Category: रायगड

raigad news and updates

महेंद्र थोरवे यांच्या भेटीत डॉ. आंबेडकर भवन निर्माण संदर्भात चर्चा – हिरामण गायकवाड

अशोक गायकवाड कर्जत : कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्र कार्यसम्राट आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांची रविवारी भेट घेऊन बाबासाहेब डॉ. आंबेडकर भवन निर्माण संदर्भात चर्चा केली, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)…

पशुसंवर्धनातून उद्योजकता विकासाला चालना – किशन जावळे

अशोक गायकवाड   रायगड : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा, संस्कृतीचा पशुधन हा महत्वाचा घटक आहे. पशुपालनाकडे केवळ शेतीला पूरक व्यवसाय म्हणून न पाहता एक चांगला व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. पशुसंवर्धनाला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक मूल्यांची जोड दिल्यास त्यातून उद्योजकता विकासाला चालना देता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. नियोजन भवन येथे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुपालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ.सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शामराव कदम, उपायुक्त रत्नाकर काळे, सहाय्यक आयुक्त डॉ.अजित हिरवे यासह कार्यशाळेस जिल्हाभरातील पशुपालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, स्वाभाविकपणे दुग्ध उत्पादन, अंडी, कुक्कुटपालन, शेळी पालन या व्यवसायाला आपल्या जिल्ह्यात खुप वाव आहे. पशुसंवर्धनाला चालना दिल्यास त्यातून प्रक्रिया उद्योग, विक्री व्यवस्था, वैरण विकास, पशुखाद्य निर्मिती इ. अशा अनेक क्षेत्रात व्यवसाय व उद्योगाच्या संधी निर्माण होतात. त्यामुळे पशुसंवर्धनातून आपण उद्योजकता विकास घडवून लहान लहान उद्योजक घडवू शकतो. त्यातून अनेकांना रोजगाराची संधीही आपण देऊ शकतो. महिला बचतगटानी कुक्कुट पालन व्यवसायात पुढाकार घ्यावा असे आवाहन जावळे यांनी यावेळी केले. तसेच या वर्षात किमान पाच पोल्ट्री तयार करण्याचे निदेश संबंधित यंत्रणेला दिले. दुग्ध व्यवसाय आणि पूरक जोड धंदेवाढीसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा किमान ५ वैरण प्रकल्प तयार करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय पशुधन योजनेचा शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी अंगिकार करावा. त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जावळे यांनी यावेळी केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील पशुधन वाढीसाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. बकरी, कोंबडी, शेळी पालन यासाठी जिल्ह्यात चांगल्या संधी आहे. तसेच शासनामार्फत मोठया प्रमाणावर अनुदान दिले जाते. जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनाचा लाभ घ्यावा असे सांगितले. उपायुक्त डॉ.देशपांडे यांनी लवकरच सुरु होणाऱ्या पशु गणनेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, तसेच नागरिकांनी अचूक व बिनचूक माहिती द्यावी असे सांगितले. तसेच शेळी-मेंढी पालन, कुक्‍कुट पालन, वराह पालन अशा अनेक व्यवसायाकरीता शासनाव्दारे देण्यात येणाऱ्या अनुदान आणि अनुषंगिक माहिती दिली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शामराव कदम यांनी आभार मानले. दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत वैरणविकास व गुणवत्ता पूर्वक व्यावसायिक सायलेज उत्पादन, शेळीपालन व्यवस्थापन, कुक्कुटपालन, बॅंक अर्थसहाय्य इ. विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. 00000

अंगावर विज पडून ४o वर्षीय आदिवासी महिलाचा जागीच मृत्यू

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील भांगवाडी चासोळे गावातील एका आदिवासी कुटुंबाच्या घरावर वीज पडल्याने एक ४० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य ३ महिला गंभीर झाल्याची घटना घडली आहे. मुरबाड तालुक्यातील टोकावडे या आदिवासी बहुल भागातील भांगवाडी चासोळे या गाव परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जोरदार वादळवाऱ्या सह विजेच्या लखलखाट होऊन पावसाने हाहाकार माजवला होता. याच प्रसंगी भांगवाडी येथील गावा बाहेर असणाऱ्या एका आदिवासी कुटुंबाच्या घरात ४ महिला व १ पुरुष घरात बसले असताना अचानक मोठ्या आवाजा सह त्या घरावर विज कोसळली त्यात ४० वर्षीय रुक्मिणी गोपाळ मेंगाळ यांच्या अंगावर विज पडल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या तर नंदा गुलाब मेंगाळ, हेमी अनंता लोभी, हौशा जैतू हिंदोळा ह्या तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी  टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रसंगी  शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख प्रकाश पवार, मा. जि.प सदस्य संजय पवार, मा. पंचायत समिती सदस्य अनिल घरत आणि समाजसेवक बंडूशेठ पवार यांनी तात्काळ दवाखान्यात धाव घेऊन योग्य ती जखमींना मदत केली. 0000

जुन्या ई रिक्षा शासकीय खात्यांना सुपूर्द करा

स्थानिकांची मागणी   माथेरान : माथेरान मधील एकूण ९४ पैकी वीस हातरीक्षा श्रमिकांच्या हाती १० जूनपासून सहा महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टवर पर्यावरण पूरक ई रिक्षाचे स्टेरिंग आल्याने सुरुवातीला नगरपरिषदेच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या सात ई रिक्षा बंद करण्यात आल्या असून त्या सर्व ई रिक्षा शास्त्री हॉलमध्ये ठेवण्यात आल्या असून त्यांची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अजूनही काही दिवस त्या बंद ठेवण्यात आल्या तर आगामी काळात नादुरुस्त होऊन भंगारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी गावातील शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्गाला नगरपरिषदेने भाडेतत्त्वावर दिल्यास त्याचा सदुपयोग होऊ शकतो आणि याच माध्यमातून नगरपरिषदेला आर्थिक उत्पन्न प्राप्त होऊ शकते. अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे. ई रिक्षा सुरू झाल्यापासूनच खऱ्या अर्थाने इकडे पर्यटकांना लोंढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आणि त्यातच ऐन गर्दीच्या वेळी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग मध्येच येऊन रिक्षात बसून जातात त्यामुळे अनेकदा त्याठिकाणी रिक्षा स्टँडवर पर्यटक संबंधित रिक्षाच्या कर्मचाऱ्यासोबत वाद घालताना दिसतात. बहुतेक खात्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग हे मोफतच ह्या सेवेचा लाभ घेत आहेत. येथील श्रमिकांनी कर्ज काढून या ई रिक्षा घेतलेल्या आहेत त्यातच शासकीय वर्गाला मोफत सेवा उपलब्ध करून दिल्यास ह्या श्रमिकांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. यासाठी नगरपरिषदेने येथील सर्व शासकीय खात्याला या जुन्या सात रिक्षा मासिक भाडेतत्त्वावर दिल्यास यातून नगरपरिषदेच्या तिजोरीत भर पडून या जुन्या सात रिक्षांची देखभाल राहू शकते असेही बोलले जात आहे. 00000

व्यवस्थेतील महत्त्व या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान – ॲड.प्रसाद पाटील

 अशोक गायकवाड   रायगड : ‘रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशन’ च्यावतीने शनिवार, २४ ऑगस्टला सकाळी ११.०० वाजता क्षात्रैक्य सभागृह, कुरुळ-अलिबाग येथे मा.न्यायमूर्ती अभय ओक (न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायलय, नवी दिल्ली) यांचे, ‘जिल्हा व तालुका न्यायालयांचे न्याय व्यवस्थेतील महत्त्व’ या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.प्रसाद पाटील यांनी दिली आहे. या प्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून मा.न्यायमूर्ती आर.आय. छागला (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) मा.न्यायमूर्ती एम.एम.साठ्ये (न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई) मा.ए. एस. राजंदेकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड उपस्थित राहणार आहेत. तर विशेष निमंत्रित म्हणून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा पदाधिकारी अॅड. जयंत जायभावे, अध्यक्ष, अॅड. डॉ.उदय वारुंजीकर उपाध्यक्ष, अॅड.हर्षद निंबाळकर, अॅड.गजानन चव्हाण, अॅड. विठ्ठल कोंडे-देशमुख सदस्य उपस्थित राहणार आहेत. ००००

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा-२ मध्ये शाळांनी सहभागी व्हावे – डॉ भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड   रायगड : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, गुणवत्ता वाढ व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे तसेच शाळेचा सर्वागीण विकास करणे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा कालावधी २९ जुलै ते १५ सप्टेंबर २०२४ हा ठरविण्यात आला आहे. या अभियानाच्या टप्पा २ मध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांनी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी केले आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांचे पुढील मुद्दयांच्या आधारे गुणांकन करण्यात येईल. पायाभूत सुविधा ३३ गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण, शैक्षणिक संपादणूक ४३ गुण. तालुकास्तरावरील मुल्यांकनाचे कार्य- प्राथमिक स्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष केंद्रप्रमुख हे आहेत. तालुका स्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष गट विकास अधिकारी, पंचायत समिती हे आहेत. जिल्हास्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे आहेत. पारितोषिके:- तालुकास्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ३ लक्ष, द्वितीय क्रमांक ३ लक्ष, तृतीयक्रमांक- ३ लक्ष. इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ३ लक्ष, व्द्वितीय क्रमांक २ लक्ष, तृतीयक्रमांक १ लक्ष. जिल्हास्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ११ लक्ष, द्वितीय क्रमांक ५ लक्ष, तृतीय क्रमांक -३ लक्ष. इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ११ लक्ष, द्वितीय क्रमांक ५ लक्ष, तृतीयक्रमांक ३ लक्ष, अशाप्रकारे रायगड जिल्हयात बक्षिसे मिळणार आहेत.

विना परवानगी सुरू असलेले पॉड हॉटेलचे बांधकाम त्वरित थांबवा-मनोज खेडकर

माथेरान : मध्य रेल्वेने माथेरान रेल्वे स्टेशन परिसरात जुन्या हेरिटेज वास्तूमध्ये अनधिकृतपणे तोडफोड करून अनधिकृतपणे पॉड हॉटेलचे बांधकाम सुरू केले आहे यासाठी हेरिटेज कमिटी व नगर परिषदेची परवानगी घेतलेली नाही…

क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून वाहतूक नियम पाळा संदेश देत ‘रक्षाबंधन’

माथेरान : क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन विविध सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असून रक्षाबंधनचे औचित्य साधन दरवर्षीप्रमाणे पनवेल मधील विजय सेल जवळील सिग्नलच्या चौकात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना राखी बांधत सुरक्षेची काळजी…

नेरळ माथेरान घाटामध्ये अपघातांचे प्रमाण वाढले

माथेरान : माथेरान हे मुंबई पुणे नाशिक ठाणे सारख्या मोठ्या शहरांपासून सर्वात जवळचे पर्वतीय पर्यटन स्थळ असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी वाढत आहे व येथे येण्यासाठी नेरळ माथेरान हा एकमेव…

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा : डॉ. भरत बास्टेवाड*

अशोक गायकवाड* अलिबाग : रायगड जिल्ह्यात गणेश भक्तांनी गणेशोस्तव साजरा करताना केंद्रीय प्रदूषण मंडळाने यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन करून, उत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…