Category: रायगड

raigad news and updates

नवीन पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देणार-संदीप पाटील

पनवेल : पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना नवीन पनवेल मधून मताधिक्य देवून बहुमताने निवडून आणणार असा ठाम विश्वास भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केला. नवीन पनवेल येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सेक्टर १८ मधील सिडको विनायक  मंदिरातील श्री गणेशाचे दर्शन घेवून प्रचाराला सुरूवात केली.  यावेळी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी बोलताना सांगितले कि, पनवेलच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर विजयी होणे गरजेचे आहे. तसेच महायुती सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून त्यांचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळवून दिला आहे. लाडकी बहीण योजना राबवून महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे आत्ता या योजनेचे पैसे वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे गतीमान पद्धतीने काम करणारे महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आणा असेही त्यांनी यावेळी सांगितले. पनवेल विधानसभा मतदार संघाचा विकास करणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडीत घेतली आहे. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे संपुर्ण मतदार संघ पिंजून काढत आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. यावेळी माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, जगदीश घरत, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, विभागीय अध्यक्ष विजय म्हात्रे, जितेंद्र वाघमारे, अॅड. चंद्रकांत मढवी,  गंगाधर भगत, महेश तांडेल, मयूर कदम, गिरीश खरिवले, पप्पू साळवी, अमोल भगत, पप्पू वाघमारे,  आदी उपस्थित होते. 00000

८ दिवसात सरकार बदला,  नशिब बदलतो- उद्धव ठाकरे

 मालेगाव : शेतकऱ्यांना परत एकदा मी कर्जमुक्त करुन दाखवणार म्हणजे दाखवणारचं असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. तसेच सोयाबीनला हमी भाव देणार आहे. त्यामुळं आठ दिवसांनी तुम्ही सरकार बदलून दाखवा, मी…

पावसात भिजलो की निकाल चांगला लागतो- शरद पवार

इचलकरंजी : महाराष्ट्रामध्ये अनेकवेळा मी बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो अशी मिश्कील टिप्पणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी भर…

 बदलापूरची बदनामी केल्यानंतर फडणवीसांकडून बंदूक घेऊन फोटो

सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांवर टीकास्त्र, सुभाष पवार यांच्या प्रचारासाठी बदलापूरात सभा   बदलापूर : राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात बदलापूर शहराची बदनामी झाली. मात्र, एवढी गलिच्छ घटना घडल्यानंतरही फडणवीस बदलापूरकडे फिरकले नाहीत. उलट बंदूक घेऊन बदलापूर असे बोर्ड लावले गेले, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. बदनामी झालेल्या बदलापूर शहराला आगामी सहा महिन्यांत पुन्हा नावलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहनही खासदार सुळे यांनी केले. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांची बदलापूरमधील कात्रप येथे भव्य जाहीर सभा झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी खासदार बाळ्यामामा म्हात्रे, खासदार निलेश लंके, लोकनेते गोटीरामभाऊ पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या ज्योती ठाकरे, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड,  महेश तपासे, विद्या वेखंडे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आप, आरपीआय सेक्युलर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच बदलापूर येथील महिला व नागरिकांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले. बदलापूरच्या लेकीबाबत झालेले चुकीचे वर्तन हे बदलापूरकरांनी उत्स्फूर्त आंदोलन केल्यामुळेच जगाला समजले. या आंदोलनामुळे ही घटना समजली. अन्यथा या भयंकर प्रकाराची जगाला माहिती मिळाली नसती, असे नमूद करीत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. बदलापूर शहरात पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, अपुरी लोकल सेवा आदी अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. बुलेट ट्रेनवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना, बदलापूरकर गर्दीत प्रवास करीत आहेत. बुलेट ट्रेनऐवजी बदलापूर ते चर्चगेटपर्यत ट्रेन लिंक करायला हवी. स्वच्छ स्वच्छतागृहे उभारायला हवीत, असे भाषणात म्हटल्यावर नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्याला पसंती दिली. नगरहून मुंबईला येताना माळशेज घाटात खड्डे लागल्यानंतर आम्हाला मुरबाड मतदारसंघ सुरू झाल्याचे समजते. गेल्या २० वर्षांत या भागाचा विकास झाला नाही. काचेच्या पुलाची १० वर्षांपासून घोषणा केली जात आहे, ही काय भानगड आहे. केवळ निवडणूक आली की दिशाभूल करण्याचा उद्योग केला जात आहे, अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केली. बदलापूरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे बाळ्यामामा म्हात्रे यांनी सांगितले. महिला लोकलसह  रेल्वे प्रश्नांसाठी आपण पाठपुरावा करणार आहोत, असे आश्वासन म्हात्रे यांनी दिले. बदलापूर शहरात २० वर्षांत महाविकास आघाडीची प्रथमच भव्य सभा झाली. आतापर्यंत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, मुरबाड मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे. मुरबाडला गेल्यानंतर बदलापूरमध्ये विकास केला, तर बदलापूरला आल्यावर मुरबाडमध्ये विकास केल्याचे सांगितले जाते. लोकल प्रवाशांचे हाल सुरु असून, महिला लोकलची आवश्यकता आहे. पाणीपुरवठ्याचे हेतूपुरस्सर नियोजन झाले नसून, बगलबच्च्यांचे टँकर सुरू झाले आहेत. २० वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत बदलापूरच्या सुसज्ज हॉस्पिटलचे आश्वासन दिले जाते, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले. चौकट टोपी घालून श्रेयासाठी धाव वडोदरा एक्सप्रेस हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून, या महामार्गाचे श्रेय घेण्यासाठी ते टोपी घालून धावले.पण रेल्वे हा विषय माझा नाही, असे म्हणतात. एखादे काम झाले की ते मी केले, तर रखडलेली कामे दाखविली की ते माझे काम नाही, अशी त्यांच्या कामाची स्टाईल आहे, असा टोला सुभाष पवार यांनी कोणाचेही नाव न घेता मारला. 00000

भुई धोपटण्याचा प्रकार

काश्मीरमधील 370 वे कलम रद्द करण्यास कुणाचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. विधानसभा बरखास्त करून संसदेत हा विषय मंजूर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता काळाची चक्रे…

श्रीवर्धन विधानसभेमध्ये १४ व १५ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग, ज्येष्ठांचे गृहमतदान -महेश पाटील

अशोक गायकवाड रायगड : १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये माणगाव, तळा, रोहा, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ४७२ व दिव्यांग मतदार ११६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी…

उरण विधानसभेमध्ये १५ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग,ज्येष्ठांचे गृहमतदान – जनार्दन कासार

अशोक गायकवाड रायगड :१९०-उरण विधानसभा मतदार संघामध्ये पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ६८ व दिव्यांग मतदार १६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी १२ ड अर्ज दिले आहेत. त्यानुसार १९०-उरण विधानसभा मतदार…

निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी -रुही खान

अशोक गायकवाड रायगड : मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रावर सुरळीत प्रवेश, मार्गदर्शक सूचना, दिशादर्शक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती याबाबत त्यांनी माहिती घेतली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात…

श्रीवर्धन विधानसभेमध्ये १४ व १५ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग, ज्येष्ठांचे गृहमतदान -महेश पाटील

अशोक गायकवाड रायगड : १९३-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये माणगाव, तळा, रोहा, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ४७२ व दिव्यांग मतदार ११६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी…

विधानसभा मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर…