Category: रायगड

raigad news and updates

 धाराशिवचा दुहेरी मुकुटासह दिवाळी धमाका

 सुवर्णमहोत्सवी कुमार व मुली (ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाराशिवचे कुमारगटात पहिले तर मुलींच्या गटात चौकारासह आठवे विजेतेपद   धाराशिव : यजमान धाराशिवने सुवर्ण महोत्सवी (५०वी) कुमार व मुली (ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत कुमार व मुली या दोन्ही गटातून  विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट संपादिला. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी असलेले सावित्री पुरस्कार तन्वी भोसले हिने व विवेकानंद पुरस्कार सोत्या वळवी या धाराशिवच्याच खेळाडूंनी पटकाविले. मुलींच्या गटात सोलापूर, ठाणे तर मुलांच्या गटात सोलापूर व पुण्याने अनुक्रमे तृतीय व चतुर्थ स्थान संपादिले. धाराशिवने कुमारगटात पहिलेच विजेतेपद पटकावले असून मुलींच्या गटात विजेतेपदाच्या चौकारासह (२०२१-२२ पासून सलग चौथे विजेतेपद) तर एकूण आठवे विजेतेपद मिळवत सुवर्णमहोत्सवी वर्षात दुहेरी विजेतेपदासह दिवाळी धमाका साजरा केला. यापूर्वी २०१५-१६ साली जळगाव येथे झालेल्या ४३ व्या स्पर्धेत ठाण्याने दुहेरी मुकुट मिळवला होता त्यानंतर तब्बल सहा अजिंक्यपद स्पर्धांनंतर धाराशिवला हा इतिहास घडवता आला. यजमान म्हणून सुध्दा दुहेरी मुकुट मिळवणारा धाराशिव हा पहिला संघ ठरला व प्रेक्षकांनी दिवाळीत विजयोत्सव साजरा करताना आकाश आतीशबाजीच्या विविध रंगांनी भरून टाकले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त गर्दीत झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात धाराशिवने सांगलीचा ११-९ असा २ गुणांनी पराभव केला. मध्यंतराची ६-४ ही २ गुणांची आघाडीच त्यांना विजय मिळवून देऊन गेली. धाराशिवकडून अश्विनी शिंदेने ४.०० व २.१० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात ६ गुण मिळवत प्रेक्षकांना दिवाळीत फटके फोडण्याचा आनंद द्विगुणीत करून दिला. तन्वी भोसलेने १.२० आणि २.१० मिनिटे संरक्षण केले. सृष्टी सुतारने १.१० आणि १.०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गुण वासूल केला. प्रांजली काळेने पहिल्या डावात नाबाद १.२० व दुसऱ्या डावात १.३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गुण संघाला मिळवून दिला. मैथिली पवारने  १.१० व १.४० मिनिटे संरक्षण केले. सुहानी धोत्रेने आक्रमणात ३ खेळाडू बाद करताना विजेतेपदाचा धमाका उडवून दिला. तर पराभूत सांगली कडून सानिका चाफेने अष्टपैलू कामगिरी करताना ३.१०  व १.४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गुण मिळवत “हम भी किसीसे कम नही” या अविर्भावात कामगिरी नोंदवली. सानिया सुतारने १.४० व १.३० मिनिटे संरक्षण केले. प्रतीक्षा बिराजदारने आक्रमणात ३ खेळाडू बाद करून संरक्षणामध्ये १.१० व २.४० मिनिटे अशी वेळ नोंदवताना कडवी लढत दिली. पण शेवटी धाराशिवने विजेतेपदाचा विजयी चौकार मारलाच. मुलांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जादा डावांमध्ये धाराशिवने सांगलीवर  २३-२२ असा २.३० मिनिटे राखून १ गुणाने विजय साजरा करताना पहिले वाहिले विजेतेपद खेचून आणले. शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात मध्यंतराला १०-७ अशी तीन गुणांची आघाडी धाराशिवकडे होती. त्यानंतर मात्र, सांगली संघाने दुसऱ्या डावात जोरदार मुसंडी मारत आक्रमण केले व धाराशिवला १६-१६ असे बरोबरीत रोखले. जादा डावात मात्र धाराशिवने २.३० मिनिटे राखून ७-६ अशी बाजी मारली. नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण करणाऱ्या धाराशिवच्या सोत्या वळवीने १.५०, २.४० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात तीन गडी बाद केले. विलास वळवीने १.२० आणि १.५० मिनिटे असे संरक्षण करताना आक्रमणात दोन गडी बाद केले. हरदया वसावेने दोन मिनिट व एक मिनिट संरक्षण करताना आक्रमणात तीन गडी बाद केले. जितेंद्र वसावेने १.४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात चार गडी बाद केले. नितेश वसावेने १.१० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात पाच गडी टिपले व जमलेल्या प्रेक्षकांनी मैदानातच फटाक्यांची आतिषबाजी केली. सांगलीकडून प्रज्वल बनसोडेने १.१० व एक मिनिट संरक्षण करताना आक्रमणात सहा गडी बाद केले. अथर्व पाटीलने १.३०, १.१० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात ४ गडी बाद केले. आदर्श खतावेने आक्रमणात पाच गडी टिपत जोरदार लढत दिली पण दिवाळीने विजयाचे दान धाराशिवच्या पारड्यात टाकले. सर्वोत्कृष्ट खेळाडू अष्टपैलू: सोत्या वळवी, तन्वी भोसले (धाराशिव). संरक्षक :  विलास वळवी (धाराशीव), सानिका चाफे (सांगली). आक्रमक : अश्विनी शिंदे (धाराशिव),प्रज्वल बनसोडे (सांगली). या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले, सोलापूरचे पोलिस उपअधिक्षक दूलबा ढाकणे  यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नेत्र रोग तज्ञ डॉ. वृषाली लामतुरे (वारद), डॉ. मिलिंद पोळ, डायट कॉलेजचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ सारिका काळे, मराठी चित्रपटसृष्टीचे सह दिग्दर्शक संतोष साखरे,…

निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयात दाखले सादर करावेत – देवीदास टोंगे

अशोक गायकवाड रायगड : शासनाच्या ज्या निवृत्तीवेतनधारकांना रायगड जिल्हा कोषागाराकडून निवृत्तीवेतन प्रदान केले जाते अशा सर्व निवृत्तीवेतनधारकांनी १ ते ३० नोव्हेंबर रोजी हयात असल्याबाबतचे हयात प्रमाणपत्र” या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन रायगड जिल्हा कोषागार अधिकारी रायगड-अलिबाग देवीदास टोंगे यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारकांचे हयात प्रमाणपत्र विहित मुदतीत कोषागारात प्राप्त झाल्याशिवाय पुढील निवृत्तीवेतन प्रदान केले जाऊ शकत नाही. बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकेकडे पाठविण्यात आलेल्या घोषणापत्रावर स्वतः हयात असल्याबाबत बँक व्यवस्थापक यांच्या समक्ष दिनांकित स्वाक्षरी करावी. पुनर्नियुक्त/पुनर्विवाह केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतन/निवृत्तीवेतनधारकांकरिता नियमित नमुना वापरावा. मनिऑर्डरद्वारे निवृतीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांचे हयात दाखल्यांचे नमुने या कोषागार कार्यालयाकडून संबंधितांच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेले आहेत. त्यांनी स्वतःचे हयात दाखले स्वाक्षरीसह पूर्ण करुन कोषागार कार्यालयाकडे परस्पर पाठविण्याची व्यवस्था करावी. तसेच अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा कोषागार अधिकारी देवीदास टोंगे यांनी केले आहे. 00000

निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयात दाखले सादर करावेत – देवीदास टोंगे

अशोक गायकवाड रायगड : शासनाच्या ज्या निवृत्तीवेतनधारकांना रायगड जिल्हा कोषागाराकडून निवृत्तीवेतन प्रदान केले जाते अशा सर्व निवृत्तीवेतनधारकांनी १ ते ३० नोव्हेंबर रोजी हयात असल्याबाबतचे हयात प्रमाणपत्र” या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन रायगड जिल्हा कोषागार अधिकारी रायगड-अलिबाग देवीदास टोंगे यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारकांचे हयात प्रमाणपत्र विहित मुदतीत कोषागारात प्राप्त झाल्याशिवाय पुढील निवृत्तीवेतन प्रदान केले जाऊ शकत नाही. बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांनी कोषागार कार्यालयाकडून संबंधित बँकेकडे पाठविण्यात आलेल्या घोषणापत्रावर स्वतः हयात असल्याबाबत बँक व्यवस्थापक यांच्या समक्ष दिनांकित स्वाक्षरी करावी. पुनर्नियुक्त/पुनर्विवाह केलेल्या कुटुंब निवृत्तीवेतन/निवृत्तीवेतनधारकांकरिता नियमित नमुना वापरावा. मनिऑर्डरद्वारे निवृतीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांचे हयात दाखल्यांचे नमुने या कोषागार कार्यालयाकडून संबंधितांच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेले आहेत. त्यांनी स्वतःचे हयात दाखले स्वाक्षरीसह पूर्ण करुन कोषागार कार्यालयाकडे परस्पर पाठविण्याची व्यवस्था करावी. तसेच अधिक माहितीसाठी रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा कोषागार अधिकारी देवीदास टोंगे यांनी केले आहे. 00000

निवडणूक निरीक्षक ठेवणार निवडणूक प्रक्रियेवर लक्ष – किशन जावळे

रायगड : अशोक गायकवाड रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात निवडणुका शांत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत देखील या मतदारसंघांसाठी खर्च, सर्वसाधारण तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी स्वतंत्र निरीक्षक नेमण्यात आले आहेत. हे सर्व निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून ते संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघांसाठी ४ सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व निवडणूक निरीक्षक यांचे जिल्ह्यात आगमन झाले असून जिल्हाधिकारी जावळे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. १८८ पनवेल, १८९ कर्जत मतदार संघासाठी साठी दुनी चंद राणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १९० उरण आणि १९१ पेण मतदार संघासाठी संतोष कुमार राय तर १९२ अलिबाग अलिबाग मतदार संघांसाठी श्रीमती रुही खान, १९३ श्रीवर्धन आणि १९४ महाड साठी सतीश कुमार एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदारसंघात उमेदवारांच्या नामनिर्देशन प्रक्रियेपासून ते मतमोजणीपर्यंत सर्व महत्वाच्या टप्प्यांवर प्रत्यक्ष उपस्थित राहून हे सर्व साधारण निरीक्षक पाहणी करतील. तसेच मतदान यंत्रे व मतदान अधिकारी/कर्मचाऱ्यांची दुसरी सरमिसळ, उमेदवारी अर्ज छाननी, प्रक्रिया, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस, मतदानानंतर निवडक मतदान केंद्रांच्या संविधानिक कागदपत्रांची छाननी, मतमोजणी व विजयी उमेदवाराची घोषणा यासर्व प्रसंगी हे निरीक्षक उपस्थित राहतील. निवडणूकांदरम्यान, कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी पोलिस निवडणूक निरीक्षक म्हणून स्वप्नील ममगाई यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. समाजातील विविध घटकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग, कायदा– सुव्यवस्था याबाबत हे निरीक्षक आयोगाला अहवाल सादर करतील.

निवडणूक काळात सोशल मीडियावर करडी नजर; आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात होणार गुन्हा दाखल सोमनाथ घार्गे

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा निवडणूक काळात समाजमाध्यमांवर कुठलीही पोस्ट करतांना अथवा प्रतिक्रिया देतांना तसेच पक्षाचा अथवा उमेदवारांचा प्रचार करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी. सोशल मीडियावर आचारसंहिता काळात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर…

भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – किशन जावळे*

अशोक गायकवाड रायगड : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात निवडणुका शांत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत देखील या मतदारसंघांसाठी खर्च, सर्वसाधारण तसेच कायदा…

विजयाचा चौकार मारण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सज्ज

अशोक गायकवाड पनवेल : विजयाची हॅट्रिक करून आता विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी (सोमवार,…

साडेतीन हजार अंध बांधवांना दिवाळीची शिधा भेट

घाटकोपर –  घाटकोपर येथे दिवाळीनिमित्त जवळपास साडेतीन हजार अंध बांधवांना दिवाळीची भेट म्हणून रवा, मैदा, साखर, तूप, तेल, चहापावडर, हळद पावडर, मिरची पावडर, मिठाई, फरसाण आदी अन्नपदार्थांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम ओमकार अंध केवक सोसायटी या संस्थेच्या वतीने आयोजित केला होता. गेल्या ३६ वर्षांपासून या संस्थेच्या वतीने दरवर्षी अंध बांधवांसाठी हा कार्यक्रम पंतनगर येथील जनरल अरुणकुमार वैद्य मैदानात आयोजित केला जातो. संस्थेचे सर्वेसर्वा धर्मेश गिरी, अशोक देवरे पाटील, विपुल मेहता, प्रवीण तन्ना, नितीन शहा, निरुपा शहा, डॉ अनिल सॅम्युअल आदी या वेळी उपस्‍थित होते. शिवआरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी, समाजसेवक रवींद्र कोठवदे, दुर्गा परमेश्वरी मंदिर ट्रस्टच्या राखी जाधव यांच्या हस्ते अंध बांधवांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. या वेळी राज्यभरातून येणाऱ्या अंध बांधवांसाठी घाटकोपर रेल्वे स्थानक ते जनरल अरुणकुमार वैद्य मैदानापर्यंत सुमारे २०० रिक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. 00000

 महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर आज अर्ज दाखल करणार 

  पनवेल : १८८ पनवेल विधानसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करत विजयाचा शंखनाद करणार आहेत. तीनवेळा बहुमतांनी विजयी मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर मताधिक्य मिळवून विजयाचा चौकार मारण्यासाठी ज्येष्ठ, युवा, महिला, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशिर्वादाने सज्ज झाले आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आणि हितचिंतक जमणार असून त्यानंतर महायुतीतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व देणारे आणि जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करणारे लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. या मतदार संघाचे सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून संपृर्ण जबाबदारीने आमदार प्रशांत ठाकूर कार्यरत आहेत. प्रगती पासून दूर आणि भकास झालेल्या पनवेलला विकासाचा चेहरा देण्याचे काम त्यांनी केले, खऱ्या अर्थाने त्यांनी विधायक कामाने पनवेलला विकासकामांची ओळख करून दिली. कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दूरदृष्टीतून पनवेल विधानसभा क्षेत्रात विकासाचे महापर्व आले. सर्व धर्म समभाव आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांच्याकडून कायम पहायला मिळते. आपल्या कार्यकौशल्यातून पनवेलचा विकास घडविणारे, वक्तृत्व, दातृत्त्व आणि नेतृत्त्व गुणसंपन्न नेता व समाजप्रिय व्यक्तीमत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांचा नेहमीच नागरिकांना अभिमान राहिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना जनतेचा कौल मिळणार असून सोमवारी ते तमाम जनतेच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ०००००

हजारो कार्यकर्त्यांसमोर महेंद्रशेठ घरत यांनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा ?

पनवेल : आगामी विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाला एकही उमेदवार न दिल्यामुळे रायगड जिल्ह्यामधील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाले आहेत.सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आग्रह केला. रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी हजारो कार्यकर्ते महेंद्रशेठ घरत यांना भेटण्यासाठी शेलघर येथे आले असता उपस्थित हजारो कार्यकर्त्यासोबत महेंद्रशेठ घरत यांनी संवाद साधला व आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करत असताना महेंद्रशेठ घरत म्हणाले की खरेतर लोकसभेची निवडणूक मावळ लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला पोषक होता परंतु उद्धव ठाकरे सेनेने आपला उमेदवार उभा केला व कोकणातील एकही सीट काँग्रेस पक्षाला मिळाली नाही. पुढील विधानसभेत काँग्रेस पक्षाला न्याय मिळेल असा आशावाद होता परंतु याही विधानसभेत रायगड जिल्ह्यात एकही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला न सुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. काँग्रेस कार्यकर्ते आम्ही  कोणत्याही पक्षाचे ओझे उचलणार नाही असे म्हणणे होते. जोपर्यंत महाराष्ट्र प्रदेशचे नेते आदेश देत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही पक्षाचे काम करायचे नाही असे ते म्हणाले. तसेच बॅरिस्टर ए.आर.अंतुले साहेबांच्या रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला एकही विधानसभा मतदारसंघ न देता भोपळा मिळाला त्यामुळे महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रदेश चिटणीस तथा रायगड सहप्रभारी श्रीरंग बरगे यांच्यासमोर रायगड जिल्हा कॉग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा  सादर केला. जनतेच्या संवाद सभेसाठी रायगड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उरण मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या मदतीशिवाय कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उरण विधानसभेत काँग्रेस पक्ष किंगमेकर असेल.