Category: रायगड

raigad news and updates

डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून जिल्ह्यात महावाचन उत्सव २०२४ उत्सव संपन्न*

अशोक गायकवाड*   अलिबाग : समग्र शिक्षा रायगड जिल्हा परिषद, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.३०) महावाचन उत्सव २०२४ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अलिबाग शहरात…

‘माथेरान-कर्जत मार्गावर मिनीबसेस उपलब्ध कराव्यात’

पालिकेची स्वतःची मिनीबस सुरू होण्याच्या प्रतिक्षेत नागरिक ! माथेरान : माथेरान करांच्या कर्जत ते माथेरान दरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेचा मुख्य कणा म्हणून मिनीबस सेवेला अधिकाधिक प्राधान्य दिले जाते.या सेवेचा लाभ सर्वसामान्य लोकांना, व्यापारी त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्टीने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणावर होत आहे. ११ ऑक्टोबर २००८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळेच अनेक खडतर आव्हाने पेलून ही मिनीबस सेवा उपलब्ध झाली असून आजवरच्या काळात याच सेवेच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपले करियर करता आले आहे.सुरुवातीला ह्या बसने उत्तम प्रकारे सेवा उपलब्ध करून दिली होती. परंतु काही वर्षांपासून ह्या बसने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच या मार्गावरील दोन बसेसची पुरती वाताहत झाली असल्याने घाटरस्त्यात कुठेही बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ही बस व्यवस्थित प्रवास देईल याचीही शाश्वती राहिलेली नाही. पर्यटनस्थळ माथेरान मध्ये स्थानिकांना आजवर आपल्या मूलभूत अधिकार असो किंवा गावाची विकासात्मक कामे असोत नेहमीच इथल्या गलिच्छ राजकारणापायी संघर्ष करावा लागत आहे.राज्यातील विविध ठिकाणी सर्वत्रच शासनाच्या मिनीबसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यामुळे माथेरान नगरपरिषदेच्या माध्यमातून लवकरच या मार्गावर स्वतःच्या दोन बसेस उपलब्ध करून दिल्यास शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे नियमित प्रवास करणाऱ्या व्यापारी वर्गाला, नागरिकांना सोयीचे ठरू शकते असे स्थानिक बोलत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येणारी कर्जत माथेरान मिनीबसची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सुरुवातीच्या काळात माथेरानसाठी दोन मिनी बस दिल्या गेल्या होत्या नंतर त्यातील एक बस ही पनवेल येथे फिरविण्यात आली त्यामुळे येथील नागरिकांना एकाच बसवर अवलंबून राहून खडतर प्रवास करावा लागत आहे.फार जुनी बस असल्याने नेरळ माथेरान घाटात अचानक बंद पडल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन किमान दोन नवीन बस नागरिकांच्या सेवेत आणल्यास नागरिकांचा प्रवास सुखकर होईल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला देखील याचा निश्चित फायदा होईल. चंद्रकांत जाधव— अध्यक्ष क्षत्रिय मराठा समाज माथेरान  

२८ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन – न्या. अमोल शिंदे

अशोक गायकवाड रायगड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्हयामध्ये २८ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती न्यायाधिश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूरसंचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. २८ सप्टेंबरला होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग ए.एस. राजंदेकर यांनी केले आहे

आदिवासींसाठी विविध दाखले वाटप शिबिरांचे आयोजन – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या व्यक्तींना प्रत्येक गावांमध्ये व वाडयांमध्ये जाऊन जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन खाते, इतर आवश्यक प्रमाणपत्रे व पीएम किसानचा लाभ देण्याकरिता २३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये शिबीरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. आदिम जमातीच्या (कातकरी) विकासाकरिता प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान (PM- JANMAN) ही मोहिम देशभरात राबविण्यात येत आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यक्रमात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरीता केंद्र शासनाने ११ प्राथम्य क्षेत्र निश्चित केले असून त्यामध्ये ९ मंत्रालयाचा समावेश केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आदिम जमातीच्या लोकांना जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन खाते, इतर प्रमाणपत्रे व पीएम किसान चा लाभ देण्यात येणार आहे.प्रकल्प अधिकारी,आदिवासी विकास प्रकल्प पेण, जिल्हा आरोग्य अधिकारी, रा.जि.प., तहसिलदार सर्व, गट विकास अधिकारी-पंचायत समिती सर्व, तालुका कृषी अधिकारी सर्व व अग्रणी बँक व्यवस्थापक यांचा या शिबिरात समावेश असणार आहे. जातीचे दाखला, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन बचत खाते, पीएम किसानचा लाभ यापासून एकही आदिम व्यक्ती वंचित रहाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

झुंडशाही , दबावाला बळी पडू नका  – न्या. अभय ओक

अलिबाग :  घटनेने दिलेले सर्वसामान्यांचे स्वातंत्र्य  आबाधीत राखणे ही  न्यायव्यवस्थेत काम करणार्‍या वकीलांची व न्याधीशांची जबाबदारी आहे. त्यामुळे या व्यवस्थेत काम करणार्‍यांनी  झुंडशाही , व कोणत्याही दबावाला बळी नपडता निपक्षपातीपणे काम केले पाहिजे,  असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांनी व्यक्त कले. रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांचे ‘ जिल्हा व तालुका न्यायालयांचे न्याय व्यवस्थेतील महत्व ‘  या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (दि.24) क्षात्रैक्य सभागृह , कुरूळ येथे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आर. आय. छागला, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. एम. साठ्ये, रायगडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर , बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. उदय वारूंजीकर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अ‍ॅड. गजानन चव्हाण, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अ‍ॅड. विठ्ठल कोंडे – देशमुख, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य जयंत जायभावे , जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. संतोष पवार आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्हा व तालुका न्यायालयात सर्वसामान्य माणसे येत असतात. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम ही न्यायालये करत असतात. त्यामुळे आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेत ही न्यायालये महत्वाची आहेत. त्यांना दुय्यम न्यायालये असे संबोधणे चुकीचे आहे. असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांनी केले. जिल्हा व तालुका न्यायालय ही सर्वसामान्यांची न्यायालये आहेत. त्यांच्यासाठी ही शेवटची न्यायालये असतात. ते या पुढील न्यायालयात जावू शकत नाहीत. याच न्यायालयांमध्ये अशीलाचे भवितव्य घडते किंवा बिघडते. त्यामुळे येथेच व्यवस्थित पुरावे नोंदवून आपल्या अशीलाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न वकिलांनी केला पाहिजे, असे न्यायमुर्ती अभय ओक म्हणाले. जिल्हा व तालुका न्यायालयात काम करणार्‍या वकीलांनी आपणास कमी समजू नये. सर्वोच्च  व उच्च न्यायालयात काम करणार्‍या वकीलांपेक्षा आपले ज्ञान  कमी आहे असे समजू नये .  त्यांनी आपल्यातील न्यूनगंड काढून टाकून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा., असे ते म्हणाले. सर्वसामान्यांच्या अपेक्षा न्यायालयांकडून पूर्ण होत नसल्यामुळे न्यायालयाबाबत सर्वसामान्यांच्या मनामध्ये लौकिक कमी होत चालला आहे. न्यायालयाच्या   विश्वासार्हतेला तडा जात आहे. न्यायदानात उशीर होत असल्यामुळे न्यायालयाची बदनामी होत आहे.  त्यामुळे न्यायालयाची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करा. वेळ पाळा. न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका, असा सल्ला न्यायमुर्ती अभय ओक यांनी तरूण वकीलांना दिला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. एम. साठ्ये म्हणाले की, न्यायालयात आपल्या अशीलाला निकाल मिळणार की न्याय मिळणार याचा विचार करा. माहिती मिळवा. ज्ञानाच्या बळावर शहाणपण कमवा. त्यातून आपली प्रगती करावी. अ‍ॅड. उदय वारूंजीकर, अ‍ॅड. गजानन चव्हाण , अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी प्रस्ताविक केले. सचिव अ‍ॅड. अमित देशमुख यांनी आभारप्रदर्शन केले. अ‍ॅड. विजय पाटील यांनी सुत्रसंचालन केले.

बालकांसाठी ‘चाईल्ड हेल्पलाईन सेवा’ १०९८ कार्यान्वित – डॉ.प्रशांत नारनवरे

रायगड :आपल्या आजूबाजूला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत कोठून व कशी…

प्रवेश प्रक्रियेबाबतचा अर्ज भरण्यासाठी QR Code-महेश देवकाते

रायगड : २५ फेब्रुवारीला जर्मनी देशातील बाडेन वुटेनवर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. ज्यामध्ये वाहनचालकांचा समावेश असून सदर कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्याची कार्यपध्दती…

महेंद्र थोरवे यांच्या भेटीत डॉ. आंबेडकर भवन निर्माण संदर्भात चर्चा – हिरामण गायकवाड

अशोक गायकवाड कर्जत : कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्र कार्यसम्राट आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांची रविवारी भेट घेऊन बाबासाहेब डॉ. आंबेडकर भवन निर्माण संदर्भात चर्चा केली, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)…

पशुसंवर्धनातून उद्योजकता विकासाला चालना – किशन जावळे

अशोक गायकवाड   रायगड : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा, संस्कृतीचा पशुधन हा महत्वाचा घटक आहे. पशुपालनाकडे केवळ शेतीला पूरक व्यवसाय म्हणून न पाहता एक चांगला व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. पशुसंवर्धनाला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक मूल्यांची जोड दिल्यास त्यातून उद्योजकता विकासाला चालना देता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. नियोजन भवन येथे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुपालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ.सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शामराव कदम, उपायुक्त रत्नाकर काळे, सहाय्यक आयुक्त डॉ.अजित हिरवे यासह कार्यशाळेस जिल्हाभरातील पशुपालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, स्वाभाविकपणे दुग्ध उत्पादन, अंडी, कुक्कुटपालन, शेळी पालन या व्यवसायाला आपल्या जिल्ह्यात खुप वाव आहे. पशुसंवर्धनाला चालना दिल्यास त्यातून प्रक्रिया उद्योग, विक्री व्यवस्था, वैरण विकास, पशुखाद्य निर्मिती इ. अशा अनेक क्षेत्रात व्यवसाय व उद्योगाच्या संधी निर्माण होतात. त्यामुळे पशुसंवर्धनातून आपण उद्योजकता विकास घडवून लहान लहान उद्योजक घडवू शकतो. त्यातून अनेकांना रोजगाराची संधीही आपण देऊ शकतो. महिला बचतगटानी कुक्कुट पालन व्यवसायात पुढाकार घ्यावा असे आवाहन जावळे यांनी यावेळी केले. तसेच या वर्षात किमान पाच पोल्ट्री तयार करण्याचे निदेश संबंधित यंत्रणेला दिले. दुग्ध व्यवसाय आणि पूरक जोड धंदेवाढीसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा किमान ५ वैरण प्रकल्प तयार करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय पशुधन योजनेचा शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी अंगिकार करावा. त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जावळे यांनी यावेळी केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील पशुधन वाढीसाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. बकरी, कोंबडी, शेळी पालन यासाठी जिल्ह्यात चांगल्या संधी आहे. तसेच शासनामार्फत मोठया प्रमाणावर अनुदान दिले जाते. जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनाचा लाभ घ्यावा असे सांगितले. उपायुक्त डॉ.देशपांडे यांनी लवकरच सुरु होणाऱ्या पशु गणनेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी अचूक व बिनचूक माहिती द्यावी असे सांगितले. तसेच शेळी-मेंढी पालन, कुक्‍कुट पालन, वराह पालन अशा अनेक व्यवसायाकरीता शासनाव्दारे देण्यात येणाऱ्या अनुदान आणि अनुषंगिक माहिती दिली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शामराव कदम यांनी आभार मानले. दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत वैरणविकास व गुणवत्ता पूर्वक व्यावसायिक सायलेज उत्पादन, शेळीपालन व्यवस्थापन, कुक्कुटपालन, बॅंक अर्थसहाय्य इ. विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. 00000

अंगावर विज पडून ४o वर्षीय आदिवासी महिलाचा जागीच मृत्यू

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील भांगवाडी चासोळे गावातील एका आदिवासी कुटुंबाच्या घरावर वीज पडल्याने एक ४० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य ३ महिला गंभीर झाल्याची घटना घडली आहे. मुरबाड तालुक्यातील टोकावडे या आदिवासी बहुल भागातील भांगवाडी चासोळे या गाव परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जोरदार वादळवाऱ्या सह विजेच्या लखलखाट होऊन पावसाने हाहाकार माजवला होता. याच प्रसंगी भांगवाडी येथील गावा बाहेर असणाऱ्या एका आदिवासी कुटुंबाच्या घरात ४ महिला व १ पुरुष घरात बसले असताना अचानक मोठ्या आवाजा सह त्या घरावर विज कोसळली त्यात ४० वर्षीय रुक्मिणी गोपाळ मेंगाळ यांच्या अंगावर विज पडल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या तर नंदा गुलाब मेंगाळ, हेमी अनंता लोभी, हौशा जैतू हिंदोळा ह्या तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी  टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रसंगी  शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख प्रकाश पवार, मा. जि.प सदस्य संजय पवार, मा. पंचायत समिती सदस्य अनिल घरत आणि समाजसेवक बंडूशेठ पवार यांनी तात्काळ दवाखान्यात धाव घेऊन योग्य ती जखमींना मदत केली. 0000