Category: मुंबई

Mumbai news

दहावीत ‘कोकण पॅटर्न’ पुन्हा नंबर १

राज्यात निकालांत मुलींनी बाजी मारली १८ विषयांचा १०० टक्के निकाल १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण निकालात मुंबई तिसऱ्या क्रमांकावर मुंबई : बारावीपाठोपाठ दहावीतही यंदा ‘कोकण पॅटर्न’ नंबर एक ठरला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि…

शाहिद खानच्या शतकाने शास्त्री संघ २२९

ड्रीम एलेव्हन कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा चिन्मय दुखंडेचे ६ बळी मुंबई :  मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ कप निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दोन दिवसीय  साखळी लढतीत रवी शास्त्री संघाने शाहिद खानच्या (१०४ धावा) शतकी खेळीमुळे सर्वबाद २२९ धावा केल्या. याच लढतीत  वेंगसरकर संघाच्या लेगस्पिनर  चिन्मय दुखंडे याने ४० धावांत ६ बळी घेण्याची करामत   केली. पहिल्या दिवसाअखेर वेंगसरकर संघाने बिनबाद ८३ धावा करत जोरदार प्रदर्शन केले आहे.  कर्नाटक सपोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत गावस्कर संघाने तेंडुलकर संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दिवसाखेर ९ बाद २४९ धावा केल्या आहेत. ओव्हल मैदानावरील लढतीत रवी शास्त्री संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शाहिद खान याने ११५ चेंडूत १२ चौकारांसह १०४ धावा करताना पाचव्या विकेटसाठी पार्थ ठाकूर (२७) यांच्यासह ९८ धावांची भागी रचली. आयांश चित्कारा (२१) आणि वेदांत कडू (१९) यांनीही संघाच्या धावसंख्येत थोडी भर टाकली.  वेंगसरकर संघाच्या चिन्मय दुखंडे याने आपल्या लेगस्पिन गोलंदाजीने ४० धावांत ६ बळी मिळवत प्रतिस्पर्धी संघाला ६७ षटकांतच २२९ धावांवर रोखण्याची करामत केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अरहाम जैन (खेळात आहे ३५) आणि ईशान पाठक (खेळात आहे ४०) या सलामीवीरांनी २५ षटकांत ८३ धावांची अभेद्य भागी रचत वर्चस्व राखले आहे. कर्नाटक सपोर्टींगवरील लढतीत सुनील गावस्कर  संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ९ बाद २४९ धावांची मजल मारली आहे. ७ बाद १५९ अशा डळमळीत अवस्थेनंतर  कर्णधार शेन रझा (५२) याच्या अर्धशतकी खेळीमुळे आणि त्याने आठव्या विकेटसाठी आयुष गोहो  (२२) यांच्यासह केलेल्या ४२ धावांच्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे ही मजल मारली आहे. गावस्कर संघासाठी स्वानंद पालव (२८), स्मित ठाकूर (३१), वेदांग मिश्रा (४८) यांनीही  फलंदाजीत योगदान दिले. तेंडुलकर संघासाठ कर्णधार हर्ष कदम याने ३३ धावांत ४ बळी  तर मोक्ष निकम याने ५७ धावांत ३ आणि हार्दिक गजमल याने ४९ धावांत २ बळी मिळविले आहेत. उद्या सामनाच दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. संक्षिप्त धावफलक –  ओव्हल मैदान =  रवी शास्त्री संघ – ६७ षटकांत सर्वबाद २२९ (आयांश चित्कारा २१, शाहिद खान १०४, पार्थ ठक्कर २७, वेदांत कडू १९; चिन्मय दुखंडे ४० धावांत ६ बळी) वि. दिलीप वेंगसरकर संघ – २५ षटकांत बिनबाद  ८३ (अरहाम जैन खेळत आहे ३५, ईशान पाठक खेळात आहे ४०). कर्नाटक सपोर्टींग = सुनील गावस्कर संघ – ९५ षटकांत ९ बाद २४९ (स्वानंद पालव २८, स्मित ठाकूर ३१, वेदांग मिश्रा ४८, शेन रझा ५२, आयुष गोहो २२; हार्दिक गजमल ४९ धावांत २ बळी, हर्ष कदम ३३ धावांत ४ बळी, मोक्ष निकम ५७ धावांत ३ बळी) वि. सचिन तेंडुलकर संघ.विजय बने – ९८१९०५९६७७ फोटो ओळी –  रवी शास्त्री संघाचा शतकवीर शाहिद खान (१०४ धावा) आणि दिलीप वेंगसरकर संघाचा चिन्मय दुखंडे (४० धावांत ६ बळी).

‘कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही विचारधारा सोडणार नाही…’

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये – अजित पवार मुंबई – निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद…

वसुंधरा अभियानांतर्गत पथनाट्यातुन पर्यावरण विषयक जनजागृती-शिरिष आरदवाड

अशोक गायकवाड नवी मुंबई : माझी वसुंधरा अभियानामध्ये पर्यावरण संवर्धन माहितीपूर्ण कार्यशाळा आयोजित करून पथनाट्यांतुन जनजागृतीवर भर दिला जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (२) शिरिष आरदवाड यांनी दिली आहे. शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवत नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. यावर्षीही ‘माझी वसुंधरा अभियान’ ४.० अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत असून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरण विषयक जनजागृती करताना पथनाट्यासारख्या लोकांना चटकन् भावणा-या माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्यात येत असून २१ मेपासून नमुंमपा क्षेत्रातील आठही विभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येक माणसाने करावयाच्या छोट्या छोट्या बाबींची माहिती पथनाट्यांच्या माध्यमातून त्यावर हसत खेळत भाष्य करीत सादर करण्यात आली असून या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आठही विभागांत गर्दी असते अशा मुख्य २२ ठिकाणी सादर झालेल्या माझी वसुंधरा अभियानविषयक पथनाट्यांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला असून पथनाट्य सादरीकरण करणा-या कलावंत समुहाचे उपस्थिांकडून कौतुक झाले आहे.

‘कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात ताजमहालचे थडगे पहाण्यापेक्षा रायगडाचे दर्शन घ्या’!

शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई यांची आग्रही भूमिका जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला  उत्साहात संपन्न मुंबई : कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात आग्र्याला जाऊन ताजमहालचे थडगे पहाण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडाचे दर्शन घ्यावे, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई यांनी आग्रही भूमिका मांडली. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत एका प्रकट मुलाखतीत शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई यांनी ही भूमिका मांडली. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजू देसाई यांनी १७ मार्च २०२४ रोजी पाचशेव्यांदा रायगड सर करुन एक ऐतिहासिक अभिनव विक्रम पूर्ण केला. यानिमित्ताने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री. विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून तसेच प्रा. सौ. नयना रेगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिवभक्त श्री राजू देसाई यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम यंदाच्या ४२ व्या वर्षाच्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत आयोजित करण्यात आला होता. पाचशेव्यांदा रायगड सर केल्याबद्दल राजू देसाई यांना शिवरायांच्या मावळ्याची पगडी आणि संपूर्ण मावळ्याची वस्त्रे, शाल श्रीफळ देऊन विजय वैद्य यांच्या शुभहस्ते तर सौ. रेवा राजू देसाई यांना साडी, खण आणि श्रीफळाची ओटी भरुन सौ. माया योगेश त्रिवेदी यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी प्रकट मुलाखत घेतांना प्रश्नांच्या उत्तरांच्या ओघात राजू देसाई यांनी संपूर्ण शिवकाल उपस्थितांसमोर उभा केला.  प्रत्येक शाळेमध्ये रोज शिवरायांची आरती प्रार्थनेवेळी लावण्यात यावी. तसेच कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात ताजमहाल नावाचे थडगे पहाण्यापेक्षा रायगडाचे दर्शन घ्यावे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाबद्दल विचारले असता देसाई म्हणाले की, या स्मारक बांधणीचा कोट्यावधी रुपयांचा खर्च गडकिल्यांसाठी वापरावा कारण गडकिल्ले हेच छत्रपतींचे खरे स्मारक आहे‌. छत्रपती शंभूराजे यांचे औरंगजेबाने जे अतोनात हाल केले तो संपूर्ण प्रसंग राजू देसाई यांनी उपस्थितांसमोर सादर केला तेंव्हा उपस्थित शिवभक्तांच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याच भारलेल्या वातावरणात प्रकट मुलाखतीची सांगता झाली. एका रात्रीत टकमक टोक चढून जाण्याचा रोमांचकारी आणि अंगावर काटा उभा राहण्याचा प्रसंग, राजू आणि रेवा देसाई यांचा मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने झालेला शुभविवाह, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगण्यात येणे, राज्याभिषेक नव्हे तर राजाभिषेक असे ठासून सांगणे या शिवचरित्र कथनामुळे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेतील या कार्यक्रमास श्रोत्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सौ‌. नयना रेगे यांनी केले. पाच दिवसांच्या या वसंत व्याख्यानमालेत  लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांचा शाहिरांचा पोवाडा, रवींद्र देवधर, हृषिकेश कानडे आणि नयना रहाळकर यांनी सादर केलेला ‘मी भारतीय’ हा दीर्घांक; ख्यातनाम सदाबहार चित्रपट अभिनेते देव आनंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रख्यात चित्रपट समीक्षक श्री. दिलीप ठाकूर यांनी सांगितलेल्या असंख्य आठवणी आणि संतोष पिसाट, प्रमोद कुंभार, संगीता मिरकर, रश्मी मुळे व सहकाऱ्यांनी सादर केलेली अजरामर गाणी; विजय मडव(शारदा), दिलीप चव्हाण, वसंत सावंत(जय महाराष्ट्र नगर भूषण), विजय घरटकर(प्रेरणा), हर्षिता वायंगणकर(मल्लखांब सुवर्ण पदक) यांना शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आलेले विविध पुरस्कार; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम कदम यांनी ४२ व्या व्याख्यानमाले निमित्त श्री. विजय वैद्य यांना ४२ गुलाबपुष्पांची माळा व शाल देऊन सन्मानित केले. सातत्याने ४२ वर्षे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत उपस्थिती लावणारे वर्तक गुरुजी यांनाही सन्मानित करण्यात आले. अनेकांनी आठवणी कथन केल्या. सचिन वगळ यांनी पुरस्कार सन्मानित मान्यवरांच्या सन्मान पत्राचे आपल्या खड्या आवाजात वाचन केले.

पथनाट्यांतून पर्यावरण विषयक जनजागृती

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत नवी मुंबई : शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवत नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. यावर्षीही ‘माझी वसुंधरा अभियान’ 4.0 अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत असून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरण विषयक जनजागृती करताना पथनाट्यासारख्या लोकांना चटकन् भावणा-या माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्यात येत असून 21 मेपासून नमुंमपा क्षेत्रातील आठही विभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येक माणसाने करावयाच्या छोट्या छोट्या बाबींची माहिती पथनाट्यांच्या माध्यमातून त्यावर हसत खेळत भाष्य करीत सादर करण्यात आली असून या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आठही विभागांत गर्दी असते अशा मुख्य 22 ठिकाणी सादर झालेल्या माझी वसुंधरा अभियानविषयक पथनाट्यांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला असून पथनाट्य सादरीकरण करणा-या कलावंत समुहाचे उपस्थिांकडून कौतुक झाले आहे. पथनाट्याप्रमाणेच मोठ्या सोसायट्यांमध्ये जाऊन माझी वसुंधरा अभियानामध्ये पर्यावरण संवर्धन माहितीपूर्ण कार्यशाळा आयोजित करूनही जनजागृतीवर भर दिला जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (2) श्री. शिरिष आरदवाड यांनी दिली आहे.

प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवा – आयुक्त डॉ. कैलास शिंदे

प्रतिबंधात्मक कारवाईत ८५ हजार दंडात्मक रक्कम तसेच ३९.७५० किलो प्लास्टिक जमा अशोक गायकवाड नवी मुंबई : एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईत ८५ हजार दंडात्मक रक्कम तसेच ३९.७५० किलो प्लास्टिक जमा करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही एकल प्लास्टिक वापर प्रतिबंधात्मक कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनी पर्यावरणास व मानवी जीवनास विघातक अशा एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.* नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र एकल वापर प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने याविषयी जनजागृती करण्यासोबतच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. सर्वच विभाग कार्यक्षेत्रात संबंधित विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. अशा एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेअंतर्गत १५ ते २२ मे २०२४ या आठवड्याभराच्या कालावधीत विभागीय कार्यक्षेत्रात ७१ ठिकाणी तपासणी करण्यात आली आणि दंडात्मक कारवाई तसेच प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये दोषी आढळलेल्या १७ व्यावसायिक व आस्थापनांकडून एकूण रू. ८५ हजार दंडात्मक रक्कम तसेच ३९ किलो ७५० ग्रॅम प्लास्टिक पिशव्यांचा साठा तसेच एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले. यामध्ये बेलापूर विभागात ७ व्यावसायिक / आस्थापनांवर कारवाई करीत ३५ हजार दंडात्मक रक्कम व २४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. वाशी विभागात ३ व्यावसायिक / आस्थापनांवर कारवाई करीत १५ हजार दंडात्मक रक्कम व ३ किलो एकल वापर प्लास्टिकची जप्ती केली. ऐरोली विभागातही व्यावसायिक / आस्थापनांवर कारवाई करण्यात आली व त्यामध्ये 15 हजार दंड वसूली व 10 किलो 500 ग्रॅम एकल वापराचे प्लास्टिक जप्ती करण्यात आली. परिमंडळ 2 विभागाच्या भरारी पथकाने 4 व्यावसायिकांवरील कारवाईत 20 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 2 किलो 250 ग्रॅम एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. अशाप्रकारे या आठवड्यात 17 व्यावसायिक / आस्थापनांकडून 85 हजार दंडात्मक रक्कम वसूली तसेच 39 किलो 750 ग्रॅम एकल वापर प्लास्टिकचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही एकल प्लास्टिक वापर प्रतिबंधात्मक कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनीही पर्यावरणास व मानवी जीवनास विघातक अशा एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागा अंतर्गत  श्री. बजरंग महादेव गोळे, रूम नंबर 335 सेक्टर-15 कोपरखैरणे, नवी मुंबई व श्री. कारभारी रामभाऊ ढोले, रूम नंबर 122 सेक्टर 05, कोपरखैरणे, नवी मुंबई. यांनी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे आर.सी.सी. स्वरूपाचे बांधकाम सुरू केले होते. अनधिकृत बांधकामास कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये अनुक्रमे दि.29/02/2024 व दि.26/03/2024 रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. सदरची दोन्ही अनधिकृत बांधकामे आज दिनांक 24/05/2024 रोजी निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, 08 मजूर, 01 गॅस कटर, 02 ब्रेकर, 1 पीकअप व्हॅन कारवाई करीता वापर करण्यात आले. तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

दहावीचा आज निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आज सोमवार दिनांक २७ मे रोजी दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे.  ही परीक्षा…

एकच लक्ष विधानसभा क्षेत्र-सुनिल तटकरे

मुंबई : चार जूनला लोकसभेचे निकाल काहीही लागू देत, आम्ही एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हा मंत्र घेऊन महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे राष्ट्रवादी अजिपवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज जाहीर…