Category: मुंबई

Mumbai news

 स्वच्छता कार्यात लोकसहभाग वाढीवर भर देण्यासोबतच शहर स्वच्छतेकडे

अधिक बारकाईने लक्ष देण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश   नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ ला सामोरे जाताना स्वच्छता विषयक विविध उपक्रमांमध्ये व दैनंदिन बाबींमध्ये अधिक व्यापक…

 डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी दिला भाजपचा राजीनामा;

कॉँग्रेस पक्षात घेतला प्रवेश ;   मुंबई : मुंबई विद्यापीठात बायोलॉजिकल विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर डॉ. प्रा. सौ. उज्ज्वला जाधव यांनी आझाद मैदान, मुंबई येथील राजीव गांधी काॅंग्रेस भवन येथे मुंबई विभागीय काॅंग्रेस अध्यक्षा, खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. खासदार वर्षाताई गायकवाड यांनी डॉ. उज्ज्वला जाधव यांना काॅंग्रेस पक्षात प्रवेश देतांना त्यांच्या हाती काॅंग्रेस पक्षाचा झेंडा दिला आणि पक्षाच्या मजबुतीसाठी डॉ. उज्ज्वला जाधव या उत्तम काम करतील असा विश्वास व्यक्त केला. काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी एक भला मोठा पुष्पहार मुंबई काॅंग्रेस अध्यक्षा खासदार प्रा. वर्षाताई गायकवाड आणि डॉ. उज्ज्वला जाधव यांना घालून आनंद व्यक्त केला. डॉ उज्ज्वला जाधव या २०१४ पासून भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळी डॉ उज्ज्वला जाधव यांनी  भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष लल्लुसिंग आर्य, प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती मोर्चाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. डॉ उज्ज्वला जाधव यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला तेंव्हा माजी आमदार अशोक जाधव, विविध पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला असतांना भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले भारताचे संविधान बदलण्याची भाषा वारंवार करीत होते. यासाठी चारशे पार चा नारा दिला जात होता. मी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची निष्ठावंत कार्यकर्ती असून भारतीय संविधानाशी एकनिष्ठ असल्याने मला ही भारतीय जनता पार्टीची भूमिका पटत नव्हती म्हणून मी भारतीय जनता पक्ष सोडण्याच्या निष्कर्षाप्रत आले होते. काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, मुंबई काॅंग्रेस अध्यक्षा खासदार प्रा वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री नसीम खान आदींची भेट घेऊन चर्चा केली आणि अखेर आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच त्यांच्या प्रचंड यशस्वी झालेल्या भारत जोडो व भारत न्याय यात्रेने प्रभावित होऊन प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश घेतला, असे डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले. प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी लवकरच डॉ. उज्ज्वला जाधव यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र

दिल्लीश्वरांचे पुन्हा शिक्कामोर्तब नवी दिल्ली: देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यावर आज दिल्लीश्वरांनी पुन्हा शिक्कामोर्तब केले. आगामी विधानसभा निवडणूक भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असून फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री…

महायुतीत ‘बोंबा बोंब’

संजय शिरसाठांची भुजबळ तर, मिटकरींची भाजपाविरोधात बोंब स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर भाजपाप्रणीत महायुतीतील धुसफूस दिवसागणिक सार्वजनिक होऊ लागली आहे. आपल्या पक्षाच्या नेत्याला वाचवण्याच्या नादात पक्षाचे प्रमुख प्रवक्ते दुसऱ्या पक्षाविरोधात बोंब…

रिक्षा, टॅक्सी चालकांनाही आता ग्रॅच्युईटी मिळणार !  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट  मुंबई :  रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी खुशखबर आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांना आता ग्रॅच्युईटी मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.  ग्रॅच्युईटीसाठी रिक्षा, टॅक्सी चालकांना फक्त वर्षाला 300 रुपये भरावे लागणार, अशी घोषणा  मुख्यमंत्री शिंदेंनी केली…

विधान परिषदेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले

११ जागांसाठी १२ जुलैला मतदान मुंबई   : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. राज्यातील ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला मतदान होणार आहि. विधानसभा सदस्यांमधून निवडून दिलेले विधान परिषदेतील ११ सदस्य…

मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेणार

मनोज जरांगेंचा सरकारला १३ जुलैचा अल्टीमेटम छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातूनच घेणार आणि त्यासाठी सरकारला आम्ही १३ जुलैचा अल्टीमेटम दिला आहे असा अंतिम इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी…

काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा

मुंबई : मुंबईतील धारावी मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज आमदारपदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला . नुकत्याच…

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज

आपला दवाखाना, रुग्णवाहिका, अतिदक्षता व हिरकणी कक्ष उपलब्ध   मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त काढल्या जाणाऱ्या वारीदरम्यान वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. आरोग्य विभागाने पालखी मार्गावर सहा हजारांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी, आपला दवाखाना, फिरती रुग्णवाहिका पथके, आरोग्यदूत सज्ज ठेवली आहे. मुक्कामाच्या ठिकाणीही अतिदक्षता कक्ष, हिरकणी कक्ष उपलब्ध केले आहेत. आषाढी एकादशीनिमित्ता राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. यामध्ये साधारणपणे १२ लाखांपेक्षा अधिक वारकरी दरवर्षी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी गतवर्षीपासून राज्य सरकारने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत यंदाही वारकऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालखी मार्गावर आरोग्य विभागाने पाच किमी अंतरावर आरोग्य सेवा उपलब्ध केली आहे. यासाठी सहा हजार ३६८ आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहेत. पालखी मार्गातील खासगी वैद्यकीय दवाखान्यात वारीतील रुग्णांसाठी १० टक्के खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अत्यवस्थ रुग्णांसाठी पाच खाटांचे, तर पालखी मार्गावर ८७ अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. महिला वारकऱ्यांसाठी १५८ स्त्री रोग तज्ज्ञ विविध ठिकाणी सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच, १३६ हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. याशिवाय, १०२ आणि १०८ क्रमांकाच्या ७०७ रुग्णवाहिका २४ तास सज्ज असणार आहेत. दिंडी प्रमुखांHeading – आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग सज्ज Slug -आपला दवाखाना, रुग्णवाहिका, अतिदक्षता व हिरकणी कक्ष उपलब्ध मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त काढल्या जाणाऱ्या वारीदरम्यान वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. आरोग्य विभागाने पालखी मार्गावर सहा हजारांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी, आपला दवाखाना, फिरती रुग्णवाहिका पथके, आरोग्यदूत सज्ज ठेवली आहे. मुक्कामाच्या ठिकाणीही अतिदक्षता कक्ष, हिरकणी कक्ष उपलब्ध केले आहेत. आषाढी एकादशीनिमित्ता राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. यामध्ये साधारणपणे १२ लाखांपेक्षा अधिक वारकरी दरवर्षी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी गतवर्षीपासून राज्य सरकारने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत यंदाही वारकऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पालखी मार्गावर आरोग्य विभागाने पाच किमी अंतरावर आरोग्य सेवा उपलब्ध केली आहे. यासाठी सहा हजार ३६८ आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहेत. पालखी मार्गातील खासगी वैद्यकीय दवाखान्यात वारीतील रुग्णांसाठी १० टक्के खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अत्यवस्थ रुग्णांसाठी पाच खाटांचे, तर पालखी मार्गावर ८७ अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात आले आहेत. महिला वारकऱ्यांसाठी १५८ स्त्री रोग तज्ज्ञ विविध ठिकाणी सज्ज ठेवण्यात आले आहेत. तसेच, १३६ हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. याशिवाय, १०२ आणि १०८ क्रमांकाच्या ७०७ रुग्णवाहिका २४ तास सज्ज असणार आहेत. दिंडी प्रमुखांसाठी पाच हजार ८८५ औषधांचे कीट उपलब्ध केले आहेत. पालखी मार्गावरील दोन हजार ७५२ पाणी स्रोतांचे सर्वेक्षण व निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, पालखी मार्गावरील सात हजार ९९१ हॉटेल, उपहारगृहे, ढाबा येथील १९ हजार ५०२ कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. वारी मार्गावर ठिकठिकाणी कीटकजन्य आजार सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून, नागरिकांची असंसर्गजन्य आजारांची तपासणी, समुपदेशन व उपचार करण्यात आले आहेत. आपला दवाखाना वारकऱ्यांच्या सेवेत वारकऱ्यांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी वारी मार्गामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने मुक्कामाच्या ठिकाणी तसेच प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखान्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पालखी मार्गावर २५८ आपला दवाखाना उभारले आहेत. दिवेघाटामध्ये पायथ्याशी, मस्तानी तलाव आणि डोंगरमाथा अशा तीन ठिकाणी आपला दवाखाना उभारण्यात येणार आहे. महाआरोग्य शिबिरासाठी तीन हजार कर्मचारी नियुक्त वारी मार्गादरम्यान वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. ही महाआरोग्य शिबिरे वाखरी, तीन रस्ता, गोपाळपूर या ठिकाणी भरवले जाते. वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता या महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभागाने तीन हजार ३६२ आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 000000 साठी पाच हजार ८८५ औषधांचे कीट उपलब्ध केले आहेत. पालखी मार्गावरील दोन हजार ७५२ पाणी स्रोतांचे सर्वेक्षण व निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, पालखी मार्गावरील सात हजार ९९१ हॉटेल, उपहारगृहे, ढाबा येथील १९ हजार ५०२ कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. वारी मार्गावर ठिकठिकाणी कीटकजन्य आजार सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून, नागरिकांची असंसर्गजन्य आजारांची तपासणी, समुपदेशन व उपचार करण्यात आले आहेत. आपला दवाखाना वारकऱ्यांच्या सेवेत वारकऱ्यांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी वारी मार्गामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने मुक्कामाच्या ठिकाणी तसेच प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखान्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पालखी मार्गावर २५८ आपला दवाखाना उभारले आहेत. दिवेघाटामध्ये पायथ्याशी, मस्तानी तलाव आणि डोंगरमाथा अशा तीन ठिकाणी आपला दवाखाना उभारण्यात येणार आहे. महाआरोग्य शिबिरासाठी तीन हजार कर्मचारी नियुक्त वारी मार्गादरम्यान वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. ही महाआरोग्य शिबिरे वाखरी, तीन रस्ता, गोपाळपूर या ठिकाणी भरवले जाते. वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता या महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभागाने तीन हजार ३६२ आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 000000

‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या आसपास वृक्षारोपण करा

एमएमआरसीचे नागरिकांना आवाहन   मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेलगतच्या परिसरात वृक्षारोपण करावे असे आवाहन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) नागरिकांना केले आहे. नागरिकांनी लावलेल्या…