Category: मुंबई

Mumbai news

सोमय्या मानहानी केसमध्ये संजय राऊतांना जामीन

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना न्यायालयाने अंशतः दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांना १५ हजारांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच शिक्षेविरोधात सत्र…

हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात ताडदेव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आला होता. धमकी देणाऱ्या…

मेट्रोच्या खड्ड्यात पडून महिलेने जीव गमावला

मुंबई : मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला होता. यामुळं विविध भागात पाणी साचलं होतं. सिप्झ परिसरात मेट्रोच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला होता. त्या खड्ड्यात पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अंडरग्राऊंड मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात महिला पडून…

राष्ट्रवादीला सोबत घेणे आमच्या मतदारांना आवडले नाही : फडणवीस

मुंबई : अजित पवारांना महायुतीत घेतल्याने भाजपाला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याची कबूली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिली. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर नाराज झालेल्या समर्थकांना ही तडजोड का करावी लागली, हे समजवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे प्रतिपादन फडणवीसांनी केले. ‘इंडिया…

भुजबळांची तब्येत बिघडली; पुण्यातून एअर लिफ्ट केले

मुंबईतील बॉम्बे रुग्णालयीत उपचार सुरू०प्रकृती स्थिर मुंबई- महाराष्ट्राचे अन्न, नागरि पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातून एअर लिफ्ट करून मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं…

निवडणूकीचे काऊंटडाऊन सुरु केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत दाखल

स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रातील निवडणूकीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. महाराष्ट्रातील आगामी निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांसह केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव…

ज्येष्ठ फार्मासिस्ट सत्कार, पोस्टर स्पर्धा संपन्न

 जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त  बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ऍण्ड रिसर्च, डोंबिवली असोसिएशनचा संयुक्त कार्यक्रम डोंबिवली : जागतिक फार्मासिस्ट दिन डोंबिवली शहरात साजरा करण्यात आला. बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च आणि डोंबिवली केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेण्यात आले. 25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिना निमित्त बॉम्बे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च आणि डोंबिवली केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ फार्मसी सत्कार, पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासनाचे माजी आयुक्त अभिमन्यूजी काळे यांच्या हस्ते नीरज इंगळे, सुनंदा बिराजदार, तलाक्षी छेडा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख, मल्हार नार्वेकर सीईओ, जॉन डिसोझा प्राचार्य, शिक्षक वृंद डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी फार्मासिस्ट उपस्थित होते. कॉलेज कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन यावेळी अभिमन्यू काळे, निलेश वाणी, संजू भोळे, विलास शिरुडे, राजेश कोरपे अन्य पदाधिकारी कॉलेजचे शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डोंबिवली केमिस्ट असोसिएशनच्या वतीने माजी आयुक्त अभिमन्यू काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी विकास कामाचा भूमिपूजन सोहळा

राजेंद्र साळसकर मु़ंबई – श्री संत संताजी जगनाडे महाराजांचे श्रीक्षेत्र सुदुंबरे येथील समाधी मंदिर विकास कार्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून  ६६.११कोटी निधी मंजुर झाला आहे. या तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत विकास आराखड्या नुसार विकासकामाचे भूमिपूजन शुक्रवार ४ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजता सुदुंबरे तालुका चाकण जिल्हा पुणे येथे होणार आहे. सदर मिटिंगमध्ये श्री संत संताजी जगनाडे महाराज महासंघाचे अध्यक्ष मधुकर नेराळे  यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा मुंबईत घेण्यात आली होती. यावेळी दत्ताजी कहाणे, देवीदास राऊत , सुभाष कसाबे, विजय निगडकर तसेच समाज इतर मुख्य प्रतिनिधी उपस्थित होते. या भूमीपूजन सोहोळ्याचे सर्वांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री संत संताजी  जगनाडे महाराज महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख दिलीप खोंड यांनी  सर्व तेली समाज बांधवांना एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सर्व धर्म गुरूंनी शांती संदेश समाजात रुजवावा ….

 ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे आवाहन रमेश औताडे मुंबई : देशात धार्मिक विद्वेषाचा वनवा पेटवून त्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. अशा वेळी सर्व धर्मातील धर्मगुरूंनी आपापल्या धर्मातील शांतीचासंदेश समाजात रुजवून विद्वेषाचा वनवा शांत करावा, असे आवाहन वारकरी विचार मंचचे अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित सर्व धर्मीय सद्भावना संमेलनात ते बोलत होते. या संमेलनाला विविध धर्मातील धर्म गुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी बोलताना शामसुंदर महाराज पुढे म्हणाले की, ज्या वेळी धर्माचा आधार घेऊन स्वार्थासाठी सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे प्रयत्न होतात. सच्चा धर्माच्या विचारांना बाजूला सारून धर्माच्या नावाने पाखंडीपणा केला जातो  तेव्हा खऱ्या धार्मिकांना त्या पाखंडाचं खंडन करून खऱ्या धर्माच रक्षण करावं लागतं. या संमेलनाला इस्लामचे उपासक मौलाना, जमात ए इस्लाम हिंदचे राष्ट्रीय पदाधिकारी, ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू फादर, वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार, प्रवचनकार, अभ्यासक, हिंदू धर्मातील साधू, सन्याशी, बैरागी, वेदशास्त्र पंडित, निरंकारी, तुकडोजी महाराज परंपरेतील गुरूदेव संप्रदायाचे प्रबोधनकार, बौद्ध भिकू, भंत्ते उपस्थित होते.

विविध प्रलंबित मागण्यासाठी दिव्यांग आझाद मैदानात

रमेश औताडे मुंबई : दिव्यांगाना अत्योदय योजनेचा लाभ का मिळत नाही ? दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना तातडीने लागू का होत नाही ? दिव्यांगाना महामंडळाकडून वितरीत केलेले कर्ज माफ का होत नाही ? असे अनेक सवाल करत प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही  सरकारचे लक्ष नाही.  कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बंद पडले त्यात आम्ही ही होतो. मग आमचे कर्ज माफ केले का नाही ? असा सवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगशे साळवी यांनी यावेळी केला. दिव्यांगाना सहा हजार रुपये पेन्शन,  प्रत्येक जिल्हयामध्ये स्वयंरोजगाराकरिता स्टॉल मिळावेत. दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मानधन खुप उशीरा जमा का होते ते लवकरात लवकर जमा करावे. प्रत्येक जिल्हयामध्ये सुसज्ज अशा दिव्यांग भवनाची निर्मिती करून आम्हाला योग्य आसरा देण्यात यावा. रेल्वे जिने हे सरकते असावेत.जेणेकरून आम्हाला योग्य प्रकारे प्रवास करता येईल. असे मंगेश साळवी यांनी सांगितले.