Author: bittambatami.com

 हजारो अंगणवाडी कर्मचारी व कृती समितीच्या नेत्यांचे जेल-भरो आंदोलन

 मानधनवाढ, ग्रॅच्युईटी व मासिक पेन्शनचे शासकीय आदेश ताबडतोब काढावेत या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक अनिल ठाणेकर   ठाणे : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या प्रतिनिधींनी मानधनवाढ, ग्रॅच्युईटी व मासिक पेन्शनच्या मागील संपात मान्य केलेल्या मागण्यांबाबतचे जीआर ताबडतोब काढवेत, या मागणीला घेऊन बेमुदत उपोषण व हजारो अंगणवाडी कर्मचारी व कृती समितीच्या नेत्यांचे जेल-भरो आंदोलन करण्यात आल्याची माहिती एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी दिली आहे. कृती समितीचे ज्येष्ठ नेते कॉ. अतुल दिघे यांनी उपोषणकर्त्यांना प्रेरणा देणारे भाषण करून कार्यक्रमाची सुरवात केली. कृती समितीच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कृती समितीच्या शिष्ठमंडळांना मंत्रालयात बोलावून त्यांचे निवेदन स्विकारले. परंतु ही भेट उभ्या उभ्या झाल्यामुळे कोणतीही चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या रात्री प्रचंड पाऊस कोसळल्यामुळे संपूर्ण आझाद मैदान जलमय झाले होते. मंडपात व स्टेजवर देखील प्रचंड ओल होती. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी खुर्च्यांवर बसून पूर्ण रात्र काढली. तरीही त्यांचे मनोबल तुटले नाही. पोलिसांनी त्यांच्या नियमाप्रमाणे संध्याकाळी सर्वांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वांनी तिथेच थांबण्याची ठाम भूमिका घेतली. कृती समितीचे नेते वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले व शेवटी ही कारवाई थांबवण्यात आली. या शिष्ठमंडळात शुभा शमीम, दिलीप उटाणे, सूर्यमणी गायकवाड, नितीन पवार, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर व जयश्री पाटील यांचा समावेश होता. यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, प्रधान सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे व अन्य अनेक अधिकारी उपस्थित होते. आझाद मैदानाच्या स्टेजच्या मागच्या गेटजवळील रस्त्यावर पोलिसांच्या गाड्या आणण्यात आल्या व घोषणांच्या गजरात जेल भरो आंदोलनाला सुरवात झाली. कृती समितीचे प्रमुख नेते शुभा शमीम, भगवानराव देशमुख, सुर्यमणी गायकवाड, राजेश सिंग, नितीन पवार, माधुरी क्षिरसागर, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. चार गाड्या भरून सत्याग्रहींना यलो गेट पोलीस ठाण्यात आणून स्थानबद्ध करण्यात आले. पोलिस यंत्रणा हजारो अंगणवाडी कर्मचारी महिलांना अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यासाठी अक्षम ठरल्यामुळे त्यांनी आझाद मैदानातच सर्वांना स्थानबद्ध करत असल्याची घोषणा केली व सुमारे दहा हजार महिलांच्या नावांची यादी करून त्यांना अटक केल्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतरही ज्यांची नावे यादीत येऊ शकली नाहीत अशा सुमारे सहा हजार महिलांनी मैदानावर व मैदानाच्या बाहेर घोषणा दिल्या. परंतु पोलिसांची महिलांना अटक करण्याची क्षमता संपल्यामुळे त्यांनी याद्या करण्याचे काम बंद केले. सायंकाळी अटक करून नेलेल्या नेत्यांना सोडेपर्यंत अंगणवाडी कर्मचारी पावसाची पर्वा न करता मैदानावर ठाण मांडून बसल्या. हे सर्व नेते परत आल्यानंतर सभा घेऊन सर्व सत्याग्रहींचे अभिनंदन करण्यात आले व लढ्याचा पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात आला.पाऊस व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील आंदोलनकर्त्या महिलांचा परतीचा प्रवास लक्षात घेता बेमुदत साखळी धरण्यामध्ये २६ व २७ या दोन दिवसांसाठी मुंबई व ठाणे येथील नागरी प्रकल्पातील कर्मचारी व ज्यांचा परतीच्या प्रवासाचे नियोजन उशीराचे आहे अशा बाहेरगावच्या कर्मचारी आझाद मैदानावर ठाण मांडून बसतील. ३० सप्टेंबरपासून मंत्रीमंडळाच्या बैठकीत मानधनवाढ, मासिक पेन्शन व ग्रॅट्युईटीचा निर्णय होईपर्यंत रोज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून लोक २५० ते ३००च्या संख्येने रोज उपस्थित राहतील असा निर्णय कृती समितीने घेतला आहे, असे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांनी सांगितले. ०००००

पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई –  उदय सामंत

अशोक गायकवाड   रत्नागिरी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना सक्षम करणारी आहे. ७२ तासात प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत. पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला…

 मुरबाड-कल्याण रेल्वे लवकरच सुरु होणार

 २०० कोटींचा निधी मंजूर   मुरबाड : मुरबाड- ल्याण रेल्वेच्या भूमी अधिग्रहणासाठी रेल्वेने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे दिली. मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गासाठी…

 मुरबाड-कल्याण रेल्वे लवकरच सुरु होणार

 २०० कोटींचा निधी मंजूर   मुरबाड : मुरबाड- ल्याण रेल्वेच्या भूमी अधिग्रहणासाठी रेल्वेने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड येथे दिली. मुरबाड-कल्याण रेल्वे मार्गासाठी…

यांची तोंड आवरा !!

भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार अशी ज्यांची ख्याती व प्रचार केला जातो, त्या देवेन्द्र फडणवीस यांच्याच नागपूर जिल्ह्यातील कामटी विधानसभा मतदारसंघातील आमदराने असे काही तारे तोडले आहेत की भाजपाला…

सदाबहार अभिनेते; देव आनंद

हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार, चिरतरुण आणि चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते जेष्ठ सिनेअभिनेते दिवंगत देव आनंद यांची आज १०१ वि जयंती. १०१ वर्षांपुर्वी अजच्याच दिवशी म्हणजे २६…

ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे व मराठा आरक्षण मागणीचे जनक क्रांतीसुर्य कै. आमदार अण्णासाहेब पाटील

भारतीय कामगार चळवळीच्या देदीप्यमान इतिहासात माथाडी कामगार चळवळीला अन्यन्य साधारण असे महत्व आहे. कारण माथाडी कामगारांचे भाग्यविधाते कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या अथक परिश्रमाने तसेच जिद्द आणि चिकाटीने महाराष्ट्रातील माथाडी…

पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही

उद्धव ठाकरेंनी ठणकावले मुंबई : महाराष्ट्र दौऱ्यावर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा उल्लेख बाजारबुणगे असा केला असून, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रामधून कुणीच संपवू…

ठाकरे-पवारांचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याकडे जोडा; अमित शाहांच्या सूचना

नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये सभा घेत विधानसभा निवडणुकीची रणनीती सांगितली आहे. एकीकडे गेल्या दोन वर्षात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडलेली…