शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून बंद
मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा असलेला शीव उड्डाणपूल गुरुवार, १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केला जाणार आहे. हा उड्डाणपूल…
Mumbai news
मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा असलेला शीव उड्डाणपूल गुरुवार, १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केला जाणार आहे. हा उड्डाणपूल…
अनेक झोपु योजनांची मंजुरी रखडली! मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजना विकास नियंत्रण नियमावलीतील इतर तरतुदींसोबत संलग्न करण्याचे अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आहेत. या योजना संलग्न करताना चटईक्षेत्रफळाचे उल्लंघन…
सदीप चव्हाण मिशन ऑलिम्पिक आयुष्यात असे काही क्षण येतात जे तुम्हाला पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. पॅरिस ऑलिम्पिकच्या शुटींग रेंजवर आणि दिडशे कोटी भारतीयांना असाच आजचा एतिहासिक क्षण अनुभवला. पॅरिसची परी…
मुंबई– चाकरमन्यांसाठी खुशखबर आहे. आता गणपतीसाठी बोरवलीतून थेट रेल्वेने कोकण गाठता येणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे १५९०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.येत्या आठ महिन्यात त्याचा फायदा राज्याला व…
जालना – येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत लढायचं की पाडायचं याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी आज स्पष्ट केले.जर सरकार आपल्यावर अन्याय करणार असेल, चारही बाजूने मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत…
शीव उड्डाणपूल वहातुकीसाठी बंद मुंबई : येत्या एक ऑगस्टपासून आपण मुंबईच्या दिशेने येणार असाल तर सायनला टाळा. कारण एक ऑगस्टपासून येथे ट्रॅफीक जाम होणार आहे. शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून पूर्णतः बंद केला जाणार आहे. या…
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकाने केलेल्या नवी मुंबई : पुणे शहर व परिसरात अतिवृष्टीतील पूर परिस्थितीमुळे ओढवलेल्या अडचणीच्या स्थितीत पूर ओसरल्यानंतर तेथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य पथक धावून गेले आहे. नेहमीच इतरांच्या मदतीसाठी सज्ज असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने सिंहगड रोड एकतानगरी परिसरात केलेल्या स्वच्छता कार्याचे तेथील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मनापासून कौतुक करीत आभार मानले आहेत. पुणे येथे ओढवलेल्या पूर परिस्थितीमुळे तेथील अनेक भागातील रस्त्यांवर तसेच घरातही गाळ आणि कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार असल्याचे लक्षात घेत जलद स्वच्छता करणे महत्वाचे होते. या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार, आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी लगेच महानगरपालिकेचे 115 जणांचे पथक तयार केले व त्यांना 2 जेटींग मशीन व आवश्यक स्वच्छता साधनांसह शनिवारी सकाळी एनएमएमटीच्या 2 बसेसने पुण्याकडे रवाना केले. त्याठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नमुंमपा मदतकार्य पथकास सिंहगड रोड परिसरातील एकतानगरी हा पूरग्रस्त भागात साफसफाई करण्याचे सूचित करण्यात आले. त्या अनुषंगाने उपमुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे व स्वच्छता अधिकारी श्री. विजय पडघन यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत आपले सहकारी स्वच्छता निरीक्षक सर्वश्री विजय नाईक, नितीन महाले, नवनाथ ठोंबरे व विजय काळे यांच्यासह साफसफाई कामाचे नियोजन केले व सोबतच्या 2 स्वच्छता पर्यवेक्षक आणि 100 हून अधिक स्वच्छताकर्मींसह तेथील परिसरात व घरांतील स्वच्छतेत महत्वपूर्ण योगदान दिले. त्या परिसरात रोगराई पसरू नये म्हणून सोबत नेलेल्या जंतुनाशक पावडरही त्याठिकाणी फवारण्यात आली. या पथकाने ज्या आत्मियतेने स्वयंस्फुर्तीने काम केले त्याची प्रशंसा तेथील माजी नगरसेविका श्रीम. मंजुषा नागपुरे तसेच त्या परिसरातील नागरिकांनी केलेली असून नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार व्यक्त केलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची स्वच्छता राखतानाच इतर शहरांच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच धावून गेली असून पुणे येथील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीची तेथील नागरिकांप्रमाणेच पुणे महानगरपालिकेकडूनही आभार व्यक्त करीत दखल घेण्यात आलेली आहे. 00000
अनेक झोपु योजनांची मंजुरी रखडली! मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजना विकास नियंत्रण नियमावलीतील इतर तरतुदींसोबत संलग्न करण्याचे अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आहेत. या योजना संलग्न करताना चटईक्षेत्रफळाचे उल्लंघन झालेले नाही. उलटपक्षी ज्या तरतुदीशी झोपु योजना संलग्न करण्यात आली आहे, त्यानुसारच चटईक्षेत्रफळ वितरित करण्यात आले असून ते योग्य आहे, अशी भूमिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नगर विकास विभागाला लिहिलेल्या पत्रात मांडली आहे. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचे कायदेशीर मत सोबत जोडले आहे. अशा १८ योजनांना पालिकेकडून याआधीच अभय मिळाले असले तरी भविष्यात अशा योजना मंजूर करावयाच्या किंवा नाही, याबाबत संदिग्धता असल्यामुळे अनेक योजना प्रतीक्षेत आहेत. झोपु योजनांसाठी विकास नियंत्रण नियमावलीत ३३(१०) अशी तर झोपडीवासीयांच्या पुनर्वसनासाठी संक्रमण सदनिका उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नव्या नियमावलीत ३३(११) ही तरतूद आहे. यासाठी झोपु प्राधिकरण नियोजन यंत्रणा आहे. या दोन तरतुदी वगळल्या तर इतर सर्व तरतुदींसाठी महापालिका नियोजन प्राधिकरण असून यापुढे झोपु प्राधिकरणाने ३३(१२)(ब) (रस्त्यावर असलेले अतिक्रमण वा अडथळे दूर करुन संबंधितांना सामावून घेणे) तसेच ३३(१९) (व्यावसायिक वापर केल्यास पाच इतके चटईक्षेत्रफळ) या तरतुदींसोबत झोपु योजना संलग्न करू नयेत तसेच संलग्न केलेल्या योजना रद्द कराव्यात, असे पत्र झोपु प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले होते. या पत्राबाबत झोपु प्राधिकरणाने नगरविकास विभागाला स्पष्टीकरण करून आपला निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नगरविकास विभाग काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ३३(१२)(ब) अंतर्गत पाच तर ३३(१९) अंतर्गत १३ झोपु योजना आतापर्यंत मंजूर झाल्या आहेत, असेही या पत्रात म्हटले आहे. प्राधिकरणाने या पत्रात म्हटले आहे की, ३३ (९) म्हणजे समुह पुनर्विकास वगळता कुठल्याही तरतुदीशी झोपु योजना संलग्न करण्याची विकास नियंत्रण नियमावलीत तरतुद आहे. या तरतुदीसाठी महापालिका नियोजन प्राधिकरण आहे. उर्वरित तरतुदींसाठी कुठेही महापालिका आयुक्त असा उल्लेख नाही. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारीही आपल्या अधिकारात निर्णय घेऊ शकतात. ३३(१२)(ब) या तरतुदीशी झोपु योजना संलग्न करण्याचे पत्र महापालिकेनेच पहिल्यांदा दिले होते. आताही महापालिकेच्या सहायक आयुक्तांकडूनच ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते, याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. याबाबत झोपु प्राधिकरणाने माजी न्यायमूर्ती भोसले यांचे मत घेतले असून त्यांनाही महापालिका आयुक्तांना असे करता येणार नाही. फार तर याबाबत राज्य शासनाकडे दाद मागावी, असे भोसले यांनी म्हटले आहे.
मुंबई : अंध मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य विकास, स्वावलंबन साठी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या NATIONAL ASSOCIATION FOR THE BLIND (NAB) ह्या राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या आपल्या देशातील अनेक पुरस्कार प्राप्त…
मुंबई : आर्थिक सुधारणांना प्रारंभ होऊन पावशतकापेक्षा अधिक काळ उलटला. याकाळातील सर्व सरकारांकडून भरघोस सवलती, सोईसुविधा घेऊन प्रचंड नफा कमाविणार्या खाजगी क्षेत्रातील उद्योगांनी देश उभारणीच्या कार्यात दिलेले अत्यल्प योगदान निराशाजनकच…