Category: रायगड

raigad news and updates

जुन्या ई रिक्षा शासकीय खात्यांना सुपूर्द करा

स्थानिकांची मागणी   माथेरान : माथेरान मधील एकूण ९४ पैकी वीस हातरीक्षा श्रमिकांच्या हाती १० जूनपासून सहा महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टवर पर्यावरण पूरक ई रिक्षाचे स्टेरिंग आल्याने सुरुवातीला नगरपरिषदेच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या सात ई रिक्षा बंद करण्यात आल्या असून त्या सर्व ई रिक्षा शास्त्री हॉलमध्ये ठेवण्यात आल्या असून त्यांची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अजूनही काही दिवस त्या बंद ठेवण्यात आल्या तर आगामी काळात नादुरुस्त होऊन भंगारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी गावातील शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्गाला नगरपरिषदेने भाडेतत्त्वावर दिल्यास त्याचा सदुपयोग होऊ शकतो आणि याच माध्यमातून नगरपरिषदेला आर्थिक उत्पन्न प्राप्त होऊ शकते. अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे. ई रिक्षा सुरू झाल्यापासूनच खऱ्या अर्थाने इकडे पर्यटकांना लोंढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आणि त्यातच ऐन गर्दीच्या वेळी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग मध्येच येऊन रिक्षात बसून जातात त्यामुळे अनेकदा त्याठिकाणी रिक्षा स्टँडवर पर्यटक संबंधित रिक्षाच्या कर्मचाऱ्यासोबत वाद घालताना दिसतात. बहुतेक खात्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग हे मोफतच ह्या सेवेचा लाभ घेत आहेत. येथील श्रमिकांनी कर्ज काढून या ई रिक्षा घेतलेल्या आहेत त्यातच शासकीय वर्गाला मोफत सेवा उपलब्ध करून दिल्यास ह्या श्रमिकांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. यासाठी नगरपरिषदेने येथील सर्व शासकीय खात्याला या जुन्या सात रिक्षा मासिक भाडेतत्त्वावर दिल्यास यातून नगरपरिषदेच्या तिजोरीत भर पडून या जुन्या सात रिक्षांची देखभाल राहू शकते असेही बोलले जात आहे. 00000

व्यवस्थेतील महत्त्व या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान – ॲड.प्रसाद पाटील

 अशोक गायकवाड   रायगड : ‘रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशन’ च्यावतीने शनिवार, २४ ऑगस्टला सकाळी ११.०० वाजता क्षात्रैक्य सभागृह, कुरुळ-अलिबाग येथे मा.न्यायमूर्ती अभय ओक (न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायलय, नवी दिल्ली) यांचे, ‘जिल्हा व तालुका न्यायालयांचे न्याय व्यवस्थेतील महत्त्व’ या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.प्रसाद पाटील यांनी दिली आहे. या प्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून मा.न्यायमूर्ती आर.आय. छागला (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) मा.न्यायमूर्ती एम.एम.साठ्ये (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) मा.ए. एस. राजंदेकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड उपस्थित राहणार आहेत. तर विशेष निमंत्रित म्हणून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा पदाधिकारी अॅड. जयंत जायभावे, अध्यक्ष, अॅड. डॉ.उदय वारुंजीकर उपाध्यक्ष, अॅड.हर्षद निंबाळकर, अॅड.गजानन चव्हाण, अॅड. विठ्ठल कोंडे-देशमुख सदस्य उपस्थित राहणार आहेत. ००००

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा-२ मध्ये शाळांनी सहभागी व्हावे – डॉ भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड   रायगड : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, गुणवत्ता वाढ व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे तसेच शाळेचा सर्वागीण विकास करणे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा कालावधी २९ जुलै ते १५ सप्टेंबर २०२४ हा ठरविण्यात आला आहे. या अभियानाच्या टप्पा २ मध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांनी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी केले आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांचे पुढील मुद्दयांच्या आधारे गुणांकन करण्यात येईल. पायाभूत सुविधा ३३ गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण, शैक्षणिक संपादणूक ४३ गुण. तालुकास्तरावरील मुल्यांकनाचे कार्य- प्राथमिक स्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष केंद्रप्रमुख हे आहेत. तालुका स्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष गट विकास अधिकारी, पंचायत समिती हे आहेत. जिल्हास्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे आहेत. पारितोषिके:- तालुकास्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ३ लक्ष, द्वितीय क्रमांक ३ लक्ष, तृतीयक्रमांक- ३ लक्ष. इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ३ लक्ष, व्द्वितीय क्रमांक २ लक्ष, तृतीयक्रमांक १ लक्ष. जिल्हास्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ११ लक्ष, द्वितीय क्रमांक ५ लक्ष, तृतीय क्रमांक -३ लक्ष. इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ११ लक्ष, द्वितीय क्रमांक ५ लक्ष, तृतीयक्रमांक ३ लक्ष, अशाप्रकारे रायगड जिल्हयात बक्षिसे मिळणार आहेत.

विना परवानगी सुरू असलेले पॉड हॉटेलचे बांधकाम त्वरित थांबवा-मनोज खेडकर

माथेरान : मध्य रेल्वेने माथेरान रेल्वे स्टेशन परिसरात जुन्या हेरिटेज वास्तूमध्ये अनधिकृतपणे तोडफोड करून अनधिकृतपणे पॉड हॉटेलचे बांधकाम सुरू केले आहे यासाठी हेरिटेज कमिटी व नगर परिषदेची परवानगी घेतलेली नाही…

क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून वाहतूक नियम पाळा संदेश देत ‘रक्षाबंधन’

माथेरान : क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन विविध सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असून रक्षाबंधनचे औचित्य साधन दरवर्षीप्रमाणे पनवेल मधील विजय सेल जवळील सिग्नलच्या चौकात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना राखी बांधत सुरक्षेची काळजी…

नेरळ माथेरान घाटामध्ये अपघातांचे प्रमाण वाढले

माथेरान : माथेरान हे मुंबई पुणे नाशिक ठाणे सारख्या मोठ्या शहरांपासून सर्वात जवळचे पर्वतीय पर्यटन स्थळ असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी वाढत आहे व येथे येण्यासाठी नेरळ माथेरान हा एकमेव…

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा : डॉ. भरत बास्टेवाड*

अशोक गायकवाड* अलिबाग : रायगड जिल्ह्यात गणेश भक्तांनी गणेशोस्तव साजरा करताना केंद्रीय प्रदूषण मंडळाने यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन करून, उत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

चार गावांचा सनद वाटपाचा कार्यक्रम संपन्न-नितीन आटाळे

अशोक गायकवाड कर्जत : कर्जत तालुक्यातील चार गावांच्या सनदा नव्याने भारतीय सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त झाल्या असुन चार गावांच्या सनद वाटपाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला, मौजे मानकिवली ता. कर्जत १००% सनद फी वसूल झाली. अशी माहिती उप अधीक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांनी दिली आहे. सनदांची प्रिंट करून सनदा वाटप विषयाची माहिती कार्यालयाच्या ग्रुपवर त्याच दिवशी पाठविण्याची होती व सनद फी वसुल केलेली रक्कम मुख्यालय सहाय्यक यांच्याकडे जमा करायची होती. या कामास टाळाटाळ होता कामा नये. टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतां विरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल अशी सूचना देण्यात आली होती. संबंधीत गावचे ग्रामसेवक यांनी आपण सनद वाटप करण्यासाठी येणार असल्याची माहिती गावकऱ्यांना दिली होती. त्या अनुषंगाने बोरगाव येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी संजय गायकवाड भूकरमापक व निलेश जाधवर प्रतिलिपीक, माणकिवली येथे अण्णासाहेब सोमवंशी भूकरमापक व अभिजित मुजमुले अभिलेखापाल, कळंबोली तर्फे वरेडी येथे रामचंद्र कवटे निमतानदार व कृष्णा गायकवाड भूकरमापक, नसरापुर येथे कृष्णा गायकवाड भूकरमापक व सचिन थोरात भूकरमापक हे अधिकारी- कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते, असे उप अधीक्षक भूमि अभिलेख, शिरस्तेदार शैलेश जाधव यांनी कळविले आहे.

आदिती तटकरे यांच्याहस्ते सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान

किसन जावळे, सोमनाथ घार्गे यांची उपस्थिती अशोक गायकवाड अलिबाग : महाराष्ट्र राज्य मंत्री आदितीताई तटकरे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत कर्जत येथील ” रक्षा” संस्थेच्या दोन शूरवीरांचा भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ वर्धापनदिन दिनानिमित्त सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान सोहळा पार पडला. भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान, अलिबाग येथे पोलीस ग्राउंड वर आयोजित केलेल्या कार्यक्रमात, कर्जत मधील सुमित हरि गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान करण्यात आला. सुमित गुरव व अक्षय गुप्ता हे कर्जत येथील “रक्षा सामाजिक विकास मंडळ” या संस्थेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. यावर्षी पावसाळ्यामध्ये उत्पन्न झालेली पूर परिस्थिती व विविध आपत्कालीन परिस्थितीत स्वतःच्या जीवावर उदार होऊन सह्याद्रीच्या खडतर डोंगर रांगांमध्ये केलेले शोध व बचाव कार्य व आत्तापर्यंत करत आलेल्या देश सेवेबद्दल यांचा सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्री कु.आदितीताई तटकरे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.सुमित गुरव यांनी गिर्यारोहणाचे प्राथमिक प्रशिक्षण अधिकृत गिर्यारोहण संस्थेतून, जम्मू काश्मीर येथे घेतले आहे. याचबरोबर वायरलेस कम्युनिकेशन याचे प्रशिक्षण रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथून घेतलेले आहे. व त्यांनी अग्निशामन दलाचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.आणि याच बरोबर ते रायगड जिल्हा साठी ते अधिकृतरित्या “आपदा मित्र” म्हणून कार्यरत आहेत. तर अक्षय गुप्ता हे उत्तम गिर्यारोहक आहेत व उत्तम प्रकारचे सर्पमित्रही आहेत. यावर्षी जुलै महिन्यात पोसरी बेंडसे येथे एक व्यक्ती उल्हास नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जात असताना त्याला सुरक्षितरीत्या जिवंत बाहेर काढण्यात केलेले सहकार्य, तसेच माळशेज घाटातील हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा येथे एक व्यक्ती १४०० फूट खोल पडली होती त्यावेळेस केलेले सहकार्य, याचबरोबर ढाक भैरी येथे अडकलेल्या तीन युवकांना सुखरूपपणे बाहेर काढल्याबद्दल सुमित गुरव व अक्षय गुप्ता यांचा सन्मान गुरुवारी,(दि.१५ ऑगस्ट) भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ वा वर्धापन दिनानिमित्त अलिबाग येथे करण्यात आला.

माथेरानची महाराणी मिनी ट्रेनच्या जन्माची कहाणी

माथेरान : ‘झुकझुक झुक आगीनगडी धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया’, या पंक्तीची आठवण करून देणारी माथेरान ची महाराणीची निवड जागतिक सांस्कृतिक ठेवा म्हणजेच युनेस्को मध्ये झाल्याने माथेरानला एक…