Category: ठाणे

Thane news

जोपर्यंत भारत देश अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान अबाधित राहील – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : जोपर्यंत भारत देश अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान अबाधित राहिल. भारत देशाची एकात्मता आणि अखंडता ही बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे. आजच्या दिवशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करीत असताना परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा मंत्र, हा विचार अधिकाधिक प्रसारित करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत. असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी बाबासाहेबांना अभिवादन करताना काढले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानलव, बोधिसत्व, परमपूज्य, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी, १४ एप्रिल, २०२४ रोजी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, झेड विंग, फ्लॉवर व्हॅली कमर्शियल कॉम्प्लेक्स, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे (पश्चिम) येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसेच कोर्टनाका, ठाणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी अभिवादन केले. यावेळी ‘भारतीय संविधान निर्माते डाॅ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे’, ‘डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ या राष्ट्रवादी काँग्रेस कार्याकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी कोर्ट नाका परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विरु वाघमारे, युवक कार्याध्यक्ष संदेश पाटील, जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस रविंद्र पालव, परिवहन समिती सदस्य मोहसीन शेख, नितीन पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजय सावंत, दिनेश मेहरोल, मनोज कोकणे, अतुल कदम, संतोष सहस्त्रबुद्धे, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, समीर पेंढारे, निलेश फडतरे, शंकर कोळेकर, निलेश कापडणे, प्रभाग अध्यक्ष समीर शेख, साहिल सुर्यवंशी, महिला विधानसभा अध्यक्षा सुवर्णा खिल्लारी, अरुणा पेंढारे, वंदना खानोलकर, ब्लॉक अध्यक्षा शामा भालेराव, लक्ष्मी वैती, प्रिया वाघेरा, मनिषा कांबळे, राणी कटारनवरे, पुजा खोपडे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष हुसेन मणियार, सोशल मिडीया सेल अध्यक्ष कल्पेश मिठबावकर, विद्यार्थी विधानसभा अध्यक्ष केतन माने, विद्यार्थी ब्लॉक अध्यक्ष हर्ष चापले, विद्यार्थी पदाधिकारी मुर्शिद खान आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाण्यात विविध ठिकाणी होणार प्रात्यक्षिके

अग्निशामक दल सेवा सप्ताहाचे आयोजन ठाणे :अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित केला आहे. या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून रविवारी सकाळी करण्यात आला. त्या निमित्ताने ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त  प्रशांत रोडे यांनी बाळकूम अग्निशमन केंद्र येथे शहीद स्तंभाला अभिवादन केले. या प्रसंगी ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त (अग्निशमन विभाग) दिनेश तायडे, अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आदी उपस्थित होते. याचवेळी, महाराष्ट्र फायर सर्व्हीस असोसिएशनच्या देणगी पेटीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई बंदरात १४ एप्रिल, १९४४ रोजी लागलेल्या आगीत अग्निशमन जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ अग्निशमन दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने १४ एप्रिल ते २१ एप्रिल या काळात ठाणे अग्निशमन दलातर्फे शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात, विविध आस्थापना, सोसायटी येथे अग्निसुरक्षेबाबतची प्रात्यक्षिके करण्यात येतील.

कल्याण लोकसभा क्षेत्रात ख्रिश्चन समाजासाठी ‘ख्रिश्चन भवन’-डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण  : ‘ख्रिश्चन एकता सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी, तसेच फादर्सनी  माझी भेट घेत कल्याण लोकसभा क्षेत्रात ख्रिश्चन समाजासाठी ‘ख्रिश्चन भवन’ उभारण्यासह अन्य मागण्या मांडल्या. त्यावर ख्रिश्चन समाजाशी सकारात्मक चर्चा केली. या सर्व…

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने ठाणे कोर्ट नाका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनुयायांनी मेणबत्या प्रज्वलित करून अभिवादन केले यावेळी अनुयायांमध्ये उत्साहाचे…

श्रीकांत शिंदे घेतली आजारी शिवसैनिकाची भेट

डोंबिवली : कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला मतदारसंघ पिंजून काढत आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ते आपला वेळ देत असतानाच या बिझी शेड्युल मधून वेळ…

आजच्या तरुणांमध्ये मोबाईल सिंड्रोम वाढतोय- ऑर्थो स्पाइन सर्जन डॉ. निखिल जोशी

ठाणे: आजच्या तरुणांमध्ये स्लीप डीस्कचे प्रमाण जास्त आहे. याला कारणम्हणजे सातत्याने बाईकवरुन होत असलेला प्रवास, डेड लिफ्ट म्हणजे व्यायाम करताना अचानक जास्त वजन उचलणे, अपघात. तसेच, मोबाईल सिंड्रोम देखील वाढताना…

लेखकांचा ‘ॲक्सेप्टन्स’ आपल्या मराठी समाजात नाही

डॉ. नितीन रिंढे यांनी व्यक्त केली खंत ठाणे: लेखकांचा ॲक्सेप्टन्स आपल्या मराठी समाजात नाही, इथे लेखकाला कोणी ओळखतही नाही. याचे मुख्य कारण साहित्याचा प्रभाव पडण्याची क्षमताच आणि वाचनाचे प्रमाण खूप…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी कोर्ट नाका…

स्वाक्षरी मोहीमद्वारे मतदानाबाबत जनजागृती

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त्‍ नागरिकांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या किसननगर शाळा क्र. २३ मध्ये मी…

देश आता भुलणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमची जादू संपलेली आहे – डॉ. जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : ‘लोक काय खातात; शाकाहार की मांसाहार ? याचा अर्थ दहा वर्षांत तुम्ही काहीच करू शकला नाहीत. आता शेवटचे अस्र तुमच्याकडे उरले आहे, ते म्हणजे हिंदू विरूद्ध…