ई रिक्षाच्या सेवेचा लाभ आम्हाला अगोदर द्या !
पर्यटकांची मागणी थेरान : पर्यटन क्रांती घडवून आणण्यासाठी ई रिक्षा मैलाचा दगड ठरत असताना ह्या सेवेचा लाभ अगोदर आम्हा पर्यटकांना देण्यात यावा अशी मागणी खुद्द पर्यटकांकडून केली जात आहे. गेल्यावर्षा…
raigad news and updates
पर्यटकांची मागणी थेरान : पर्यटन क्रांती घडवून आणण्यासाठी ई रिक्षा मैलाचा दगड ठरत असताना ह्या सेवेचा लाभ अगोदर आम्हा पर्यटकांना देण्यात यावा अशी मागणी खुद्द पर्यटकांकडून केली जात आहे. गेल्यावर्षा…
महावाचन उत्सव २०२४ उत्सव संपन्न अशोक गायकवाड अलिबाग :समग्र शिक्षा रायगड जिल्हा परिषद, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी महावाचन उत्सव २०२४ उत्साहात साजरा करण्यात आला.…
माथेरान : अत्यंत चिकाटीने आणि मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या माथेरान नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानात कर्जत तालुक्यात माथेरानच्या प्राथमिक शाळेचा…
अशोक गायकवाड* अलिबाग : समग्र शिक्षा रायगड जिल्हा परिषद, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.३०) महावाचन उत्सव २०२४ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अलिबाग शहरात…
पालिकेची स्वतःची मिनीबस सुरू होण्याच्या प्रतिक्षेत नागरिक ! माथेरान : माथेरान करांच्या कर्जत ते माथेरान दरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेचा मुख्य कणा म्हणून मिनीबस सेवेला अधिकाधिक प्राधान्य दिले जाते.या सेवेचा लाभ सर्वसामान्य लोकांना, व्यापारी त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्टीने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणावर होत आहे. ११ ऑक्टोबर २००८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळेच अनेक खडतर आव्हाने पेलून ही मिनीबस सेवा उपलब्ध झाली असून आजवरच्या काळात याच सेवेच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपले करियर करता आले आहे.सुरुवातीला ह्या बसने उत्तम प्रकारे सेवा उपलब्ध करून दिली होती. परंतु काही वर्षांपासून ह्या बसने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच या मार्गावरील दोन बसेसची पुरती वाताहत झाली असल्याने घाटरस्त्यात कुठेही बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ही बस व्यवस्थित प्रवास देईल याचीही शाश्वती राहिलेली नाही. पर्यटनस्थळ माथेरान मध्ये स्थानिकांना आजवर आपल्या मूलभूत अधिकार असो किंवा गावाची विकासात्मक कामे असोत नेहमीच इथल्या गलिच्छ राजकारणापायी संघर्ष करावा लागत आहे.राज्यातील विविध ठिकाणी सर्वत्रच शासनाच्या मिनीबसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यामुळे माथेरान नगरपरिषदेच्या माध्यमातून लवकरच या मार्गावर स्वतःच्या दोन बसेस उपलब्ध करून दिल्यास शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे नियमित प्रवास करणाऱ्या व्यापारी वर्गाला, नागरिकांना सोयीचे ठरू शकते असे स्थानिक बोलत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येणारी कर्जत माथेरान मिनीबसची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सुरुवातीच्या काळात माथेरानसाठी दोन मिनी बस दिल्या गेल्या होत्या नंतर त्यातील एक बस ही पनवेल येथे फिरविण्यात आली त्यामुळे येथील नागरिकांना एकाच बसवर अवलंबून राहून खडतर प्रवास करावा लागत आहे.फार जुनी बस असल्याने नेरळ माथेरान घाटात अचानक बंद पडल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन किमान दोन नवीन बस नागरिकांच्या सेवेत आणल्यास नागरिकांचा प्रवास सुखकर होईल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला देखील याचा निश्चित फायदा होईल. चंद्रकांत जाधव— अध्यक्ष क्षत्रिय मराठा समाज माथेरान
अशोक गायकवाड रायगड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्हयामध्ये २८ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती न्यायाधिश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूरसंचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. २८ सप्टेंबरला होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग ए.एस. राजंदेकर यांनी केले आहे
अशोक गायकवाड रायगड : जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या व्यक्तींना प्रत्येक गावांमध्ये व वाडयांमध्ये जाऊन जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन खाते, इतर आवश्यक प्रमाणपत्रे व पीएम किसानचा लाभ देण्याकरिता २३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीमध्ये शिबीरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. आदिम जमातीच्या (कातकरी) विकासाकरिता प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियान (PM- JANMAN) ही मोहिम देशभरात राबविण्यात येत आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यक्रमात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरीता केंद्र शासनाने ११ प्राथम्य क्षेत्र निश्चित केले असून त्यामध्ये ९ मंत्रालयाचा समावेश केला आहे. या कार्यक्रमांतर्गत आदिम जमातीच्या लोकांना जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन खाते, इतर प्रमाणपत्रे व पीएम किसान चा लाभ देण्यात येणार आहे.प्रकल्प अधिकारी,आदिवासी विकास प्रकल्प पेण, जिल्हा आरोग्य अधिकारी, रा.जि.प., तहसिलदार सर्व, गट विकास अधिकारी-पंचायत समिती सर्व, तालुका कृषी अधिकारी सर्व व अग्रणी बँक व्यवस्थापक यांचा या शिबिरात समावेश असणार आहे. जातीचे दाखला, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड, आधारकार्ड, जनधन बचत खाते, पीएम किसानचा लाभ यापासून एकही आदिम व्यक्ती वंचित रहाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
अलिबाग : घटनेने दिलेले सर्वसामान्यांचे स्वातंत्र्य आबाधीत राखणे ही न्यायव्यवस्थेत काम करणार्या वकीलांची व न्याधीशांची जबाबदारी आहे. त्यामुळे या व्यवस्थेत काम करणार्यांनी झुंडशाही , व कोणत्याही दबावाला बळी नपडता निपक्षपातीपणे काम केले पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांनी व्यक्त कले. रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांचे ‘ जिल्हा व तालुका न्यायालयांचे न्याय व्यवस्थेतील महत्व ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (दि.24) क्षात्रैक्य सभागृह , कुरूळ येथे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आर. आय. छागला, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. एम. साठ्ये, रायगडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर , बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष अॅड. उदय वारूंजीकर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अॅड. गजानन चव्हाण, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अॅड. विठ्ठल कोंडे – देशमुख, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य जयंत जायभावे , जिल्हा सरकारी वकील अॅड. संतोष पवार आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्हा व तालुका न्यायालयात सर्वसामान्य माणसे येत असतात. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम ही न्यायालये करत असतात. त्यामुळे आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेत ही न्यायालये महत्वाची आहेत. त्यांना दुय्यम न्यायालये असे संबोधणे चुकीचे आहे. असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांनी केले. जिल्हा व तालुका न्यायालय ही सर्वसामान्यांची न्यायालये आहेत. त्यांच्यासाठी ही शेवटची न्यायालये असतात. ते या पुढील न्यायालयात जावू शकत नाहीत. याच न्यायालयांमध्ये अशीलाचे भवितव्य घडते किंवा बिघडते. त्यामुळे येथेच व्यवस्थित पुरावे नोंदवून आपल्या अशीलाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न वकिलांनी केला पाहिजे, असे न्यायमुर्ती अभय ओक म्हणाले. जिल्हा व तालुका न्यायालयात काम करणार्या वकीलांनी आपणास कमी समजू नये. सर्वोच्च व उच्च न्यायालयात काम करणार्या वकीलांपेक्षा आपले ज्ञान कमी आहे असे समजू नये . त्यांनी आपल्यातील न्यूनगंड काढून टाकून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा., असे ते म्हणाले. सर्वसामान्यांच्या अपेक्षा न्यायालयांकडून पूर्ण होत नसल्यामुळे न्यायालयाबाबत सर्वसामान्यांच्या मनामध्ये लौकिक कमी होत चालला आहे. न्यायालयाच्या विश्वासार्हतेला तडा जात आहे. न्यायदानात उशीर होत असल्यामुळे न्यायालयाची बदनामी होत आहे. त्यामुळे न्यायालयाची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करा. वेळ पाळा. न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका, असा सल्ला न्यायमुर्ती अभय ओक यांनी तरूण वकीलांना दिला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एम. एम. साठ्ये म्हणाले की, न्यायालयात आपल्या अशीलाला निकाल मिळणार की न्याय मिळणार याचा विचार करा. माहिती मिळवा. ज्ञानाच्या बळावर शहाणपण कमवा. त्यातून आपली प्रगती करावी. अॅड. उदय वारूंजीकर, अॅड. गजानन चव्हाण , अॅड. जयंत जायभावे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रसाद पाटील यांनी प्रस्ताविक केले. सचिव अॅड. अमित देशमुख यांनी आभारप्रदर्शन केले. अॅड. विजय पाटील यांनी सुत्रसंचालन केले.
रायगड :आपल्या आजूबाजूला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत कोठून व कशी…
रायगड : २५ फेब्रुवारीला जर्मनी देशातील बाडेन वुटेनवर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. ज्यामध्ये वाहनचालकांचा समावेश असून सदर कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्याची कार्यपध्दती…