Category: होम

ज्येष्ठ पत्रकार कपील राऊत यांना पितृशोक

वडील अनंत राऊत यांचे निधन     ठाणे : ठाणे – मुंबईत झी २४ तासमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार कपिल राऊत यांना पितृशोक झाला. कपील याचे वडील अनंत राऊत यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, पुतणे आणि नातवंडे असा परिवार आहे. ठाणे पुर्वेकडील कोपरी परिसरात राहणारे अनंत राऊत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासुन खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्याने उपचारा दरम्यान शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर  कोपरी ठाणेकरवाडी येथील स्मशानभूमीत दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी निरंजन डावखरे,माजी नगरसेवक भरत चव्हाण, भाजप प्रवक्ते अजित चव्हाण आदिसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तसेच अनेक पत्रकार मित्रांनी उपस्थित राहून पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. अत्यंत मीतभाषी, मनमिळाऊ स्वभावाचे अनंत राऊत यांच्या जाण्याने कोपरी भागात हळहळ व्यक्त होत आहे. 00000

कोपरी शांती नगर भागात अद्यावत शौचालय

ठाणे : कोपरी शांती नगर परिसरात सार्वजनिक शौचालयाची चांगली व्यवस्था नसल्यामुळे गैरसोय होत होती. परंतु माजी ज्येष्ठ नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी ठाणे महापालिकेने सुसज्य सार्वजनिक शौचालय बांधून दिले…

 घोडबंदर रोडवरील वाहतुकोंडी दूर होणार-प्रताप सरनाईक

२० हजार कोटींच्या गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंत भुयारी मार्ग व फाऊंटन हॉटेल जंक्शन ते उन्नत भाईंदर मार्गाला मंजूरी ! अनिल ठाणेकर     ठाणे : २० हजार कोटी खर्चुन गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार असून आठ पदरी उन्नत मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यावरून वसई, विरार, मीरा रोड तसेच भाईंदरकडे जाणाऱ्या प्रवाश्यांची, वाहतुक कोंडीपासून सुटका होईल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भुयारी मार्गासाठी अंदाजे ११५०० कोटी रूपये व भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या उन्नत मार्गासाठी अंदाजे ८५०० कोटी असे दोन्ही प्रकल्पांना अंदाजे २० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार असून गायमुख ते फाऊंटन हॉटेल या भागाची एकूण लांबी ५.५ किमी असून या अंतर्गत प्रत्येकी ३.५ किमी लांबीचे दोन स्वतंत्र बोगदे ३+३ असे सहा पदरी बांधण्यात येणार आहेत. तसेच भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंतच्या रस्त्याची एकूण लांबी १० किमी असून ४+४ असे आठ पदरी उन्नत मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यावरून वसई, विरार, मीरा रोड तसेच भाईंदर कडे जाणार्या प्रवाश्यांची वाहतुककोंडीपासून सुटका होईल, असे आमदार  प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या दोन्ही प्रकल्पांना एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी मंजुरी दिल्याबद्दल आमदार  प्रताप सरनाईक यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त  संजय मुखर्जी यांचे आभार मानले. घोडबंदर रोडवर होत असलेल्या वाहतुककोंडीवर उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मंगळवार २ जुलै, २०२४ ला एम.एम.आर.डी.ए. च्या प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत भुयारी मार्ग व फाऊंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर उन्नत मार्ग या दोन्ही प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात चार पदरी मार्गिका असून या मागील ठाणे शहरातील घोडबंदर रस्त्याचा भाग व पुढील राष्ट्रीय महामार्गाचा भाग विस्तृत रूंदीचे आहेत. त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडी होते. तसेच या रस्त्याचा काही भाग घाट स्वरूपातील असून या भागात अवजड वाहनांची वाहतुक देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वाहतुकीची गती धीमी असते. या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी या रस्त्याच्या भागाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे तथापि, रस्त्याच्या एका बाजुला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व दुसर्या बाजुला ठाणे खाडी असल्याने रस्त्याचे रूंदीकरण करणे अश्यक्य आहे त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भाईंदर  ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात देखील वाहतुककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे वर्सोवा ते भाईंदर  या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने भाईंदर  ते घोडबंदर रोडपर्यंत येण्याकरिता अंतर्गत रस्त्याचा वापर करण्यात येणार असून खाडी किनारा लगत असणारा खारफुटीचा भाग लक्षात घेता वाहतुककोंडीवर उपाय योजना करण्यासाठी भाईंदर  ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत उन्नत मार्ग होणे गरजेचे आहे. ठाणे शहरातून घोडबंदर मार्गे वसई, विरार, मीरा रोड तसेच ठाणे ते भाईंदर  येथे जाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. घोडबंदर रोडवरील वाहतुककोंडी दुर करण्यासाठी गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग बांधण्यात यावा तसेच भाईंदर  ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत उन्नत मार्गाची निर्मिती व्हावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या ७-८ वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन मंगळवारी झालेल्या एम.एम.आर.डी.ए.च्या बैठकीमध्ये वसई, फाऊंटन हॉटेल जंक्शन ते गायमुख या भागात भुयारी मार्ग बांधण्यासाठी तसेच गायमुख ते वसई भुयारी मार्गाने येणार्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदर ला अतिवेगाने जाता यावे यासाठी फाऊंटन हॉटेल जंक्शन, वसई ते भाईंदरपर्यंत उन्नत मार्गाची निर्मिती करण्यासाठी एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी मंजुरी दिलेली आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. ०००००

४ जुलैचा योगायोग…

शुक्रवार, 4 जुलै 1975.. वेळ संध्याकाळची सव्वासहाची.. आज गुरूवार, 4 जुलै 2024.. तीच तारीख, वार फक्त एक दिवस आधीचा.. माझ्या जीवनातील आणीबाणी पर्व सुरू झाले ते याच दिवशी.. आज बरोबर…

धमाल पावसाळी कॅम्पिंग…

प्रासंगिक सायली शिगवण शहराच्या गोंगाटापासून दूर कुठे तरी निसर्गाच्या सानिध्यात रात्र घालवण्याचा अनुभव काही औरच. यातही मित्र, मैत्रिणी सोबत असले तर विचारायलाच नको. विशेषत: पावसाळ्यातल्या कॅम्पिंगचा अनुभव खूप काही देऊन…

विरोधकांचे अशोभनीय वर्तन…

अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू होऊन त्याचा पहिला टप्पा नुकताच आटोपलेला आहे. संसदीय लोकशाहीत संसदेत किंवा विधिमंडळ मंडळात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोन प्रमुख स्तंभ असतात. यात सत्ताधारी…

हाथरसमधील मृतांच्या कुटुंबीयांची राहुल गाधींनी घेतली भेट

हाथरस : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी हाथरस पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. अलीगढ येथील पिलखाना येथे हाथरस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी राहुल गांधी पोहोचले होते. यावेळी राहुल गांधी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या…

ऋषी सुनक यांच्या पक्षाचा ब्रिटनच्या निवडणूकीत पराभव

ब्रिटन : ऋषी सुनकयांच्या १४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटीव्ह पक्षाला ब्रिटिशांनी सत्तेबाहेर फेकले आहे. तर लेबर पार्टीला ४०० पार नेऊन ठेवले आहे. भारताशी वंशाच्या पंतप्रधान ऋषी सुनक यांचा दारुण पराभव झाला आहे. ब्रिटनमध्ये एक्झिट पोल खरे ठरले…

आता फैसला १३ जुलैलाच- जरांगे

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात २८८ उमेदवार उभे करायचे की २८८ उमेदवार पाडायचे याचा फैसला आता १३ जुलैलाच होईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.  मराठा आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या…

पेपरफुटीला आळा घालणारे विधेयक विधानसभेत सादर

मुंबई : देशात नीट आणि  युजीसी परीक्षांमध्ये पेपरफुटीसह अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पेपरफुटीला आळा घालणारे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक…