Category: होम

बेशिस्त रिक्षाचालकांविरोधातील स्वाक्षरी मोहिमेला प्रवाशांचा प्रतिसाद

भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचा पुढाकार     ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांविरोधातील स्वाक्षरी मोहिमेला ठाण्यातील प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या…

विरोधीपक्ष विषाप्रमाणे काम करतोय – आ. संजय केळकर

अशोक गायकवाड   पनवेल : भारतीय जनता पक्ष सत्ता लोकांच्या सेवेसाठी म्हणून बघतो मात्र विरोधक स्वार्थासाठी सत्ता मिळवू पाहत आहे.त्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपासून विरोधकांनी खूप अपप्रचार केला, आणि विष जसे…

माथेरान मधील रस्त्यांची चाळण !

व्यापारी ,पर्यटक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त   माथेरान : माथेरान मधील मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून विविध ठिकाणी लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक पावसाने वाहून गेल्याने रस्त्यांची गटारे झाली आहेत. धुळविरहीत रस्त्याला एकमेव पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी स्थानिकांच्या मागणी नुसार सनियंत्रण समितीने रस्त्यावर क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्यास परवानगी दिल्याने इथे धुळीचे प्रमाण काहीअंशी का होईना कमी झाले आहे. तर नेहमीच विकासाला विरोध करणाऱ्या राजकीय वरदहस्त असलेल्या मंडळींना मुळातच हे क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते नकोशे वाटतात.एकीकडे याच क्ले ब्लॉकच्या रस्त्याचा वापर सुध्दा करायचा आणि विरोधी भूमिका पण घ्यायची अशा परिस्थितीत गावाचा विकास खुंटत चालला आहे. काही ठिकाणी जुन्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे प्रवास करताना पर्यटकांना,नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.नवीन ब्लॉक लावण्यास सध्यातरी कोर्टाने बंदी घातली आहे त्यामुळे जुने ब्लॉक लावून रस्ते पूर्ववत करावेत नगरपरिषदेच्या माध्यमातून लवकरच ही रस्त्यांची महत्वपूर्ण अत्यावश्यक सुविधा पूर्णत्वास न्यावी जेणेकरून याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होणार नाही अशी मागणी स्थानिक तसेच व्यापारी वर्गातून केली जात आहे. ——————————————————- हुतात्मा भाई कोतवाल नावाने नगरपरिषदेने शॉपिंग मार्केट बनविले स्टेशन परिसरात गजबजलेल्या परिसरात हे मार्केट असून नगरपरिषदेने प्रथम ह्याच रस्त्याला क्ले पेव्हर ब्लॉकचा पायलट प्रोजेक्ट बनवला होता.  पण आज त्या रोडची अतिशय खराब परिस्थिती झाली आहे ह्या रस्त्यावरूनच महत्वाच्या भागात जाण्यासाठी सततची रहदारी सुरू असते. पण नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे कित्येक पर्यटक अपघात होऊन जखमी झाले आहेत. तरीही हा रस्ता अनेक महिन्यांपासून दुरुस्त केला जात नाही ह्या रस्त्याला ज्या हुतात्म्यांचे नाव दिले आहे त्यांच्या नावाची तरी कदर करून हा रस्ता दुरुस्त करण्याची तसदी घ्यावी. प्रदिप घावरे— माजी नगरसेवक 00000

अनधिकृत व्यवसायांवर व बेवारस वाहन पार्कींगवर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागाअंतर्गत येणारे नेरूळ रेल्वे स्टेशन पश्चिम व पूर्व, सेक्टर-2 नेरूळ राजीव गांधी ब्रिजजवळ, सेक्टर – 1 शिरवणे न्यु मॉर्डन बार जवळ, सेक्टर -15 फकिरा…

‘प्रत्येक सणातून राजकीय वातावरण निर्मिती करा’

मंत्री रवीद्र चव्हाण यांचा कार्यकर्त्यांना सल्ला   उल्हासनगर : विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे येत असलेल्या प्रत्येक सणामध्ये राजकीय वातावरण निर्मिती करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले. विधानसभा कार्यकारिणी विस्तारित बैठकीत चव्हाण बोलत होते. विधानसभा निवडणूक अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे भाजप जोमाने कामाला लागला आहे. मोदी सरकारने मागील दहा वर्षांत २५ करोड भारतीयांना गरिबीतून बाहेर काढल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, २०१९ मध्ये आपल्याबरोबर गद्दारी झाली; मात्र आता तसे होणार नाही. त्यामुळे पुढची पाच वर्षे विधानसभेत आपली सत्ता राहणार, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने चालू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँगेस सरकार भ्रष्टाचारी सरकार होते. त्यामुळे ते पुन्हा निवडून आल्यावर योजना बंद करेल, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी कलानी कुटुंबावर टीका करत त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पाढा वाचला. तसेच, ज्येष्ठ नेते नरेंद्र राजानी यांनीही कलानी कुटुंबाचा समाचार घेतला. आमदार कुमार आयलानी यांनी कलानी कुटुंबाकडून कोणीही उमेदवार असला तरी विजय मात्र भाजपचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. या बैठकीला मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, जमनु पूरस्वानी, संजय गुप्ता, प्रशांत पाटील, नरेंद्र राजानी, मीना आयलानी आदी उपस्थित होते.

राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा अधिक बळकट होणार

मुंबई  : राज्यातील मोफत रुग्णवाहिका सेवा ”१०८” आणखी मजबूत होणार आहे. ही सेवा देण्यासाठी राज्य सरकारने नवीन कंपनीची निवड केली आहे. राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी म्हणजे रुग्णवाहिकांची संख्या पूर्वीपेक्षा जवळपास…

वाय पी ग्रुप कडून ठाण्यात रक्तदान शिबीर!

सलमान पठाण     ठाणे ; ठाण्यातील वागळे परिसरातील इंदिरा नगर रोड न. २२ येथे वाय पी ग्रुप यांच्याकडून ७ ऑगस्ट बुधवारी  सकाळी ११ ते २ या दरम्यान  रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. ठाण्यातील वागळे परिसरातील समाजसेवक योगेश पाठक यांच्या कडून लोकांमध्ये जनजागृती साठी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. समाजसेवक योगेश पाठक यांच्याकडून रुग्ण तपासणी , मेडिकल कॅम्प, रक्तदान शिबीर अशे विविध उपक्रम नेहमीच राबविले जातात. आजारी रुग्णांना लवकरात लवकर रक्ताची सोय व्हावी या साठी त्यांनी ब्लड लाईन या रक्तपेढीसोबत  मिळून हा उपक्रम राबवला  या प्रसंगी खूप मोठ्या  प्रमाणात नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर ७३ लोकांनी रक्तदान करून हा कॅम्प यशस्वी केला या रक्तदान शिबिराला भारतीय जनता पक्षाचे ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक भारत चव्हाण यांनी देखील उपस्तीथी लावली होती.  ज्या ७३ नागरिकांनी रक्तदान  केले त्यांना अल्पोहार व त्याच बरोबर रक्तदान केल्याचं प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

‘बेस्ट’ दिनादिवशी प्रवासी बसस्टॉपवर ताटकळत

रमेश औताडे     मुंबई : काही वर्षापूर्वी बेस्ट ही भारतातील एक उत्कृष्ट सार्वजनिक बस सेवा होती. मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट व्यवस्थापनाने बेस्ट सेवा कशी मोडकळीस आणता येते हे यशस्वीपणे दाखवून देत खाजगी कंत्राटदारांचे अविश्वसनीय आणि असुरक्षित जाळे तयार करून प्रवाशांना अनेक संकटाचा सामना करण्यास बस स्टॉपवर ताटकाळत सोडले आहे. असा आरोप ‘आमची मुंबई आमची बेस्ट’ या संघटनेच्या वतीने संघटनेचे समन्वयक विद्याधर दाते यांनी ‘बेस्ट’ दिनाच्या पार्श्वभुमीवर मुंबई प्रेस क्लब येथे केला. यावेळी जेष्ठ पत्रकार लेखक राजु परुळेकर व प्राध्यापक ताप्ती मुखोपाध्याय प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना राजु परुळेकर म्हणाले, बॉम्बे ची मुंबई झाली तेव्हापासून मुंबईची दुरवस्था होण्यास सुरवात झाली. मुंबईची लोकसंख्या वाढत चालली अन् बेस्ट बस चे अनेक मार्ग बंद होत गेले व काही विस्तारित होत गेले. आता अडाणी चे लक्ष बेस्टवर अजून कसे गेले नाही ? असे सांगत असतानाच , ते म्हणाले, अडाणीला बेस्ट प्रवासी सेवा याबद्दल काही घेणे देणे नसेल. त्यांचा डोळा हजारो एकर बेस्ट डेपोच्या जमिनीवर असेल. बेस्टचा ताफा पूर्णपणे सार्वजनिक (बेस्टच्या मालकीचा) केला पाहिजे. सार्वत्रिक वाहतुक व्यवस्था उपलब्ध असणे हे वाहतूक नियोजनाचे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे, बंद केलेले सर्व बस मार्ग पुन्हा सुरू करावेत.  सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण सुधारणे हे पर्यावरणीयदृष्ट्या योग्य आहे. बसेसची संख्या २००० लोकसंख्येमागे किमान १ बस पर्यंत वाढवावी किमान ६००० बसेस उपलब्ध कराव्यात.अशी मागणी यावेळी संघटनेचे पदाधिकारी रंगा सतोसे यांनी यावेळी केली. लोकांना खाजगी वाहतुकीपासून परावृत्त करून सार्वजनिक वाहतुक वापरण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. सर्व सामान्य लोकांना वेळेवर प्रवास करण्याचा अधिकार आहे. बेस्ट बसेसना मुख्य रस्त्यांवर वेगळ्या स्वतंत्र मार्गिका दिल्या पाहिजेत. सार्वजनिक जमीन ही जनतेची आहे, बिल्डरांची नाही. बेस्ट डेपोचा पुनर्विकास थांबवावा. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 211 विना परवानगी बॅनर्सवर धडक कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विनापरवानगी कुठेही लावण्यात येणा-या बॅनर्स / होर्डींगमुळे शहर विद्रुपीकरण होत असून ते रोखण्याकरिता महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत नियमित कारवाई करण्यात येत असते. तथापि मागील दोन दिवसात शहरात मोठया प्रमाणावर बॅनर्स लागले असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागामार्फत धडक मोहीम हाती घेऊन 6 ऑगस्टला एका दिवसात 211 विनापरवानगी बॅनर काढून टाकण्यात आले आहेत. यामध्ये बेलापूर विभागात 29, नेरुळ विभागात 40, वाशी विभागात 10, तुर्भे विभागात 28, कोपरखैरणे विभागात 18, घणसोली विभागात 42, ऐरोली विभागात 27, दिघा विभागात 17 अशाप्रकारे एकूण 211 विनापरवानगी बॅनरवर धडक कारवाई करण्यात आली.…

जेसीबी वाहतुकीस अडथळ्यांमुळे कायदेशीर कर्तव्यात कसूरता !

वाहतूक विभागाचे उपआयुक्त डॉ. विजयकुमार राठोड यांना नितीन देशपांडे यांचा प्रश्न अनिल ठाणेकर     ठाणे स्टेशन जवळील गावदेवी मैदाना समोर गेल्या दहा दिवस एक जेसीबी वाहनाच्या चाकातील हवा गेल्यामुळे उभा असून वाहतुकीस अडथळा होत आहे. ठाणे स्टेशनवर जाण्यासाठी वाहनाची दिवसरात्र न भुतो न भविष्यती ये जा करीत असतात . काही वेळेस प्रचंड वाहतूक कोंडीही असते.म्हणूनच हा एक दिशा मार्ग ठेवला आहे.याची कल्पना वाहतूक विभागाला असतानाही सदर बाबतीत ही बाब कायदेशीर कर्तव्यात कसूर नाही का ? असा प्रश्न धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी वाहतूक विभागाचे उपआयुक्त डॉ.. विजयकुमार राठोड यांना विचारला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे ठाण्याचे असताना त्यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी वाहतूक विभागाने जी तत्परता वाहतूक वळवण्यासाठी घेतली त्यापेक्षाही अधिक तत्परता वरील सार्वजनिक बाबतीत घेणे हे कायद्याला अपेक्षित असताना आपल्या विभागाचा दुर्लक्ष केल्यामुळे अनेक वाहनधारक व पादचारी यांना त्रास होतोय एवढेच नव्हे तर पादचार्यांची सुरक्षिताही धोक्यात आहे याची गंभीर नोंद घ्यावी. सदर बाब म्हणजे ” सरकार हे जनतेचे आहे” असे प्रतिपादन मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे नेहमीच करीत असतात याची जाणीव अपणास आहे का ? धर्मराज्य पक्षांच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत तत्काळ वरील बाबतीत कार्यवाही करून वाहतुकीचा अडथळा दूर करावा, अशी मागणी नितीन देशपांडे यांनी केली आहे.