Category: मुंबई

Mumbai news

११व्या राष्ट्रीय पुरुष व महिला बीच कबड्डी स्पर्धा

महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांचा उपांत्य फेरीत निसटता पराभव     मुंबई:- महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांचा “११व्या राष्ट्रीय बीच कबड्डी” स्पर्धेच्या उपांत्य फेरीत निसटता पराभव. बिहार, बुद्धगया येथे सुरू…

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची माहिती देण्यासाठी

नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष बैठक     नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्ष वयाच्या व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नवी मुंबईतील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात योजनेची माहिती देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होते. या बैठकीस महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ,  ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळ तसेच महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रांचे पदाधिकारी असणारे 60 हून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी या योजनेची सविस्तर माहिती उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना दिली. भारत देशात तसेच विशेषत्वाने महाराष्ट्र राज्यात सर्व धर्मांची मोठी तीर्थस्थळे आहेत. अशा ठिकाणी एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. मात्र गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे अथवा सोबत कोणी नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेऊन साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची व दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 14 जुलै 2024 रोजी शासन निर्णय जाहीर केला असून 8 ऑगस्ट 2024 च्या शासन निर्णयान्वये योजनेमध्ये सुधारणाही जाहीर केल्या आहेत. या योजनेअंतर्गत शासन निर्णयात तीर्थस्थळांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये भारतातील 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक यांना घेता येणार असून लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटी – शर्ती आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती या बैठकीत माहिती देण्यात आली तसेच शासन निर्णयाची प्रतही उपलब्ध करून देण्यात आली. या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी विचारणा केलेल्या योजनेविषयीच्या विविध शंकांचे समाधान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्री. सुरेश पोटे, ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळचे सल्लागार श्री. प्रकाश लखापते यांनीही योजनेचा लाभ घेण्याविषयी आवाहन केले. उपस्थित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमार्फत या योजनेची माहिती नवी मुंबईतील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवावी जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल असे आवाहन समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात आले.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे मंजुषा पाटील यांचे गायन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात हा कार्यक्रम रविवार दिनांक…

आचार्य अत्रे पुरस्कारासाठी पत्रकार श्री. रमेश झवर यांची निवड

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणाऱ्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी यंदा निवड समितीने एकमताने ज्येष्ठ पत्रकार  श्री. रमेश झवर यांची निवड केली आहे. प्रत्यक्ष आचार्य अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक मराठा मध्ये काम केलेले श्री. झवर हे पन्नास वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय आहेत. दैनिक मराठा ते दैनिक लोकसत्ता असा त्यांचा सलग प्रवास आहे.  या कालावधीत उपसंपादक, वार्ताहर, मुख्य उपसंपादक, वृत्त संपादक, सहसंपादक अशा पदांवर त्यांनी काम केले आहे. दैनिक लोकसत्ता मध्ये व्यापार उद्योग पुरवणी (कॉमर्स विभाग) व प्रादेशिक विभाग हेही त्यांनी समर्थपणे सांभाळले होते. संपादकीय पानावरील लेख, स्फुट तसेच लोकसत्ताचे अनेक अग्रलेखही त्यांनी लिहिले आहेत. निवडणुका, साहित्य संमेलने, देश विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे त्यांनी वृत्तांकन केले आहे. वयाची ८० वर्षे पार केलेल्या झवर यांचे आजही समाज माध्यमांवर माहितीपूर्ण लिखाण चालू आहे. त्यांचा ब्लाॅग लोकप्रिय झाल्यावर rameshzawar.co.in ही स्वत:ची वेबसाईट त्यांनी सुरू केली. ह्या साईटलाही देश विदेशात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष म्हणूनही अनेक वर्षे ते कार्यरत होते. श्री. झवर यांचे मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे अभिनंदन. निवड समितीने केलेल्या सहकार्याबद्दलही मुंबई मराठी पत्रकार संघ आभारी आहे. 00000

 महाराष्ट्रातील रेशन दुकानात आनंदाचा शिधा गायब

ओरिसात रेशन दुकानात २४ तास धान्य ए टी एम   मुंबई / रमेश औताडे ओरिसाची राजधानी भुवनेश्वर मध्ये देशातील पहिले धान्य एटीएम (धान्य वितरण मशीन) लाँच करण्यात आले. तर महाराष्ट्रातील दुकानातून घोषित केलेला आनंदाचा शिधा गायब होत आहे. अशी भ्रष्टाचारी अवस्था असताना, देशातील ८० कोटी जनतेला रेशन व्यवस्था परिपूर्ण असल्याची केंद्रीय शिधावाटप यंत्रणा जाहिरात करत आहे. असा आरोप करत रेशन हक्क समिती ने खंत व्यक्त केली आहे. अनेक शिधावाटप दुकानात सर्व्हर डाऊन मुळे रांगेतील ग्राहक मोकळ्या हाताने घरी जातात. सर्व्हर आला तर वीज जाते, वीज आली तर थम मशीन बंद पडते, अशी तांत्रिक अडचण असताना सडके किडके धान्य, दुकानदार वेळेवर येत नाही, शिधा घेतल्यानंतर पावती देत नाही असे प्रकार अनेक दुकानात पाहायला मिळत आहेत. मागील श्री रामनवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा अनेक दुकानात मिळाला नाही. आता गणेशोत्सव काळात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली आहे. नुसत्या घोषणा करण्यापेक्षा शिधा वाटप दुकानात किमान कॅमेरे तरी लावा जेणे करून मनमानी उजेडात येईल. ओरिसामध्ये आठवड्याचे सात दिवस २४ तास शिधा देणारी ए टी एम मशीन व महाराष्ट्रात मात्र आंधळ दळतंय अन् कुत्रे पीठ खातंय अशी अवस्था आहे.

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचा एक सलाम वर्दीला

राजेंद्र साळसकर     मुंबई : आपण जे स्वच्छंदी जीवन जगतो,निवांतपणे निद्रासुख घेतो त्यामागे असंख्य दृश्य- अदृश्य पाठिराख्यांचे हात असतात हे कदापि विसरून चालणार नाही.हे पाठिराखे आपल्यासाठी देवदूतासमान आहेfत.आपल्या देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून ऊन,वारा,पाऊस,थंडी कशाचीही पर्वा न करता अहोरात्र जागून त्याचबरोबर वेळप्रसंगी आपल्या प्राणांची बाजी लावून सीमेचं रक्षण करतात ते आपल्या देशाचे जवान त्याचप्रमाणे कोणाही नागरिकाला कोणताही गंभीर आजार असो त्या रूग्णाला वाचविण्यासाठी आपले सारे वैद्यक कसब पणाला लावून व त्याची अहोरात्र सेवासुश्रुषा करून त्याचे प्राण वाचवितात हेे आपल्या साठी माणसातील देवमाणूसच आहेत.या देवमाणसाची प्रचिती आपण सर्वांनी कोरोना महामारी काळात घेतली आहेच. अशा या माणसातील देव माणसांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहेच.म्हणूनच आपल्याला अभिमानास्पद  असणा-या माणसातील देव माणसाची सेवा म्हणून त्यांच्या युनिफॉर्मची (वर्दीची) ड्रायक्लिनींग सुविधा १५ऑगष्ट ह्या स्वातंत्र्यदिनी केवळ एक रूपया सेवामूल्य घेऊन करण्याचे कॉर्पोरेट तसेच मध्यम वर्गात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आयन फिल या लॉंड्री सेवा देणा-या संस्थेमार्फत ड्रायक्लिनींग सेवा देण्यात येणार आहे.आयन फिल ने गतवर्षीही ही योजना राबविली होती तेव्हा यास प्रचंड प्रतिसाद लाभला होता. वर्दीतील देवमाणसांच्या कार्याला सलाम म्हणून यंदाच्या स्वातंत्र्यदिनीही ही योजना राबविण्याचे ठरविले असून देशाची सेवा करणारे जवान, पोलीस,डॉक्टर,परिचारिका यांनी या ड्रायक्लिनींग सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आयन फिल चे उदय पवार यांनी आग्रहाचे आवाहन केले आहे.   अधिक माहितीसाठी ७३०४६७८४८४/८४२२८९८९०२ या क्रमांकावर संपर्क करावा. 0000

मुंबई-नाशिक महामार्गावर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर डेब्रिज टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिले आहेत. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर करण्यात येणाऱ्या उपायोजनांविषयीची…

सर्वद फाऊंडेशनतर्फे डहाणूत आदिवासी  दिनाचे आयोजन

दिवासी बांधवांचा उदंड प्रतिसाद     मुंबई :  जागतिक  आदिवासी  दिनानिमित्त सर्वद फाऊंडेशनने डहाणू  मधील सारणी याठिकाणी  आदिवासी  नृत्यस्पर्धा आयोजित  केली  होती कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे पोलीस  पाटील नाना लक्ष्मण  डगला यांनी श्रीफळ वाढवून आदिवासी  पारंपरिक  पद्धतीने  केले . यानंतर  सारणी गावच्या  ग्रामस्थांनी सर्वद फाऊंडेशनचे पालघर जिल्हा  सचीव श्री. अमीत हिरे, पालघर जिल्हा  उपाध्यक्षा श्रीमती  रूपाली राऊत, सर्वदचे सल्लागार डॉ. सी. पी. देशमुख , सर्वदच्या संचालिका डॉ.. सुचिता पाटील यांचे पुष्प देऊन  स्वागत  केले .यानंतर  सर्वद फाऊंडेशन संचालिका डॉ.. सुचिता पाटील यांनी  आदिवासी  दिनाच्या सर्वांना  शुभेच्छा देऊन  आदिवासी  भाषा, संस्कृतीचे महत्त्व  विषद केले. यानंतर  वेगवेगळ्या  संघांनी तारपा नृत्य , गौरी  नृत्य , कांबड नाच, टिपरी नाच, सांगड नाच, धुमसा नाच, ढोल नाच सादर केले .सुप्रसिद्ध आदिवासी  नाटक  सोंग काढणे हेही सादर करण्यात  आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश डगला यांनी  केले. कार्यक्रमासाठी दिनेश डगला, दिनेश धर्मा डगला, दिनेश सोमण, प्रकाश पाचलकर आदि आदिवासी  मंडळीनी परिश्रम  घेतले. आदिवासी  समाजाची संस्कृती  टिकून  राहण्यासाठी  सर्वदने या कार्यक्रमाचे आयोजन करून भरघोस पारितोषिकही ठेवण्यात  आले असे श्री. अमित हिरे व श्रीमती रुपाली राऊत यांनी  पत्रकारांना सांगितले. 00000

एमएसपीसीच्या माध्यमातून फार्मासिस्ट होणार स्मार्ट

रमेश औताडे   मुंबई: महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदने  राज्यातील ४ लाख ३० हजार फार्मासिस्टला जगभरात औषध क्षेत्रामध्ये आलेले नवीन तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञा ( एआय ) च्या युगात सज्ज राहण्यासाठी व औषधांचे परिपूर्ण सखोल ज्ञान व भान येण्यासाठी ‘फार्मासिस्टची उन्नत्ती’ हा कार्यक्रम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत असल्याची माहिती अध्यक्ष अतुल अहिरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत शनिवारी दिली. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेला ७५ वर्ष झाली असून या अमृत महोत्सवानिमित्त नवीन अद्ययावत वास्तूत हा भव्य दिव्य कार्यक्रम १३ ऑगस्टला कालिदास नाट्यगृह येथे होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धर्मराव बाबा अत्राम,  कॉन्सील ऑफ इंडिया, नवी दिल्ली अध्यक्ष डॉ माँटू बुमार पटेल व अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. ००००

शरद पवार, उद्धव ठाकरेंवर ‘परमवीर अस्त्रा’चा हल्लाबोल

दरेकर, गिरीश महाजनांना अडकवण्यासाठी मातोश्रीवर, सिल्व्हर ओकवर फिल्डींग लागायची स्वाती घोसाळकर मुंबई : विधानसभेच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शऱदचंद्र पवारांची राष्ट्रवादीवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपापाठोपाठ…