Category: मुंबई

Mumbai news

पैसे वाटप संशयावरून कोपरखैरणेत हाणामारी 

नवी मुंबई : विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया संपण्यास काही तास राहिले असता स्वराज्य पक्ष आणि भाजप कार्यकर्त्यात हाणामारी झाली आहे. सेक्टर पाच येथील माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयासमोर सदर प्रकार घडला. मतदान…

चहाल वेळ नसते पण वेळेवर चहा मिळाल तर… मतदानाच्या धामधुमती उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी चहाचा कार्यकर्त्यांसमवेत असा आस्वाद घेतला.

मतदान संपले, आकड्यांचा खेळ सुरू महाराष्ट्रातही एक्झिट पोलचा ‘झोल’

 महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्याबाजूने , 3 मविआच्या बाजूने तर एकात कुणालाच बहुमत नाही मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेसाठी तब्बल ६० टक्के मतदान झाले असून आता महाराष्ट्रात एक्झिट पोलच्या आकड्यांचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी आज मतदान झाले आहे. येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यापुर्वीच महाराष्ट्रात एक्झिट…

केतकी धुरेची 158 धावांची नाबाद खेळी; भारत सीसीचा मोठा विजय 

– एमसीए महिला क्रिकेट लीग 2024   मुंबई : मधल्या फळीतील केतकी धुरेच्या 158 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारत सीसीने तिसऱ्या एमसीए महिलांच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात ग्लोरियस सीसीविरुद्ध 97 धावांनी विजय मिळवला. न्यू हिंद मैदान, माटुंगा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात मंगळवारी केतकी हिने सर्वोत्तम कामगिरीमध्ये सातत्य राखताना 116 चेंडूमध्ये 22 चौकार आणि 4 षटकारांसह झंझावाती दीड शतकी खेळी केली. तिच्या फटकेबाज शतकी खेळीमुळे भारत सीसीने डाव 40 षटकांत 6 बाद 261 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात ग्लोरियस सीसीचा डाव 40 षटकांत 8 बाद 164 धावांवर संपला. साध्वी संजय (७७ धावा) आणि वैष्णवी वर्मा (४८ धावा) वगळता त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. भारत सीसीकडून कशिश निर्मल ३७ धावांत २ आणि निर्वाण राणे २६ धावांत २ विकेट घेत मोठा विजय आणखी सुकर केला. डॉ. डी. वाय. पाटील एसएने केआरपी इलेव्हन क्रिकेट क्लबला १३७ धावांनी पराभूत केले. स्वरा खेडेकरची नाबाद शतकी खेळी (115 चेंडू, 12 चौकार) तसेच लावण्या शेट्टी (8 धावांत 3 विकेट),  वर्षा नागरे (28 धावांत 3 विकेट), प्रिया मेहताने आणि मेगन रॉड्रिग्जची (प्रत्येकी २ विकेट) प्रभावी गोलंदाजी त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. प्रथम फलंदाजी करताना डी.वाय. पाटीलने 40 षटकांत 5 बाद 217 धावा केल्या. त्यानंतर त्यांनी केआरपी इलेव्हन सीसीला 24.3 षटकांत अवघ्या 80 धावांत गुंडाळले. एका अन्य सामन्यात, भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या जान्हवी काटेने (धावा 110, 103 चेंडू, 13 चौकार, 1 षटकार) आणखी एक शतक झळकावून एकतर्फी सामन्यात फोर्ट यंगस्टर्स सीसीला व्हिक्ट्री सीसीविरुद्ध 83 धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. संक्षिप्त धावफलक: भारत सीसी – 40 षटकात 6 बाद 261 (केतकी धुरे 158* (116 चेंडू, 22 चौकार, 4 षटकार), लक्ष्मी सरोज 37; दिशा चांडक 2/24, वैष्णवी वर्मा 2/38) वि. ग्लोरियस सीसी – ४० षटकांत ८ बाद १६४(साध्वी संजय ७७, वैष्णवी वर्मा ४८; कशिश निर्मल २/३७, निर्वाण राणे २/२६). निकाल  – भारत सीसी ९७ धावांनी विजयी. डॉ. डी. वाय. पाटील एसए – 40 षटकांत 5 बाद 217 (स्वरा खेडेकर 100* (115 चेंडू, 12 चौकार); चेतना कांबळे 2/31) वि. केआरपी इलेव्हन सीसी –…

बॉम्बे जिमखाना क्रिकेट निवडचाचणी २१ आणि २२ नोव्हेंबरला

मुंबई : बॉम्बे जिमखान्याच्या बीजी केअर्स (BG Cares) या सीएसआर उपक्रमातर्गत जिमखाना मैदानावर २१ आणि २२ नोव्हेंबर २०२४ रोजी १९ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या १९ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट…

१८८ पनवेल विधानसभा मतदार संघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, त्यांच्या मातोश्री शकुंतला ठाकूर, पत्नी वर्षा ठाकूर, बंधू परेश ठाकूर, अर्चना…

मतदारयादीतील घोळामुळे दिव्यांग मतदारांना नाहक त्रास

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची बुधवारी धावपळ सुरू होती. तर दुसरीकडे बहुसंख्य मतदारांच्या घरी मतदार माहिती चिठ्ठी पोहोचली नसल्यामुळे मतदान केंद्रात पोहोचल्यानंतर अनेकांना…

राज ठाकरेंच्या बनावट पत्राप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा, आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबईः वरळीतील तिरंगी लढतीमुळे चुरस निर्माण झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचे बनावटपत्र वायरल झाले असून त्यात राज ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात धनुष्यबाणाला समर्थन दिल्याचे नमुद करण्यात आले…

तृतीयपंथींनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई  ः तृतीयपंथी समाजाला मोठ्या संघर्षातून मतदानाचा हक्क मिळाला आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी  बुधवारी (ता. २०) विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील तृतीयपंथींनी मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. तृतीयपंथी समाजाला मतदानाच्या हक्कापासून कित्येक वर्षे वंचित राहावे लागते होते. आपल्या मतदानाच्या मूलभूत अधिकारासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयात लढा द्यावा लागला होता. मुंबई व उपनगरात मोठ्या संख्येने तृतीयपंथी समाजाचे वास्तव्य आहे. त्यात उपनगरात १,०७६ पेक्षा अधिक तृतीयपंथी राहतात. घाटकोपर, मानखुर्द, मानखुर्द, शिवाजीनगर, सायन कोळीवाडा, धारावी, माहीम, दहिसर, विलेपार्ले, अंधेरी पश्चिम, विक्रोळी, वडाळा, वर्सोवा व अन्य मतदान केंद्रांवर जाऊन तृतीयपंथींनी मतदान केले. कागदपत्राच्या अपुऱ्या अभावामुळे कित्येक तृतीयपंथींना मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित रहावे लागले आहे. लोकप्रतिनिधी निवडण्याची ताकद आपल्या बोटात आहे. आमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदान केल्याची भावना किन्नर माँ संस्थेच्या अध्यक्षा सलाम खान यांनी व्यक्त केली आहे. ०००