Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

  दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी

शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या तत्परतेमुळे दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या तत्परतेमुळे कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला सर्कलजवळ खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ला सर्कल परिसरातील रस्त्यावर निर्माण झालेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः भिवंडी–कल्याण महामार्गावरील दुर्गाडी पुलाच्या उतारालगतच हे खड्डे असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात होती.  हजारो वाहने ये-जा करणाऱ्या या मार्गावर खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होत असे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचाऱ्यांचे जीव अक्षरशः धोक्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगतच आणि शहराच्या प्रवेशद्वारावरच अशी अवस्था असणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण असल्याचे लक्षात येताच या परिस्थितीची कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांनी तात्काळ दखल घेत परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. कोणताही विलंब न करता त्यांनी संबंधित विभागाला त्वरित सूचना देत युद्धपातळीवर दुरुस्तीचे आदेश दिले. जागरूक नागरिकांनी याबाबत परदेशी यांना सूचित करून वस्तूस्थितीकडे लक्ष वेधले होते. परदेशी यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे अवघ्या २४ तासांत पुलाच्या उतारालगत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या भोवती असलेले सर्व खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करण्यात आला आहे. वेळेत ही कारवाई झाली नसती, तर गंभीर अपघात अटळ होते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. वेळेवर आणि संवेदनशीलपणे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संभाव्य अपघात टळले असून नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. प्रशासनाच्या या जलद प्रतिसादाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत शहर अभियंता अनीता परदेशी यांच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक केले आहे.

आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबवा, शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा – सीटू

आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबवा, शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा – सीटू अनिल ठाणेकर मुंबई – राज्यातील शासकीय रुग्णालयांतील सेवांवर शुल्क आकारण्याबाबत जारी करण्यात आलेला शासन निर्णय (जी.आर.) तात्काळ रद्द करावा आणि…

मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार – एकनाथ शिंदे

मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक केंद्र बनवणार – एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील २५ वर्ष मुंबईकर विकासापासून वंचित होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मागील साडेतीन वर्षात मुंबईच्या विकासाला चालना दिली. महायुतीच्या आश्वासनांवर, वचनांवर मुंबईकरांनी विश्वास ठेवला. महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं, असे ते म्हणाले. महायुतीच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी दोघेही अनुभवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे फिनटेक हब बनवण्याचा स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जे जे आवश्यक असेल ते ते देण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याचे काम महायुती सरकार करेल. झोपडपट्टीमुक्त मुंबई, एसआरए, क्लस्टरच्या माध्यमातून ४० लाख मुंबईकरांना हक्काची घरं याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे, असे ते म्हणाले. खड्डेमुक्त मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई, भ्रष्टाचारमुक्त तसेच ड्रग्ज मुक्त मुंबई, मुंबईकरांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याबाबत महायुती कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

शिवसेनेचा घराघरांत पोहचला ‘महाआरोग्य’ आणि ‘लोकसेवा’ यज्ञ – प्रताप सरनाईक

शिवसेनेचा घराघरांत पोहचला ‘महाआरोग्य’ आणि ‘लोकसेवा’ यज्ञ – प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर,-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे केवळ नाव नाही, तर लाखो शिवसैनिकांसाठी एक ऊर्जास्त्रोत आणि सामान्यांसाठी आधारवड आहेत. त्यांच्या विचारांतील…

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात अमर्याद वृक्षकत्तल – मनोज प्रधान

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात अमर्याद वृक्षकत्तल – मनोज प्रधान अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे महानगर पालिका हद्दीत ८.२४ किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र, ही तोडलेली झाडे…

नाशिकमध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय आदिवासी साहित्यिक आणि सांस्कृतिक संमेलन

नाशिकमध्ये पहिल्यांदाच राज्यस्तरीय आदिवासी साहित्यिक आणि सांस्कृतिक संमेलन हरिभाऊ लाखे नाशिक : शहरात प्रथमच राज्यस्तरीय आदिवासी साहित्यिक व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून हे संमेलन १४ फेब्रुवारी रोजी पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे होणार आहे. संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना आणि जिव्हाळा यांच्या पुढाकारातून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी दिवस भरगच्च असणार आहे. सकाळी ‘संस्कृती दर्शन’ फेरीने संमेलनाची सुरुवात होणार असून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत विविध सत्रे पार पडतील. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिका कुसुम आलाम असतील. उद्घाटन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खा. भास्कर,भगरे तसेच नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर या आमदारांसह माजी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, माजी महापौर रंजना भानसे, आदिवासी आयुक्त लीना बनसोड, उपायुक्त दिनकर पावरा, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, आदिवासी प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, इत्यादी उपस्थित राहणार आहेत. संमेलनात आदिवासींचे वास्तव जीवन साहित्यात आहे का ?, या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय लोहकरे असतील. डॉ. पद्माकर सहारे, डॉ. सुलतान पवार, डॉ. मधुचंद्र भुसारे, साहित्यिक रवी बुधर आणि लेखक राजू ठोकळ हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. मुलाखत सत्रात साहित्यिक देवचंद महाले विविध आदिवासी साहित्यिक, राजकारणी व कलाकारांच्या मुलाखती घेणार आहेत. महिला सत्राच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा चौरे असून या सत्रात आदिवासी महिलांच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. यानंतर युवा कवी संतोष पावरा यांच्या सहभागातून नवोदित कवी संमेलन होईल. निमंत्रित कविसंमेलन ज्येष्ठ कवी तुकाराम धांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. याशिवाय सांस्कृतिक फेरी, लघुनाट्य, आदिवासी पारंपरिक नृत्य, चित्रप्रदर्शन आदी कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे. काही लेखकांच्या पुस्तकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राज्यातील आदिवासी साहित्य, संस्कृती आणि विचारप्रवाह यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  महा अंनिसच्या ‘युवा संकल्प अभियाना’चा व्हॅलेंटाईन डेला डोंबिवलीत समारोप

अभिनेता सुव्रत जोशी-अभिनेत्री शर्मिला शिंदे यांच्या उपस्थितीत महा अंनिसच्या ‘युवा संकल्प अभियाना’चा व्हॅलेंटाईन डेला डोंबिवलीत समारोप ठाणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘जोडीदाराची विवेकी निवड विभागा’तर्फे राबविण्यात आलेल्या ‘युवा संकल्प अभियाना’चा समारोप शनिवारी, १४ फेब्रुवारी , व्हॅलेंटाईन डेला सकाळी १० ते सायंकाळी ४ या धेळेत डोंबिवली पश्चिम येथील स. हैं. जोंधळे पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात होणार आहे. या समारोप परिषदेला प्रसिद्ध अभिनेता, नाट्यकलाकार व निर्माता सुव्रत जोशी व  अभिनेत्री शर्मिला शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष माधव बावगे असतील, तर उद्घाटन स. हैं. जोंधळे पॉलिटेक्निक कॉलेजचे सचिव देवेंद्र जोंधळे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेत जोडीदाराची विवेकी निवड, प्रेम, लैंगिकता, सामाजिक दबाव, कायदे व समावेशकता या विषयांवर परिसंवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. या परिसंवादात अनिल उकरंडे, आरती नाईक यांच्यासह तृतीयपंथी (Transgender) समुदायातील प्रतिनिधी वक्ता सहभागी होणार असून, युवक-युवतींसाठी हे सत्र मार्गदर्शक व प्रबोधनात्मक ठरणार आहे.समाजात विवाह, प्रेमसंबंध व सहजीवनाबाबत असलेले गैरसमज, अंधश्रद्धा व दबाव याविरोधात विवेकी भूमिका मांडणे, तसेच तरुण पिढीला स्वतंत्र, समतावादी व जबाबदार निर्णयक्षम बनवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. जोडीदाराची निवड हा प्रत्येक युवक-युवतीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र या निर्णयाकडे अनेकदा पुरेशी पूर्वतयारी, समज आणि गंभीरतेने पाहिले जात नाही. परिणामी, वैवाहिक जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. आज समाजात जोडीदार निवडीचे प्रामुख्याने दोनच मार्ग रूढ आहेत — पारंपरिक ‘कांदेपोहे’ पद्धतीतील अल्प वेळेचा परिचय कार्यक्रम किंवा प्रेमविवाह. या दोन्ही पर्यायांमध्ये अनेक मर्यादा असल्याचे समितीचे मत आहे. या पार्श्वभूमीवर समितीने ‘परिचयोत्तर विवाह’ हा अधिक समंजस आणि विवेकाधिष्ठित पर्याय पुढे आणला आहे. या उपक्रमांतर्गत लग्नाळू युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांसोबत संवादशाळा घेऊन विवेकपूर्ण निर्णय प्रक्रियेवर भर दिला जातो.समितीने या अभियानासाठी पाच सूत्रे निश्चित केली आहेत :१ प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजून घेणे, २ बौद्धिक, भावनिक आणि मूल्यात्मक अनुरूपता तपासणे, ३ हुंडा, पत्रिका आणि व्यसनांना स्पष्ट नकार देणे, ४ लग्न साधेपणाने करणे, ५ आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाच्या शक्यता सकारात्मकतेने पडताळणे. अभियानादरम्यान युवक-युवतींची परस्पर संमती, जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता, आवडी-निवडी, स्वभाव, शारीरिक-मानसिक-आर्थिक सुदृढता, विचारसरणी आणि भविष्याविषयीची स्वप्ने या सर्व बाबींवर चर्चा केली जाणार आहे. विवाहातील अपयश आणि तणाव कमी करण्यासाठी हा एक सकारात्मक पर्याय असल्याचे समितीचे मत आहे. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच अधिक माहितीसाठी :रेश्मा खाडे: ९४२१११४८७९, कविता मते: ९५७९१०५०५८, डाॅ सुषमा बसवंत: ९८९२३८०४७३, अनिल ठाणेकर(पत्रकार) : ९५९४६७९९२६ यांना संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

  राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याचा एकमताने निर्धार..

राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याचा एकमताने निर्धार.. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न… मुंबई :    स्व. अजितदादा पवार यांची शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचारधारा पुढे नेण्यासाठी राज्यभर “अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान”  राबविण्या एकमताने निर्धार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलकडुन विधानभवन येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली  विधानभवन कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे अजितदादा पवार यांचे ध्येय पुढे नेण्यासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखाणी करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे.या नव्या अभियानामुळे पक्षाला मजबूती देण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेल शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या या बैठकीत सामाजिक न्यायाशी संबंधित विविध प्रश्न, आगामी पक्ष संघटनात्मक कार्यक्रम तसेच वंचित, दुर्बल घटकांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याबाबत चर्चा करण्यात आली.  पुढील वाटचाल सुरू ठेवण्यासाठी एकजूट ठेवत सामाजिक न्याय विभागाची भूमिका अधिक सक्रिय व जनतेशी जोडलेली असावी हीच खरी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगर म्हणाले. मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा विभागांची आखाणी करत पक्ष बांधणी करण्यात येणार आहे. शहर व ग्रामीण कार्यक्षेत्रातील समस्या, उपक्रम व संघटनात्मक कामाचा आढावा घेत “अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान” सुरू करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विषयक शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पक्ष पातळीवर समन्वय वाढवण्यावर भर देण्यात येईल असा विश्वास विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे,कार्याध्यक्ष बाळासाहेब करडक,शहर तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष,कार्याध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 ठाणे शहराच्या नियोजित प्रगतीसाठी ‘ठाणे शहर विकास समिती’ स्थापन करा

ठाणे शहराच्या नियोजित प्रगतीसाठी ‘ठाणे शहर विकास समिती’ स्थापन करा उपमहापौर कृष्णा पाटील यांचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना पत्र ठाणे: ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि नागरी गरजा लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही ‘ठाणे शहर विकास समिती’ नियुक्त करण्यात यावी, अशी आग्रही मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन पाठवले आहे. पारदर्शक विकासासाठी समितीची गरज पत्राद्वारे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधले की, ठाणे शहर सध्या झपाट्याने विस्तारत असून महानगराच्या समस्याही तितक्याच जटील होत आहेत. केवळ सिमेंट-काँक्रीटची जंगले न उभारता शहराचा विकास सर्वसामान्य ठाणेकरांना केंद्रस्थानी ठेवून होणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेत शहर विकासासाठी ज्याप्रमाणे विशेष समिती कार्यरत आहे, त्याच धर्तीवर ठाण्यातही तज्ज्ञांची समिती असणे ही काळाची गरज बनली आहे. समितीची प्रमुख उद्दिष्टे: उपमहापौरांनी या प्रस्तावित समितीच्या माध्यमातून पाच प्रमुख उद्दिष्टे मांडली आहेत: विकास आराखडा (DP) नियंत्रण: शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनवर बारीक लक्ष ठेवून त्याची पारदर्शक अंमलबजावणी करणे. जनहितकारी धोरणे: बिल्डरधार्जिण्या निर्णयांना चाप लावून सर्वसामान्यांच्या हिताची गृहनिर्माण धोरण राबविणे. भ्रष्टाचार निर्मूलन: शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराला लगाम लावून कामात पारदर्शकता आणणे. ज्वलंत प्रश्नांवर तोडगा: अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधणे. हॅपी इंडेक्समध्ये वाढ: नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यावर भर देणे. राज्य सरकारकडे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा ठाणे हे सर्वांच्या जिव्हाळ्याचे शहर असून, शहर विकास विभागाकडून दर्जेदार आणि नियोजनबद्ध काम करून घेण्यासाठी अशा तज्ज्ञ समितीची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या पत्राची प्रत ठाणे मनपा आयुक्तांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.

भारतात हृदयविकाराच्या मृत्यूत झपाट्याने वाढ

भारतात हृदयविकाराच्या मृत्यूत झपाट्याने वाढ  रमेश औताडे मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेनुसार  दरवर्षी सुमारे १ कोटी ८० लाख मृत्यू हृदयरोगामुळे होतात. बदलती जीवनशैली, ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान आणि चुकीची माहिती यांमुळे भारतातही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ . कौशल छत्रपती यांनी याबाबत माहिती दिली. जगभरात हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण ठरत असताना, प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कौशल छत्रपती यांनी “ हार्टस्ट्राँग ” हे मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित केले आहे. ३१ वर्षीय एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला होता. तो दिसायला फिट असतानाही हा प्रकार घडला. “फिट दिसणे म्हणजे आरोग्यदायी असणे नव्हे,” असा महत्त्वाचा संदेश ते देतात. रुथ अँड सोशल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेले हे पुस्तक पहिल्या आवृत्तीत हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.