Author: bittambatami.com

जूनमध्येही मुंबईकर घामाघूम;

सकाळी पाऊस, तर दुपारी उन्हाने होरपळ मुंबई : गोव्यात दाखल झालेला मान्सून मुंबईत येण्यास १० जून उजाडण्याची शक्यता असतानाच बुधवारी सकाळी मुंबईत पाऊस झाला. यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे मुंबईकरांना चटके बसले. उकाड्याचे प्रमाण अधिक असल्याने जूनमधील पावसाऐवजी मुंबईकरांची घामाच्या धारांनी अंघोळ होत होती. गुरुवारी शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यतेसह सामान्य: आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे मान्सून वेळापत्रकानुसार दक्षिण कर्नाटक, दक्षिण आंध्र प्रदेशपर्यंत पोहोचल आहे. मान्सून पुढे सरसावण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे दक्षिण, अहमदनगर दक्षिण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूरपर्यंतच्या जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून १० जूनपर्यंतच्या पाच दिवसांदरम्यान कधीही हजेरी लावण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची दाट शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी  बोलताना सांगितले.

मुंबई ‘आयआयटी’ ठरली क्यूएस रॅंकिंगमध्ये सर्वोत्तम;

१४९ वरून ११८ स्थानावर घेतली झेप मुंबई : जागतिक विद्यापीठांच्या क्यूएस रॅंकिंगमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी)च्या कामगिरीत सुधारणा झाली असून, संस्था १४९ वरून ११८ व्या स्थानावर पोहोचली आहे. ‘आयआयटीने १०० पैकी ५६.३ गुणांची कमाई करत आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पहिल्या १५० संस्थांच्या यादीत इतकी भरीव कामगिरी आयआयटीने प्रथमच केली आहे. विविध नऊ निकषांवर ‘आयआयटी’ची निवड करण्यात आली आहे. भारतातील ६१ टक्के विद्यापीठांचे क्यूएस क्रमवारीतील स्थान उंचावले आहे. त्यात दिल्ली ‘आयआयटी’ (१९७ वरून १५०व्या स्थानावर), बंगळुरू ‘आयआयएससी’ (२२५वरून २११ व्या स्थानावर), खरगपूर ‘आयआयटी’ (२७१ वरून २२२व्या स्थानावर), मद्रास ‘आयआयटी’ (२८५वरून २२७वर), दिल्ली विद्यापीठ (४०७वरून ३२८वर) या संस्थांचा समावेश आहे. एमआयटी सलग १३ व्या वर्षी प्रथम अमेरिकेतील ‘एमआयटी’ने सलग १३ वर्षे आपले स्थान अबाधित ठेवत प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या स्थानावर लंडनचे इम्पेरिअल कॉलेज (आधीच्या सहाव्या स्थानावरून दुसऱ्या) आहे. हार्वर्ड आणि ऑक्सफर्डने एकत्रितपणे तिसरा रँक मिळवला आहे. तर केंब्रिज दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरले आहे. कोट आयआयटी’ची क्यूएसमधील कामगिरी ३१ गुणांनी सुधारली आहे. हे आमच्या शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे यश आहे. – प्रा. शिरीष केदारे, संचालक, आयआयटी आयआयटीचे गुण- शिक्षकांची प्रतिष्ठा –  ८६ सायटेशन –  ७९.१ शैक्षणिक प्रतिष्ठा – ५८.५ रोजगारक्षमता – ६४.५ सस्टेनिबीलिटी –  ५२.३ शिक्षक-विद्यार्थी रेशो – १४.४ इंटरनॅशनल फॅकल्टी – ४.३ इंटरनॅशनल रिसर्च नेटव – ५२.३ इंटरनॅशनल स्टुडन्टस – १.३

गेल्या ६ वर्षांपासून रखडलेल्या पूलामुळे

नागरिकांमध्ये  प्रचंड संताप आणि तणाव मुंबई : मरोळ ते साकीनाका भागातील कृष्णलाल मारवाह रोडलगतच्या पिकनिक पुलाचे बांधकाम गेली ६ वर्षे रखडले असून त्याची  दखल कुणीच घेत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्येही काम न होण्यावरून आपापसात भांडणे तसेच तणाव अनुभवयाला मिळत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी एक मोर्चा काढून मुंबई महानगरपालिका व त्यांनी नियुक्त केलेल्या कंत्राटाराच्या विरोधात उत्सफूर्त मोर्चा काढला.  त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर नागरिकांनी या पिकनिक पूलाचे काम लवकरात लवकर झाले नाही तर मात्र आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

स्पोर्टींग क्लबचे सेंट्रल मैदान म्हणजे ठाण्याचे लॉर्ड्स

ठाणे : स्पोर्टींग क्लब कमिटीच्या  सेंट्रल मैदानाने गेल्या शंभर वर्षात ठाण्याच्या क्रिकेटची अनेक स्थितंतरे अनुभवली आहेत. मड, मॅट, आणि टर्फ अशा खेळपट्टयांवर क्रिकेटवेड्या ठाणेकरांनी आपले कौशल्य पणाला लावले. श्री आनंद भारती समाज संस्थेची स्थापना १९१० साली झाली. तर संस्थेची क्रिकेट शाखा १९१५ साली स्थापन झाली. स्पोर्टींग क्लब कमिटीच्या शताब्दी वर्षात आमच्या संस्थेच्या गौरव होत आहे त्याबद्दल आम्ही क्लबचे अध्यक्ष डॉ राजेश मढवी यांच्यासह  स्पोर्टींग क्लब कमिटीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे आभारी आहोत असे भावपूर्ण मनोगत श्री आनंद भारती समाजाचे सचिव विवेक मोरेकर यांनी व्यक्त केले. स्पोर्टींग क्लब कमिटीतर्फे सीकेपी सभागृहात शताब्दी वर्षाचा सांगता सोहळा अनेक मान्यवर, क्लबचे सदस्य यांच्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्याप्रसंगी सचिव विवेक मारेकरी बोलत होते.  पुष्पगुच्छ, क्लबचे बोधचिन्ह असलेली टोपी, चांदीची मुद्रा यावेळी सर्वाना भेट देण्यात आली. यावेळी ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, माजी आमदार निरंजन डावखरे, क्लबचे जेष्ठ सदस्य दिलीप[ रणदिवे, मुकुंद सातघरे,  क्लबचे माजी अध्यक्ष मुरलीधर मढवी, सुषमा मढवी, हेमांगी नाईक यांचे डॉ राजेश मढवी यांनी स्वागत केले. कार्यवाहक दिलीप धुमाळ, सहकार्यवाहक सुशील म्हापुसकर, अतुल फणसे, , किशोर रणदिवे, किशोर ओवळेकर, योगेश महाजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जेष्ठ सदस्य  प्रल्हाद नाखवा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले.

8वी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा  

अभिजित – काजलला प्रथम मानांकन मुंबई : श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हॉटेल मंगलम नरसोबावाडी कोल्हापूर  येथे सुरु होणाऱ्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष व महिला गटात अनुक्रमे पुण्याच्या अभिजित त्रिपनकर व मुंबईच्या काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेतील पुरुष एकेरी गटात २५६ तर महिला एकेरी गटात ४४ खेळाडूंनी भाग घेतला आहे. शनिवार दिनांक ८ जून २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता पुरुष एकेरी गटाने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या युट्युब चॅनलवरून या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे. पुरुष एकेरी : १) अभिजित त्रिपनकर ( पुणे ) २) विकास धारिया ( मुंबई ) ३) झैद फारुकी ( ठाणे ) ४) पंकज पवार ( मुंबई ) ५) प्रशांत मोरे ( मुंबई ) ६) रहिम खान ( पुणे  ७) संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) ८) सागर वाघमारे ( पुणे) महिला एकेरी : १) काजल कुमारी ( मुंबई ) २) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) ३) अंबिका हरिथ ( मुंबई ) ४) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) ५) उर्मिला शेंडगे ( मुंबई ) ६) केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) ७) अंजली सिरीपुरम ( मुंबई ) ८) प्रीती खेडेकर ( मुंबई)

नेरुळ येथे विधी महाविद्यलयाकडून वृक्षरोपण

नेरुळ : महात्मा गांधी मिशिन विधी महाविद्यालय नेरुळ नवी मुंबई येथे विधी महाविद्याल यांच्या वतीने ५ जून रोजी  ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे  वृक्ष रोपणाचा उपक्रम यशवीरित्या राबवण्यात आला विधी महाविद्यालय  च्या मुख्याध्यापीक शीला होसमानी  व महाविद्यलयातील विद्यार्थी , कर्मचारी, नवी मुंबई महानगपालिकेचे अधिकारी ,कर्मचारी ,व   ईतर विद्यार्थी आणि नागरिक यांनी सहभाग घेतला होता. या उन्हाळ्यात साधारणतः तापमान हे ४५ अंश सेल्सियस च्या जवळ पास गेले होते पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे त्यामुळे वृक्षरोपण हि काळाची गरज  झालेली आहे प्रत्येक माणसांनी किमान एक तरी झाड लावून संगोपन करून जगवले पाहिजे असा संदेश मुख्याध्यापिका शीला होसमानी यांनी  पर्यावरणदिनानिमित्त तेथे जमलेल्या विद्यार्थी ,महानगपालिकीचे कर्मचारी व नागरिकांना  दिला.

शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के म्हणतात, हा आहे नवा ‘हिंदुस्थान’

ठाणे: लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी समाज माध्यमावर एक पोस्ट केली आहे.  त्यात एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता…

टिटवाळ्यात पाणीबाणी

सहा जलकुंभ असूनही टिटवाळ्यात पाणी समस्या कल्याण  : कल्याण- डोंबिवली महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या मांडा टिटवाळ्यातील नागरिक पाणी समस्येने त्रस्त आहेत. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विकतचे पाणी आणावे लागत आहे. पाणीसाठ्यासाठी…

पवईतील ८०० झोपड्यांवर हातोडा

रहिवासी-पोलिसांत संघर्ष घाटकोपरः पवईतील जयभीमनगर झोपडपट्टीतील तब्बल ८०० झोपड्यांवर गुरुवारी  पालिकेने तोडक कारवाई केली. कोणतीही नोटीस न देता मोठा पोलिस फौजफाटा घेऊन पावसाळा तोंडावर असताना ही एकतर्फी कारवाई केल्‍याचा रहिवाशांचा आरोप आहे. ही जागा मोकळी करून एका बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप रहिवाशांनी बोलताना केला.पवईतील जयभीमनगर ही झोपडपट्टी गेल्या २५ वर्षांपासून असून, त्यातील सुमारे ८०० झोपड्यांना मुंबई महानगरपालिकेने बेकायदेशीर ठरवत त्यांना ४८८ अंतर्गत निष्कासनाची नोटीस बजावली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कारवाई झाल्‍याने आम्‍ही जाणार कुठे, असा सवाल रहिवासी विचारत आहेत. तोडक कारवाईसाठी जवळपास २५० ते ३०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. रहिवाशांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा पोलिसांचा आरोप आहे; तर कारवाईला न्यायालयाकडून स्‍थगिती आणण्यासाठी वेळ मागूनही आम्‍हाला दिला नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले. या भागातील एका विकसकाच्या दबावाखाली पालिका, पोलिस आणि राजकारणी झोपड्यांच्या मुळावर उठले आहेत, असा रहिवाशांचा आरोप आहे. आम्‍ही गरीब, असहाय झोपडीधारक एकटे पडलो असून कुणीही साथ देण्यास पुढे सरसावत नाही, अशी खंत त्‍यांनी बोलून दाखवली. पवईची ओळख ही मुंबई शहरात उच्चभ्रू परिसर म्हणून असली, तरी येथे अर्ध्यापर्यंत झोपडपट्टी, चाळकऱ्यांची वस्ती आहे. येथे रमाबाई आंबेडकरनगर, गौतमनगर, इंदिरानगर, महात्मा फुलेनगर, मोरारजीनगर, हरिओमनगर आदी…

खासदार होताच बाळ्या मामा ॲक्शन मोडमध्ये

काल्हेर येथील शासकीय जमिनींवर केलेल्या अनधिकृत बांधकामांची केली पाहणी भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी ॲक्शन मोडवर आले आहेत. बाळ्या मामा यांनी बुधवारी काल्हेर येथील शासकीय जमिनीवर केलेल्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांची बाळ्या मामा यांनी पाहणी केली. जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो आहे. त्यामुळे येथील शेतकरी व जनसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी माझ्यावर आली आहे. काल्हेर येथे सुमारे २६ एकर शासकीय जागेवर शासकीय तसेच वन विभाग व स्थानिक नागरिकांच्या जागेवर नागरिकांना दमदाटी करून व अतिक्रमण करून येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर पाटील ,भरत पाटील,नितीन पाटील या बांधकाम व्यावसायिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे.या अनधिकृत बांधकामासाठी माजी खासदार कपिल पाटील व त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने हे बांधकाम व्यावसायिक येथील शेतकरी व नागरिकांना धमकावत जमिनींवर अतिक्रमण केले असून येथील स्थानिक गुंडांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिक जनतेची फसवणूक करत आहेत असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी यावेळी केला आहे.या प्रकरणी आपण स्वतः एमएमआरडीए,तहसीलदार व प्रांत तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून या प्रकाराची सर्व कागदपत्र आपण शासकीय यंत्रणेला सोपविणार आहोत असेही बाळ्या मामा यांनी यावेळी सांगितले. येथील बांधकाम व्यावसायिक जमिनीचे खोटे कागदपत्र दाखवून इन्व्हेस्टर लोकांना व सामान्य घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना फसवत असून दादागिरी व दहशत वाढवली आऊन आज शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर मी इथे येऊन पाहणी केली असून मी शेतकऱ्यांना शब्द डिंक होता की मी निवडून आलो की दुसऱ्याच दिवशी या जागेची पाहणी करणार व तिसऱ्या दिवशी तक्रार करून जनतेला न्याय देणार असल्याचे सांगितले असल्याने आज व्यस्त कार्यक्रम आटोपते घेऊन आज मी या ठिकाणी अनधिकृत बांधकामांची पाहणी केली असल्याचेही खासदार सुरेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले असून केवळ केंद्रीय मंत्र्यांच्या आशीर्वादाने शासकीय यंत्रणा या अनधिकृत बांधकामांवर दुर्लक्ष करत आले आहेत मात्र आता असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देखील बाळ्या मामा यांनी दिला आहे.