Category: ठाणे

Thane news

 ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियासह स्वाईन फ्ल्यूची साथ

ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूचे १३१ रुग्ण     ठाणे : यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियासह स्वाईन फ्ल्यूचे रुग्णही आढळून येत आहेत. जिल्ह्यात मागील दोन आठवड्यात डेंग्यूचे १०२ तर, मलेरियाचे १९ रुग्ण आढळून आले आहेत. ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूचे १३१ रुग्ण आढळून आले असून हे शहर वगळता जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात २० जून ते ७ जुलै या कालावधीत डेंग्यू चे ४३ रुग्ण तर, ८ जुलै ते १४ जुलै या कालावधीत ५९ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये डेंग्यू चे सर्वाधिक रुग्ण हे कल्याण शहरात आढळले आहेत. तर, मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण ठाणे शहरात आढळले आहेत. तसेच ठाणे शहरात गेल्या काही दिवसापासून स्वाईन फ्लुच्या रुग्ण संख्येतही वाढ होताना दिसत आहे. ठाणे शहरात जुन महिन्यात स्वाईन फ्ल्युचे ८ रुग्ण आढळले होते. तर, ९ जुलैपर्यंत स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या ७० वर पोहोचली होती. या आठवड्यात रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली असून सद्यस्थितीला रुग्णांची संख्या १३१ इतकी आहे. या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. कळवा रुग्णालयात स्वाईन फ्ल्यू रुग्णांसाठी विशेष कक्ष ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लुच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी एकूण १९ खाटा सज्ज असून त्यातील ४ खाटा या अतिदक्षता विभागातील असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या रुग्णालयात स्वाईप टेस्टींगची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. साथीच्या आजारांमध्येही वाढ डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्ल्यू या आजारांसह डायरियाच्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असून सध्या ही संख्या १६० वर पोहचली आहे. शहरात स्वाईन फ्ल्यूची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन महापालिकेने कळवा रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. तसेच औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे. डॉ. चेतना नितील (मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठाणे महापालिका) पावसाळ्याच्या दिवसात सखल भागात पाणी साचून तिथे डासांचा प्रादूर्भाव वाढतो. त्यातून, डेंग्यू मलेरिया सारखे आजार उद्भवतात. पावसाळ्याच्या काळात बाहेरचे अन्न पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे. पाणी उकळून प्यावे अशी काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. डॉ. कैलास पवार, शल्यचिकित्सक (जिल्हा रुग्णालय, ठाणे) 00000

दिवा रेल्वे स्थानकातील गृहफलाट रखडल्याने प्रवाशांचे हाल

कल्याण: मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकातील गृह फलाटाचे काम (होम प्लॅटफाॅर्म) गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याने प्रवासी, रेल्वे प्रवासी…

लक्षभेदी सामाजिक संस्थेने काढली आषाढी एकादशी निमित्त पालखी दिंडी

ठाणे : ठाण्यातील लक्षभेदी सामाजिक संस्थेच्या वतीने पाचपाखाडी भागातून आषाढी एकादशी निमित्त पालखी दिंडी काढण्यात आली . लक्षभेदी सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष व भाजपा ठाणे शहर जिल्हा सचिव माधुरी मेटांगे यांच्या…

मिरा भाईंदर महापालिकेच्या उपायुक्तांकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेचे उपायुक्त रवी पवार यांची बदनामी करण्याची धमकी देत त्यांच्याकडे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात अनोळख्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी…

कल्याण रिंग रोड पूर्णत्वाकडे

प्रकल्पातील चार टप्प्यांचे काम पूर्ण     ठाणे: डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण रिंग रोड प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या एकूण आठ टप्प्यांपैकी टप्पा चार ते सात ( दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन ) अशा चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर उर्वरित टप्प्यांचे काम देखील जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने वेगाने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या वाहतुकीला अधिक गती प्राप्त करून देणारा कल्याण रिंग रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर कल्याण, डोंबिवली सह आसपासच्या शहरातील वाहतूक जलदगतीने करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या सद्यस्थितिचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, कल्याण डोंबिवली महानरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.

महापालिका मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

    ठाणे : सीपी तलाव येथील ठेकेदारकडे कार्यरत असलेल्या सुमारे ५५ कामगारांना कामावरून कमी करण्याच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ कामगारांनी मंगळवारी ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी…

 ठाण्यात उंची मार्गरोधक कोसळला

    मार्गरोधक अंगावर पडून दुचाकीस्वार जखमी     ठाणे : ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील आराधना सिनेमागृह परिसरातील रस्त्यावर बसविण्यात आलेल्या उंची मार्गरोधकास एका ट्रकने धडक दिल्याने तो खाली कोसळल्याचा…

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शिकाऊ उमेदवारांना निवड पत्र वाटप

    ठाणे : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत 15 जुलै रोजी शिकाऊ उमेदवारी प्राप्त झालेल्या प्रशिक्षणार्थ्यींना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

रस्ते दुरुस्ती कामाची आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

    ठाणे : पावसाने हलकी उसंत दिल्यामुळे सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामे मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुरू केली आहेत. या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ…

 आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा

   आनंद गुरुकुल आणि महाविद्यालयात   ठाणे : आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी व आपल्या परंपरेचे जतन करताना…