Category: रायगड

raigad news and updates

चार गावांचा सनद वाटपाचा कार्यक्रम संपन्न-नितीन आटाळे

अशोक गायकवाड कर्जत : कर्जत तालुक्यातील चार गावांच्या सनदा नव्याने भारतीय सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त झाल्या असुन चार गावांच्या सनद वाटपाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला, मौजे मानकिवली ता. कर्जत १००% सनद फी वसूल झाली. अशी माहिती उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांनी दिली आहे. सनदांची प्रिंट करून सनदा वाटप विषयाची माहिती कार्यालयाच्या ग्रुपवर त्याच दिवशी पाठविण्याची होती व सनद फी वसुल केलेली रक्कम मुख्यालय सहाय्यक यांच्याकडे जमा करायची होती. या कामास टाळाटाळ होता कामा नये. टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतां विरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल अशी सूचना देण्यात आली होती. संबंधीत गावचे ग्रामसेवक यांनी आपण सनद वाटप करण्यासाठी येणार असल्याची माहिती गावकऱ्यांना दिली होती. त्या अनुषंगाने बोरगाव येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी संजय गायकवाड भूकरमापक व निलेश जाधवर प्रतिलिपीक, माणकिवली येथे अण्णासाहेब सोमवंशी भूकरमापक व अभिजित मुजमुले अभिलेखापाल, कळंबोली तर्फे वरेडी येथे रामचंद्र कवटे निमतानदार व कृष्णा गायकवाड भूकरमापक, नसरापुर येथे कृष्णा गायकवाड भूकरमापक व सचिन थोरात भूकरमापक हे अधिकारी- कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते, असे उप अधीक्षक भूमि अभिलेख, शिरस्तेदार शैलेश जाधव यांनी कळविले आहे.

आदिती तटकरे यांच्याहस्ते सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान

किसन जावळे, सोमनाथ घार्गे यांची उपस्थिती अशोक गायकवाड अलिबाग : महाराष्ट्र राज्य मंत्री आदितीताई तटकरे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत कर्जत येथील ” रक्षा” संस्थेच्या दोन शूरवीरांचा भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ वर्धापनदिन दिनानिमित्त सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान सोहळा पार पडला. भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान, अलिबाग येथे पोलीस ग्राउंड वर आयोजित केलेल्या कार्यक्रमात, कर्जत मधील सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान करण्यात आला. सुमित गुरव व अक्षय गुप्ता हे कर्जत येथील “रक्षा सामाजिक विकास मंडळ” या संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. यावर्षी पावसाळ्यामध्ये उत्पन्न झालेली पूर परिस्थिती व विविध आपत्कालीन परिस्थितीत स्वतःच्या जीवावर उदार होऊन सह्याद्रीच्या खडतर डोंगर रांगांमध्ये केलेले शोध व बचाव कार्य व आत्तापर्यंत करत आलेल्या देश सेवेबद्दल यांचा सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्री कु.आदितीताई तटकरे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.सुमित गुरव यांनी गिर्यारोहणाचे प्राथमिक प्रशिक्षण अधिकृत गिर्यारोहण संस्थेतून, जम्मू काश्मीर येथे घेतले आहे. याचबरोबर वायरलेस कम्युनिकेशन याचे प्रशिक्षण रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथून घेतलेले आहे. व त्यांनी अग्निशामन दलाचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.आणि याच बरोबर ते रायगड जिल्हा साठी ते अधिकृतरित्या “आपदा मित्र” म्हणून कार्यरत आहेत. तर अक्षय गुप्ता हे उत्तम गिर्यारोहक आहेत व उत्तम प्रकारचे सर्पमित्रही आहेत. यावर्षी जुलै महिन्यात पोसरी बेंडसे येथे एक व्यक्ती उल्हास नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जात असताना त्याला सुरक्षितरीत्या जिवंत बाहेर काढण्यात केलेले सहकार्य, तसेच माळशेज घाटातील हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा येथे एक व्यक्ती १४०० फूट खोल पडली होती त्यावेळेस केलेले सहकार्य, याचबरोबर ढाक भैरी येथे अडकलेल्या तीन युवकांना सुखरूपपणे बाहेर काढल्याबद्दल सुमित गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान गुरुवारी,(दि.१५ ऑगस्ट) भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ वा वर्धापन दिनानिमित्त अलिबाग येथे करण्यात आला.

माथेरानची महाराणी मिनी ट्रेनच्या जन्माची कहाणी

माथेरान : ‘झुकझुक झुक आगीनगडी धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया’, या पंक्तीची आठवण करून देणारी माथेरान ची महाराणीची निवड जागतिक सांस्कृतिक ठेवा म्हणजेच युनेस्को मध्ये झाल्याने माथेरानला एक…

‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ अभियानात केंद्रस्तरावर माथेरानच्या प्राथमिक शाळेने मारली बाजी

माथेरान : सन 2023 /24 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा” हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता १/१/२४ ते १५/२/२०२४ या कालावधीत राबविण्यात आले या अभियानास  विद्यार्थी, शिक्षकांबरोबर  माजी विद्यार्थी पालक व शिक्षण प्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला जवळपास 95 टक्के विद्यार्थी शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत उपक्रमात सहभागी झाले होते त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद देखील करण्यात आली आहे. या अभियानात तालुका जिल्हा व राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात आली आहेत या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. माथेरान सारख्या दुर्गम भागातील वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषद प्राथमिक शाळेने या स्पर्धेत केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. मराठी माध्यमाच्या या नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक वर्ग अत्यंत आत्मीयतेने विद्यार्थ्यांना घडविण्याचे प्रांजळपणे प्रयत्न करत असून शिक्षक वृंद पदवीधर असल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमा बरोबरच उत्तम नागरिक होण्याचे संस्कार देखील केले जात आहेत. या शाळेत सर्वसामान्य लोकांची मुले शिक्षण घेत असून याच शाळेच्या जडणघडणी मधून अनेक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात जाण्यासाठी सोपस्कार झाले आहे. परंतु सद्यस्थितीत सुशिक्षित असो किंवा अशिक्षित पालक वर्ग यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना पाठवण्यात अधिक रस दिसत आहे. आर्थिक परिस्थिती जरी बेताची असली तरीसुद्धा इंग्रजीचे खूळ डोक्यात भिनल्याने मराठी शाळेची पटसंख्या दरवर्षी कमी होत चालली आहे. निदान मुलांवर उत्तम संस्कार घडावेत यासाठी पालकांनी मराठी शाळेला प्रथमतः प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे अभ्यासू नागरिक बोलत आहेत. नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल या शाळेला केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल स्थानिकांनी शिक्षक वृंद तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ——————————————————- मागील अनेक दिवसांपासून शिक्षक वर्गाने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे आणि त्यांचे सर्व सहकारी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असताना मुलांना पुस्तकी अभ्यासक्रमा बरोबर सामाजिक उपक्रमावर भर घालतात. त्या सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन. शिवाजी शिंदे– माजी विरोधी पक्षनेते माथेरान नगरपालिका ——————————————-;;——– मा. मुख्याधिकारी तथा उत्तम प्रशासक राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या अभियानात सहभाग घेतला. सर्व शिक्षक आणि पालक यांनी या करीता योगदान दिले. शाळा या पुढे गुणात्मक कामगिरी करून आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. दिलीप अहिरे— मुख्याध्यापक ०००००

२०४७ पर्यंत विकसित भारत देशाची ओळख होईल.- राज्यपाल राधाकृष्णन

अशोक गायकवाड रायगड : भारतामध्ये सेवा क्षेत्रातील नेतृत्वासोबतच जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत ही आपली ओळख असणार आहे. या काळात तरुणांना मोठया प्रमाणावर संधी निर्माण होणार आहे. प्रत्येक युवकाने आपले ध्येय निश्चित करावे. कठोर आणि प्रामाणिक मेहनत आणि सर्वोत्तम सातत्यपूर्ण कामगिरी ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.* डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे च्या २६ व्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपमुख्य कार्यकारी डॉ.भरत बास्टेवाट, विद्यापीठ कुलगुरू डॉ.कारभारी काळे, कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, परीक्षा नियंत्रक डॉ.नरेंद जाधव आदी उपस्थित होते. राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, नव्या पिढीने तंत्रज्ञान, संशोधन, विचार आणि अर्थ अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज कुशल मनुष्यबळासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. युवकांना कौशल्याचे आणि नवनिर्मितीचे प्रशिक्षण देवूनच देशाला या संधीचा लाभ घेता येईल. भारताची झपाट्याने होणारी वाढ, लोकसंख्या शास्त्रीय लाभांश आणि जागतिक स्तरावर वाढते महत्त्व यामुळे आजच्या पदवीधरांसाठी अकल्पनीय संधी निर्माण झाल्या आहेत.आपण आपले ध्येय निश्चित करून आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थी-केंद्रित धोरण तयार केले आहे. याचा फायदा निश्चित होणार आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होईल.. तसेच हे नवीन विचार आणि नवीन उर्जा निर्माण करेल आणि बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण करेल आणि उद्योजक पर्यावरण प्रणाली तयार करण्यासाठी सहाय्यक होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपल्या भारताची संस्कृती जिवंत राहिली व तिचे जतन झाले आहे त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशवासीयांना संविधान मिळाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रबोधन करून त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून देशाचे नाव मोठे करणे व अर्थव्यवस्था सुदृढ करण्याबाबत आवाहन केले. पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर म्हणाले, एखा‌द्याचा ‘जीवनाचा उद्देश साध्य करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासासाठी आत्मसात केलेल्या कौशल्यांचा आणि ज्ञानाच वापरआपल्या दैनंदिन आयुष्यात करावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे राजदूत या नात्याने संपूर्ण राष्ट्रासाठी भरीव योगदान द्यावे असे सांगितले. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आपल्याला देशाला बलशाली बनवायचे आहे. यासाठी प्रत्येक युवकांने आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा. आपले सामाजिक भान आणि दायित्व कायम लक्षात ठेवावे असे सांगितले. विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून सेवा सुविधा देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगितले. राज्यपाल महोदय व मंत्री महोदयांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठातील सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव तसेच विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.

कान्होजी आंग्रे यांच्या जयंतीनिमित्त श्रीनिवास मुडगेरिकर यांनी केले अभिवादन

अशोक गायकवाड अलिबाग :१८ ऑगस्टला सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आरसीएफच्या कुरुळ वसाहतीच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या सरखेलांच्या पुतळ्यास आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुडगेरिकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच आरसीएफच्या वित्त संचालक श्रीमती नझहत शेख, कार्यकारी संचालक अनिरुद्ध खाडिलकर, मुख्य महा व्यवस्थापक नितीन हिरडे, महा व्यवस्थापक सर्वश्री संजीव हरळीकर, सुधीर कोळी, अभय काळबांडे, व्ही. मगेश, सिआयएसएफचे डेप्युटी कमांडंट संदीप चक्रवर्ती, उप महा व्यवस्थापक विनायक पाटील, अधिकारी- कर्मचारी संघटना प्रतिनिधींनी सरखेलांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. यावेळी शिवप्रेमी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

पनवेलच्या तरुणांचे माथेरान मध्ये स्वच्छता अभियान

माथेरान : लक्ष शूटिंग क्लब पनवेल या संस्थेमार्फत १५ ऑगस्टला माथेरानमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील सनसेट पॉईंट या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले माथेरानमध्ये दरवर्षी अशा प्रकारच्या अभियान ही…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत एकही महिला लाभापासून वंचित राहणार नाही – किशन जावळे

अशोक गायकवाड   रायगड : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे. महिलांचे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”योजनेचा”जिल्हास्तरीय शुभारंभ होरायझन सभागृह अलिबाग येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार विक्रम पाटील, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी जि.प.निर्मला कुचिक आदि उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की,”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजासाठी शासनाकडून निर्देश प्राप्त होताचा तात्काळ जिल्ह्यातील विविध विभागांच्या बैठकीचे आयोजन करुन या याजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रामध्ये उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य धरावा अशी शासनाला विनंती केली होती. त्यानुसार या योजनेच्या लाभासाठी पिवळे किंवा केसरी रेशनकार्ड हा पुरावा ग्राह्य धरावा असा शासनाचा निर्णय झाला. झाली. तसेच आदिवास प्रमाणपत्राबाबतही शासनाने पंधरा वर्षांचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा हा चांगला मार्ग काढला. त्यामुळे ही योजना एकदम सोपी झाली. अंगणवाडी सेविकेच्या हातात योजनेचे काम दिले त्यांनी प्रामिाणकपणे काम केले. जिल्ह्यात ही योजना विहित वेळेत, अचूक पध्दतीने राबविली गेली ही अभिमानाची बाब आहे. पहिल्या दोन महिन्यांचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पोहचले. योजनेच्या अंमलबजावणीत रायगड जिल्हा हा सर्वात पुढे होता. आशा वर्कर व अंगणवाडी सेविका शासनाचे कर्मचारी यांचे यात मोठे योगदान आहे. एक कोटीपेक्षा जास्त लोकांना लाभ देणारी ही योजना यशस्वीपणे राबविली गेली. या योजनेचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी ३ लाख ५२ हजार लाभार्थी महिला पात्र ठरल्या आहेत. अजून ९० हजार अर्ज पात्र करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात जवळ जवळ साडेचार लाखाचा आकडा आपण नक्कीच पार करु. पात्र असलेली कुठलीच भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. माजी आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की, जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना शासनाची क्रांतीकारी योजना आहे. ही योजना सर्व धर्मियांसाठी असून सर्व समावेशक योजना आहे. ज्या माती-भगिनी अजूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांनाही या योजनेचा लाभा द्यावा. आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना लागू केल्याबद्दल राज्यशासनास मन:पूर्वक धन्यवाद देतो. महिलांच्या सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे. हे राज्य शासन महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्टया सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्य शासनामार्फत महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व भाता-भगिनींना देण्यात यावा. या योजनेचे अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. यावेळी जिल्हाधिकारी तसेच आमदार महोदयांच्या हस्ते महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. 00000

माथेरानची महाराणी मिनी ट्रेनच्या जन्माची कहाणी

माथेरान : झुकझुक झुक आगीनगडी धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, ह्या पंक्तीची आठवण करून देणारी माथेरान ची महाराणीची निवड जागतिक सांस्कृतिक ठेवा म्हणजेच युनेस्को मध्ये झाल्याने माथेरानला एक…

मैफिल अलिबाग या संस्थेतर्फे आज सुरंजन खंडाळकर यांच्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम

अशोक गायकवाड   अलिबाग: मैफिल अलिबाग या संस्थेतर्फे आज सायंकाळी ७.०० वाजता आरसीएफच्या कुरूळ वसाहतीत सभागृहात सुरंजन खंडाळकर यांच्या सुश्राव्य भक्तिसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १९८९ साली स्थापन झालेल्या…