Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

सानपाडा येथे भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन

सानपाडा येथे भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन मुंबई : नवी मुंबईच्या सानपाडा येथील सेक्टर ११ मध्ये भक्ती रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा जवळ भारत ई सेवा केंद्राचे उद्घाटन नुकतेच प्रभाग १९च्या नवनिर्वाचित नगरसेविका शैला पाटील,  शिल्पा ठाकूर,  नगरसेवक भाऊ भापकर,  सुनील कुरकुटे, समाजसेवक   अजय पवार, श्री तानाजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर,  नगरसेविका कोमलताई वास्कर, प्रभाग क्रमांक २२चे नगरसेवक अभिजीत देसाई, समाजसेवक मिलिंद सूर्याराव, शुभांगी सूर्याराव, समाजसेवक गणेश पावगे, सानपाडा  ७.५०गार्डन ग्रुपचे रणवीर पाटील,  दत्तात्रय कुरळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे  अध्यक्ष मारुती विश्वासराव, चिटणीस जगदीश एकावडे,  उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे, संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम,  उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे,  सह खजिनदार सुभाष बारवाल, उपाध्यक्षा डॉ. विजया गोसावी, हास्य क्लब गार्डन ग्रुप ६.३० चे भरत खरात, गार्डन ग्रुप ७.०५ चे जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा टोपी, रुमाल आणि तुलसीचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. नगरसेवक भाऊ भापकर आणि समाजसेवक अजय पवार यांनी  विश्वासराव कुटुंबियांच्या विजया इंटरप्राईजेस यांच्यातर्फे महाराष्ट्र सरकार आणि खाजगी सेवा एकाच ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या सेवाभावी कार्याला शुभेच्छा दिल्या.

दिव्यांग मुलीचे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण

दिव्यांग मुलीचे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण मुंबई / रमेश औताडे नागपूर येथील दिव्यांग मुलगी कु. मानवता ऊर्फ बेशिका रवीकांत डोंगरे हिला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवार १६ फेब्रुवारी पासून हे आंदोलन सुरू झाले असून विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. “निर्णय झाल्याशिवाय माघार नाही, जिंकलो नाही तर कधीच नाही,” असा निर्धार व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित प्रकरणात तातडीने कारवाई करून पीडितेला न्याय द्यावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनस्थळी मानवता हिने हातात आपल्या नातेवाईकाचा फोटो धरून न्यायाची मागणी केली. प्रशासनाने संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे पाहावे, अशी मागणी केली. आझाद मैदानावरील या उपोषणामुळे पुन्हा एकदा दिव्यांगांच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

  कोकण रेल्वे दुहेरीकरणासाठी निधीची मागणी

कोकण रेल्वे दुहेरीकरणासाठी निधीची मागणी विलिनीकरण तातडीने पूर्ण करण्याचा प्रस्ताव लोकसभेत सादर राजेंद्र साळसकर नवी दिल्ली : कोकण रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अंतर्गत सभागृहात मांडली. हा प्रस्ताव लोकसभेच्या पटलावर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कोकण रेल्वे ही १९९०च्या दशकात साकारलेली ऐतिहासीक व दूरदृष्टीपूर्ण रेल्वे योजना असून , या प्रकल्पात भारतीय रेल्वेचा ५० टक्के तर उर्वरित संबंधित राज्यांचा   सहभाग होता. मूळ करारानुसार कोकण रेल्वेचे १०वर्षांच्या आत भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण होणे अपेक्षित होते.मात्र तीन दशके उलटून गेल्यानंतरही हे विलिनीकरण अद्याप प्रलंबित आहे. केरळ, कर्नाटक आणि  गोवा या राज्यानंतर हे महाराष्ट्र शासनानेही कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्यास मान्यता दिली आहे.महाराष्ट्र शासनाने “कोकण रेल्वे” हे नाव कायम ठेवण्याची अट घातली होती आणि ती केंद्र सरकारने मान्य केली आहे. सध्या कोकण रेल्वे आपल्या क्षमतेच्या सुमारे  १७५ टक्के वापरात कार्यरत आहे.मात्र स्वतंत्र महमंडळ असल्यामुळे इतर रेल्वे झोनप्रमाणे तिला केंद्राकडून नियमित अर्थसंकल्पीय सहाय्य मिळत नाही.निधीअभावी सुमारे ३५० किलोमीटर  मार्गाचे दुहेरीकरण, भूस्खलन प्रतिबंधक उपाययोजना आणि पायाभूत सुविधांची अत्यावश्यक कामे रखडली आहेत.परिणामी नव्या गाड्या सुरू करणेही शक्य नसल्याचे खासदार वायकर यांनी निदर्शनास आणले. दरम्यान,मुंबई-कोकण मार्गासह संपूर्ण कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो मंजुरी प्रक्रियेत आहे.या प्रकल्पात बोगद्यांचे मजबुतीकरण, रूळांचे अद्ययावतीकरण आणि इतर तांत्रिक सुधारणांचा समावेश आहे.टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वेवरील प्रवासी गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

घरांसाठी १४ कामगार संघटनांच्या वतीने येत्या १० मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा!

घरांसाठी १४ कामगार संघटनांच्या वतीने येत्या १० मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा! मुंबई -घराच्या प्रश्नावर सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने निराश झालेल्या कामगारांमध्ये आता कमालीचा असंतोष उफाळून आला…

 मेट्रो दुर्घटनेत मृताच्या मदतीसाठी यादव समाज एकवटला

मेट्रो दुर्घटनेत मृताच्या मदतीसाठी यादव समाज एकवटला कल्याण: मुलुंडमध्ये मेट्रोच्या सुरु असलेल्या कामाचा एक स्लॅब कोसळला, ज्यामुळे घटनास्थळीच एकाचा मृत्यू झाला आणि इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रामधन यादव यांना मदत मिळवून देण्यासाठी रविवारी आर. एन. यादव यांच्यासह संपूर्ण यादव समुदायाचे सदस्य दिवसभर जबाबदार अधिकाऱ्यांकडून भरपाईच्या मागणीबाबत लेखी आश्वासन मागत राहिले, परंतु एमएमआरडीए किंवा उपकंत्राटदाराचा कोणताही अधिकारी प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध नव्हता. अखेर, दुपारी ४ वाजता, समुदायाच्या एका वरिष्ठ सदस्याने निर्णय घेतला की जर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठोस निकाल लागला नाही तर त्यांना रस्त्यावर उतरून निषेध करण्यास भाग पाडले जाईल. ही माहिती माध्यमांना आणि पोलिस ठाण्याला मिळाल्यावर, एक अधिकारी पीडितेच्या कुटुंबाशी बोलण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहोचला. रात्री १० वाजेपर्यंत निकाल लागला, परंतु रात्री धनादेशावर स्वाक्षरी न झाल्यामुळे, अधिकारी लेखी आश्वासन देऊन निघून गेले. रात्री धनादेश न मिळाल्याने, कुटुंब रुग्णालयातून मृतदेह घेऊ शकले नाही. आज सोमवारी धनादेश मिळाला आणि मृतदेह घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शंशिकांत यादव, ईश्वर देव यादव, पारस यादव, मोतीलाल यादव, राम यादव, जितेंद्र यादव, कमलेश यादव, आर.डी. यादव, राम झलक यादव, पप्पू यादव, जयसिंग यादव, कीर्ती यादव, रमेश यादव, सुरेश यादव, सुनील यादव, ईश्वर देव यादव आणि पारस यादव यांच्यासह सुमारे २०० समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या सर्वांचे आर.एन. यादव यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की पीडितेला न्याय समुदायाच्या एकजुटीमुळे मिळाला.

“एमएमआरडीए”चा अधिशेष अर्थसंकल्प

“एमएमआरडीए”चा अधिशेष अर्थसंकल्प स्लग-  ४८,०७२.५७ कोटींचा आराखडा O आर्थिक परिवर्तन आणि पायाभूत सुविधांना गती O प्रकल्पांसाठी ८७%  भरघोस तरतूद मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने  आज सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रुपये ४८,०७२.५७  कोटींचा अधिशेष अर्थसंकल्प सादर केला…

म्हाडाच्या मुंबईतील ११८ सदनिकेसाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी

म्हाडाच्या मुंबईतील ११८ सदनिकेसाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन नोंदणी मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ११८ सदनिकांची विक्री जाहीर करण्यात आली आहे.…

सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा

सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा येत्या २६ फेब्रुवारीला होणार शिक्कामोर्तब राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय स्वाती घोसाळकर मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार आहे. आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…

विचार आयटी क्षेत्राचा

आयटी क्षेत्राने दिलेल्या संधींचा फायदा घेत भारतीय तरुणाईने यशाची नवी शिखरे सर केलीच, पण समृद्धीही मिळवली. आज हे भारताच्या प्रगतीच्या प्रवासातले महत्वाचे क्षेत्र ठरते आहे. देशाच्या अर्थकारणात या क्षेत्राची महत्वाची…

कौशल्याची दीडशे वर्षे…

कौशल्य म्हणजे काय हे बघायचे असेल तर आपल्याला या दीडशे वर्षे सुरु असलेल्या एका जपानी कारखान्यात जावे लागेल. आजही या कारखान्यात सगळे काम कारागीर आपल्या हातांनी करतात आणि त्यात जी…