Category: देश

National-News

भारताविरुद्धच्या वर्ल्डकप मॅचवर पाकचा बहिष्कार

भारताविरुद्धच्या वर्ल्डकप मॅचवर पाकचा बहिष्कार नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताविरूद्धच्या टी-२० वर्ल्ड कपमॅचवर बहिष्कार टाकला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये मॅच होणार होती. बांगलादेशने भारतात सुरक्षेच्या कारणावरून  खेळण्यास नकार दिल्यावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट…

आत्मनिर्भर भारतासाठीचा अर्थसंकल्प

आत्मनिर्भर भारतासाठीचा अर्थसंकल्प  महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी नवी दिल्ली: भारताला आत्मनिर्भर करणारा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी लोकसभेत सादर केला. सलग नवव्यांदा बजेट मांडण्याचा विक्रमही निर्मला सीतारमण यांनी केलाय.…

महाराष्ट्राची दणदणीत सलामी!

३५ वी किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्राची दणदणीत सलामी! कुमार–कुमारी गटात विजयाचा जल्लोष कुरुक्षेत्रच्या मैदानावर महाराष्ट्राची विजयी झलक हरियाणा, क्री. प्र. : कुरुक्षेत्र (हरियाणा) येथील थीम पार्क मैदानावर सुरु झालेल्या ३५ व्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयी सलामी देत आपली ताकद ठसठशीतपणे दाखवून दिली. वेग, चपळाई, अचूक डावपेच आणि भक्कम संरक्षणाच्या जोरावर महाराष्ट्राने साखळी सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत स्पर्धेत आपली विजयाची दावेदारी निर्माण केली. किशोरी गट : महाराष्ट्राची आंध्रप्रदेशवर एकतर्फी मात किशोरी गटातील एका सामन्यात महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच सामना आपल्या बाजूने झुकवला. महाराष्ट्राने आंध्रप्रदेशवर एक डाव ३४ गुणांनी ४२–८ असा दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राकडून पियुषा पानमाळकर (३.१० मि. संरक्षण), अपर्णा वर्दे (२.५० मि. संरक्षण व २ गुण), ऋतुजा सुरवसे (२.५० मि. संरक्षण व ८ गुण), वेदिका तामखडे (२.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी प्रभावी कामगिरी करत विजय साकारला. आंध्रप्रदेश कडून एस. मीना हिने एकाकी प्रतिकार केला. किशोर  गट : पश्चिम बंगालची उत्तर प्रदेशवर काठावरची सरशी दुसऱ्या किशोरी सामन्यात पश्चिम बंगालने उत्तर प्रदेशवर ५ गुण व २ मि. ५ सेकंद राखून ३९–३४ असा थरारक विजय मिळवला. पश्चिम बंगालकडून अमृता दास (१.३५ मि., नाबाद १ मि. संरक्षण व ४ गुण), अनुषा मंडल (२.२० मि. संरक्षण व ४ गुण), कुकु माझी (१ मि. व १.४० मि. संरक्षण) यांनी निर्णायक भूमिका बजावली. उत्तर प्रदेशकडून आरोही कुमारी (१.१० मि. संरक्षण व १० गुण), साक्षी कुमारी (१ मि. संरक्षण व १२ गुण) यांनी झुंज दिली. किशोर गट : महाराष्ट्राचा पॉंडेचेरीवर ठसठशीत विजय किशोर गटातील सामन्यात महाराष्ट्राने पॉंडेचेरीवर २१ गुणांनी ३५–१४ असा स्पष्ट विजय मिळवला. महाराष्ट्राकडून विक्रमसिंग राठोड (नाबाद २.२० मि. संरक्षण व २ गुण), वेदांत गायकवाड (१२ गुण), कर्तव्य गाडेकर (२.१० मि. संरक्षण) यांनी दमदार कामगिरी नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. पॉंडेचेरी कडून आर. विश्वनाथ (१ मि. संरक्षण), एम. दिबिनेश (१ मि. संरक्षण) यांनी प्रयत्न केले. विजयाचा आत्मविश्वास, पुढील लढतींकडे लक्ष पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) संघांनी दाखवलेला आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ पाहता पुढील साखळी सामन्यांतही महाराष्ट्राकडून अशीच दमदार कामगिरी अपेक्षित आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची खो-खो परंपरा अधिक बळकट होत असल्याचे हे सामने ठळकपणे अधोरेखित करतात.

भारत-युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची घोषणा

भारत-युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा आज  करण्यात आली आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील बहुचर्चित ‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी करण्यात आली…

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीलाच शिवसेनेच्या मालकीची सुनावणी 

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीलाच शिवसेनेच्या मालकीची सुनावणी सुप्रीम कोर्टाचे आस्तेकदम पक्ष आणि चिन्हावर आता शुक्रवारी २३ जानेवारीला सुनावणी नवी दिल्ली: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या रक्त आणि घामाने उभा केलेल्या शिवसेना…

भाजपात आजापासून नबीन पर्व !

भाजपात आजापासून नबीन पर्व ! नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड  नबीन ठरले भाजपाचे सर्वात तरुण अध्यक्ष नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीत आजपासून नबीन पर्व सुरु झाले आहे. भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मंत्री नितीन गडकरी, जे.पी.नड्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजपाचे निवडणूक अधिकारी के लक्ष्मण यांनी अध्यक्षपदासाठी घेतलेल्या निवडणुकीची माहिती सगळ्यांना दिली. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांचा एकमेव अर्ज आल्याचं सांगत त्यांनी नबीन यांच्या नावाची घोषणा करत त्यांना निवडीचं प्रमाणपत्र सोपवले. नितीन नबीन हे मूळ कार्यकर्ते आहे. अगदी लहान वयात ते ५ वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेत. बिहार सरकारमध्ये अनेकदा ते मंत्री होते. राष्ट्रीय युवा मोर्चाचे महासचिव म्हणून त्यांनी देशभरात काम केले. सिक्कीम, छत्तीसगड येथे प्रभारी म्हणून काम केले. संघटनेतील अनुभवासोबत त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात पक्ष आणखी पुढे जाईल असा विश्वासमावळते अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केला. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे रिटनिंग ऑफिसर म्हणून के. लक्ष्मण यांच्याकडे नितीन नबीन यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. एकूण नामांकनाचे ३७ संच सादर करण्यात आले ते सर्व अर्ज वैध ठरले. नामांकन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २ ते ४ या वेळेत पूर्ण झाली. नामांकन अर्जाच्या ३७ संचांपैकी ३६ संच विविध राज्यातून आले. उरलेला एक संच भाजपा संसदीय मंडळाच्या सदस्यांकडून सादर करण्यात आला. त्यात पंतप्रधान आणि ३७ खासदारांचा समावेश होता. अर्ज परत घेण्याच्या कालावधीनंतर केवळ एकमेव अर्ज नितीन नबीन यांचा राहिला. आतापर्यंतचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? ६ एप्रिल १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. १९८० ते १९८६ या काळात अटल बिहारी वाजपेयी हे वयाच्या ५५ व्या वर्षी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. त्यानंतर १९८६ ते १९९१ या काळात लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व होते. तेव्हा त्यांचे वय ५८ वर्ष होते. त्यानंतर १९९३ ते १९९८, २००४ ते २००५ असे तीन वेळा अडवाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. १९९१ ते ११९३ या काळात वयाच्या ५७ व्या वर्षी मुरली मनोहर जोशी यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. १९९८ ते २००० या काळात कुशाभाऊ ठाकरे, २०००-२००१  बंगारू लक्ष्मण, २००१-२००२ जना कृष्णमूर्ती, २००२-२००४ या काळात व्यंकय्या नायडू, २००५ ते २००९ आणि २०१३-२०१४ या काळात राजनाथ सिंह, २००९ ते २०१३ मध्ये नितीन गडकरी, २०१४ ते २०२० वयाच्या ४९ व्या वर्षी अमित शाह यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. २०२० ते २०२४ या काळात जे.पी. नड्डा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आणि आता नितीन नबीन भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. नबीन माझे…

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांना प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला रोखलं

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंदांना प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला रोखलं स्नानाच्या ठिकाणी पोलिसांनी पालखी रोखल्याने वाद चिघळला शंकराचार्यांच्या शिष्यांना शेंडीला पकडून मारहाण शंकराचार्यांचे उपोषण प्रयागराज : प्रयागराज माघ मेळ्यात मौनी अमावस्येला स्नान करण्यासाठी आलेल्या शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची पालखी स्नानाच्या ठिकाणाहून आधी पोलिसांनी रोखल्याने वाद चिघळला आहे. पोलिसांनी शंकराचार्यांना संगमाकडे पायी जाण्यास सांगितले. शंकराचार्यांच्या शिष्यांनी त्यास नकार देत पालखी घेऊन पुढे जाऊ लागले. यामुळे शिष्य आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी अनेक शिष्यांना ताब्यात घेतले. त्यातील एका भिक्षूला  पोलिस स्टेशनमध्ये शेंडीला पकडून मारहाण झाल्याचा व्हिडीयो व्हायरल झाल्यामुळे…

 ‘अॅट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

७७ वा प्रजासत्ताक दिन ‘अॅट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण नवी दिल्ली: भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित ‘अॅट होम’ (At Home) स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील…

 मैदान गाजवलं! महाराष्ट्राचा झंझावात प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण!

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मैदान गाजवलं! महाराष्ट्राचा झंझावात प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण! काझीपेठच्या रेल्वे ग्राउंडवर थरारक लढती; विजयी संघांची दिमाखात पुढील फेरीत झेप काझीपेठ (तेलंगणा):  येथील रेल्वे ग्राउंडवर सुरू…

केडीएमसी निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची उडाली झुंबड

केडीएमसी निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची उडाली झुंबड उमेदवारी अर्ज भरण्याच्या विहित वेळेच्या नंतरही अर्ज भरण्यासाठी गर्दी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पालिकेच्या नऊ…