Category: होम

 मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये पाण्यात

 विकासाच्या नावाखाली भाजपाने मुंबई ‘बकाल’ केली – वर्षा गायकवाड* बीएमसीत ३० वर्ष सत्तेत राहून मलई खाणाऱ्या भाजपाने अक्कल शिकवू नये; रस्त्यावर उतरून भाजपा नेत्यांनी काय ‘दिवे’ लावले ? मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष मागील ३० वर्षांपासून सत्तेत आहे, यात २५ वर्षे शिवसेनेसोबतची युती आणि ज्या काळात निवडणुका झाल्या नाहीत त्या काळात प्रशासकांमार्फतही भाजपाची सत्ता होती आणि आत्ताही बीएमसीमध्ये भाजपाचीच सत्ता आहे तरीही, मुंबईच्या दुर्दशेला आपण जबाबदार नाही असे भासवून जबाबदारी झटकण्याचे काम भाजपा करत आहे, परंतु मुंबईला लुटून स्वतःचे खिसे भरणाऱ्या भाजपाला जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. मुंबईची वाताहत होण्यास भाजपाच जबाबदार आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला आहे. भाजपाचा सडकून समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका नालेसफाईवर दवर्षी १०० कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करते, इतर खर्च वेगळाच करत असूनही एक दोन पावसातच मुंबई जलमय होते, मोठ मोठे वृक्ष कोलमडून जिवीत व वित्त हानी होते, रस्ते खचतात, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, वाहतूक कोंडी होती. महापालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षाचे नेते १०० टक्के कामे झाल्याचा दावा करतात पण मुंबईची अवस्था काही बदलत नाही. मुंबईकरांना दरवर्षी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महापौर स्वतःचे ‘रील्स’ बनवण्यात अधिक मग्न असल्याचे दिसत आहे, तर आयुक्तांनीही काहीही उल्लेखनीय काम केलेले नाही. गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुर्दैवी घटनांची भाजप केवळ थट्टाच करत आहे.…

कर्जतची वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न

भरत गोगावले यांच्या हस्ते नवीन पुलाचे उद्घाटन अशोक गायकवाड राजगड—कर्जत :  कर्जत शहरात उल्हास नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे हस्ते शनिवारी करण्यात आले. त्यावेळी गोगावले यांनी कर्जत शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न झाले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या दूरदृष्टीचे आणि कार्यपद्धतीचे कौतुक भरत गोगावले यांनी केले. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवरील नवीन ‘श्रीराम पुलाचा’ लोकार्पण सोहळा कर्जत येथे झाले. कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आला असून आजपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर,भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे,तसेच भाजपचे राजेश भगत,शरद लाड,जिल्हा उप प्रमुख भाई गायकर, विजय पाटील, शिवराम बदे, यांच्या सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, उपविभागीय अभियंता राहुल देवांग आदी प्रमुख उपस्थित होते. पुलामुळे आता अवजड वाहनांची कोंडी फुटणार असून कर्जत शहर व तालुक्याच्या विकासाला नवी गती प्राप्त होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल व सार्वजनिक बांधकाम उपविभाग कर्जत यांच्या वतीने करण्यात आले होते. पुलाचे लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या शुभहस्ते आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा पूल इंग्रजकालीन आणि जुना झाल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला व वाहनांच्या संख्येला अपुरा पडत होता. शहरात जाण्यासाठी हाच मुख्य मार्ग असल्याने येथे दररोज मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असे. पावसाळ्यात तर पर्यटकांची गर्दी वाढल्याने तासनतास वाहनांच्या रांगा लागत असत. हीच कोंडी आणि स्थानिक वाहनचालक यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी या नवीन पुलासाठी अथक परिश्रम घेतले. पावसामुळे पुलाचे अंतिम रंगकाम आणि विद्युत दिव्यांचे काम काहीसे लांबणीवर पडले होते. मात्र पुलाच्या सौंदर्यापेक्षा पावसाळ्यात नागरिकांची होणारी गैरसोय दूर करणे आणि त्यांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे असे थेट आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले आणि काम युद्धपातळीवर पूर्ण करून लोकार्पण निश्चित केले. ००००००००

पुणे लिंक रोडखालील नाल्यातील अडथळे दूर करण्यासाठी महेश गायकवाड स्वतः उतरले नाल्यात

नाल्याच्या रुंदीकरणासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार कल्याण  : कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडखालून संतोषनगर प्रभागातून लोकग्रामकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या नाल्याची रुंदी व उंची वाढविण्याच्या कामासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निधी मंजूर केला असला, तरी प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नसल्याने परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. या नाल्यात पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा केरकचरा, प्लास्टिक तसेच झाडांच्या मोठ्या फांद्या अडकून पाण्याचा प्रवाह खोळंबतो. परिणामी पावसाचे पाणी साचून संतोषनगर तसेच परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरत असल्याची समस्या निर्माण होते. रविवारी दुपारी शिवसेना संपर्क प्रमुख तथा प्रभागाचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ते स्वतः नाल्याच्या तोंडाशी खाली उतरून अडकलेला केरकचरा व इतर अडथळे हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाल्यात मोठ्या प्रमाणात झाडांच्या जाड फांद्या अडकून राहिल्याने पाण्याचा प्रवाह पूर्ण क्षमतेने मोकळा होऊ शकला नाही. यावेळी बोलताना महेश गायकवाड म्हणाले की, “या नाल्याच्या रुंदीकरण व उंची वाढविण्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला असला, तरी काम तातडीने सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना दरवर्षी पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी या कामाचा सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल.” नाल्याचे रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडूनही करण्यात येत आहे. 0000

पाऊस पडल्यानंतर गाळ काढण्यात ठामपा प्रशासन दंग -राहूल पिंगळे

ठाणे: नालेसफाईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही प्रत्येक पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणे आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरणे, ही प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराची साक्ष आहे, असे मत ठाणे काँग्रेस अध्यक्ष राहुल…

एमआयडीसी निवासी मध्ये घरफोड्या करणारे पाच जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

000000 कल्याण :   डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पाच जणांच्या दरोडेखोर टोळीने काही बंद फ्लॅट फोडून घरफोड्या केल्या आहेत. हे दरोडेखोर चेहऱ्यावर फडका लावून आले होते. त्यांच्याकडे…

एमआयडीसी निवासी भागात रविवार सुट्टीच्या दिवशी विजेचा खेळखंडोबा*

कल्याण :   डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात आज रविवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून विज पुरवठा खंडित झाला होता.  उच्च दाबाच्या वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडल्यामुळे किंवा स्पर्श झाल्याने स्फोट होऊन वीज पुरवठा खंडित होत…

Heading – नालेसफाईचे करोडो रुपये वाया

चार दिवसांच्या पावसामुळे खोटे दावे उघडकीस मिरा -भाईंदर शहरात मान्सून सुरू झाल्याने नाले साफसफाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे, घाण पसरली आहे आणि सांडपाणी रस्त्यांवर वाहत आहे, ज्यामुळे महानगरपालिकेच्या साफसफाई प्रणालीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की शहरातील बहुतेक नाले आणि गटारे अजूनही गाळ आणि कचऱ्याने तुंबलेली आहेत. जर नाले वेळेवर आणि प्रभावीपणे स्वच्छ केले असते, तर पावसाचे पाणी नाल्यांमधून सुरळीतपणे वाहून गेले असते. याउलट, अनेक ठिकाणी घाणेरडे गटार रस्त्यांवर वाहत आहे, ज्यामुळे रहिवाशांना मोठी गैरसोय होत आहे. शिवसेना नेते सज्जी आयपी आणि शिवसेना प्रवक्ते रामभुवन शर्मा यांनी महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारावर गटार साफसफाईचे केवळ वरवरचे आश्वासन दिल्याचा आरोप केला आहे. रामभुवन शर्मा म्हणाले की, कंत्राटदाराने केवळ वरवरची स्वच्छता केली, पण वस्तुस्थिती अशी आहे की गटारांमध्ये आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण अजूनही तशीच आहे. त्यांनी असा आरोप केला की, गटार स्वच्छतेवर खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांचा फायदा जमिनीवर दिसून येत नाही.

नौपाड्यात स्पा व मसाज सेंटरवर कारवाई करावी – संजय वाघुले

अनिल ठाणेकर ठाणे, नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व स्पा व मसाज सेंटरची चौकशी करून गैरप्रकार करणारी सेंटर तत्काळ बंद करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेश आव्हाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दादा पाटील वाडी येथील एका कॉम्प्लेक्समधील सदनिकेत वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नौपाडा पोलिसांना निवेदन दिले. या वेळी नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले, संतोष साळुंखे, प्रशांत कळंबटे, राजेश ठाकरे, सई कारुळकर, भाग्यश्री मुळे, राणी क्षीरसागर, भक्ती मोहिते, मनोज स्नेही, हिमांशू राजपूत आदी उपस्थित होते. यापूर्वी गेल्या वर्षी स्टेशनजीकच्या पॅराडाईज टॉवरमध्ये स्पा सेंटरमध्ये गैरप्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळीही पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच शांत, सुशिक्षित नौपाड्यात गैरप्रकार रोखण्यासाठी दाद मागण्यात आली होती. संबंधित स्पा सेंटरला घर भाड्याने देण्याबाबतचा करार नोंदणीकृत केला आहे का, पोलिस स्टेशनकडून व्हेरिफिकेशन केले आहे का, संबंधित मसाज सेंटरकडे मसाज सेंटर व्यवसाय नोंदणीचा परवाना आहे का, याची चौकशी करावी. नौपाड्यातील सर्व स्पा सेंटरचे चालक व जागा भाड्याने देणारे मालक यांच्या भाडेकराराची तपासणी करून पोलिस चौकशी करावी. तसेच परिसरातील नागरिकांकडून तोंडी वा फोनवर तक्रार आल्यास तत्काळ दखल घ्यावी, पोलिसांच्या गस्ती पथकाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवावी, स्पा सेंटर व मसाज सेंटरला जागा भाड्याने देणाऱ्या मालकांनी पोलिसांकडून व्हेरिफिकेशन सर्टीफिकेट घेतले नसल्यास संबंधित मालकाविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 00000000000

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे टनेल बोरिंग मशीनद्वारे विक्रोळी येथून उत्खननास सुरुवात  

मुंबई :    मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पहिले टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) आज, पाच जुलै 26  विक्रोळी शाफ्ट येथून बांधकामाधीन मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाच्या दिशेने बोगद्याच्या उत्खननाचे काम सुरू करणार आहे. एकूण 21 किमी लांबीच्या भूमिगत बोगद्यापैकी, मुंबईतील सावली (घणसोली) ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यानचा 16 किमी लांबीचा भाग टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने बांधण्यात येणार आहे.           उर्वरित 5 किमी लांबीच्या भागाचे बांधकाम एनएटीएम पद्धतीने आधीच पूर्ण झाले आहे. (Tunnel…

लालपरीची ज्ञानयात्रा, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना एसटीचे सुरक्षित पंख-प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे,  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ ही केवळ प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणारी बस नसून, राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, सुरक्षिततेची आणि उज्ज्वल भविष्याची विश्वासू जीवनवाहिनी बनली आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याचे सामाजिक दायित्व एसटी महामंडळ गेली अनेक दशके यशस्वीपणे पार पाडत असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. सरनाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी महामंडळाकडून शालेय वेळेत बसस्थानकांवर पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. हे कर्मचारी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसमध्ये चढण्यास मदत करतात. तसेच, प्रवासादरम्यान कोणतीही अडचण उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी एसटीने स्वतंत्र टोल-फ्री मदत केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. राज्यात दररोज सुमारे ३०,१७७ शालेय फेऱ्यांद्वारे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित व नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडथळा येऊ नये, यासाठी एसटी महामंडळ विविध प्रवासी सवलतींच्या योजना प्रभावीपणे राबवत आहे. अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना १०० टक्के मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय शैक्षणिक सहलींसाठी ५० टक्के सवलत, मासिक विद्यार्थी पासवर ६६.६७ टक्के सवलत, तसेच उन्हाळी सुट्टी, परीक्षा, शैक्षणिक शिबिरे किंवा आजारी पालकांना भेटण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रवासासाठीही ५० टक्के सवलत देण्यात येते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातच २५.१३ लाख अहिल्याबाई होळकर पास आणि २७.९८ लाख विद्यार्थी मासिक पास वितरित करण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांसाठी NCMC स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रियाही सुरू असून, त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ, आधुनिक आणि पारदर्शक होणार आहे. याशिवाय कौशल्य सेतू अभियानांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासभाड्यात ६६.६७ टक्के सवलत देण्यात येत आहे. तसेच मानव विकास योजनेअंतर्गत राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये ९६६ बसेसद्वारे ७३,६२१ मुलींना मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देत शिक्षणातील समान संधीचे स्वप्न साकार करण्यात येत आहे. “एसटीची ‘लालपरी’ ही आज केवळ रस्त्यावर धावणारी बस नाही, तर ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांची सारथी, प्रत्येक पालकाच्या विश्वासाची हमी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत धावणारी ज्ञानगंगा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा दीप अखंड तेवत ठेवण्याचे हे सामाजिक कार्य एसटी महामंडळ यापुढेही अधिक सक्षमपणे, संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने सुरू ठेवेल,” असा विश्वास परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.