Category: होम

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ

कामकाज दिवसभरासाठी तहकूब   गदारोळात ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या  मंजूर मुंबई   :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर काल  बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस महाविकास आघाडीने बहिष्कार टाकल्यानंतर बुधवारी महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही…

आमदार ‘पक्ष’कैदेत

० विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी ० आमदारांवर हॉटेलच्या सीसीटीव्हीची नजर ० मतदान होईपर्यंत आमदारांचा मुक्काम पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्वाती घोसाळकर मुंबई: विधान परिषदेच्या मतदानाआधी सावधगिरीचा उपाय म्हणून प्रत्येक पक्षाने आपल्या आमदांराना…

‘खरीप हंगाम २०२४’ पिकस्पर्धेसाठी शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा – रविंद्र बिनवडे

अशोक गायकवाड       रायगड : खरीप हंगाम २०२४ पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्य, रविंद्र बिनवडे यांनी केले आहे. राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वार्डावण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या ११ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी : पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै दूसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे.स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० राहिल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती, जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची काग पत्रे – विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतक-याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते, चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप, सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वित्तीय व तृतीय क्रमाकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे. तालुकापातळी सर्वसाधारण व आदिवासी गट रुपये पहिले ५ हजार, दुसरे ३ हजार, तिसरे २ हजार, जिल्हापातळी पहिले १० हजार, दुसरे ७ हजार, तिसरे ५ हजार, राज्यपातळी पहिले ५० हजार, दुसरे ४० हजार, तिसरे ३० हजार. खरीप हंगाम सन २०२४ पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्य, रविंद्र बिनवडे यांनी केले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ- www.krishi.maharashtra.gov.in किवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

 दिव्यांगाच्या कल्याणकारी योजनांसाठी खासदार नरेश म्हस्के यांचा पुढाकार

दिव्यांगांचे अनुदान वितरित करण्याबाबत आयुक्त सकारात्मक     ठाणे : राज्य शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दारिद्रय निर्मुलन समिती अंतर्गत विविध दिव्यांग कल्याणकारी योजना आणि महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. मात्र गेल्या दोन वर्षापासून दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी याबाबत चर्चा केली. सदरचे अनुदान लवकरच वितरित करण्याबाबत कार्यवाही केली जाईल असे आयुक्तांनी या चर्चेत नमूद केले. दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी दरवर्षी महापालिकेतर्फे एकूण बजेटच्या पाच टक्के इतकी रक्कम राखीव ठेवली जाते. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी स्टॉलचे वाटप, दिव्यांग स्कूटर, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दिव्यांगाच्या व्यायामशाळा, परिवहन सेवेमध्ये 100 टक्के सवलत व बेरोजगार दिव्यांगासाठी रु. 24,000/- इतके अनुदान वितरित करण्यात येते. परंतु मागील दोन वर्षापासून सदरचे अनुदान बंद झाले असल्यामुळे दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत धर्मवीर दिव्यांग सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केले होते. खासदार नरेश म्हस्के हे ठाणे महापालिकेत सभागृह नेता असताना त्यांच्या संकल्पनेतून महिला व बालकल्याण समितीच्या विविध योजना तसेच दिव्यांग कल्याणकारी योजनांमध्ये नवीन योजनांची सुरूवात करुन त्याची अंमलबजावणी केली होती. या महत्वाकांक्षी योजनांची नोंद राज्यातील इतर महापालिकांनी घेवून त्यांनी देखील अशा योजना राबविण्यास सुरूवात केली आहे. या दोन्ही योजनांचा फायदा ठाणे शहरातील अनेक गरीब व गरजू नागरिकांना होत आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत घरे वाटप करणे, स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करुन देणे अशा अनेकविध योजना महापालिकेने राबविल्या असून याची नोंद संपूर्ण राज्याने घेतली होती. परंतु अचानकपणे अनुदानाची रक्कम बंद केल्यामुळे दिव्यांग व्यक्तींसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत झालेल्या चर्चेत खासदार नरेश म्हस्के यांनी दिव्यांगाच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने चर्चा केली. तसेच महिला व बालकल्याण समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाही राबवाव्यात असेही आयुक्तांना सांगितले. चर्चेअंती आयुक्तांनी दिव्यांग कल्याणकारी योजना आणि  महिला व बालकल्याण समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतही निर्णय घेवून त्याची त्वरीत  अंमलबजावणी केली जाईल असे नमूद केले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त  1-संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 – प्रशांत रोडे, धर्मवीर दिव्यांग सेनेचे अध्यक्ष गिरीष मेहरोल, सचिव शरद पवार व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी पुढाकार घेवून आयुक्त यांच्याशी चर्चा करुन या बैठकीत दिव्यांगाच्या योजनांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. 000000

राणीच्या बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणीसंग्रहालय व उद्यान- प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर       ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनामध्ये ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात मंगळवारी एक बैठक पार पडली. त्यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वनखात्याच्या १५० एकर जमिनीवर  मुंबईतील भायखळा येथील जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर उद्यान करण्याची विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी केली असता मुख्यमंत्र्यांनी त्यास मान्यता देऊन वनखात्याच्या प्रधान सचिव व उपस्थित अधिकार्यांना त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले. ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजुबाजूच्या शहरामध्ये इमारतीचे बांधकाम वाढत चालले आहे. ठाण्यातील नागरिक हिरव्यागार उद्यानाकडे आकर्षित असल्यामुळे अश्या प्रकारचे उद्यान निर्मिती केल्यास आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रातील अबाल वृध्दांना या उद्यानाचा फायदा होईल. काही महिन्यांपूर्वी ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोलशेत भागात नमो उद्यान सुरू करण्यात आले असून या उद्यानाचा आनंद  घेण्यासाठी तरूण-तरूणी, अबाल-वृध्द येत असतात. त्याचप्रमाणे हावरे सिटी येथे प्राणीसंग्रहालय व उद्यान झाल्यास त्याचा आंनद शाळकरी मुलांना व अबालवृध्द तसेच नागरिकांना मिळू शकतो.त्यानुसार या १५० एकर जागेवर बाबूंच्या झाडांबरोबरच इतरही झाडांची लागवड होणार आहे. तसेच विविध प्रकारचे प्राणी व पक्षी सुध्दा या उद्यानामध्ये उपलब्ध होणार आहेत. वनखात्याच्या नियमानुसार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करता फक्त प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जेवढे बांधकाम करता येईल तेवढेच बांधकाम अनुज्ञेय करता येईल. त्यापैकी बहुतांश बांधकाम हे लाकडाचे असावे असाही अभिप्राय वनखात्याच्या अधिकार्यांनी दिला. मुंबईतील राणीची बाग तसेच नागपूरची महाराज बाग त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेतही अश्या प्रकारचे उद्यान लवकरच साकारण्यात येणार आहे, असे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव  विकास खार्गे,  अतिरिक्त प्रधान सचिव आय.एस. चहल, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, सचिव जलसंपदा संजय बेलभरे, जतून कपोले, उदय ढगे, क्लेंमेंट बेन, जी. मल्लिकार्जुन, दिपक खांबीत, श्री. उदय मराठे, अनिल अंकलगी,  अजित कवडे, विनोद पवार, संजय कदम, अतुल कुलकर्णी, पी.एम. शिंदे हे अधिकारी उपस्थित होते. 000000

वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टचे वैद्यकीय पथक वारीत

मुंबई : वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या आतापर्यंतच्या आषाढी व कार्तिकीवारीत वैद्यकीय सेवा देणाऱ्या अलौकिक कार्याचा गौरव केला. या वारीत संस्थेचे २५० कार्यकर्ते व डॉक्टर रुग्णवाहिका, औषधांच्या…

 ‘खांदेश्वर पोलीस ठाण्यात धूळ पडलेले वाहन तुमचे तर नाही ना ? ‘

वाहन मालकांच्या प्रतीक्षेत खांदेश्र्वर पोलीस राज भंडारी       पनवेल : शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या बेवारस वाहनांप्रमाणेच पोलीस ठाण्यांमध्ये धूळ खात पडून असलेल्या वाहनांची मोठी समस्या आहे. या वाहनांच्या  मालकांचा शोध घेतला जातो. मात्र, गाडीमालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या आवारात अशा वाहनांचा खच लागत असून प्रदूषणासह अनेक समस्या उद्भवत आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत खांदेश्र्वर पोलीस ठाण्यांमध्ये अशीच २० वाहने धूळखात पडली आहेत. त्या वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. पोलीस ठाण्याकडून यापूर्वीही मोहीम राबवून गाड्यांच्या मालकांचा शोध घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा गाड्यांची भर पडली आहे. खांदेश्र्वर पोलीस ठाण्याच्या आवारात १६ दुचाकी, २ चारचाकी आणि २ ऑटो रिक्षा आपल्या मालकांच्या प्रतीक्षेत आहेत. सदर वाहने वाहन मालकांनी त्वरित घेवून जाण्यासाठी खांदेश्र्वर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाय. टी. चव्हाण यांच्या सहीचे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये वाहन मालकांना आपापले वाहन घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कंत्राटी कामगारांची मागण्यांसाठी १८ जुलैला ठामपा मुख्यालयावर दिंडी

अनिल ठाणेकर     ठाणे : महानगरपालिकेची कायमस्वरूपी बारामाही आणि सतत नियमितपणे चालणारी कामे कंत्राटी कामगारांच्या कडून करून घेतली जातात. मात्र वेतन, भत्ते, बोनस, भरपगारी रजेचे वेतन आणि अन्य कायदेशीर सोयी सुविधा देताना ठेकेदार लबाडी करतात. महापालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प राहून ठेकेदार यांना पाठीशी घालत असल्याने सर्व विभागातील कंत्राटी कामगार श्रमिक जनता संघ युनियनच्या नेतृत्वाखाली अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी येत्या १८ जुलै रोजी ठाणे महापालिका मुख्यालयातवर दिंडी काढून महापालिका आयुक्त सौरव राव यांना साकडे घालणार आहेत. या वेळी विविध प्रमुख मागण्यांबाबत अंमलबजावणी करण्यासाठी आग्रह धरण्यात येईल, अशी माहिती महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली. आत्यावश्यक सेवेतील नियमित स्वरुपाची बारामाही सतत चालणारी कामे करणार्‍या कंत्राटी कामगारांना कायम कामगारां प्रमाणे वेतन, भत्ते व  सोयी सुविधा लागु करा. ठाणे महापालिका शाळेतील सफाई कामगार व अन्य खात्यातील कार्यरत कर्मचारी यांना वयोमानानुसार कमी करण्यात आलेले किंवा मरण पावलेल्या कामगारांना उपदान (Gratuity) ची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. कंत्राटी कामगारांना मृत्यु किंवा वयोमानानुसार कामावरुन कमी केल्यानंतर उपदानची रक्कम एका महीण्याच्या आत अदा करा, शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगारांना दरमहा २६ दिवसाचे वेतन, मे महिना, दिवाळीच्या सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीच्या काळात काम द्या / वेतन द्या, प्रत्येक कंत्राटी कामगारांना नियमितपणे वेळेवर कायदेशीर वेतन,गणवेश, ओळखपत्र, वेतनस्लिप, सुरक्षिततेची साधणे, पावसाळी रेनशूट , गमबूट आदी  वाटप करा, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यावर कामगारांना सुट्टी किंवा जादा कामाचा भत्ता मासिक वेतनात अदा करा, कायमस्वरुपी व अत्यावश्यक सेवेत कंत्राटी पध्दत बंद करुन सर्व कार्यरत कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत सामावुन घ्यावे. किंवा कायम स्वरुपी कामगारांच्या सारखे वेतन व भत्ते लागु करा. आदी मागण्यांसाठी सर्व विभागातील कंत्राटी कामगार, सफाई कामगार, वाहनचालक, वाल्वमेन आदींनी मिळून श्रमिक जनता संघ युनियनच्या नेतृत्वाखाली अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी येत्या १८ जुलै रोजी ठाणे महापालिका मुख्यालयातवर दिंडी काढून महापालिका आयुक्त श्री सौरव राव यांना साकडे घालणार आहेत, असेही महासचिल जगदीश खैरालिया यांनी सांगितले. अजय भोसले (कार्यकारी सचिव), सुनील दिवेकर, संतोष देशमुख, स्वाती देशमुख, अर्चना पवार (शिक्षण विभाग), भास्कर शिगवण (रस्ते सफाई), गणेश चव्हाण (पाणी पुरवठा विभाग) सूरज वाल्मिकी आदी कार्यकर्त्यांनी कामगारांना मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.

वृक्षारोपण आणि संवर्धन ही सर्वांची नैतिक जबाबदारी-उमेश जंगम

माथेरान : माथेरान मध्ये सुध्दा यावर्षी उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. त्यासाठी वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज निर्माण झाली असून आम्ही यांचे संगोपन करणार आहोतच परंतु सर्व नागरिकांनी…

 घोडबंदर रोडचा घेतला महपालिकेने आढावा

‘रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने सर्व यंत्रणांनी काम करावे- आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश     ठाणे : पावसाळ्यात रस्ते खराब होऊन त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करताना कमीत कमी वेळेत प्रतिसाद दिला गेला पाहिजे. त्यासाठी महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एक टीम बनून काम करावे. संसाधने, मनुष्यबळ, रस्त्याची मालकी, कामाची जबाबदारी यापैकी कोणतीही अडचण त्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. रस्त्याच्या मालकीविषयी स्पष्टता, संसाधनांचे एकत्रीकरण आणि कमीत कमी कालावधीत रस्ते दुरुस्ती या त्रिसूत्रीने आपण सगळ्यांनी एकत्रित काम करून आपले क्षेत्र खड्डेमुक्त करूया, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे. पावसाळ्यातील रस्ते स्थितीचा, विशेषत:  घोडबंदर रोडचा, आढावा घेण्यासाठी बुधवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सर्व यंत्रणांच्या विभागप्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत, ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता विनय सुर्वे, कार्यकारी अभियंता गुरुदास राठोड, मेट्रोचे समन्वयक जयंत डहाणे, कायर्कारी अभियंता सुरेंद्र शेवाळे आणि अतुल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. आनंद नगर चेक नाका ते गायमुख या पट्ट्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि घोडबंदर रोड यावरील रस्त्याचे कोणते भाग कोणाकडे आहेत, तसेच, त्यावरील कोणत्या मार्गिकेत कोणाचे काम सुरू आहे, उड्डाणपूलांची जबाबदारी कोणाची आहे या विषयीची स्पष्टता येण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र बसून नकाशावर त्याचे रेखांकन करावे. त्यातून रस्त्याविषयी स्पष्टता येईल आणि संदिग्ध स्थिती होणार नाही, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, पावसाळ्यात रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी सर्व यंत्रणांची संसाधने, मनुष्यबळ हे एकाच यंत्रणेचा भाग आहेत. त्यामुळे एकमेकांना सहाय्य करून रस्ता कमीत कमी वेळात दुरुस्त करणे हेच आपले मुख्य उद्दीष्ट आहे. याचा पुनरुच्चार आयुक्त राव यांनी केला.…