Category: मुंबई

Mumbai news

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि या निवडणुका शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीनंतर घेण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने या मागणीचा विचार करून महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवाषिक निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल हरिश्चंद्र पाटील हे 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

मुंबई,  : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा…

मनसेबरोबर युती करून भाजपाने गोरगरिब उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळले.

प्रा. वर्षा गायकवाड यांचा बीजेपीवर हल्लाबोल उत्तर भारतीय समाज व काँग्रेस साथ साथ, लोकसभा निवडणुकीत मुंबईसह देशात परिवर्तन करा. मुंबई : कोरोना काळात केंद्रातील भाजपा सरकारने अचानक लॉकडाऊन लावून जनतेला वाऱ्यावर सोडले. उत्तर भारतातून मुंबईत कामासाठी आलेल्या लोकांचे तर प्रचंड हाल झाले. या कठीण काळात सर्वात आधी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकार या समाजाच्या मदतीला धावून आले. कोणीही उपाशी राहू नये यासाठी अन्नधान्य व गरजेचे साहित्य घरोघरी पोहचवले. उत्तर भारतीयांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार त्यांना गावी पाठवण्यासाठी सर्व सुविधा पुरवल्या परंतु या काळातही भाजपा सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेतली होती, असा हल्लाबोल उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे. सांताक्रूज येथे झालेल्या उत्तर भारतीय संमेलनात प्रा. वर्षा गायकवाड बोलत होत्या, त्या पुढे म्हणाल्या की, उत्तर भारतीय समाज व काँग्रेस पक्षाचे संबंध नेहमीच गंगा जमुना संस्कृतीसारखे राहिले आहेत. काँग्रेस पक्षानेही उत्तर भारतीयांचा योग्य तो मान सन्मान राखला आहे. मुंबईचे महापौरपद, विरोधी पक्षनेता, मंत्री, आमदार व संघटनेतही महत्वाची जबाबदारी दिली. उत्तर भारतीय समाज मुंबईच्या संस्कृतीत मिसळला आहे. काँग्रेस सरकारने हॉकर्स पॉलीसी बनवून सन्मानाने व्यवसाय करण्याची संधी दिली परंतु कामासाठी मुंबईत आलेल्या या गोरगरिब कष्टकरी समाजावर मनसेने हल्ले केले, मारहाण केली त्याच मनसेबरोबर भारतीय जनता पक्षाने युती करुन उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. उत्तर भारतीय लोक मुंबईत दुधाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात करतात. मुंबईतील जागा एका उद्योगपतीला देण्याचा सपाटा भाजापाने लावला आहे आता त्यांची नजर तबेल्यावरही पडली आहे. दुधावरही जीएसटी लावून लूट केली जात आहे. केंद्रीय मंत्री व भाजपा नेते पियुष गोयल यांनीच कोरोना काळात उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे सोडताना अडवणूक केली. गोयल यांनी मासळीचा वास सहन होत नाही म्हणून ते तोंडावर रुमाल बांधून फिरतात हे लोक तुमच्यासाठी काम करणार आहेत का? सवाल विचारून, ‘भाजपा सरकार हटानी है, काँग्रेस सरकार लानी है’, असा नारा वर्षा गायकवाड यांनी दिला. या संमेलनाला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार भाई जगताप, महारष्ट्र सह प्रभारी आशिष दुआ कार्यक्रमाचे आयोजक अविनाश सिंह, संदिप शुक्ला आदी उपस्थित होते.

 राज्याचे कॅरम पंच शिबीर संपन्न

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने ११ व १२ मे २०२४ दरम्यान एल. जे. ट्रेनिंग सेन्टर, दादर, मुंबई येथे पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी व पुणे येथून स्थानिक, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकंदर ४० पंच सहभागी झाले होते. यामध्ये तीन महिलांचाही समावेश होता. दोन दिवस झालेल्या या शिबिरातील पंचांना आंतर राष्ट्रीय कॅरम पंच श्री अजित सावंत व श्री केतन चिखले यांनी कॅरमच्या नियमांची सविस्तर माहिती दिली. शिवाय महाराष्ट्रात भविष्यात अधिक गुणवान पंच तयार होण्यासाठी स्वेच्छेने मार्गदर्शन करण्याची तयारी दाखविली. कॅरमच्या नियमावलीतील प्रत्येक नियमांवर या शिबिरात चर्चा करण्यात आली. शिवाय कॅरम बोर्ड वर सामन्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर कृतीद्वारे प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. यावेळी आंतर राष्ट्रीय पंच श्री परविंदर सिंग ग्रोव्हर, श्री आशिष बागकार, राष्ट्रीय पंच श्री साईप्रकाश कानिटकर, श्री रमेश चव्हाण यांनीही शिबिरात सहभागी झालेल्या पंचांना विशेष मार्गदर्शन केले. स्पर्धेत पंचांचा सहभाग अतिशय महत्वाचा असून त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे कोणत्याही खेळाडूचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी पंचांची असते. त्यामुळे गेली दोन वर्षे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन अशा शिबिराचे आयोजन करत असल्याचे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव श्री अरुण केदार यांनी सांगितले. शिबिराची सांगता करताना श्री अजित सावंत यांनी या शिबिरामुळे झालेला सकारात्मक बदल यापुढे सामन्यात दिसेल अशी अशा व्यक्त केली. तर श्री केतन चिखले यांनी काम करताना पंचाने आपली भूमिका निष्पक्षपणे मांडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. शिबिरात सहभागी झालेल्या पंचानीही या शिबिराचा फायदा झाला असून यापुढे अधिक सतर्क राहण्याचे आश्वासन दिले. तर काहींनी या शिबिरामुळे पंचांची उजळणी झाल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री यतिन ठाकूर व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष श्री धनंजय पवार उपस्थित होते.

मुंबईला वादळी वाऱ्याचा तडाखा

बेकायदेशीर होर्डींग पडल्यामुळे आठ ठार, शेकडो जखमी मुंबई : मुंबई आणि उपनगराला आज वादळी वाऱ्याचा तडाक बसला. सोसाट्याच्या वाऱ्याने मुंबईची पार दैना उडवून दिली. मुंबईतील घाटकोपरच्या छेडानगर जवळील पेट्रोलपंपावर महाकाय…

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधिल बॅगात दडलय काय ?- संजय राऊत

मुंबई : नाशिकला अवघ्या दोन तासांसाठी गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून जड बॅगा उतरवितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीत या जड बॅगात दडलयं काय असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी…

आगरी कोंढरीपाडाचा मतदानावर बहिष्कार

उरण : दिनांक ६ में २०२३ रोजी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत दद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील…

देशातील कर दहशतवाद थांबवणार- उद्धव ठाकरे

मुंबई – इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येताच देशात जीएसटीच्या माध्यमातून होणारा कर दहशतवाद आम्ही थांबवू. जीएसटीमध्ये अशा घातक गोष्टी आहेत ज्यात काही चूक झाली तर सरळ जेलमध्ये टाकलं जाते. हा कर दहशतवाद आम्ही थांबवणारच असे…

सुट्टीत गावी गेलेल्या मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील मतदान मुंबईत २० मे रोजी पार पडणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि सुटीत गावी गेलेल्या मुंबईकरांनी मुंबईत येऊन मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते आर. जी. हुले आणि त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या अलका हुले यांनी ग्रामीण भागातून ‘चलो मुंबई’चे बॅनर लावत मतदारांना मतदानासाठी आवाहन करत आहेत. मे महिन्याच्या सुटीत अनेक मुंबईकर कुटुंबासहित गावी जात असतात. काही जण मतदान असतानादेखील मुंबईत येऊन आपले कर्तव्य बजावत नसल्याने मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढण्यासाठी रायगडमधील आंबेगाव गावात ‘मतदानासाठी मुंबईत चला’, असे आवाहन बॅनरद्वारे केल्याचे आर. जी. हुले यांनी सांगितले.

मुंबईत १७ हजार आरोपींची तपासणी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विशेष मोहिम मुंबईः निवडणुकांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून नये, यासाठी फरार व विविध गुन्ह्यांतील पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम मुंबईत राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत सहा हजार ६०७ फरार आरोपी व विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या १७ हजार ११४ आरोपींची यादी करण्यात आली असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय यावर्षी ९,५९३ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि परिसरातील मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. मतदान सुरळीत व्हावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सराईत आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. त्या अंतर्गत सहा हजार ६०७ फरार आरोपी व विविध गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या १७ हजार ११४ आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे ३२० जामीनपात्र व ६७४ अजामिनपात्र वॉरंट असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी संवेदनशील ठिकाणे, हॉटेल याठिकाणी गस्त घालण्यात येत आहे. याशिवाय ठिकठिकाणी तपासणी कक्षही उभे करण्यात आले आहेत. यावर्षी प्रतिबंधात्मक कारवायांमध्येही वाढ करण्यात आली असून यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत सीआरपीसी १०७ अंतर्गत सर्वाधिक म्हणजे ६,२०१ कारवाया करण्यात आल्या आहेत. एखाद्या व्यक्तीकडून शांतता भंग होण्याची भीती असल्यास संबंधीत व्यक्तीवर सीआरपीसी १०७ अंतर्गत कारवाई केली जाते. याशिवाय सीआरपीसी कलम ११० व १५१(३) अंतर्गत अनुक्रमे २१५४ व ९१६ कारवाया करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस (एमपी) कायदा कलम ५५, ५६ व ५७ अंतर्गत अनुक्रमे ३३, १९३ व ९० कारवाया करण्यात आल्या आहेत. याशिवाय एपीडीए कायद्यांतर्गत सहा जणांवर कारवाई केली आहे.महाराष्ट्र पोलीस कायदा (पूर्वीचा मुंबई पोलीस कायदा) ५५, ५६, ५७ अन्वये तडीपार किंवा स्थानबद्धतेची कारवाई केली जाते. यानुसार संबंधित व्यक्ती आदेशात नमूद केलेल्या जिल्ह्यात वा परिसरात दिलेल्या कालावधीसाठी प्रवेश करू शकत नाही. याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायदा ६८, ६९ तसेच १५१, दंड प्रक्रिया संहिता १०७, १०९,११० अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून केली जाते.