Category: मुंबई

Mumbai news

‘झोपडीवासीयांना भाड्याची सद्यःस्थिती मोबाईलवरच कळणार’

प्राधिकरणाकडून स्वतंत्र अ‍ॅप लवकरच कार्यान्वित मुंबई : झोपडीवासीयांना आता विकासकांकडून मिळणाऱ्या भाड्याची सद्यःस्थिती काय आहे, भाडे कधी जमा होणार वा जमा झाले असल्याचा त्याचा तपशील आदी बाबी आता मोबाईलवर लवकरच कळू शकणार आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने याबाबत ‘भाडे व्यवस्थापन यंत्रणा’असे स्वतंत्र अ‍ॅप कार्यान्वित केले आहे. या अ‍ॅपवर झोपडीवासीयाला मोबाईल क्रमांक, ईमेल असा तपशील देऊन नोंदणी करता येणार आहे. त्याद्वारे त्याला भाडेविषयक संपूर्ण तपशील प्राधिकरणात खेटे न घालता पाहता येणार आहे. गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंग यांनी या अ‍ॅपला हिरवा कंदिल दाखविला आहे. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. कल्याणकर यांनी सूत्रे स्वीकारताच याबाबत तात्काळ कार्यवाही सुरू केली होती. हे अ‍ॅप लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. यामुळे झोपडीवासीयांना भाड्याची निश्चित स्थिती कळू शकणार आहे. झोपडीवासीयांच्या भाड्याचा प्रश्न संवेदनाक्षम असून थकित भाड्यापोटी उच्च न्यायालयानेही प्राधिकरणाची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर प्राधिकरणाने २१० क्रमांकाचे परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार, झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यापूर्वी विकासकाने झोपडीवासीयांना दोन वर्षांचे आगाऊ भाडे आणि त्यानंतर पुढील वर्षभराचे धनादेश प्राधिकरणाकडे जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कुठलीही रखडलेली योजनाही पुन्हा सुरू करण्यासाठी विकासकाला या परिपत्रकाची अंमलबजावणी केल्याशिवाय काम सुरू करण्याचे पत्र दिले जात नाही. हे भाडे प्राधिकरणाकडून झोपडीवासीयांना दिले जाते. या परिपत्रकामुळे थकित भाड्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. आता एक पाऊल पुढे जात, प्राधिकरणाने भाडेविषयक कुठलीही तक्रार असल्यास अ‍ॅपवर नोंदविण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. या शिवाय आता प्रत्येक झोपडीवासीयाला आपल्या भाड्याची सद्यःस्थितीही कळू शकणार आहे. हजार कोटी रुपये भाड्यापोटी जमा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे आतापर्यंत हजार कोटी रुपये भाड्यांपोटी जमा झाले आहे. हे भाडे झोपडीवासीयांना प्रत्यक्षात देण्यासाठी प्राधिकरणाने सहायक निबंधक संध्या बावनकुळे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. याशिवाय आता अपवर कुठल्या योजनेत, कोणत्या विकासकाने भाडे दिलेले नाही आदी तपशील ॲपवर सहजगत्या उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थी व नागरिक लोकसहभागातून स्वच्छता मोहीम

वाशी मिनी सी शोअर परिसरात नवी मुंबई :‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छताविषयक विविध उपक्रम विभाग पातळीवर राबविण्यात येत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभागावर भर दिला जात आहे.  या अंतर्गत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांचे नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी वाशी विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सागर मोरे तसेच स्वच्छता अधिकारी श्री.सूर्यकांत म्हात्रे यांच्यासह प्रत्यक्ष सहभागी होत विद्यार्थी व स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या सहयोगाने वाशी विभागात स्वच्छता मोहीम राबविली. वाशीतील टिळक महाविद्यालय आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामधील एनसीसी व एनएसएस चे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्र येत महानगरपालिकेच्या वाशी विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छतामित्रांसह एकत्र येत जुहूगाव चौपाटी, वाशीतील मिनी सी शोअर, सेक्टर-१० परिसरातील प्लास्टिक कचरा जमा केला तसेच परिसराची स्वच्छता केली. 78 विद्यार्थी व नागरिकांनी महापालिकेच्या कर्मचा-यांसह राबवलिलेल्या या स्वच्छता मोहीमेमध्ये ४० पोती प्लास्टिक कचरा तसेच १५ पोती काचेच्या बाटल्या जमा करण्यात आल्या. याप्रसंगी उपस्थितांनी ‘माझी वसुंधरा’ अभियानातील पर्यावरण जपणूकीची शपथ तसेच ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिक प्रतिबंधाची शपथ ग्रहण केली.

काँग्रेसच्या यशात सेनेचा वाटा – राऊत

मुंबई : शिवसेनासोबत नसती तर काँग्रेसच्या इतक्या जागा आल्या असत्या का? हा साधा प्रश्न आहे. काही ठिकाणी आमची मदत झाली नसती आणि त्यांची आम्हाला झाली नसती तर हे यश मिळालं असतं का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय…

नाना पटोलेंनी कठीण काळात काँग्रेसला सावरले– सुशीलकुमार शिंदे

मुंबई – कठीण काळात महाराष्ट्रात नाना पटोलेंनी ज्या पद्धतीने काँग्रेस उभी केली ते महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. नुसतीच उभी केली नाही तर आर्थिकदृष्ट्याही चांगल्याप्रकारे सावरलं. तुम्ही जे काम केले ते सदैव लक्षात राहणारं आहे अशा शब्दात ज्येष्ठ नेते…

विधानसभेला भाजपच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही – संजय शिरसाट

मुंबई : सर्व्हे नावाचं भूत जे भाजपच्या डोक्यात गेलेलं ते आता निघेल. एका मतदारसंघात 12 सर्व्हे केल्याने काही होतं नाही. नागरिकांची मतं ही महत्वाची आहेत. आम्हाला अतिआत्मविश्वास नडला, आता भाजपाच्या सर्व्हेच्या च्या दबावतंत्राला आम्ही बळी पडणार…

ठाकरेंच्या संपर्कात सहा नव्हे चाळीस आमदारही असू शकतात

सचिन अहिर यांचा गुगली ! मुंबई : लोकसभा निवडणूकीत भाजपाप्रणित महाविकासा आघाडीचा दारूण पराभव झाला. त्यातही एकनाथ शिंदे यांच्या १५ पैकी सात जागा फक्त निवडून आल्या. माझा एक जरी सहकारी पडला तरी…

राज ठाकरेंची ‘मनसे’ माघार

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा देत महायुतीच्या सभांमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना च्रकावून टाकणारा निर्णय घेत कोकण पदवीधर…

श्रीकांत शिंदेची संसदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड

मुंबई : यंदाच्या सतराव्या लोकसभेत शिवसेनेच्या संसदेतील गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे पक्षाचे संसदेतील प्रतोद असतील.…

राष्ट्रपतींकडून मोदींना शपथविधीचे आमंत्रण!

 ९ जूनचा मुहुर्त ठरला ! नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहुर्त अखेर ठरला. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना येत्या रविवारी ९…

राजीनामा अमान्य

फडणवीस पुन्हा इन अॅक्शन नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला लाजीरवाण्या अपयशास सामोर जावे लागले. २०१९ साली २३ जागा जिंकणार्या भाजपाची अवघ्या ९ जागांवर पडझड झाली. या नामुष्कीजनक पराभवाची जबाबदारी…