Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाला दणका

ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाला दणका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाकडून टॅरिफ रद्द टॅरिफ बेकायदेशीर असल्याचा निकाल न्युयॉर्क : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर लागू केलेले…

मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द

मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द स्लग- पाच टक्के आरक्षण रद्द  शासन निर्णयाविरोधता मुंबई उच्च न्यायालयात याचिका मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णय काढून शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी तसेच निमसरकारी नोकऱ्यांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिमांना देण्यात येणारे ५ टक्के आरक्षण रद्द केले. २०१४ पासून हे आरक्षण देण्यात आले होते. मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं आरक्षण रद्द करण्याच्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. अॅड एजाझ नक्वी यांनी याचिका दाखल केली आहे. शासनाचा निर्णय रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. अचानक असं काय झाल की राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांमधील मुस्लिम समाजाला दिलेल पाच टक्के आरक्षण रद्द केलं? असा सवाल याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सरकार मुस्लिमांच्या विरोधात काम करत असल्याचे मत आझमी यांनी व्यक्त केले. शासन निर्णयात मुस्लिम समाजाला देण्यात आलेले २३ डिसेंबर २०१४ रोजीचे आरक्षण रद्द झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतरही राबवली जाणारी जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेक लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर, आगामी विधानसभा निवडणुकांकडे लक्ष ठेवून असलेल्या तत्कालीन काँग्रेसच्या महाराष्ट्र सरकारने मराठा आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला होता. सरकारने सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठ्यांना १६ टक्के आणि मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण जाहीर केले होते. यामुळे राज्यातील एकूण आरक्षण ७३ टक्के झाले होते. काँग्रेस नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुस्लिम समुदायासाठी ५ टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता. कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

स्‍थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे बिनविरोध

स्‍थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे बिनविरोध मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी  प्रभाकर शिंदे यांची  बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली.  बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या महानगरपालिका विशेष सभेत स्‍थायी समितीवर २६ महानगरपालिका सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली. तर शिक्षण समिती अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात.  स्थायी समिती या वैधानिक समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता  २० फेब्रुवारी २०२६ला दुपारी २.०० वाजता विशेष सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. स्‍थायी समिती अध्यक्षपदासाठी श्री. प्रभाकर शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्‍त झाल्‍याने त्‍यांची बिनविरोध निवड झाल्‍याचे पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी जाहीर केले.  स्थायी समितीच्या  सर्व सदस्यांसह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.

अरे बापरे! भाजपातही बंडखोरी झाली

अरे बापरे! भाजपातही बंडखोरी झाली भिवंडीत भाजपा बंडखोराला काँग्रेसने महापौर केला स्वाती घोसाळकर भिवंडी : भारतात २०१४ नंतर राजकारणाचा पट बदलून टाकणाऱ्या भाजपाला भिवंडीत मात्र काँग्रेसने जोरदार झटका दिला. शिवसेनेत फुट पाडून एकनाथ शिंदेंना…

नमुंमपा सभागृह नेतेपदी सागर नाईक व विरोधी पक्ष नेते पदी विजय चौगुले यांची नियुक्ती

नमुंमपा सभागृह नेतेपदी सागर नाईक व विरोधी पक्ष नेते पदी विजय चौगुले यांची नियुक्ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी आज पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १९ – १- अ अन्वये सभागृह नेता म्हणून  सागर ज्ञानेश्वर नाईक तसेच अधिनियमाच्या कलम १९ – १- अअ अन्वये विरोधी पक्ष नेता म्हणून  विजय लक्ष्मण चौगुले यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे जाहीर केले. नव नियुक्त सभागृह नेता व विरोधी पक्ष नेता यांचे महापौर श्रीम. सुजाता पाटील, उपमहापौर  दशरथ भगत व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देउुन अभिनंदन केले. नमुंमपा स्थायी समिती सदस्यपदी १६ सदस्यांची निवड जाहीर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २०(२) सह वाचावयाच्या कलम ३१– अ (२) अन्वये नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सदस्यपदी १६ सदस्यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर केले. या १६ सदस्यांमध्ये  जयवंत सुतार,  सुधाकर सोनवणे,  शशिकांत भोईर,  अशोक पाटील, स्वाती गुरखे, अंजली वाळुंज,  संदीप म्हात्रे,  प्रदीप गवस,  सुरेश शेट्टी,  सागर नाईक,  आकाश मढवी, अनिता पाटील, मंदाकिनी म्हात्रे, दिपाळी सकपाळ,  सुरेश कुलकर्णी, सरोज पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. या नवनियुक्त १६ सदस्यांचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौर  दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अभिनंदन केले.

शिवाजी महाराजांचे राज्य आजही आदर्शवत – प्रा. डॉ. काशिलिंग गावडे

शिवाजी महाराजांचे राज्य आजही आदर्शवत – प्रा. डॉ. काशिलिंग गावडे ठाणे : शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला नाही. सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे स्वराज्य हे केवळ एका जातीचे, घराण्याचे नव्हते तर ते जनसामान्यांचे राज्य होते असे मत प्रा. डॉ. काशीलिंग गावडे यांनी व्यक्त केले. ते पाडळी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिद्धार्थ युवा फाउंडेशन व शेतकरी मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी पाडळी च्या सरपंच मीना कांबळे उपस्थित होत्या. गावडे पुढे म्हणाले की शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षाची गुलामगिरी नष्ट केली. त्यांनी रयतेत धैर्य, शौर्य व आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या राज्यात शेतकरी, बारा बलुतेदार, स्थानिक उद्योगधंदे यांच्या हिताची भूमिका घेतली गेली. रयतेच्या भाजीच्या देटाला, स्त्रीच्या केसाला आणि प्रार्थना स्थळांना धक्का लागता कामा नये ही त्यांची भूमिका होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ध्येयधोरणे ही आजही आदर्शवत आहेत अध्यक्षा मीना कांबळे म्हणाल्या की शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात स्त्रियांचा केलेला आदर व रयतेची घेतलेली काळजी खूप महत्वपूर्ण आहे. या कार्यक्रमात मध्ये आदिती पाटील हिने शिवचरित्राविषयी प्रभावी भाषण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता कांबळे यांनी केले. तर आभार मा.समाधान कांबळे व सूत्रसंचालन आणि संयोजन डॉ. सुनील पाटील यांनी केले. या शिवजयंतीसाठी पाडळी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 शहापूरातील वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात

शहापूरातील वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात शेत, माळरानावर नीलगायींचे कळप वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी चिंताग्रस्त अविनाश उबाळे ठाणे:  शहापूर तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील बहुतांश जंगल हे समृद्धी महामार्ग व विविध धरण व रस्ते प्रकल्पांसाठी भुईसपाट झाले आहेत.काही वर्षांपासून प्रकल्पांसाठी प्रचंड जंगल तोड झाल्याने येथील दाट,हिरवीगर्द जंगल ही नामशेष झाली आहेत.परिणामी वन्यजीवांचे अधिवास आता धोक्यात सापडले आहेत. दुसरीकडे अन्न व पाण्याच्या शोधात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव जंगल सोडून आता जंगला शेजारील गाव वस्त्यांकडे कुच करीत आहेत.अशाच प्रकारे जंगलातील नीलगायींचे कळप हे गाव वस्ती लगत माळरानावर स्थलांतरित झालेले दिसत आहेत.हे वन्यजीव नीलगायींचे तांडे शेतकऱ्यांच्या रोज नजरेस पडत आहेत.शिकार आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या निलगायींचे कळप हे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करताना दिसत आहेत.निलगायी या भाजीपाला,व कडधान्य फस्त करीत आहेत.निलगायींच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे चिंतेत सापडले आहेत.शहापूर तालुक्यातील प्रादेशिक विभागाच्या जंगलातील शेणवा मळेगाव,कुडशेत,मुसई बेडीसगाव,परटोली,उंब्रई,कानवे,चेरवली,आष्टा,आदिवासी,लवले,ठुणे,व किन्हवली परिसरातील शेत माळरानावर सध्या मोठ्या प्रमाणावर निलगायी आढळून येत आहेत.या निलगायी शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या रब्बी हंगामातील हरभरा,वाल,मटकी,इत्यादी कडधान्ये तसेच भेंडी,घोसाळी,शिरवळे,भोपळा,गवार,काकडी व पालेभाज्या यांची प्रचंड नासधूस करुन नुकसान करीत आहेत.यामुळे मोठे अर्थीक नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत.निलगायींची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव पाहता रब्बी हंगामातील पिके घेण्याचे संकट शेतकऱ्यांनसमोर आता उभे राहिले आहे.यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.एकिकडे शेतकऱ्यांना पावसाळ्या मोसमात वादळीवाऱ्यासह होणारा पाऊस बेमोसमी होणाऱ्या अवकाळी पावसामुळे नुकसानाला दरवर्षी समोर तर जावे लागतेच परंतु आता हिवाळ्यातील रब्बी हंगामात निलगायींच्या शेत मळ्यातील वाढत्या उपद्रवामुळे अर्थीक नुकसानाला देखील तोंड द्यावे लागते आहे अशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे.या निलगायींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशःमेटाकुटीला आले आहेत.या नीलगायींच्या समस्येबाबत वन विभागाकडे स्थानिक शेतकरी रोज तक्रारी करीत आहेत.या निलगायींचा उपद्रव थांबविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना वनविभागाकडून होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु नीलगाय या वन्यजीव प्राणी असल्याने वनविभागाला याबाबत काहीएक करता येणार नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.नीलगायींचे कळप काही स्थलांतरित होताना भटकंतीत रस्त्यावर देखील येत आहेत.यावेळी रस्ता ओलांडून जाताना निलगायीला भरधाव वाहनांची धडक लागून यात नीलगायीचा अपघात झाल्याच्या घटना देखील येथे घडलेल्या आहेत.नीलगायींचे हे वाढते अपघात रोखण्यासाठी व नीलगायी संरक्षणासाठी वनविभागाकडून आता जनजागृती केली जात आहे.रस्त्यावर वाहनं सावकाश चालवावीत असे आवाहन करण्यासाठी नीलगाय अधिवास असलेल्या संरक्षित क्षेत्रात फलक लावण्यात आलेले आहेत.असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.एकिकडे जंगल भुईसपाट होत असल्याने वन्यप्राण्यांचे अस्तित्व संकटात सापडले आहे.तर दुसरीकडे अन्न आणि पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या वन्यजीवांची वाताहत होताना दिसत आहे.असे हे विदारक चित्र येथे दिसत आहे. प्रतिक्रिया – नीलगायींच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होताच तातडीने घटनास्थळी पाहणी करुन रीतसर पंचनामा करून त्या शेतकऱ्याला वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जात आहे. संजय सावंत वनपाल, शेणवे वनपरिमंडळ,तालुका शहापूर प्रतिक्रिया – वाढत्या निलगायींच्या उपद्रवामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.याकडे वनविभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. मनोहर खाडे शेतकरी

  अबुधाबीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंचा पराक्रम!

अबुधाबीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंचा पराक्रम! सूरज पी. एच. यांचे  आंतरराष्ट्रीय रौप्यपदक! दीप रांभिया आणि सोनाली मिलखेलकर यांना सुवर्ण पदक! अबुधाबी येथे ६ ते १५ फेब्रुवारी  दरम्यान अबुधाबी नॅशनल एक्झिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित ४८व्या आय.एस.सी अपेक्स यूएइ ओपन बॅडमिंटन एलिट चॅम्पिअनशिप २०२६ या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारताचा झेंडा उंचावला. विशेष उल्लेखनीय कामगिरी करत आयकर विभाग, मुंबई येथे कार्यरत असलेले आणि खेलो इंडिया योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीत प्रशिक्षण घेणारे सूरज पी. एच. यांनी पुरुष दुहेरी ३५+ गटात मोहम्मद रेहान यांच्यासह भारतासाठी रौप्यपदक पटकावले. अंतिम सामन्यात त्यांना माजी जागतिक क्रमांक ९ तसेच विद्यमान ३५+ पुरुष दुहेरी विश्वविजेते डॅनी बावा क्रिस्टनंता (सिंगापूर) आणि फर्नांडो कुर्नियावन (इंडोनेशिया) या जोडीविरुद्ध ११–१५, ९–१५ असा पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांच्या लढाऊ आणि शिस्तबद्ध खेळामुळे भारताला अभिमानास्पद दुसरे स्थान मिळाले. या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदके जिंकत ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपक्रमाची ताकद सिद्ध केली. पुरुष दुहेरी गटात दीप रांभिया यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या सरवनन कन्नन व अभीश वल्लाचीरा यांचा २१-१५, २१-१४ असा पराभव केला. उपांत्य फेरीत देव अय्यप्पन व धिरेन अय्यप्पन (यूएई) यांना २१-१३, २१-१९ असे नमवत अंतिम फेरी गाठली; मात्र अंतिम सामन्यात भारताच्या हरिहरन व ध्रुव रावत यांच्याकडून २१-११, २१-१३ असा पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्यपदक पटकावले. मिश्र दुहेरी प्रकारात दीप रांभिया व सोनाली मिखेलकर यांनी उपांत्यपूर्व फेरीत यूएईच्या धिरेन अय्यप्पन व अलीना काथून यांचा १२-२१, २१-१८, २१-१४ असा पराभव करत शानदार पुनरागमन केले. उपांत्य फेरीत हरिहरन व ताबिया खान यांना २१-१८, २१-१५ असे नमवले. अंतिम सामन्यात यूएईच्या अँडी मारवान हम्झा व नुरानी रुतु अझ्झाह्रा या जोडीवर १८-२१, २१-१६, २१-१२ अशी मात करत सुवर्णपदक पटकावले. महिला दुहेरी प्रकारात सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर यांनी कांस्यपदकाची कमाई केली. एकूणच दीप रांभिया व सोनाली मिखेलकर – सुवर्णपदक (मिश्र दुहेरी), दीप रांभिया – रौप्यपदक (पुरुष दुहेरी), सोनाली मिखेलकर व अनघा करंदीकर – कांस्यपदक (महिला दुहेरी) आणि सूरज पी. एच. – रौप्यपदक (पुरुष दुहेरी ३5+) अशी २ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्य अशी एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदके ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खात्यात जमा झाली. या सर्व यशामागे ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची भक्कम प्रशिक्षण व्यवस्था, प्रमुख प्रशिक्षक  श्रीकांत वाड यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व तसेच प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजिरनीस, राजीव गणपुले यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. ठाणे  महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त श्रीमती. मीनल पालांडे यांनी सदर खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले आहे.  विशेषतः सूरज पी. एच. यांच्या रौप्यपदकामुळे आणि एकूण ६ आंतरराष्ट्रीय पदकांमुळे ठाण्याचा क्रीडा ध्वज जागतिक व्यासपीठावर अभिमानाने फडकला आहे.

ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब

ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब सिद्धेश शिगवण ठाणे : ठाणे महापालिका निवडणूकीत नगरसेवक निवडणून आल्यानंतर आणि महापौर विराजमान झाल्यावर पहिलीच सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली.  अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्याचे अधिकृत सांगण्यात आले. यावेळी सर्व पक्षाचे गटनेते, ज्येष्ठ नगरसेवकांनी अजित पवार यांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे महापालिकेतील गटनेते पवन कदम यांनी अजित पवार यांच्या निधनाची घटना मनाला चटका लावून गेल्याचे म्हटले. तर, भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनीही अजित पवार यांच्या कार्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांच्यासोबतचे अनेक किस्से मांडले. अजित पवार यांच्यासोबतची त्यांची शेवटची भेट कशी झाली, अजित पवार यांचे मिळालेले मार्गदर्शन, सकाळी उठून काम करण्याची त्यांची सवय याविषयी नजीब मुल्ला हे भाषण करताना भावूक झाले होते.तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अश्रफ शानू पठान यांनी अजित पवार यांच्या अपघातात कोणी दोषी आहे? अपघात कसा झाला? याची चौकशी करण्याचे आमचे निवेदन महापौरांनी सरकारला द्यावे अशी मागणी केली. तर एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनीही आम्ही अजित पवार यांच्या कुटुंबासोबत असून प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी केली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक विकास रेपाळे, राम रेपाळे यांनीही अजित पवार यांच्यासोबत निवडणूकांमध्ये काम करताना आलेले अनुभव सांगितले. तसेच अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यांच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. ही सभा  अजित पवार यांना श्रद्धांजली देण्यासाठी तहकुब करण्यात आल्याचे सांगत लवकरच नवीन तारीख घोषित केली जाईल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

 शिवजयंतीनिमित्त गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग

शिवजयंतीनिमित्त गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय सहभाग मुंबई शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य पदयात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनात गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांनी मोलाचा सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमात गुरुकुल कृती फाउंडेशनचे संस्थापक  उमेश मूरकर तसेच त्यांच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण कार्यक्रमात नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन व समन्वयाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. पदयात्रा, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग लाभला. सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टने शिवजयंतीच्या निमित्ताने तरुण पिढीमध्ये इतिहासाची जाणीव व समाजभान निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे यावेळी दिसून आले. या कार्यक्रमास पद्मश्री पुरस्कार विजेते उदय देशपांडे (मल्लखांब प्रशिक्षक), आंचल गोयल (जिल्हाधिकारी, मुंबई शहर), बप्पासाहेब थोरात (अपर जिल्हाधिकारी, मुंबई शहर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथील प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, अनिल घुगे, फुलचंद कराड, नेहा साप्ते, समृद्धी देवळेकर, निलेश गराटे, साहिल उतेकर उपस्थित होते. गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट तर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडू व रेफ्री विघ्नेश मूरकर यांच्यासह विन्स पाटील, आशिष महाडिक, अश्विनी जांभळे, भूपेश वैती, सय्यद मोहमद, श्रेयांक मौर्य, शिवांक मौर्य, अथर्व काळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचा सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक पटकावणारे खेळाडू सिद्धत गुप्ता यांची उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी पदयात्रा, मान्यवरांचे स्वागत, शिस्तबद्ध नियोजन व समन्वय यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली. शिवजयंतीच्या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात तरुणाईला प्रेरणा देण्याचे कार्य ट्रस्टच्या माध्यमातून घडल्याचे यावेळी दिसून आले.