Category: ठाणे

Thane news

शहापूरमध्ये मतदार महिलांसाठी पाळणाघराची व्यवस्था

खर्डी : शहापूर विधानसभा मतदारसंघातील खर्डी मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या महिलांच्या लहान मुलांसाठी अंगणवाडी सेविकेच्या साहाय्याने पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. मुलांसाठी खेळणी व खाऊची सोय करण्यात आली होती. आजनुप…

वसईत ३१ टक्के तर नालासोपाऱ्यात २० टक्के मतदान

वसई : लोकसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघात सोमवारी मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून मोठ्या संख्येने मतदाना केंद्रावर मतदारांनी हजेरी लावली होती. यामध्ये युवा मतदारांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनीही…

मतदानाची शाई दाखवा दहा टक्के सूट मिळवा

ठाणे:  लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणाऱ्या मतदार राजासाठी विविध आस्थापनांनी आपल्या उत्पादनावर भरघोस सुट दिली आहे. यामध्ये आता हॉटेल व्यावसायिक देखील सहभागी झाले आहेत. ‘बोटाला मतदान केल्याची शाई दाखवा, आणि १० टक्के डिस्काउंट मिळवा’, अशी योजना कल्याण आणि ठाणे शहरातील प्रमुख…

बाळासाहेबांनी उद्धव यांना मुख्यमंत्री केलेच नसते- शिंदे

ठाणे:  शिवसेनाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केले नसते, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मी किमान पाच वेळा तरी त्यांना भाजपसोबत युती करा असे सांगितले होते. त्यांना ते मान्य नव्हते. कारण मुख्यमंत्री पदावर त्यांचा…

शिवसेना कुणाची ? आज फैसला !

स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभेच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यासाठी उद्या सोमवार २० मे रोजी मतदान होत आहे. उद्या महाराष्ट्रातील होणाऱ्या १३ लोकसभेच्या जागेपैकी मुंबई आणि ठाण्यातील लोकसभा जागेकडे अवघ्या देशाचे लक्ष…

भयमुक्त मतदानासाठी ठाणे पोलिस सज्ज

ठाणे : ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी (ता. २०) होणारे मतदान भयमुक्त आणि शांततेत पार पडावे, यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांनी कंबर कसली आहे. स्वतःच्या हक्काच्या फौजफाट्यासह जिल्ह्याबाहेरील सात हजारांहून अधिक पोलिसांची कुमक मदतीला मागवली आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा, नाशिक, पुणे आदी पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर मुंबई आणि ठाण्यात राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधींपर्यंत विविध पक्षांचे मोठे नेते ठाणे, मुंबईत प्रचाराला आले. आता या मतदारसंघात इतर जिल्ह्यांतील पोलिसदेखील दाखल झाले आहेत. ठाणे, मुंबईत शिगेला पोहोचलेला प्रचार आणि २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नयेत, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयात जिल्ह्याबाहेरील सात हजारांहून अधिक पोलिस कुमक मागवण्यात आली आहे. त्यामध्ये तीन पोलिस उपायुक्त, नऊ सहायक पोलिस आयुक्त आणि १९ पोलिस निरीक्षक, तसेच नाशिक प्रशिक्षण केंद्रातील ८० प्रशिक्षण उपनिरीक्षक, पिंपरी- चिंचवडमधील ६९० अंमलदार, तीन हजार ४९१ होमगार्ड असा सात हजारांहून अधिकचा फौजफाटा आहे. त्याचप्रमाणे ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात सध्या पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, सात पोलिस उपायुक्त यांच्यासह आठ हजार पोलिसांचे संख्याबळ आहे. राखीव पोलिसांच्या २५ कंपन्या तैनात ठाणे ग्रामीण पोलिसांचेही चार हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या मदतीला असणार आहेत. हा संपूर्ण फौजफाटा मतदान केंद्र आणि ईव्हीएम मशीन असलेल्या स्ट्रँगरूमच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणार आहे. ठाणे जिल्ह्यात राज्य राखीव दलासह केंद्रीय राखीव पाेलिसांच्या २५ कंपन्या राहणार आहेत. यातील एका कंपनीत १२० कर्मचारी असल्यामुळे सुमारे तीन हजारांहून अधिकचा हा फाैजफाटा यात राहणार आहे. असा असेल पहारा ठाणे शहर परिमंडळ एकमध्ये सातारा, पुणे शहरामधून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तीन कंपन्या, राज्य राखीव दलाची एक कंपनी तैनात आहे. परिमंडळ दोन भिवंडीत सीआयएसएफच्या पुणे आणि धाराशिवच्या चार कंपन्या तैनात आहेत. परिमंडळ तीन कल्याणमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या रत्नागिरी आणि धाराशिवच्या दोन, कर्नाटकची एक आणि पुणे ग्रामीणची एक अशा पाच कंपन्या तैनात आहेत. उल्हासनगर परिमंडळमध्ये सिुंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या चार एसआरपीएफ तसेच बीएसएफच्या कंपन्या आहेत. वागळे इस्टेट परिमंडळ पाचमध्ये कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या रेल्वे सुरक्षा दल, बीएसएफ आणि राज्य राखीव दल अशा तीन कंपन्या नेमल्या आहेत. याशिवाय, ठाणे, कल्याण उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या चार परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक, तर भिवंडीमध्ये दोन अशा सहा एसआरपीएफच्या प्लाटून आहेत.

मिरा-भाईंदर शहरात कडेकोट बंदोबस्त

भाईंदर : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. २०) होत असलेल्या मतदानासाठी मिरा-भाईंदरमधील पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी अडीच हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे. शहरात मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघाचा काही भाग समाविष्ट आहे. या दोन्ही मतदारसंघात मिळून सुमारे ११७ ठिकाणी ६८१ मतदान केंद्रे आहेत. विशेष म्हणजे यातील एकही केंद्र संवेदनशील नाही. संपूर्ण परिसराचे पोलिस बंदोबस्ताच्या दृष्टीने २६ विभाग करण्यात आले आहेत. या सर्व विभागांसाठी मिळून मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयातील १०६ अधिकारी, ७४२ कर्मचारी, १६२ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, ८०० होमगार्ड, केंद्रीय सशस्त्र दलाचे २०० जवान असे सुमारे २,७१९ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त ६७६ पोलिस कर्मचारी आणि ३३ अधिकारी अन्य ठिकाणाहून मागविण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर प्रत्येकी एक पोलिस कर्मचारी, होमगार्ड नियुक्त केला जाणार असून त्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नजर असणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ३५ वाहने व पाच बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल अथवा वाहन आणण्यास मनाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या मनाई क्षेत्रातील दुकाने, त्याचप्रमाणे अन्य व्यावसायिक आस्थापनाही मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मिरा-भाईंदर शहरात सुमारे १९६ बंदुकीचे परवाने देण्यात आले आहेत. त्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व बंदुका पोलिसांकडून जमा करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. प्रतिबंधात्मक कारवाई निवडणुकीची खबरदारी म्हणून गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती, गुन्हे दाखल असणारे अथवा संशयित गुन्हेगार अशा ५०० व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त याआधीच्या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून गुन्हे प्रवृत्तीच्या नऊ व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

लाखो कामगार मतदानापासून वंचित

भिवंडी : भिवंडी शहर आणि परिसरात मोठ्या संख्येने विविध क्षेत्रांतील कामगार राहत आहेत. कुटुंबासह स्थायिक झालेले कामगार सोमवारी (ता. २०) मतदान करणार आहेत. मात्र, लाखोंच्या संख्येने असलेले अस्थायिक कामगार मतदानापासून वंचित राहणार आहेत. कारण या कामगारांना गावीसुद्धा जात येत नसल्याने मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम व भिवंडी ग्रामीण हे तीन विधानसभा मतदारसंघ भिवंडी शहर आणि परिसरात येत आहेत. या मतदारसंघाच्या क्षेत्रात मोठ्या संख्येने यंत्रमाग, सायझिंग, डाईंग, मोती कारखाने, गोदाम, औद्योगिक कारखाने आणि छोटे-मोठे व्यवसाय आहेत. या ठिकाणी काम करणारे सर्व कामगार येथील सर्व सुविधांचा लाभ घेत आहेत. मात्र, त्यांचे स्थायी राहण्याचे ठिकाण नसल्याने त्यांची नावे मतदार यादीत नाहीत. परप्रांतीय असल्याने काही कामगारांची नावे गावी नोंदवलेली आहेत. मात्र, त्यांना तेथेही जात येत नसल्याने नेहमी मतदानापासून वंचित राहतात. अनेक कामगार वर्षानुवर्षे काम करूनही रोजंदारी कामगार म्हणून त्यांची गणती होत असते. तर काही कामगारांची कायमस्वरूपी नोकरी असली, तरी या सर्व प्रकारच्या आस्थापना मतदानाच्या दिवशी बंद ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांना भरपगारी रजा मिळत नाही. या दिवसाचा पगार दिला नाही, तर सरकारी स्तरावरून कोणतीही कारवाई होत नसल्याने येथील मालकवर्ग निर्ढावलेले आहेत. त्यामुळे अशा मालकांवर निवडणूक निर्णय अधिकारी कारवाई करणार काय? अशी विचारणा कामगारांकडून होत आहे. भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात काम करणारे आणि येथे कुटुंबासह स्थायिक झालेले कामगार मतदान करणार आहेत. मात्र, काही अस्थायिक कामगारांना मतदान करता येत नाही. असे अनेक कामगार विविध ठिकाणी काम करत आहेत. त्यांना यंत्रमाग मालक मतदानासाठी सुट्टी देत नाही. त्यासाठी मालकाचे नावही कामगारास माहिती नसते. अनेक वर्षांपासूनची ही शोकांतिका आहे. – विजय कांबळे, लाल बावटा असंघटित कामगार संघटना

देशासाठी सैनिक करतात बलिदान…तुम्ही करा ना मतदान…

जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांचे आवाहन ठाणे : देशासाठी  सैनिक करतात बलिदान… तुम्ही करा ना मतदान .. असा संदेश मतदान जनजागृती करण्यासाठी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात “संवाद मतदारांचा… संकल्प मतदानाचा” या सुसंवाद कार्यक्रमात ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी मतदारांना दिला. देशाच्या सीमेवर सैनिक आपले रक्षण करीत असल्यामुळे आज आपण इथे सुरक्षित आहोत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता प्रत्येक सैनिक डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करीत आहेत. सैनिक देशासाठी बलिदान देत आहेत..आपण निदान मतदान तरी करावे, असा संदेश या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून मनोज शिवाजी सानप यांनी दिला. सीमेवर देशाचे रक्षण करताना शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री अनुराधा गोरे या वीरमातेची गाथा त्यांनी आपल्या एकपात्री अभिनयातून उभी केली. देशासाठी सैनिक म्हणून मुलाचे बलिदान हा अभिमान आणि दुसरीकडे मुलगा गमावल्याचे आईचे दु:ख हा प्रसंग एका वीरमातेच्या भूमिकेतून त्यांनी साकारला. आज सीमेवर सैनिक रक्षण करताना आपल्या प्राणाचे बलिदान देत आहेत, मग आपल्याला तर फक्त मतदान करावयाचे आहे, असे आवाहन करीत मतदान नक्की करा आणि आपली भारतीय लोकशाही बळकट करा, हे असे आवाहन वीरमाता मतदारांना करीत असल्याचा प्रसंग मनोज सानप यांनी साकारला. मतदान हे आपले पहिले कर्तव्य आहे, त्यामुळे ते प्रत्येकाने बजावणे आपला अधिकार आहे. सैनिक सीमेवर बलिदान करीत आहेत, आपल्याला फक्त मतदान करुन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचे आहे, असे जनजागृतीपर आवाहन त्यांनी सर्व उपस्थितांना केले.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील नाविन्यपूर्ण मतदार केंद्रे

ठाणे : ठाणे जिल्ह्यात २० मे रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानासाठी २५- ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. जास्तीत जास्त  नागरिकांनी मतदान करावे असे  आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात सखी, दिव्यांग आणि युवा ही नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत सखी मतदान केंद्रे : १४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ४३६ (रॉयल कॉलेज), १४६ ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र.४३९ (श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, पोखरण रोड नं. २ तळमजला), १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १९९ (नेपच्यून एलिमेंट आयटी पार्क, ओपन स्पेस पार्टीशन १ रोड नं. २२ वागळे इस्टेट, ठाणे), ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २६५ (एनकेटी महाविद्यालय, खारकर आळी, तळमजला सभागृह ठाणे), ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १५२ (सरस्वती हायस्कूल, तळमजला, सेक्टर ५, ऐरोली), बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र.१२४ (सेव्हनडे ॲडव्हेटेन्ज हायर सेकंडरी स्कूल,सेक्टर 8 सानपाडा) येथे सखी मतदान केंद्रे असणार आहेत. दिव्यांग मतदान केंद्रे- १४५ मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १९१ (बिशॉप इंटरनॅशनल स्कूल), ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३२६ (टीएमसी जिद्द शाळा, तळमजला वसंतविहार, ठाणे )  कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३०६ (विठ्ठल रुक्मिणी सेवा संघ, कमल तलावासमोर, पार्टीशन नं २ गांधी नगर रोड, गांधीनगर ठाणे ), ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २८३ (सरस्वती एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, तळमजला, पाचपाखाडी), १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १४१ (दत्ता मेघे वर्ल्ड ॲकॅडमी ग्राऊंड फ्लोअर, ऐरोली सेक्टर 16),  बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २०५ (स्किल ॲण्ड ॲबॅलीटी बॉईज स्कूल, सेकटर ११ प्लॉट नं. ९ नेरुल नवी मुंबई) येथे ती असणार आहेत. युवा मतदान केंद्रे  – मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १९६ (भाईंदर सेकंडरी स्कूल, तळमजला रुम नं १), ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३३२ (शिवाई विद्यालय, शिवाई नगर, ठाणे) कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १७० (ठाणे मॅन्युफॅक्चर असोसिएशन, जे.के. ऑडीटोरीयम हॉल, वागळे इस्टेट ठाणे), ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३५३ (विद्याप्रसारक मंडळ कॉमर्स ॲन्ड आर्टस कॉलेज, बि नं ३, बांदोडकर कॉलेज ऑफ कॉमर्स, ठाणे ), ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १६९ (जमनाबाई जनार्दन माधवी नवी मुंबई महापालिका शाळा क्र 48 तळमजला, सेक्टर ७ दिवा गांव ऐरोली), बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २८ (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी) येथे तयार करण्यातआली आहेत.