Category: मुंबई

Mumbai news

 लघुवाद न्यायालयात ३२ प्रकरणे निकाली

 राष्ट्रीय लोकअदालतला उत्तम प्रतिसाद     मुंबई : राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून मुंबई येथील मुख्य शाखा आणि वांद्रे शाखा अशी मिळून एकूण २५४ पैकी ३२ प्रकरणं निकालात निकाली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे. लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल आणेकर, अतिरिक्त मुुख्य न्यायाधीश एम. एन. सलीम व श्रीमती ए. एस. खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम यशस्वी झाले. न्यायाधीश एस. एन. गोडबोले, ए. जे. फटाले, वकील उषा गुप्ता, उज्वला घोडेस्वार यांनी लोकअदालतीचे काम पाहिले. लोकअदालतीचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक आर. के. हजारे, आर. के. कुळकर्णी आणि कर्मचारी वृंद यांनी केले. ०००००

 ‘खारफुटी पर्यावरणशील संवर्धन दिन’ साजरा

ऐरोली खाडीकिनारा स्वच्छ करत लोकसहभागातून   नवी मुंबई : युनेस्कोने जाहीर केल्याप्रमाणे 26 जुलै रोजी जगभरात ‘खारफुटीच्या पर्यावरणशील संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा होत असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही ऐरोली सेक्टर 10 येथील खाडीकिनारी विद्यार्थी व नागरिकांच्या सहयोगातून खारफुटीच्या संरक्षण संवर्धनाकरिता खाडीकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून माझी वसुंधरा अभियानाचेही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला विस्तृत असा खाडीकिनारा लाभला असून त्याची स्वच्छता रहावी व त्याचा उपयोग खाडीकिना-यांच्या पर्यावरण संरक्षणाला व्हावा या भूमिकेतून ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली असून ऐरोलीचे विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त श्री. अशोक अहिरे, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. सतिश सनदी व उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांच्या माध्यमातून या विशेष स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक, विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र यांचेसह वनशक्ती स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख श्री.विकी पाटील व त्यांचे सहकारी तसेच घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयाचे एनएसएस विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. या खाडीकिना-याच्या विशेष स्वच्छता मोहीमेत 60 गोणी प्लास्टिक बाटल्या, प्रतिबंधात्मक प्लास्टिक, चपला तसेच तत्सम कचरा गोळा करण्यात आला. याप्रसंगी माझी वसुंधरा अभियान आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ घेण्यात आली. त्याचप्रमाणे खारफुटी जतन व संवर्धन करण्याचे महत्व सांगण्यात आले. ००००

नवी मुंबईत विविध विभागांत एकाच वेळी आठ ठिकाणी अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

नवी मुंबई : महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये नो‍टीस देऊनही संबंधितांनी नोटीशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे…

विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली शपथ     मुंबई दि. 28. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी  शपथ दिली. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर या 11 सदस्यांनी शपथ घेतली. विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.  यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 00000

रायगड बालकल्याण समितीचे काम कौतुकास्पद -पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे

अशोक गायकवाड     अलिबाग : रायगड बालकल्याण समितीचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.महिला बालविकास विभाग, रायगड अंतर्गत बालकल्याण समिती व पोलिस अधीक्षक कार्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बालकल्याण सन्मान सोहळा व ताण तणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बेलत होते. यावेळी कोकण मार्गदर्शक ऍडव्होकेट सीमा अदाते, बाल कल्याण समिती सदस्य डॉ गाणार, ऍड श्रीमती झेमसे,जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन जयवंत गायकवाड, कॅलिडा रिहॅबचे डॉ. प्रशांत, डॉ. संतोष पवार, डॉ. अक्षय पाटील उपस्थित होते. या वेळी बालकांच्या क्षेत्रात कायद्याला अनुसरून उल्लेखनीय काम केलेल्या पोलीस अधिकारी,कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन पोलीस अधीक्षक घार्गे व बालकल्याण समिती चे अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे व सदस्य यांचे हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश बालकांच्या प्रति काम केलेल्या अधिकाऱ्यांचा गौरव करून बालकांप्रती काम करण्यासाठी प्रेरणा ऊर्जा उत्साह निर्माण करणे. बालकांची जास्तीत जास्त काळजी व संरक्षणाची जबाबदारी घेऊन बालकांचे पुनर्वसन करणे तसेच तनावाचे व्यवस्थापन करणे. यासाठी कॅलिडा रिहॅब सेंटर व भूमिका फाउंडेशन चे मोठे योगदान व मार्गदर्शन मिळाले. याबाबत पोलीस अधीक्षक घार्गे यांनी दोन्ही संस्थांचे कौतुक करून बालकल्याण समितीला धन्यवाद दिले.या कार्यक्रमात बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड (कर्जत), राजेंद्र मायने (महाड), निवृत्ती बोराडे (माणगाव), श्रीमती प्राची पांगे, श्रीमती माधुरी घाडगे, श्रीमती वर्षा पाटील तर नवी मुंबईचे सुनील होलार, अभिजीत मोरे, दत्तात्रय पवार, संतोष पिलाने, श्रीमती प्रणिता भाकरे, श्रीमती सारिका बोराटे, रेल्वे पोलीस आदी उकृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा शाल सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. या कार्यक्रमात राहुल धुळे यांचा निरोप समारंभ करून उपस्थित संस्थेच्या व संपर्क बालग्रामचे विनायक पाटील,संपर्क बाल ग्रामचे खंदारे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे जि.प. जयवंत गायकवाड ,डॉ विशाल गाणार, ऍड आधाते ऍड झेमसे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 00000

पत्रकारांच्या आरोग्यासाठी सरसावल्या नगरसेविका

रमेश औताडे     मुंबई : पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना आरोग्य विम्याचे कवच देण्यासाठी नगरसेविका आशाताई मराठे यांनी पत्रकार आरोग्य विमा अर्ज भरून त्यासाठी लागणारे शुल्क त्यांनी स्वतः भरले. कोरोना काळातही यांनी पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेतली होती. पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न सरकारी योजनेच्या माध्यमातून मार्गी लावल्याबद्दल सर्व पत्रकारांनी त्यांचे आभार मानले. कोरोणा काळात काही पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. काही पत्रकार मृत पावले. त्यावेळीही त्यांना किराणा सामान व आरोग्य मदत त्यांनी दिली होती. आजही अनेक पत्रकार आर्थिक परिस्थितीचा सामना करत आहेत. लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना येत आहेत. पत्रकार कल्याणकारी योजना असावी यासाठी सरकारकडे मी पाठपुरावा करणार आहे. असे आशाताई मराठे यांनी यावेळी सांगितले. मुंबई उपनगर परिसरातील सर्व पत्रकारांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा मिळावी यासाठी शिबिर आयोजन करून यावेळी अर्ज भरून घेण्यात आले. त्यासाठी लागणारे अर्ज शुल्क आशाताई मराठे यांनी भरले असून तीन दिवसानंतर या योजनेचे स्मार्ट कार्ड पत्रकारांना मिळणार आहे. भाजपा मंडळ महामंत्री गुरुदास पै, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ऍड. चेतना कोरगावकर, सावित्रीबाई फुले घरेलु कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मराठे, देविदास वर्मा, पुष्पराज माने, उपनगर पत्रकार असोसिएशन चे सहसचिव समीर कर्णूक, उपाध्यक्ष संध्या श्रीवास्तव, पत्रकार आनंद श्रीवास्तव आदी पत्रकार उपस्थित होते. 00000

रमा प्रकाशनाच्या केंद्रीय अर्थसंकल्प विश्लेषण कार्यक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष होते. इंडियनऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, बी एस ई -इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड आणि एनकेजीएसबी को ऑपरेटिव्ह बँक  यांचे या कार्यक्रमास सहप्रायोजकत्व लाभले होते. या कार्यक्रमात पार्ल्यातील काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्तीत आयोन एक्सचेंज लिमिटेड चे समूह सीएफओ नंदकुमार रणदिवे, ब्ल्यू क्रॉस लि.चे एमडी भालचंद्र बर्वे, सीए सुनील मोने , बँकर नागेश पिंगे, माजी नगरसेवक अभिजित सामंत, माजी उपमहापौर अरुण देव, उद्योजक राजू रावल, विद्यानिधी शिक्षण संस्थेच्या प्रा.संगीता तिवारी यांचा समावेश होता.…

बुजुर्ग पॉवरलिफ्टर सतीश पाताडे यांचे यश

मुंबई : बुजुर्ग छत्रपती पुरस्कार प्राप्त ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पॉवरलिप्टर, माजी शासकीय अधिकारी सतीश पाताडे यांनी इंदूर, मध्यप्रदेश येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मास्टर विभागात घवघवीत यश संपादन केले.…

विधानसभेसाठी काँग्रेस ‘ॲक्शन मोड’वर

मुंबई : आगामी विधानसभेसाठी काँग्रस इन ‘ॲक्शन मोड’वर असून  महाविकास आघाडीतील घटकपक्षांसोबत जागावाटप व्यवस्थित व्हावं, यासाठी पक्षाच्या १० नेत्यांची टीम तयार करण्यात आली आहे. या टीममध्ये कोणकोणते सदस्य असतील, याबाबतची माहिती काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी आज दिली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या…

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सहा विशेष गाड्या

मुंबई : मुंबईतीली चाकरमन्यांसाठी एख खुषखबर आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सहा विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असून दोन दिवस आधीच कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू होते. कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि…