महाराष्ट्र राज्याची स्वतः ची पेपर लॉटरी बंद करण्याचा प्रयत्न केल्यास मनसे लॉटरी सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांनी दिला आहे.
विकलांग लोकांना रोजगार मिळावा व जुगारावर नियंत्रण राहावं यासाठी महाराष्ट्र सरकारने 1969 ला स्वतः ची पेपर लॉटरी सुरु केली. या लॉटरी विक्रीचा व्यवसाय करून अंध, अपंग, वृद्ध व्यक्ती आपला उदरनिर्वाह करतात, या लॉटरी वर हजारो लोकांची रोजी रोटी अवलंबून आहे. अशी महाराष्ट्र राज्याची विश्व्सनीय लॉटरी बंद करण्याचा घाट महाराष्ट्र सरकार करीत आहे. आपली जुनी पुराणी विक्री व्यवस्था बदलून आजच्या डिजिटल युगात अत्याधुनिक विक्री प्रणाली राबऊन लॉटरी तिकिटांचा खप कसा वाढेल याचा विचार या सरकारने केला पाहिजे. क्षेत्रफळाने व लोकसंख्येने कमी असलेल्या केरळ राज्याचा लॉटरी बंपरचे पाहिले बक्षीस 25 करोड व महाराष्ट्र राज्याचे दिवाळी किंवा गणपती बंपरचे पहिले बक्षीस फार फार तर एक करोड. सरकार महाराष्ट्र राज्य लॉटरीचा गळा घोटून अन्य राज्यातील लॉटरी विक्रीला रान मोकळे करण्याचा डाव हाणून पाडेल असा इशारा मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांनी दिला आहे.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *