Category: ठाणे

Thane news

वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसत नाही – ॲड. पारिजात पांडे

अनिल ठाणेकर ठाणे : वक्फ कायद्याकडे धार्मिक कायदा म्हणुन बघण्याचे काही कारण नाही. यात मुख्य न्याय तत्वाचे (प्रिन्सिपल ऑफ जस्टीस) पालन होत नाही, या दृष्टीने या कायद्याकडे बघितले तर वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल आवश्यक आहेत. असे परखड मत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे ॲड. पारिजात पांडे यांनी व्यक्त केले. तरीही, धार्मिक आधारावर उन्माद निर्माण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, तो चुकीचा असल्याचे निरिक्षणही त्यांनी नोंदवले. ठाण्यात सुरु असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ‘कायदा वक्फ बोर्डाचा’ हे पाचवे पुष्प ॲड. पारिजात पांडे यांनी गुंफले. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, या सत्राचे अध्यक्ष ठाणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत कदम, माजी उपमहापौर सुभाष काळे उपस्थित होते. १९९५ साली काँग्रेस सरकारने व्यापक अधिकार दिलेल्या वक्फ कायद्यावर लख्ख प्रकाश टाकून ॲड. पांडे यांनी, वक्फ बोर्डाच्या मर्यादांना कात्री लावण्यासाठी विद्यमान केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रस्तावित ४० दुरुस्त्यांचा मुद्देसूद आढावा घेतला. ही धार्मिक लढाई निश्चित नाही. हा वक्फ कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही, याची ही लढाई आहे. ११३ कलमे असलेला हा वक्फ कायदा सर्वसामान्यांना आपला वाटत नाही. तरीही धार्मिक आधारावर जो उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. या कायद्याकडे धार्मिक कायदा म्हणुन बघण्याचे काही कारण नाही. हा कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही, हा कायदा सर्वसामान्य व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार देतो की नाही, यात प्रिन्सिपल ऑफ जस्टीस फॉलो होत नाही, या दृष्टीने या कायद्याकडे बघितले तर संविधानाच्या चौकटीत वक्फ कायदा बसत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल आवश्यक आहेत. आणि हे प्रस्तावित बदल बोर्डाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी सुचविलेले असून एकप्रकारे बोर्डाच्या कामाची गती वाढवण्यासाठी बदल आवश्यकच असल्याचे ॲड. पांडे यांनी नमुद केले. चौकट केंद्रात सुदैवाने बदल करण्याची मानसिकता असलेले सरकार विराजमान आहे. असा उल्लेख करीत ॲड. पांडे यांनी एकप्रकारे मोदी सरकारची स्तुती करून, या सरकारने वक्फ कायद्याचे नाव ‘एकत्रित वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा’ (युनिफाईड वफ्फ मॅनेजमेंट इन्पॉवरमेंट इफिशिएन्सी डेव्हलपमेंट ॲक्ट) असे केले. तसेच १४ ऑगस्ट १९४७ नंतर पाकिस्तान वा बांग्लादेश येथे गेलेल्याच्या इथल्या जागा वक्फच्या नावे होत्या. ही तरतुदच आता प्रस्तावित कायद्यात बदलण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात हात ठेवाल ते वक्फचे हे चालणार नाही. याकडे ॲड. पांडे यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने वक्फ कायद्यातील मर्यादेच्या तरतुदी रद्द करण्यासाठी सादर केलेल्या दुरुस्ती विधेयकाविरोधात सध्या जो फेक नॅरेटीव्हचा प्रकार सुरु आहे तो समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आहे. असे स्पष्ट करून ॲड.पांडे यांनी, त्यांचे बालेकिल्ले १०० टक्के ढासळणार असुन बालेकिल्यावरून त्यांचे निशाणही उतरणार आहे. असा सूचक इशारा दिला. तसेच आपणही समाज म्हणुन एक जबाबदारी निश्चितपणे पार पाडण्याची वेळ आली असल्याचे प्रेरीत करताना त्यांनी रामायणातील घटनेचा दाखला दिला.

‘वैश्य मेळावा, लक्ष्य २०२५’ संपन्न

ठाणे : भव्य दिव्य असा `वैश्य मेळावा, लक्ष्य 2025′ हा 600 पेक्षा जास्त समाजबांधवांच्या उपस्थितीत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. अनेक मान्यवर पाहुण्यांनी उपस्थिती  लावून मार्गदर्शन केले. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार दिपक केसरकर, खासदार नरेश म्हस्के तसेच प्रसिद्ध उद्योगपती विवेक माणगांवकर, भाई कामेरकर, हनुमंत हेडे, अरुंधती भालेराव, कीर्ती गावडे, भाई शेटये, अशोक नर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, दिपक मेजारी, रुपाली तेलवणे, संजय भाट, विष्णु सातवसे, मनोज आंग्रे, चंद्रकांत खाडये आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के आणि माजी मंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते सर्व समाज संस्था आणि प्रतिष्ठित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वैश्य उद्योजक समाज बांधवांसाठी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट चांगले कार्य करीत आहे, त्याला आमचे सर्वतोपरी सहकार्य असेल. वैश्य समाजाच्या कार्याची तोंड भरून स्तुती केली आणि कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास आम्ही सोबत असू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर यांनी समाज संपन्न, समृद्ध झाला तर देश संपन्न होईल असे सांगून मान्यवरांना पुरस्कार देताना पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते असे सांगितले. सकाळी 8 ते  रात्री 7 पर्यंत मेळाव्याचे प्रत्येक सत्र अतिशय नीटनेटके आणि व्यवस्थित होत गेले. अनेकांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरणारे  होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मोटिवेशनल स्पीच आणि मार्गदर्शन खूपच सुंदर झाले. संपूर्ण हॉल सकाळपासून शेवटपर्यंत भरगच्च भरलेला होता, यावरूनच या कार्यक्रमाची यशस्विता सांगता येते.…

ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी सीएसआर निधी मिळवून देणार!

 उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची ग्वाही ठाणे : मराठीत उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी प्रकाशकांना राजाश्रय मिळायला हवा. तसेच पुस्तकांच्या प्रसारासाठी ग्रंथालयांना सक्षम करण्याची गरज आहे. खासगी उद्योग-व्यवसायांकडून देण्यात येणारा सीएसआर निधी ग्रंथालयांच्या संवर्धनासाठी वापरला जायला हवा. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. ज्येष्ठ लेखक व राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे प्रकाशन रविवारी मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या स्वामी विवेकानंद यांच्यावरील चरित्रकादंबरीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, लेखक-कवी प्रा. अशोक बागवे, प्रा. प्रवीण दवणे, किशोर कदम (सौमित्र), कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, शारदा प्रकाशनाचे प्रा. संतोष राणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘संन्यस्त ज्वालामुखी’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, ‘वाचाल तर वाचाल’ असे ट्रकच्या मागे लिहून बिंबवण्याची वेळ आपल्यावर आली आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल तर प्रत्येक जिल्ह्यात चांगले लेखक आणि वक्ते तयार व्हायला हवेत. हिंदुत्व काय आहे हे जगाला ठासून सांगणारे स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीला सांगायला हवेत. ‘संन्यस्त ज्वालामुखी’ ही कादंबरी त्यादृष्टीने राज्यातील सर्व ग्रंथालयांमध्ये पोहोचायला हवी, अशी भावना मंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, महाराष्ट्राने स्वामी विवेकानंदांवर नेहमीच प्रेम केले आहे. लोकमान्य टिळकांपासून वि. रा. करंदीकरांपर्यंत अनेकांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची ओळख मराठी समाजाला करून दिली आहे. त्या परंपरेतील स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महाराष्ट्रातील आजचे पाईक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे आहेत, अशा शब्दांत डॉ. सदानंद मोरे यांनी चरित्रलेखक प्रा. डॉ. ढवळ यांचा गौरव केला. तर विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, धर्म आणि राजसत्ता यांचे द्वंद्व भारतीय समाजात पूर्वापार आहे. हिंदू धर्म नेमका काय आहे, हे सांगणे अतिशय गुंतागुंतीचे आहे. मात्र हिंदू धर्माच्या शोधात स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान भारतातील डाव्या-उजव्या अशा सर्वच विचारसरणींना स्वीकारार्ह वाटते, यातच त्यांचे मोठेपण आहे. त्यामुळे आजच्या पिढीला विवेकानंदांचे विचारच तारू शकतात, अशी भावना डॉ. शोभणे यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी कवी-गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनीदेखील स्वामी विवेकानंदांच्या विचाराची आजच्या पिढीला ओळख करून देण्याची गरज व्यक्त केली. याबाबत बोलताना प्रा. दवणे म्हणाले की, आज समाजाच्या सर्वच क्षेत्रांत भेसळ झाली आहे. विचार, संस्कार, संस्कृती, नीती यांचा विसर पडत चालल्याची परिस्थिती आहे. अशा काळात स्वामी विवेकानंद यांचे विचार ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या कादंबरीच्या माध्यमातून आजच्या पिढीपुढे आणण्याचे काम झाले आहे, असे प्रतिपादन प्रा. दवणे यांनी केले. तर कवी-गीतकार व अभिनेते किशोर कदम (सौमित्र) याप्रसंगी म्हणाले की, भारतीय समाजातील अनेक महनीय व्यक्तींच्या जीवनविचाराला आध्यात्मिकतेची किनार आहे. याचे कारण त्यांनी संपूर्ण देश पिंजून काqढला, आपला संपूर्ण समाज जाणून घेतला. त्यातूनच त्यांनी आध्यात्मिक विचारांचा संदेश आपल्याला दिला आहे. स्वामी विवेकानंद यांनी देखील आपापला धर्म, स्व-धर्म शोधण्याची प्रेरणा जगाला दिली आहे, असे प्रतिपादन किशोर कदम यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, कवी प्रा. अशोक बागवे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील मनोगत व्यक्त करून ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्रकादंबरीचे महत्त्व अधोरेखित केले. प्रकाशनसोहळ्याचे प्रास्ताविक शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी केले, तर प्रा. संतोष राणे यांनी प्रकाशक म्हणून भूमिका मांडली. कार्यक्रमाचा समारोप गायिका फाल्गुनी नातु यांच्या भैरवी गायनाने झाली, तर प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले.

लकी व्यायामशाळेच्या नूतनीकरणाचा शुभारंभ

ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार व याँनच्या विशेष निधितून खासदार नरेश म्हस्के, आमदार  रविन्द्र फाटक यांच्या मार्गदर्शनाने कोपरीतील प्रभाग क्रमांक २० मधील लकी व्यायामशाळेच्या नूतनीकरणाच्या कामाचा नुकताच…

ठाणे महानगरपालिकेतर्फे साजरा होणार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

डॉ. निर्मोही फडके यांच्या व्याख्यानाने होणार उद्घाटन ठाणे  : राज्यभरात १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२५ हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवार, १४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. त्यानंतर, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉ. निर्मोही फडके यांचे ‘जगू मराठीचे रंगी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी सोमवारी, कै. नरेंद्र बल्लाळ हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी उपस्थित होते. ग्रंथदिंडी व पुस्तक प्रदर्शन या पंधरवड्यात, सोमवार, २० जानेवारी रोजी स. १०.३० ते स. ११.३० या वेळेत महापालिका भवन ते परमार्थ निकेतन ते ज्ञानराज सभागृह ते महापालिका भवन अशी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर, प्राच्य विद्या संस्थेच्या सहकार्याने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे जुन्या आणि नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्याचवेळी, सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचे सुलेखन पाहण्याची संधी मिळेल. पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांसह कोश, रामायण, महाभारत यांचे खंड पाहता येतील. तसेच, पुस्तक विक्रीचे स्टॉलही यावेळी ठेवण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी सोमवार, २० आणि मंगळवार २१ रोजी स. १० ते सायं. ६ वाजेपर्यंत खुले राहील. महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या स्पर्धा बुधवार, २२ जानेवारी रोजी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निबंध, सुलेखन (हस्ताक्षर), शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या पंधरवड्याच्या काळात, शिक्षण विभागातर्फेही शालेय स्तरावर विविध स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे प्रा. प्रवीण दवणे यांचे व्याख्यान आणि समारोप मंगळवार, २८ जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ केै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात होईल. त्यात, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शालेय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिेके देण्यात येतील. त्यानंतर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान होईल. हे व्याख्यान सर्व नागरिकांसाठीही खुले आहे.

१९७२ साली अकरावी उत्तीर्ण झालेल्यांची आदिवासी शाळांमध्ये घसघशीत मदत

– सत्तरी गाठलेल्या ‘मुली मुलां’चा उत्साह कौतुकास्पद ठाणे, दि. (प्रतिनिधी) : अंबरनाथ येथील दि एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालय येथे १९७२ साली अकरावी (जुनी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी समाज माध्यमाद्वारे एकत्र येऊन ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात सुमारे सहा शाळांना भेट दिली आणि तेथील मुली, मुले आणि शिक्षक तसेच शाळांना घसघशीत सहाय्य केले. सत्तरी ओलांडलेल्या या विद्यार्थ्यांच्या विधायक कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. समाज माध्यमावर ‘आम्ही १९७२चे विद्यार्थी’ असा समूह काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. या माध्यमातून १९७२ साली जुनी अकरावी उत्तीर्ण झालेल्या सुमारे ५४ मुली आणि मुलांनी (आज मितीस सत्तरीत असलेल्या) एकत्र येऊन काही विधायक उपक्रम हाती घेतले. या उपक्रमांचा एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अंदाड येथे भेट दिली. ‌विशेष म्हणजे दि एज्युकेशन सोसायटीच्या अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय या शाळेचीच शाखा अंदाड येथे असून सौ. दीपिका विशे या मुख्याध्यापिका आहेत.   त्यानंतर अंदाड येथे प्रवीण शिर्के मुख्याध्यापक असलेल्या  शाळेला भेट दिली. यानंतर  हीव, सपाटपाडा, मानिचा पाडा येथील शाळांना भेटी दिल्या. या ठिकाणी मडके, कुंदे, चौधरी, हुलावळे, पाटील असे शिक्षक आदिवासी मुले मुलींना आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पाटी, पेन्सिल, कंपॉस, वह्या, चित्रकला वह्या, रंग, खोडरबर, शाळेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू, सतरंजी पट्ट्या, रोख रक्कम अशाप्रकारे सहाय्य करण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षिका, शिक्षक, कर्मचारी, गणवेशातील मुली, मुले यांनी अतीशय शिस्तबद्ध पद्धतीने या सत्तरीतल्या मुली मुलांचे प्रेमादराने स्वागत केले. रमेश कुर्जेकर, भारती सातघरे, भारती चव्हाण, ज्योती तावडे, सिद्धार्थ पुराणिक, सरोजिनी राणे, नीलांबरी गुप्ते, प्रतिभा धर्माधिकारी, प्रकाश मावळणकर, रत्नाकर कोर्डे, अनघा पोतनीस, संजीव पोतनीस, विजय औटी, दिगंबर वेर्णेकर यांचा या १९७२ च्या तुकडीत समावेश होता. भारती सातघरे, रत्नाकर कोरडे, सिद्धार्थ पुराणिक यांनी या तुकडीचे नेतृत्व करतांना मुंबईहून सर्व शालोपयोगी साहित्य आणण्यासाठी परिश्रम घेतले. उद्योजक (व विद्यार्थी) विश्वनाथ पनवेलकर यांनी ही सहकार्य केले.

देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठीचा सुगंध दरवळेल ! शरद पवार

दिल्ली येथे पार पडणाऱ्या ‘९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चा स्वागताध्यक्ष म्हणून मराठी साहित्यकांशी आज संवाद साधला. गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माझे दौरे, भाषणं सुरु होते. त्यातील सातत्यपूर्ण संबोधनामुळे माझा घसा बसला…

आधुनिक भारत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी बांधलेला आहे’ – अभय बापट

ठाणे : सर्वधर्मपरिषदेतील स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचा जगावर अद्भूत प्रभाव पडला. जगावर आजही स्वामीजींच्या विचारांचे गारुड कायम आहे. आजचा आधुनिक भारत हा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी बांधलेला आहे, असे प्रतिपादन…

श्रीमत् दासबोधांतील सलोकता, समीपता, सरूपता व सायोज्यता या चार मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा.- सद्गुरू श्री वेणाभारती महाराज

अनिल ठाणेकर ठाणे : आताच्या पिढीने इतका ताण वाढवुन घेतलाय की, हा ताण कसा कमी करायचा, त्या संभ्रमाचाही वेगळा ताण त्यांना उद्भवत आहे. तेव्हा, तणावमुक्त होण्यासाठी श्रीमत् दासबोधांतील सलोकता, समीपता, सरूपता व सायोज्यता या चार मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा. असे उदबोधक प्रवचन सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी दिले. ठाण्यात सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत ‘तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ हे तिसरे पुष्प शुक्रवारी सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यानी गुंफले. यावेळी, व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष सीए संजीव ब्रम्हे, सुहास जावडेकर तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पूरोहित, विद्याधर वैशंपायन तसेच, सौ.कमल संजय केळकर आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तणावमुक्त जीवनाचे सार उलगडताना सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यांनी, ताणतणाव अनेक प्रकारचे आहेत. हे ताण कमी करण्यासाठी सिंहावलोकन करा, वृद्ध मंडळीकडून जाणून घ्या. आपल्या परंपरा सोडु नका, त्या आपल्या आरोग्याशीच नव्हे तर, भाग्याशी निगडीत आहेत. एखाद्याचा आदर्श घ्या, पण विनाकारण स्पर्धा करू नका. शेजाऱ्याकडे अमुक आहे, तमुक आहे म्हणुन आपल्याकडे हवे ही असुया नसावी. पाळण्यात होतो, तेव्हा कुठे आजार होते ? शरीर आजारी होत नाही तर, मानसिक अस्वस्थता, ताणतणाव आहेत म्हणून आजार आहेत. शेवटी अग्नी जर शरीर स्विकारत असेल तर त्या शरीरात आजार नाहीत. असे स्पष्ट करून आज जगण्यातील आत्मा हरवला आहे. जे आपल्या वेदामध्ये, उपनिषदांमध्ये, सनातन ग्रंथामध्ये लिहिले आहे ते सर्वोत्कृष्ठ आहे. ग्रंथ हेच गुरु आहेत, हीच खरी संपत्ती आहे. हे सत्य आपल्याला जाणता आले पाहिजे. आपण कितीही शिकलो तरी वेदांपेक्षा उपनिषदांपेक्षा लहान आहोत. वेद हेच आपले गुरु आहेत. त्यामुळेच भारत हा सगळ्यांचा आध्यात्मिक गुरु असुन भगवद्गीता हा आद्यग्रंथ असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वजांचे देणे नाकारले तर, ताण वाढणे स्वाभाविक आहे. तेव्हा, ताण कमी करण्यासाठी श्रीमत् दासबोधामधील सलोकता, समीपता, सरूपता व सायोज्यता या चार मुक्तीचा अवलंब दैनंदिन जीवनात करा. जीवनात प्रवाही राहुन सगळ्या गोष्टी सहज करायला शिका, घरातील देवघरात मुक्तीच्या शक्तीचा धागा आहे, पुढील अनंत पिढयांसाठी तो जपुन ठेवत ह्या मुक्ती त्यांना सोपवा. अशा प्रकारे अध्यात्म आणि ईश्वराशी कृतज्ञ राहण्याचे महत्त्व सोदाहरण विषद करून सद्गुरू श्री वेणाभारती महाराज ह्यांनी, गृहस्थधर्मातील कौटुंबिक गमतीजमती सांगत उपस्थित श्रोत्यांना तणावमुक्तीसाठी अनेक सहजसुलभ मार्मिक तोडगे देखील सुचवले. चौकट आजकाल सत्य ऐकण्याची कुणाचीच हिंमत नाही. कारण सत्य कटू असते, ते सत्य नारायण आहे. तेव्हा, रस्त्यावर असेल अथवा कुठेही सत्यनारायणाच्या दर्शनाचा संकोच करू नका. किंबहुना, वर्षभरात प्रत्येकाच्या घरात एक तरी सत्यनारायण झाला पाहीजे. घरातील हॉलमध्ये सत्यनारायण आणि महाप्रसाद टेरेसवर असे प्रघात टाळा. असे स्पष्ट करून श्री वेणाभारती यांनी केळीच्या पानावरील शिऱ्याच्या प्रसादाची महती विषद केली.

ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित सांस्कृतिक महोत्सव संपन्न

 बक्षीसपात्र विद्यार्थ्यांनी सादर केली १३ नृत्य आणि २ नाटके ठाणे : ठाणे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण असून त्यांना बाल रंगकर्मी योजनेत प्रशिक्षण देऊन या विद्यार्थ्यांचे एखादे बालनाट्य बसवून महाराष्ट्राभर त्याचे २५ प्रयोग व्हावेत, असे प्रतिपादन अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई यांनी ठाणे महानगरपालिका शाळांचा सांस्कृतिक महोत्सवाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात केले. ठाणे महानगरपालिका शाळांचा मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे नुकताच संपन्न झाला. सांस्कृतिक महोत्सव २०२४-२५ मध्ये नृत्य आणि नाट्य विभाग अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. नृत्यविभागात इयत्ता १ ली ते ५वीच्या एकूण २४, इयत्ता ६ वी ते ८ वीच्या ६१ शाळांनी, तर नाट्य विभागांमध्ये १९ अशा एकूण १०४ शाळांनी भाग घेतला होता. त्यामधून बक्षीसपात्र विद्यार्थी व शाळांना मंगेश देसाई, बालकलाकार  मायरा वायकूळ, उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बक्षीसपात्र १३ नृत्ये आणि २ नाटके असे १५ कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले प्रारंभी ठाणे मनपा शाळा क्र. १३. खोपटच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ठाणे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी विद्यार्थी बालकलाकारांचे आणि मार्गदर्शक शिक्षकाचे कौतुक केले. तसेच, बालकलाकार मायरा हिने सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी, गटाधिकारी संगीता बामणे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी बाबाजी फापाळे, जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी ठाणे व पालघरचे संचालक जगन्नाथ जाधव आदी उपस्थित होते. सांस्कृतिक समिती २०२४-२५च्या कार्याध्यक्षा अनघा पालांडे पानी उपस्थिताचे आभार मानले. गटप्रमुख प्रेरणा कदम यांच्या राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समिती सदस्य सुरेश पाटील, नूतन बांदेकर,  सहचिटणीस नीलिमा पाटील यांनी केले. मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव स्पर्धा सन २०२४-२५चा निकाल पुढीलप्रमाणे – बालनाट्य विभाग, इयत्ता 1 ते 8 1) प्रथम क्रमांक – शाळा क्रमांक 14,गट क्रमांक 1( जाये तो जाये कहा) 2) द्वितीय क्रमांक – शाळा क्रमांक 125,गट क्रमांक 7 (धरती की फिर्याद) 3) तृतीय क्रमांक – शाळा क्रमांक 31,गट क्रमांक 7( वृध्दाश्रम) 4) उत्तेजनार्थ – शाळा क्रमांक 11,गट क्रमांक 1( विद्यार्थी सुरक्षा समिती) उत्कृष्ट लेखन – शाळा क्रमांक 14,गट क्रमांक 1( जाये तो जाये कहां) उत्कृष्ट नेपथ्य- शाळा क्रमांक 125,गट क्रमांक 7( धरती की फिर्याद) उत्कृष्ट अभिनय मुलगा- मोगली पात्र शाळा क्रमांक 14,गट क्रमांक 1( जाये तो जाये कहां) उत्कृष्ट अभिनय मुलगी- शारदा पात्र शाळा क्रमांक 31,गट क्रमांक 7( वृध्दाश्रम) नृत्य विभाग इयत्ता 1 ते 5 1) प्रथम क्रमांक – शाळा क्रमांक 18,गट क्रमांक 2 (धनगर नृत्य) 2) द्वितीय क्रमांक – शाळा क्रमांक 64, गट क्रमांक 6,(राम आयेंगे) 3) तृतीय क्रमांक- शाळा क्रमांक 96, गट क्रमांक 7 (शिक्षण नृत्य)…