Category: रायगड

raigad news and updates

 महाराष्ट्राच्या किशोर, किशोरी संघाचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

३४वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा सिमडेगा, झारखंड, : पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू असलेल्या ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत…

नेपाळमध्ये महापुरात ६० जणांचा मृत्यू

नेपाळ : नेपाळमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे ६० जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते बिश्वो अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी ३४ मृत्यू काठमांडू खोऱ्यात झाले आहेत. २२६ घरे पूर्णपणे पाण्यात बुडाली…

गद्दारांना ५० खोके आणि बहिणींना फक्त १५००- ठाकरे 

नागपूर:  “गद्दारांना 50 खोके आणि आम्हाला 1500 रुपये असं महिला सांगतात. 2014  ला मोदी यांचा आम्ही प्रचार करतो होतो. 15 लाख देणार होते. त्याचे 1500 का झाले?” असा ख़डा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. नागपूर येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्धव…

आनंद दिघेंची अडचण वाटणाऱ्यांनीच त्यांचा काटा काढला-संजय शिरसाट

 छत्रपती संभाजीनगर :  आनंद दिघे साहेबांवर बाळासाहेबांचे अतोनात प्रेम होते. किंबहुना दिघे साहेबांनी कधी बाळासाहेबांच्या बाजूला देखील बसण्याची हिम्मत केली नाही. दिघे साहेब किंग होतोय याची खुन्नस काहींना होती, त्यामूळे हे सर्व झाले. आनंद दिघे यांना मोठ्या…

कोकणच्या सर्वांकष औद्योगिक विकासाला गती देणार-उदय सामंत

 रायगड जिल्ह्यात ८३ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर्ससह ५० हजार कोटींचे विविध प्रकल्प येणार ! अशोक गायकवाड   रायगड : राज्यशासन महाराष्ट्राच्या समतोल औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध आहे. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या समन्वयाने विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यातून राज्याकडे आकर्षित झालेली मोठी गुंतवणूक, निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी हे सरकारचे मोठे यश असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यासह कोकणच्या सर्वांकष औद्योगिक विकासाला गती देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात ८३ हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प येत आहे. तसेच विविध ५० हजार कोटींचे प्रकल्प येत आहेत. या जिल्ह्यामध्ये झालेली गुंतवणूक कोकणच्या दृष्टीने भूषणावह असल्याचे गौरवोद्गार उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. गत दोन वर्षात महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आज भारतात पहिल्या स्थानावर आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाने या दोन वर्षात घेतले. महाराष्ट्राने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयाची माहिती उद्योग जगत साकारणाऱ्या उद्योजकांना, व्यवसायिकांना व्हावी, राज्याचे व्हिजन कळावे या उद्देशाने उलवे, पनवेल येथे आयोजित ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उद्योग सहसंचालक विजू सिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांतप्पा हरळय्या आदी उपस्थित होते. राज्यात अनेक गेमचेंजर प्रकल्प येत आहेत हे सांगताना आनंद होत असल्याचे सांगून उदयोग मंत्री सामंत म्हणाले उद्योगांना पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात उद्योग वाढावेत, यादृष्टीने उद्योजकांना सबसिडीसह विविध सवलती आणि सुविधा प्रदान केल्या जात आहेत. राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शासनाने अतिशय सकारात्मक धोरण स्वीकारले. विदेशातील उद्योजकांना राज्यात निमंत्रित करण्यासाठी औद्योगिक क्षेत्राला अत्यावश्यक असणारी पायाभूत सेवा सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची शाश्वतता जपणे याला प्राधान्य दिले. याला अपेक्षित यश मिळाले आहे. गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक ७५ हजार कोटी रुपये झाली असून महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.रायगड जिल्ह्यात ८३ हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प येत आहे. तसेच विविध ५० हजार कोटींचे प्रकल्प येत आहेत. ३८ हजार कोटींची गुंतवणूक क्षमता असलेल्या दिघी पोर्टला मंजुरी मिळाली आहे. यामुळे भविष्यात रायगड जिल्हा उद्योग नगरी म्हणून ओळख निर्माण करेल असेही सामंत यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती उपक्रमाद्वारे ३५ हजार जणांना रोजगार मिळाला आहे. हे उद्योग विभागाचे यश आहे. कोणताही प्रकल्प स्थलांतरित होत नसून उलट परकीय गुंतवणूक वाढत असल्याचे ते म्हणाले.राज्याच्या उद्योग विभागाने उत्तुंग भरारी घेतली आहे यासाठी उद्योग विभागाचे अभिनंदन करून खा. सुनील तटकरे म्हणाले गडचिरोली सारख्या भागात देखील औद्योगिक विकास होतोय, रोजगार निर्मिती होतेय ही जमेची बाजू आहे. राज्यात गुंतवणूक, रोजगार निर्मिती झपाट्याने होत आहे. ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे विस्तारते आहे. सिडकोमुळे नवी मुंबई आणि परिसराचा विकास होतो आहे. अटल सेतूमुळे मुंबईशी जवळीक वाढली आहे. राज्यात सर्वांकष औद्योगिक विकास होतोय. मध्यम आणि लघु उद्योगाच्या भूमिपुत्र उद्योजकांना देखील सवलती देण्याबाबत कार्यवाही करावे. राज्यातील वाढती गुंतवणूक ही राज्याच्या विकासासाठी फायदेशीर आहे. या माध्यमातून मोठया प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. दक्षिण रायगड जिल्ह्यात देखील मोठया प्रमाणावर क्षमता आहेत. दिघी पोर्ट मुळे या भागाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी सर्वांनी प्रयत्न करावेत असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी आ. महेश बालदी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, यांची भाषणे झाली. यावेळी उद्योग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध लाभांचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत गुरुशांतप्पा हरळय्या यांनी केले. विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माथेरानच्या झोपडपट्टीला सुरक्षा कवचाची आवश्यकता

माथेरान : माथेरान मध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता साधारण पाच दशकापूर्वी इथे झोपडपट्टीची स्थापना झाली होती.त्यावेळी मिळेल त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणाऱ्या भूमिपुत्रांनी आपल्या झोपड्या उभारून कुटुंबासह राहू लागले होते.परंतु…

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षात रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा संकल्प

नागपूर : रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस, राज्यसभेचे माजी उपसभापती दिवंगत नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षात रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा संकल्प  रिपब्लिकन पक्षाचे ( खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र…

हैदराबाद मध्ये ब्रेस्ट कॅन्सरवर जनजागृती करण्यासाठी पिंक मॅरॉथनचे आयोजन

स्पर्धकांचा महाकाय पक्ष्याच्या आकाराच्या मानवी प्रतिमा तयार करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न हैदराबाद : भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या घटनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, MEIL (Megha Engineering & Infrastructure…

 भारताचा इंग्लंड वर रोमहर्षक विजय तर सिंगापूरला दणका

 इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज   कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या सहकार्याने इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा, कोलंबो,…

कुडाळ येथे पालक मंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला प्रारंभ

सिंधुदुर्ग : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्षमी हॉल, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे सुरु असलेल्या पालक मंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे उदघाटन भारतीय जनता…