Category: मुंबई

Mumbai news

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धा

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धा खालसाचे तायक्वांडोपटू चमकले मुंबई : जालंधर (पंजाब) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत किंग सर्कल येथील गुरु नानक खालसा कॉलेजच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना तीन कास्य पदकांची कमाई केली.  या अ.भा. आंतरविद्यापीठ स्पर्धेत देशभरातील २३४ विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता, तर एक हजारपेक्षा जास्त खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. खालसा कॉलेजच्या आर्यन येवलेने‌ ६८ किलो वजनी गटात, तर ८० किलो खालील वजनी गटात निहाल भोईरने आणि ओम कदमने आपली छाप पाडताना कांस्य पदके मिळवली. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यांमध्ये यांना निसटता पराभव पत्कारावा लागला. अन्यथा त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का होता. या तिघांना प्रशिक्षक राजेश मुरव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रत्ना शर्मा यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे खास  अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका जसवीर कौर यांनी देखील खेळाडूंच्या या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.

भारताचे प्लास्टिक निर्यात ५० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य

मुंबईत ‘प्लास्टिवर्ल्ड २०२६’ला प्रारंभ भारताचे प्लास्टिक निर्यात ५० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य मुंबई : प्लास्टिक अंतिम उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले पहिलेच उद्योग ते उद्योग प्रदर्शन आणि खरेदीदार-विक्रेता व्यासपीठ…

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे

मुंबईतील सफाई कामगारांना मिळणार हक्कांची घरे उपाध्यक्षांच्या पुढाकारानंतर मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना’ अधिवेशनात जाहीर होणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी घडामोड घडली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना अंतर्गत त्यांना हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने म्युन्सिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने शासन निर्णय २००८ व २०१५ ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत, मुंबई महापालिकेने नव्याने उभारलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना मालकी हक्काने देण्याचे ठोस आश्वासन दिले. तसेच या योजनेची अंमलबजावणी येत्या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मागणीसाठी म्युन्सिपल मजदूर युनियन, मुंबईच्या वतीने २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आंदोलनापूर्वीच उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणली आणि तोडगा काढण्यात यश मिळवले. मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण ३६ वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले असून सुमारे १२,२०० नवीन घरे उभारण्यात आली आहेत. यापैकी ५० टक्के घरे सफाई कामगारांना देण्याचा निर्णय घेतल्याने हजारो कुटुंबांना स्थिर निवासाची संधी उपलब्ध होणार आहे. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, वामन कविस्कर, हिंदुराव जाधव आदी उपस्थित होते.

तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल

तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल रमेश औताडे मुंबई : डॉ.आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळे सर्वांसाठी खुले करून समानतेचा ऐतिहासिक लढा उभारला होता. मात्र आजही सामान्य नागरिकांना पाण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी हा मूलभूत हक्क आहे त्यामुळे शासनाने पाणी सर्वांसाठी मोफत केले तरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली शासनाकडून वाहिली गेली असे सिद्ध होईल. असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी सांगितले. प्रदेश प्रवक्ते धर्माजी बागडे, भोजराज वैद्य, प्रमुख पाहुणे धर्माजी बागडे, जयदेव चिंवडे, प्रकाश कांबळे, प्रविण आवळे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले.पुण्यशील बोदिले.अभिषेक मिश्रा, रोहित पांडे, राहूल द्विवेदी सतिश शुक्ला ,पवन वर्मा,शिबू पांडे, सुरेंद्र तिवारी अतुल गंगापूरकर उपस्थित होते. नारायण बागडे यांनी असे अनेक उपक्रम राबवत शासनाला वेळोवेळी सूचना केल्या आहेत. मात्र सरकार या सूचना अंमलात आणत नाही. याचे मोठे दुःख आहे असे धर्माजी बागडे यांनी सांगितले.

सेशेल्समध्ये आयएनएस ‘त्रिकंद’चा दमदार सागरी ठसा

सेशेल्समध्ये आयएनएस ‘त्रिकंद’चा दमदार सागरी ठसा ‘लामितिये 2026’ सरावात भारतीय नौदलाचा पहिलाच सहभाग मुंबई : भारतीय नौदलाचे अदृष्यता-क्षम युद्धनौका आयएनएस त्रिकंदने २० मार्चला पोर्ट विक्टोरिया येथील यशस्वी बंदर भेट पूर्ण करून तेथून प्रस्थान…

सचिन अहिर सामान्यांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ व्यक्तिमत्व!

सचिन अहिर सामान्यांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ व्यक्तिमत्व! खासदार अरविंद सावंत यांचे कामगार मेळाव्यात गौरवोद्गार! मुंबई-आज राजकारणात बरीच माणसे इकडून तिकडे पळत आहेत.परंतु सचिन अहिर असे व्यक्तिमत्व आहे की,पक्षात आले ते नुसते स्थिरावलेच नाहीत तर ‌मजबूतीने‌ काम करीत आहेत. ते एक निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच. परंतु पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेत मुंबई शहरातील सर्वसामा न्यांच्या विशेषतः गिरणी कामगारांच्या प्रश्नावर तुटून पडत आहेत! असे गौरवोद्गार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी येथे गिरणी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना कामगार नेते सचिन अहिर यांचा गुणगौरव करतांना काढले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांचा वाढदिवस आणि ते नेतृत्व करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय‌ कामगार संघाचा ३० वा वर्धापनदिन काल परेलच्या‌ महात्मा गांधी सभाग्रहात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला,त्यावेळी माजी केंद्रीयमंत्री आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत आमदार सचिन अहिर यांचे अभिष्टचिंतन करताना बोलत होते. प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्ष सचिन अहिर यांच्या कन्या ऐश्वर्या यांचाही वाढदिवसानिमित्त येथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी खासदार अरविंद सावंत,सचिन अहिर यांचा गुणगौरव करताना पुढे म्हणाले, ते निश्चितच चाणक्य आहेत,याचे कारण विधानपरिषदेत जरा जरी चुकीचे विधान केले गेले तर त्याचा खुलासा करून घेतल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत.तेव्हा सामान्यांच्या प्रश्नावर शासकीय स्तरावर चलढकलपणा स्वीकारून जर त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही धडाकेबाज कामातून ते दाखवून डदेऊ,असाही निग्रह खासदार अरविंद सावंत यांनी येथे कामगारांच्या मेळाव्यात‌ बोलताना व्यक्त केला.खासदार अरविंद सावंत यांनी अहिर यांच्या कन्या ‌कुमारी ऐश्वर्या यांचाही वाढदिवसानिमित्त गुणगौरव केला आहे.  त्यावेळी सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले ,सचिनभाऊ अहिर यांनी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून,युनियनचे‌‌ काम संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरातपर्यंत वृद्धिंगत केले आहे. संघर्ष आणि संयम यांची अचूक सांगड घालत राज्याच्या विविध औद्योगिक क्षेत्रात त्यांनी युनियनचे कार्य विस्तारत नेले आहे. याप्रसंगी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे नेते ऍड. बबन मोरे,सत्यवान उभे, रमाकांत बने आदींनी आपल्या भाषणात अध्यक्ष सचिन अहिर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार अजय चौधरी तसेच मुंबई पुण्याकडील अनेक लोकप्रतिनिधींनी सचिन अहिर यांना भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पदाधिकारी सर्वश्री राजन लाड,मिलिंद तांबडे,सुनील अहिर, उत्तम गीते,संजय कदम, विजय काळोखे,सुनील बोरकर, बजरंग चव्हाण, शिवाजी काळे,साई कुमार निकम,किशोर रहाटे,अवधेश पांड्ये,विश्वनाथ सावंत  आदी पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. अध्यक्ष सचिन अहिर यांचा वाढदिवस आणि ‌युनियनचा वर्धापन कामगार प्रतिनिधींनी रक्तदान, वृक्षारोपण,क्रीडा सामने आदी‌ सार्वजनिक उपक्रमाने संपन्न केला.

 सरकारच्या आश्वासनानंतर सफाई कामगारांचा आझाद मैदानात जल्लोष

सरकारच्या आश्वासनानंतर सफाई कामगारांचा आझाद मैदानात जल्लोष रमेश औताडे मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांच्या मागणीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनने पुकारलेले ‘वर्षा’ निवासस्थानावरील आंदोलन यशस्वी झाले व सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर सफाई कामगारांचा जल्लोष आझाद मैदानात पाहायला मिळाला. म्युनिसिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारो सफाई कामगार आपल्या कुटुंबासह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकले होते. यावेळी झालेल्या चर्चेत सरकारने सफाई कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर लवकरच ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शासन निर्णयाची (GR) प्रभावी अंमलबजावणी करून कामगारांना न्याय दिला जाईल, असे संकेत दिले. अशोक जाधव यांनी स्पष्ट केले की, “आम्ही सरकारवर विश्वास ठेवून तूर्तास आंदोलन स्थगित करत आहोत. मात्र सरकारने दिलेल्या शब्दाला सरकार जर जागले नाही तर अधिक उग्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा जाधव यांनी दिला.

लहुजी साळवे नावाने स्वतंत्र ‘मांग बटालियन’ स्थापन करा

लहुजी साळवे नावाने स्वतंत्र ‘मांग बटालियन’ स्थापन करा रमेश औताडे मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आणि महाक्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या नावाने स्वतंत्र ‘मांग बटालियन’ स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे मुंबई उपविभाग प्रमुख नरसिंग सोपानराव सूर्यवंशी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन टपालाने  पाठवले आहे. भारतीय लहुजी सेनेने आपल्या निवेदनात मांग समाजातील तरुणांच्या रोजगाराचा आणि लष्करी प्रशिक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने मांडला आहे. निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः स्वतंत्र मांग बटालियनची निर्मितीः समाजाच्या शौर्याचा वारसा जपत ‘मांग बटालियन’ची स्थापना करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना या बटालियनमध्ये विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना तातडीने सरकारी नोकरीत सामावून घ्यावे. सर्व पोटजातींचा समावेशः मांग समाजातील एकूण १२ पोटजातींमधील तरुणांना याचा लाभ मिळावा. यामध्ये मांग, मातंग, मिनी मादिक, मादिक, दानखणी मांग, मांग मटाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, तसेच २२ मे २०१२ च्या निर्णयानुसार समाविष्ट मादगी आणि मादिगा या जातींचा उल्लेख पत्रात केला आहे. मंत्रालयाने १७ मार्च २०२६ रोजी त्याची दखल घेत त्यावर स्वाक्षरी केली आहे. आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.

मुंबई इंडियन्सचे बँकिंग भागीदार उत्कर्ष स्मॉल फायनान्स

मुंबई इंडियन्सचे बँकिंग भागीदार उत्कर्ष स्मॉल फायनान्स रमेश औताडे मुंबई : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (उत्कर्ष एसएफबीएल) टी-२० २०२६ च्या लीगसाठी ‘ मुंबई इंडियन्स ‘ चे अधिकृत बँकिंग भागीदार म्हणून निवड झाली असून बँकेने या महत्वपुर्ण भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीच्या माध्यमातून बँक आपली राष्ट्रीय स्तरावरील ओळख वाढवण्याबरोबरच देशभरातील कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांशी आपले नाते अधिक दृढ करत आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद सिंग, मुख्य वित्त अधिकारी  सरजुकुमार प्रवीण सिमारिया आणि कन्झ्युमर बँकिंग प्रमुख सौरभ घोष तसेच मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या भागीदारीचा एक भाग म्हणून, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे चे उद्दिष्ट विविध ग्राहक वर्गांशी आपला संवाद आणि सहभाग वाढवणे, तसेच या हंगामादरम्यान राबवल्या जाणाऱ्या एकात्मिक मार्केटिंग उपक्रमांद्वारे व इतर नियोजित कार्यक्रमांद्वारे आपल्या ब्रँडची उपस्थिती करणे आहे.

सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे !

सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे ! आंदोलनकर्त्यांचा आझाद मैदानातून सवाल रमेश औताडे मुंबई : आमची जमीन, आमचा समुद्र, आमचा निसर्ग आणि आमचे अस्तित्व वाचविण्यासाठी व विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात आझाद मैदानात महामोर्चा काढत, “ सरकार नेमके कुणासाठी काम करत आहे “ असा सवाल करण्यात आला. आदिवासी, मच्छीमार व इतर वंचित घटकांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने भर उन्हात सहभाग नोंदवला. मच्छीमार नेते व आयोजक कमिटीचे सर्व सदस्य, नारायण पाटील संघर्ष समिती चे वैभव वजे, लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, ज्योती मेहेर, उज्वला पाटील असे अनेक समाज प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. समुद्रात होणारे विमानतळ आणि पर्यावरणास घातक ‘चौथी मुंबई’ योजना तात्काळ थांबवा. मुंबईतील कोळीवाड्यांचे, बाजारांचे पुनर्विकास धोरण मच्छिमारांच्या हिताचे करा. ससून डॉक, मुंबई येथे बंद केलेली गोदामे त्वरित ताब्यात द्यावी. कफ-परेड, मुंबई येथील प्रस्तावित ‘मरीना पार्क’ प्रकल्प रद्द करावा. छत्रपती शिवाजी महाराज बाजार (क्रॉफर्ड मार्केट) कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित करू नये. मुंबई येथील सर्व बाजारांचा विकास करताना मच्छीमार महिलांना विश्वासात घ्यावे. मच्छिमारांची सर्व प्रकारची थकीत कर्जे शेतकऱ्याप्रमाणे माफ करावी. गोराई येथील प्रस्तावित निक्षारीकरण प्रकल्प रद्द करावा. घराच्या व मासळी सुकविण्याच्या, बोटी शाकारणीच्या वहिवाटी खालच्या जागा नावे करा. या मागण्या करण्यात आल्या. मोठ्या भांडवलदारांसाठी आदिवासी, भूमिहीन, मच्छीमार अशा घटकावर अन्याय तर होत आहेच, मात्र जे या प्रकल्पात सहभागी नाहीत त्यांना प्रदूषित हवेच्या माध्यमातून या प्रकल्पाचा फटका बसणार आहे, असे किरण कोळी यांनी सांगितले. सरकारने आता अधिवेशनातील उरलेल्या दोन दिवसांत आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हा लढा अजून तीव्र होईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.