Category: महाराष्ट्र

Maharashtra News

शिवसेनेचे वामन म्हात्रे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार

  शिवसेनेत दुसऱ्या बंडखोरीचे संकेत, २८ ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार बदलापूर : महायुतीतील कुरबुऱ्या आता उघडपणे सुरू असून मुरबाड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर सोमवरी…

 राष्ट्रीय स्तरावरील’कोकण रत्न’ राष्ट्रीय मेनू २०२५ शिबिर रत्नागिरीत

रत्नागिरी : अशोक गायकवाड* २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ५ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण रत्न’ हे मेनू शिबिर होत आहे, अशी माहिती कमांडींग ऑफीसर कमांडर के. राजेश कुमार यांनी दिली. ‘हमारा समुदंर हमारी शान’ हे ब्रीद घेऊन हे १० दिवसांचे शिबिर होणार आहे. ‘कोकण रत्न’ या शिबिराचा शुभांरभ ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता अल्ट्राटेक जेटीवर एससीसीचे एडीजी मेजर जनरल योगेंदर सिंग यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी ते जयगड ते बोरीया परत याच मार्गाने रत्नागिरी असा १२२ नॉटीकल मैल नौका भ्रमण असणार आहे. या शिबिरामध्ये पुणे, मुंबई अ आणि ब, नागपूर, औरंगाबाद, अमरावती व कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेड क्वार्टरमधून ६० राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट सहभागी होणार आहेत. पथनाट्यातून समुद्र स्वच्छतेविषयी विशेषत: सागरी किनारे स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे. ‘हमारा समुंदर, हमारी शान’ हे घोषित वाक्य घेऊन स्वच्छता, सुरक्षितता याविषयी जनजागृती होणार आहे. नौसेना आणि कोस्टगार्ड या दोघांचेही या शिबीरासाठी सहकार्य असणार आहे. पश्चिमी कमांडिंग युनिटच्या माध्यमातून हवामान बदल याबाबतची माहिती मिळणार आहे. तर कोस्टगार्डच्या माध्यमातून सर्च, रेस्क्यु, हेलिकॉप्टर आदींची मदत होणार आहे. एक सुरक्षा बोट, २ रेस्क्यु बोटी आणि नेव्हीचे सेलर यांचाही समावेश असणार आहे. यावेळी कार्यकारी अधिकारी अंकित रवी उपस्थित होते. 000

 मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान नाशिक : शनिवारी रात्री मुसळधार वादळी पावसाने चांदवड, देवळा, पेठ या तालुक्यांसह सिन्नर, नाशिक आणि निफाड भागास चांगलेच झोडपले. चांदवडमध्ये दोन बंधारे फुटून उमराणे, परसूल भागात तारांबळ उडाली. जिल्ह्यात ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन, भात, डाळिंबाचा समावेश आहे. ८०६ गावांतील तब्बल ७६ हजार ५५८ शेतकऱ्यांना फटका बसला. शेकडो घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक घरांची पडझड झाली. परतीच्या पावसाने चांदवड आणि देवळा तालुक्यात हाहाकार उडवला. चांदवड तालुक्यात मातीचा बंधारा फुटल्याने गावातील लोकांना हलवावे लागले. नाशिक शहरासह कळवण, पेठ, सिन्नर, येवला आदी तालुक्यात अवघ्या काही तासात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती होती. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिवृष्टीमुळे चांदवड तालुक्यात सर्वाधिक (१०९९२ हेक्टर), देवळा (८२३६), सटाणा (८८५३), पेठ (६२३०), इगतपुरी (१८३१), निफाड (८०७), येवला (१०७६), मालेगाव (९३५), नाशिक (७५०), कळवण (३४१), त्र्यंबकेश्वर ( ४३३), सुरगाणा (६६६), दिंडोरी (१०५) असे एकूण ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कांदा (१२९६१ हेक्टर) व मक्याचे (११५८४) सर्वाधिक नुकसान झाले. सोयाबीन (३२६), भात (९०४८, भाजीपाला (२९५८), कांदा रोपवाटीका (६४२), द्राक्षे (६२४), डाळिंब (४०८) हेक्टर नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. ८०६ गावातील ७६ हजार ५५८ शेतकरी बाधित झाले. यात सटाणा (१७१३५), देवळा (१६१७८), चांदवड (१५९००) पेठ (१३१४७), इगतपुरी (३३२१), सुरगाणा (२६८३), नाशिक (२०२८), येवला (१४८७), त्र्यंबकेश्वर (११०४), कळवण (७६७), मालेगाव (५४९) शेतकऱ्यांचा समावेश आहे. चांदवड तालुक्यात पावसाचे पाणी शिरून १०० घरे, ४६ दुकानांचे नुकसान झाले. तालुक्यात ३५ घरांची पडझड झाली. २३ जनावरे दगावली. देवळा तालुक्यात वेगळी स्थिती नव्हती. शहरातून जाणाऱ्या कोलथी, भावडी नद्यांसह तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली. ढगफुटीसदृश पावसाचा कापशी, भिलवाड, वाखारी आदी गावांना फटका बसला. सात घरांची पडझड तर, ४५ घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. ००००

 मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

 चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान   नाशिक : शनिवारी रात्री मुसळधार वादळी पावसाने चांदवड, देवळा, पेठ या तालुक्यांसह सिन्नर, नाशिक आणि निफाड भागास चांगलेच झोडपले. चांदवडमध्ये दोन बंधारे फुटून उमराणे, परसूल भागात तारांबळ उडाली. जिल्ह्यात ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन, भात, डाळिंबाचा समावेश आहे. ८०६ गावांतील तब्बल ७६ हजार ५५८ शेतकऱ्यांना फटका बसला. शेकडो घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक घरांची पडझड झाली. परतीच्या पावसाने चांदवड आणि देवळा तालुक्यात हाहाकार उडवला. चांदवड तालुक्यात मातीचा बंधारा फुटल्याने गावातील लोकांना हलवावे लागले. नाशिक शहरासह कळवण, पेठ, सिन्नर, येवला आदी तालुक्यात अवघ्या काही तासात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती होती. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिवृष्टीमुळे चांदवड तालुक्यात सर्वाधिक (१०९९२ हेक्टर), देवळा (८२३६), सटाणा (८८५३), पेठ (६२३०), इगतपुरी (१८३१), निफाड (८०७), येवला (१०७६), मालेगाव (९३५), नाशिक (७५०), कळवण (३४१), त्र्यंबकेश्वर ( ४३३), सुरगाणा (६६६), दिंडोरी (१०५) असे एकूण ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कांदा (१२९६१ हेक्टर) व मक्याचे (११५८४) सर्वाधिक नुकसान झाले. सोयाबीन (३२६), भात (९०४८, भाजीपाला (२९५८), कांदा रोपवाटीका (६४२), द्राक्षे (६२४), डाळिंब (४०८) हेक्टर नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. ८०६ गावातील ७६ हजार ५५८ शेतकरी बाधित झाले. यात सटाणा (१७१३५), देवळा (१६१७८), चांदवड (१५९००) पेठ (१३१४७), इगतपुरी (३३२१), सुरगाणा (२६८३), नाशिक (२०२८), येवला (१४८७), त्र्यंबकेश्वर (११०४), कळवण (७६७), मालेगाव (५४९) शेतकऱ्यांचा समावेश आहे. चांदवड तालुक्यात पावसाचे पाणी शिरून १०० घरे, ४६ दुकानांचे नुकसान झाले. तालुक्यात ३५ घरांची पडझड झाली. २३ जनावरे दगावली. देवळा तालुक्यात वेगळी स्थिती नव्हती. शहरातून जाणाऱ्या कोलथी, भावडी नद्यांसह तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली. ढगफुटीसदृश पावसाचा कापशी, भिलवाड, वाखारी आदी गावांना फटका बसला. सात घरांची पडझड तर, ४५ घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.

 आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यविरुध्द ११ गुन्हे

८८ हजारांचा माल जप्तः ४ पथकांची करडी नजर-कीर्ती शेडगे   रत्नागिरी : अशोक गायकवाड विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु १७६ लिटर, देशी मद्य ६.६६ लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य १२.२४ लिटर, रसायन १५०५ लिटर असा एकूण रुपये ८८ हजार २५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑकटोबरपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारुची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाची करडी नजर असून, त्याविरुध्द कठोर कारवाई करण्याकरिता या विभागाकडून ४ पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारु धंद्याना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाने १ ऑक्टोबर ते दि. १४ ऑक्टोबर या कालवधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ८० गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु २०३२ लिटर, देशी मद्य १३.६८ लिटर, विदेशी मद्य ९.०० लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य २०५.६५ लिटर, रसायन ३११५० लिटर, प्लॅस्टिकचे बॅरल, कॅन व काचेचे ग्लास असा एकूण रुपये १५ लाख ४४ हजार ४१० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई- गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गांवरुन प्रवाशी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून करण्यात येत आहे. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुध्द अशी कारवाई येथून पुढेही सुरु राहील. जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्स अॕप क्रमांक- ८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक- १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती शेडगे यांनी केले आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी / खबर देणाऱ्या व्यक्तीचे नाव या विभागाकडून गुप्त ठेवण्यात येईल. 0000

 नाशकातून आता नव्या वेळेत झेपावणार विमाने

‘इंडिगो’चे हिवाळी वेळापत्रक जाहीर; २- २७ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी   हरिभाऊ लाखे नाशिक : इंडिगो कंपनीने नाशिक विमानसेवेचे हिवाळी सत्रातील वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार नाशिकच्या विमानांच्या वेळांत काही बदल करण्यात आले आहेत. काही शहरांतून नवी आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीही उपलब्ध होणार आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून या बदलांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवानगी प्राप्त झाल्यानंतर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नाशिक विमानतळावरील इंदूर, गोवा, नागपूर, अहमदाबाद, बेंगळुरू, नवी दिल्ली, हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यांपैकी काही शहरांच्या विमानांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. बेंगळुरूसाठी एक तास आधी, तर हैदराबादसाठी दोन तास आधी विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंदूरची वेळ तीन तास उशिरा, तर अहमदाबाद विमानाची वेळ दुपारऐवजी सायंकाळची करण्यात आली आहे. नवी दिल्ली विमानाच्या वेळेत मात्र कोणताही बदल नाही. दि. २७ ऑक्टोबरपासून नाशिक येथून जयपूरसाठी (व्हाया इंदूर) विमानसेवाही सुरू होत आहे. नव्या वेळापत्रकानुसार नाशिकला अबूधाबी, बँकॉक, कोलम्बो, शिकागो, दुबई, हाँगकाँग, काठमांडू, मॉरिशस, वॉशिंग्टन यांसारख्या ४२ देशांतील शहरांना दररोज आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. वेळांतील बदल नाशिक- गोवा : दुपारी १२.०५ ऐवजी १२ वाजता उड्डाण, १.५० ऐवजी १.४० ला लॅण्डिंग नाशिक-अहमदाबाद : सकाळी १०.४५ ऐवजी सायंकाळी ५.४५ ला उड्डाण, दुपारी १२.१० ऐवजी सायंकाळी ६.५५ ला लॅण्डिंग नाशिक नागपूर : सायंकाळी ४.२० ऐवजी ४.३५ ला उड्डाण, सायंकाळी ६.१० ऐवजी ६.०५ ला लॅण्डिंग नाशिक-हैदराबाद : दुपारी २.२५ ऐवजी १२.३० ला उड्डाण, सायंकाळी ४.२० ऐवजी दुपारी २.१० ला लॅण्डिंग नाशिक-बेंगळुरू : सायंकाळी ४.५० ऐवजी ३.४० ला उड्डाण, सायंकाळी ६.३५ ऐवजी ५.३० ला लॅण्डिंग नाशिक-इंदूर : दुपारी ११.०५ ऐवजी २.४० ला उड्डाण, १२.२० ऐवजी ३.५० ला लॅण्डिंग गोव्याच्या दाबोलिम विमानतळावर लॅण्डिंग गोव्यात आता उत्तर गोवा विमानतळाऐवजी दाबोलिम विमानतळावर नाशिक विमानाचे लॅण्डिंग होणार आहे. या विमानतळावर सेवा शुल्क कमी असल्याने प्रवाशांच्या विमानभाड्यात काहीशी कपात होणार आहे.

महाराष्ट्रात आम आदमी पक्ष दोन जागा मागणार

कुडाळ : आम आदमी पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेच्या दोन जागा लढवण्याची इच्छा असल्याचे आम आदमी पक्षाचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सांगून महाराष्ट्रात इंडिया आघाडीला कोणतेही प्रकारचे नुकसान होणार नाही…

जुने वृत्तपत्र रद्दी विक्रीसाठी दरपत्रके सादर करा – मनिषा पिंगळे

अशोक गायकवाड अलिबाग : स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात २२ ऑक्टोबरपर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी केले आहे. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या…

पोषण महिना अभियानात ३ वर्ष रायगड जिल्हा राज्यात प्रथम पाच क्रमांकात

अदिती तटकरे यांच्या हस्ते गौरव, डॉ. किशन जावळे व निर्मला कुचिक यांनी स्वीकारला पुरस्कार अशोक गायकवाड अलिबाग : देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारतर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण महिना अभियान राबविण्यात…

शासकीय आवारामध्ये निवडणूकीच्या घोषणा देण्यास, मतदाराला प्रलोभन दाखविण्यास निर्बंध – एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय / संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, सदरील…