Category: देश

National-News

“कायदे पतीकडून खंडणीसाठी नाही”; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली :  लग्न हा व्यावसायिक करार नाही आणि कायद्यातील तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत आणि त्यांच्या पतीला शिक्षा करण्यासाठी नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटले. कायद्यातील कठोर तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत आणि…

मुंबई, डोंबिवली, ठाणे, भिवंडी, भाईंदर शहरांना जोडणाऱ्या प्रवासी जल वाहतुकीसाठी ९६.१२ कोटींचा अंदाजे खर्च

केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हे प्रकल्पाला गती देणार – खासदार नरेश म्हस्के अनिल ठाणेकर नवी दिल्ली, मुंबई, डोंबिवली, ठाणे, भाईंदर शहरांना जोडणाऱ्या प्रवासी जल वाहतुकीसाठी ९६.१२ कोटींचा अंदाजे खर्च…

महाराष्ट्र-हरयाणामध्ये भाजपने षड्यंत्र रचून विजय मिळवला?

अरविंद केजरीवालांचा मोठा दावा नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरयाणा निवडणुकीत षडयंत्र रचून भाजपाने विजय मिळविला असा दावा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.  केजरीवाल एक्स वरील…

राहुल गांधीना संभलला जाण्यापासून रोखले

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हिंसाचारग्रस्त संभलला भेट देण्यासाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वधेरा यांच्यासह काँग्रेस नेत्यांना दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवरील गाझीपूर सीमेवर पोलिसांनी रोखले. त्यांना संभलला…

सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार अमृतसर : माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. सुवर्ण मंदिराबाहेर हाणामारी झाली, त्याचवेळी सुखबीर सिंह बादल…

डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे होणार पुर्नसर्व्हेक्षण

डहाणू : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डहाणू- नाशिक या रेल्वे मार्गाची, अनेक दशकांची मागणी आहे. सदरची मागणी काही वर्षासाठी कालबाह्य झाली होती. मात्र, खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी ही मागणी पुन्हा पुर्नजीवीत केली आहे. या रेल्वे मार्गाचे पुर्नसर्व्हेक्षण होणार आहे. त्यासाठी  2  कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणात आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी खासदार डॉ.हेमंत सवरांनी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वेमार्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  डहाणू- नाशिक रेल्वे सुरू करण्याची मागणी, या भागाचे पहिले तत्कालीन खासदार, जव्हार संस्थान चे राजे यशवंतराव मुकणे यांनी  1950  मध्ये केली होती. त्यानंतर या मागणीचा पाठपुरावा दिवंगत खासदार अॅड चिंतामण वनगा यांनी दोन तीन दशके केला आहे. दरम्यानच्या काळात तत्कालीन रेल्वे मंत्री राम नाईक यांच्या कार्यकाळात डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वे सुरू होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, नंतरच्या काळात या रेल्वे मार्गाची मागणी कालबाह्य झाली होती. आता पुन्हा पालघर चे खासदार डॉ.हेमंत सवरांनी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाच्या मागणी ला पुर्नजीवीत केले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या रेल्वे मार्गाच्या पुर्नसर्व्हेक्षणाला परवानगी दिली आहे. त्यासाठी दोन कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे, त्यामुळे डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे मार्गाची गरज…… आदिवासी भागात खरीप पीकाव्यतिरीक्त अन्य ऊत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे येथील आदिवासी, रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरीत होतात. या भागात कारखानदारी अथवा औद्योगिक वसाहत नाही. स्थानिक ठिकाणी महिला बचत गटांकडून उत्पादित अथवा तयार केलेल्या मालाला बाजारपेठ ऊपलब्ध होत नाही. शिक्षीत तरूणांना रोजगार नाही. त्यामुळे या भागात रेल्वे मार्ग झाल्यास, सर्व सुविधा तसेच रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाची गरज आहे. पुर्नसर्व्हेक्षणात आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी डहाणू- नाशिक रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व्हेक्षणात मोखाडा, जव्हार आणि विक्रमगड या तीन आदिवासी तालुक्यांचा समावेश करण्यात यावा. या तालुक्यातील मुख्य बाजारपेठांलगत सदरचा रेल्वे मार्ग व्हावा, तसे सर्व्हेक्षण करावे अशी मागणी, रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. डॉ. हेमंत सवरा, खासदार पालघर. ००००  

नायडूंकडून आंध्रात वक्फ बोर्ड बरखास्त

आंध्र प्रदेश :  आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलं आहे. गतमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीयांच्या सरकारने राज्यात वक्फ बोर्डची स्थापना केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील जनतेनं चंद्राबाबू नायडू यांच्याबाजुने कौल…

नायडूंकडून आंध्रात वक्फ बोर्ड बरखास्त

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलं आहे. गतमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीयांच्या सरकारने राज्यात वक्फ बोर्डची स्थापना केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील…

ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ फत्ते!

रेल्वे संरक्षण दलामुळे हरवलेल्या ४१४ मुलांची झाली घरवापसी मुंबई: मध्य रेल्वेवर सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) हरवलेल्या मुलांची घरवापसी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आरपीएफने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहिमे’ अंतर्गत एकूण ४१४ मुलांनं त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले आहे. या मुलांमध्ये ३०६ मुले आणि १०८ मुलींचा समावेश आहे. देशभरातील अनेक मुला- मुलींना शहराचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात. मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना सापडतात. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी या मुलांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. यंदा ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ४१४ मुलांची सुटका करून त्यांची घरवापसी केली. या मुलांना सुरक्षित घरी पाठविण्यासाठी रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपी आणि चाइल्डलाइन केंद्र समन्वयक एकत्रितपणे काम करत असून हरवलेल्या मुलांचे संगोपन, त्यांच्या आई-वडिलांचा शोध, त्यांचे समुपदेशन, त्यांचे जेवण सर्व गोष्टींची काळजी संस्थेकडून आणि प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. ००००

डोंबिवलीत फडके रोडवरील वाहन कोंडीने प्रवासी त्रस्त

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील बापूसाहेब फडके रस्त्यावर दररोज संध्याकाळी रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, चारचाकी वाहने उभी असतात. अनेक वाहन चालक फडके रोडवर वाहने उभी करून खरेदीसाठी बाजीप्रभू चौक, नेहरू रोड भागात खरेदीसाठी जातात. फडके रोड हा एक दिशा मार्ग असताना उलट दिशेने या रस्त्यावरून वाहने धावतात. त्यामुळे दिवसेंदिवस दररोज संध्याकाळच्या वेळेत या रस्त्यावर वाहन कोंडी होते. बापूसाहेब फडके रस्त्यावर जवाहिर, गृहपयोगी वस्तू, वस्त्रप्रावरणे अशी विविध प्रकारची दुकाने आहेत. हाॅटेल्स या रस्त्यावर आहेत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत खरेदीसाठी येणारे नागरिक आपली वाहने दुकानासमोर उभी करून ठेवतात. या जागेत अगोदरच दुकान मालकांची वाहने उभी असतात. हाॅटेल्ससमोर घरपोच खाद्यपदार्थ पुरवठादार वितरकांची दुचाकी वाहने घोळक्याने उभी असतात. फडके रोड गणपती मंदिर, टिळक रस्त्याने येऊन डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुला आहे. या एक दिशा मार्गावर रेल्वे स्थानकाकडून येणारी रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने घुसखोरी करतात. या रस्त्यावर कोंडी करतात. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर फडके रोडवर नवी मुंबई, ठाणे परिसरातील कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घेऊन येणारी वाहने येतात. केडीएमटीच्या बस याच रस्त्यावरून धावतात. या रस्त्याच्या दुतर्फा फळ, भाजीविक्रेते बसलेले असतात. पदपथांवर दुकानदारांनी आपल्या वस्तू ठेऊन पदपथ अडविलेले असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना फडके रस्त्यावरून चालताना वाट काढत जावे लागते. संध्याकाळच्या वेळेत नोकरदार वर्ग घरी परतत असतो. त्यांनाही या कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. रेल्वे स्थानकाकडून, के. बी. वीरा शाळेकडून येणारे बहुतांशी वाहन चालक फडके रोडवरील एक दिशा मार्गिकेचे उल्लंघन करून वाहने चालवितात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. नेहरू रस्ता, के. बी. वीरा शाळा आणि बाजीप्रभू चौकाकडून गणेश मंदिराकडे जाणारी उलट दिशेची वाहने रोखण्यासाठी वाहतूक विभागाने फडके रस्त्यावर अंबिका हाॅटेल भागात संध्याकाळच्या वेळेत एक वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी नागरिक, व्यापारी करत आहेत. केडीएमटीच्या बस संध्याकाळी टिळक रस्त्याने फडके रस्त्यावरून बाजीप्रभू चौक भागात जातात. मदन ठाकरे चौकात या बसना वळण घेताना रस्त्यावरील दुचाकी, फेरीवाल्यांचा अडथळा येतो. अनेक वेळा बस या चौकात अडकून पडतात. वाहतूक विभागाची टोईंग व्हॅन नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची प्रवाशांची मागणी आहे. वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले, डोंबिवली शहरात वाहन कोंडी होणार नाही अशा पद्धतीने नियोजन केले आहे. रस्त्यावर नियमबाह्य उभी केलेली वाहने टोईंग व्हॅनच्या माध्यमातून उचलली जातात. फडके रोडवरील वाहनांनावर नियमित कारवाई केली जाते. कोट डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरू आहे. पादचाऱ्यांना रस्ते, पदपथ मोकळे राहतील यादृष्टीने फेरीवाले नियंत्रण पथक कारवाई करते. फडके रोडवर पालिका आणि वाहतूक विभागाची संयुक्त मोहीम राबविण्याचा विचार आहे. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.