Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित “साडी वॉकाथॉन”ला महिलांचा उत्साह 

इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित “साडी वॉकाथॉन”ला महिलांचा उत्साह कल्याण: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ कल्याणतर्फे आयोजित करण्यात आलेली “साडी वॉकाथॉन” मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत आरोग्य, एकता आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या वॉकाथॉनचे उद्घाटन महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित नगरसेवक विजया पोटे, ज्योती पाटील, गणेश जाधव, शालिनी वायले आणि डॉ. तनुजा वायले यांचा सत्कार करण्यात आला. या वॉकाथॉनमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी साडी परिधान करून उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध गटांमधील सहभागी महिलांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सहभागींचा उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इनर व्हील क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा दिप्ती दिवडकर, सचिव ॲड. सुषमा पटेल, माजी अध्यक्षा साची कदम, ॲड. नीता कदम, ॲड. अर्चना सबनीस, सविता जरपडे तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. साडी परिधान करून चालण्याच्या या अनोख्या संकल्पनेतून महिला सशक्तीकरणासोबतच भारतीय संस्कृतीचा अभिमान जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.

किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद पुरुषांत तिसऱ्या फेरीत.

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी कबड्डी स्पर्धा – २०२६ किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद पुरुषांत तिसऱ्या फेरीत. ठाणे : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत यांनी महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद यांनी पुरुषांत तिसरी फेरी गाठली. कळवा, खारेगाव, ठाणे(प.) येथील  खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात आज पासून सुरु झालेल्या महिलांच्या दुसऱ्या फेरीत किल्ले माऊली संघाने राहुल मंडळावर ५५-१८ अशी सहज मात केली. सुरुवातीलाच २ लोण देत किल्ले माऊलीने पूर्वार्धात २९-११ असे वर्चस्व राखले. उत्तरार्धात आणखी २ लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. मयुरी जोशी, मयुरी शेलार, संजना विशे यांच्या चढाई पकडीच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. दुसऱ्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात नव तरुण मंडळाने मध्यंतरातील ०८-१३ अशा पीछाडीवरून शिवतेज संघाला २५-२४ असे चकवीत आगेकूच केली. वैभवी कासार, रिबीका गावीत यांनी आक्रमक खेळ करीत शिवतेजला विश्रांतीला आघाडी दिली होती. पण विश्रांतीनंतर नव तरुण संघाच्या संयमी यादव, भाविका यांनी तुफानी खेळ करीत संघाला तिसरी फेरी गाठवून दिली. महिलांच्या शेवटच्या सामन्यात जय भारतने स्व. राकेशदादा म्हात्रे संघाचा ४५-२० असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. पुरुषांच्या दुसऱ्या फेरीत छत्रपती शिवाजी महाराज संघाने नवरत्न मंडळाचा ३९-१३ असा पाडाव केला. पूर्वार्धात २५-०३ अशी आघाडी घेणाऱ्या छत्रपती शिवाजीने उत्तरार्धात सावध खेळ करीत आपला विजय साकारला. वेदान्त नायक, ओमकार मोरे, तन्मय परब यांच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते. नवरत्नचा देवराज बने बरा खेळला. दुसऱ्या सामन्यात स्वामी विवेकानंदने राज मंडळाचा प्रतिकार २८-१२ असा संपविला. पहिल्या डावात १४-०४ अशी विवेकानंद संघाकडे आघाडी होती. यश पाटील, कुणाल पानसरे या विजयात चमकले. या स्पर्धेचे उदघाटन ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकवलं विजेतेपद

एस ४ लीजेंड्स कप २०२६ एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकवलं विजेतेपद ठाणे – ऍडव्होकेट रमाकांत ओवळेकर यांच्या स्मरणार्थ ४५ वर्षांवरील खेळाडूंसाठी क्रिकेटची स्पर्धा ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथे सुर सुदान शौर्या स्वर संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली होती. एस ४ लीजेंड्स कप २०२६ एनबीईई स्पोर्ट्स क्लबने पटकावला.  स्पर्धेत ठाणे थंडर्स, एनबीईई स्पोर्ट्स क्लब, ठाणे रोटरी टायटन्स, पीडब्लूडी, आम्ही मुलुंडकर, गरवारे क्लब, मिड सिटी सीसी डोंबिवली आणि रारा मास्टर्स असे एकूण आठ संघानी सहभाग घेतला. आयपीएल, रणजी, प्रथम श्रेणीतील खेळाडूंचा संघात समावेश होता. प्रवीण तांबे, संदीप दहाड, अमित दाणी, रॉबिन मॉरिस, अमित पागनीस, अमित वेलस्कर, मनोज जोगळेकर, आशिष महाडेश्वर, श्रेयस खानोलकर, विनोद राघवन व इतर दिग्गज खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला. एनबीईई स्पोर्ट्स क्लबने विजेते पदाचा खिताब पटकाविला. तर ठाणे थंडर्स उपविजेता ठरला. तर दुसरा उपविजेता संघ गरवारे क्लब ठरला. सामनावीर म्हणून ओजस मेहता, उत्कृष्ट फलंदाज देवा मोरे, उत्कृष्ट गोलंदाज योगेश डिचोलकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओजस मेहता, उत्कृष्ट यष्टीरक्षक सागर जोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  विजेतेपदाची ट्रॉफी उषा मधुकर चांदुरकर यांनी मधुकर रामचंद्र चंद्रुकर यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली. उद्योजक व शैक्षणिक क्षेत्रातून महान व्यक्ती अश्विन वसवडा, केंद्रीय मंत्रालय उपसचिव श्री किमबहुने, आदेश चांदुरकर, किरण राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समता ओवळेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.  महिला दिनाचे औचित्य साधून समाजसेविका प्रतिभा चांदूरकर, लीना जाधव, सविता साळुंखे, शुभांगी भोर, शैला सिंह यांचा सत्कार करण्यात आला. सामनाचे आयोजन व सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव नम्रता ओवळेकर राणे यांनी केले.

महिला सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील- फडणवीस

ठाणे: जागतिक महिला दिन आणि समाजसुधारक डॉ.मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या विधानमंडळ सदस्यत्वाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम’ ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेत महिलांना अधिकाधिक संधी दिल्यास सक्षम नेतृत्व घडते, यासाठी…

गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी ९ लाख मुलींचे होणार लसीकरण

रमेश औताडे मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या (सर्व्हायकल) कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी ९ ते १४ वयोगटातील सुमारे ९ लाख ८४ हजार मुलींना एचपीव्ही प्रतिबंधक लस देण्याच्या…

महिला दिनीच नवजात बालिका वसईच्या रस्त्यावर बेवारस सापडली

    वसई : आंतरराष्ट्रीय महिला दिनी अवघं जग स्त्रिशक्तीचा जयजयकार करीत असताना वसईत आक्रीत घडले. वसई पूर्व परिसरात नवजात बालिकेला रस्त्यावर बेवारस सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांकडून  अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.…

युद्धाचा भारताला चटका गॅस ६० रुपयांनी महागला

मुंबई : अमेरिका- इस्रालयने इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धाचा चटका अखेर भारताला बसला आहे. घरगुती गॅसचे दर ६० रुपयांनी वाढले आहेत. इतकेच नाही तर आता युद्धजन्य स्थिती पहाता २५ दिवसात एकच गॅस सिलेंडर मिळणार असल्याने गॅसचा पुरवून वापर…

नाहीशा होणाऱ्या मुलीं जातात कुठे ? प्रवीण दीक्षित निवृत्त पोलीस महासंचालक लहान मुले व विशेषतः लहान मुली नाहीशा झाल्यास त्यासाबंधी पोलिसांकडे तक्रार मिळाल्यानंतर त्यावर तातडीने त्यांना पळविण्यात आले असण्याची शक्यता…

‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल

‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचा विश्वास अलिबाग 🙁 अशोक गायकवाड )— ‘लोकशाही व्यवस्थेत नागरिक हा केंद्रबिंदू असून त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि सुखकर करणे, हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यभर राबविला जात असून, याद्वारे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवल्या जात आहेत’, असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी शनिवारी येथे केले. अलिबाग तालुक्यातील सारळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित भव्य ‘महाराजस्व समाधान शिबिरा’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्यव्यापी मोहिमेतून प्रशासनाचा कायापालट. यावेळी मार्गदर्शन करताना खारगे म्हणाले की, हा उपक्रम केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व ३५८ तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळात (सर्कल) राबविला जात आहे. दर तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक तालुक्यातील सहा मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित केली जातील. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारच्या शिबिरांचे नियोजन केले जाईल, जेणेकरून एकही पात्र नागरिक लाभापासून वंचित राहणार नाही. कार्यक्रमात बोलताना शिवाजी चौरे यांनी नमूद केले की, ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी हातात हात घालून काम करतात, तिथे विकासकामांचा वेग अधिक असतो. या अभियानात लोकप्रतिनिधींचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे सामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत होत आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘महसूल विभाग हा केवळ एक विभाग नसून तो सर्व शासकीय विभागांना एकत्र बांधणारा समन्वय साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारे विविध दाखले, परवाने आणि शासकीय योजनांचा लाभ अत्यंत सुलभपणे आणि विनाविलंब मिळावा, हाच या समाधान शिबिराचा मुख्य उद्देश आहे.’ या सोहळ्याला जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, गट विकास अधिकारी शर्मिला पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, रेवस ग्रामपंचायतीचे सरपंच मच्छिंद्र पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सारळ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराला उदंड प्रतिसाद दिला असून, प्रशासनाच्या या लोकाभिमुख निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.