Category: होम

८वी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

पुण्याचा सुखबिंदर कटनोरिया चौथ्या फेरीत दाखल कोल्हापूर – श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम येथे सुरु असलेल्या कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या…

एमएचटी सीईटीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र, कृषी यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २२ एप्रिल ते १६ मे दरम्यान राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षेच्या निकालाबाबत सीईटी कक्षाकडून वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षकडून पीसीबी ग्रुपची सीईटी परीक्षा २२ ते ३० एप्रिल तर पीसीएम ग्रुपची परीक्षा २ ते १६ मे या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे तत्कालीन आयुक्तांकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर सीईटी कक्षाकडून निकालाची संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली. त्यात एमएचटी सीईटीच्या (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) निकालाची संभाव्य तारीख १० जून अशी जाहीर करण्यात आली होती. परंतु सीईटी कक्षाने एमएचटी सीईटीचा निकाल हा १९ जून किंवा त्यापूर्वी जाहीर करणार असल्याचे संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. सीईटी कक्षाकडून तारखांवर तारखा जाहीर करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सीईटी कक्षाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीला ७ लाख २५ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ७५ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. या विद्यार्थ्यांमध्ये ३ लाख ७९ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी पीसीएम या गटातून तर पीसीबी या गटातून ३ लाख १४ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

पवई भीमनगरमध्ये पोलिसांची दडपशाही?

बेदम मारहाणीचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांकडून पोस्ट मुंबई : दोन दिवसांपूर्वी पवईयेथील जय भीमनगरमधील झोपडपट्टी मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आली होती. त्यानंतर केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी ही झोपडपट्टी पाडण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. दरम्यान, आता या भागातील बेघर रहिवाशांना अमानुषपणे मारहाण होत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एक्स या समाज माध्यमावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी हे आरोप केले. जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत पोलिसांच्या वेशात नसलेली एक व्यक्ती नागरिकांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा अमानुष अत्याचार कुणी का सहन करावा? या व्हिडीओतील रुमाल बांधलेला माणूस कोण आहे. झोपडपट्टी खाली करण्यासाठी केवढी धडपड होते आहे, असे ते म्हणाले. तसेच या प्रकरणाची चौकशी होणार का? असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारला. महत्त्वाचे म्हणजे हा व्हिडीओ पवई भीमनगरमधील असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप याची पुष्टी होऊ शकलेली नाही. तत्पूर्वी शनिवारी (८ जून ) जितेंद्र आव्हाड यांनी या भागातील बेघर रहिवाशांची भेट घेतली होती. यावेळी बोलताना एका बिल्डरच्या अथक परिश्रमामुळे महानगर पालिकेच्या काही निवडक अधिकाऱ्यांनी पोलिसांना फसवत, सगळ्यांनाच गंडवत पुढचा-मागचा विचार न करता ८०० कुटुंबांना रस्त्यावर आणले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती याशिवाय जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही. तोपर्यंत येथे कोणतेही काम होऊ देणार नाही, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले होते. मात्र, तिथे पुन्हा काम सुरू झाले असल्याचा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. तसेच कायदा आणि सुव्यवस्था ही पोलिसांची जबाबदारी आहे. अशाप्रकारे जर पोलीस आपले काम नाकारत असतील तर गोरगरीबांनी कायदा हातात घेतला, तर कोणाला दोष देऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला होता.

फ्लेमिंगोच्या मृत्यूची हरित न्यायाधीकरणाकडून दखल

सिडकोसह वनविभाग, प्राधिकरणाला नोटीस नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या प्रधान खंडपीठाने येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाजवळ फ्लेमिंगोच्या मृत्यूची स्वत:हून दखल घेत राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या (एनजीटी) प्रधान खंडपीठाने सिडको, राज्य वनविभाग आणि पाणथळ प्राधिकरण यांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटीसमध्ये पर्यावरणीय नियमांचे पालन करण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले आहेत. विशेषत: वेटलँड (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियम, २०१७ च्या तरतुदींचे पालन; जैविक विविधता कायदा, २००२ आणि पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ बाबत एनजीटीने टिप्पणी केली आहे. एनजीटी अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव, न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. अफरोज अहमद यांच्या खंडपीठाने फ्लेमिंगोच्या मृत्यूचे प्रकरण पश्चिम विभागाकडे वर्ग केले आणि सुनावणीसाठी १८ जुलैची तारीख निश्चित केली आहे. एनजीटीने नमूद केले की, प्राथमिक निरीक्षणांवर आधारानुसार शहर आणि औद्याोगिक विकास महामंडळाने (सिडको) नव्याने बांधलेल्या उंच रस्त्यांमुळे टी एस चाणक्य तलावातील तीनपैकी दोन तलावांत पाणी येण्याचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे तलावात पाणी साचले होते. फ्लेमिंगो सामान्यत: वाहते पाणी असलेल्या भागात राहतात हे तथ्य. फ्लेमिंगोच्या मृत्यूनंतर त्यांनी उपस्थित केलेल्या चिंतेला त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल पर्यावरणवाद्यांनी स्वागत केले आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी निदर्शनास आणून दिले की, सिडकोने नेरुळ येथील वाहतूक जेट्टीच्या अर्थात टर्मिनलच्या कामामुळे आंतरभरतीच्या पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होणार नाही असे सिडकोने म्हटले असताना स्वत:च्या कामात नियमांचे उल्लंघन केले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिलेल्या पर्यावरण मंजुरीमध्ये नमूद केलेल्या अटींचे हे उल्लंघन आहे. आणि पाण्याचा प्रवाह आणि जीवजंतू अबाधित आहे याची खात्री करण्यासाठी राज्याने दिलेल्या सरकारी आदेशाचेही उल्लंघन केले आहे. जबाब नोंदवण्याचे निर्देश फ्लेमिंगोच्या मृत्यूचे कारण ह्यप्रकाश प्रदूषणह्ण असू शकते, जे त्यांच्या नाजूक डोळ्यांमुळे पक्ष्यांची दृष्टी अंशत: बिघडवते. त्यात असे नमूद केले आहे की, पक्ष्यांना उडताना नवीन स्थापित एलईडी दिवे दिशाभूल करतात, असे एनजीटीने आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे एनजीटीने प्रधान मुख्य वनसंरक्षक-नागपूर, महाराष्ट्र वेटलँड प्राधिकरण, सिडको आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पश्चिम विभागीय खंडपीठासमोर जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

उल्हासनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्याना प्राण किटचे वाटप

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ .  अझिझ शेख यांनी १ नोव्हेंबर २००५ च्या नंतर महापालिकेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्याना सुरक्षित किट ( प्राण किट ) चे वाटप केले आहे. या बाबत आयुक्तानी सांगितले की या कर्मचाऱ्यानी आपल्या वेतनातील एक हिस्सा हा शेअर बाजारात गुंतवला पाहिजे. त्यामुळे आर्थिक बळकटी येण्यास मदत होईल. उल्हासनगर महापालिकेत १ नोव्हेंबर २००५ नंतर महापालिकेच्या सेवेत सादर झालेल्या कर्मचाऱ्यासाठी  शासनाने  अंशदायी  योजना लागु केली असुन त्याच धरतीवर उल्हासनगर महापालिकेने राष्ट्रीय पेंशन योजना लागु केली आहे. दरम्यान काही कर्मचाऱ्याना सेवा निवृत्ती खात्यात सुरक्षित जमा म्हणुन अंशदान रक्कम वेतनातुन कपात करण्यात येणार आहे. तर या कर्मचाऱ्यांचे मासीक वेतन सरळ शेअर बाजारात जमा करण्यात येणार असल्याची माहीती आयुक्त डॉ . अझिझ शेख यांनी दिली आहे. या मध्ये या कर्मचाऱ्याना भविष्य निधी पेक्षा ही जास्त व्याज परत मिळणार आहे. या प्राण किट कार्यक्रमाला  नगररचना सहायक संचालक ललित खोब्रागडे , उपायुक्त डॉ . सुभाष जाधव , मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे , लेखा परिक्षक शरद देशमुख , जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांच्या सह शेकडो कर्मचारी उपस्थित होते .

आषाढी वारीसाठी खास गाड्या

मुंबई : न्यु सातारा समूहाच्या वतीन २००१ पासून दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने मुंबई ते पंढरपूर अशी बस सेवा दिली जाते. यासोबत मोफत चहा, न्याहरी, जेवण, राहण्याची तसेच इतर सोयीसुविधादेखील दिल्या जातात. यंदा १७ जुलै २०२४ रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्ताने मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ या दिवशी सकाळी दहा वाजता या बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ः राजेंद्र घाडगे , न्यू सातारा समूह, डॉ. कंपाऊंड, दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी पूर्व, मुंबई ४०००११. दूरध्वनी क्र. २३७९१५२०, २३७४९६३८, ९९८७१९९५८७ (वेळ सकाळी ९ ते २, दुपारी २.३० ते सायंकाळी ६.३०) यंदा या गाड्या चिंचपोकळी, ना. म. जोशी मार्ग, कांदिवली, मानखुर्द, वाशी, डोंबिवली येथून सोडण्यात येणार आहेत. आषाढी वारीसाठी खास गाड्या मुंबई : न्यु सातारा समूहाच्या वतीन २००१ पासून दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने मुंबई ते पंढरपूर अशी बस सेवा दिली जाते. यासोबत मोफत चहा, न्याहरी, जेवण, राहण्याची तसेच इतर सोयीसुविधादेखील दिल्या जातात. यंदा १७ जुलै २०२४ रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्ताने मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ या दिवशी सकाळी दहा वाजता या बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ः राजेंद्र घाडगे , न्यू सातारा समूह, डॉ. कंपाऊंड, दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी पूर्व, मुंबई ४०००११. दूरध्वनी क्र. २३७९१५२०, २३७४९६३८, ९९८७१९९५८७ (वेळ सकाळी ९ ते २, दुपारी २.३० ते सायंकाळी ६.३०) यंदा या गाड्या चिंचपोकळी, ना. म. जोशी मार्ग, कांदिवली, मानखुर्द, वाशी, डोंबिवली येथून सोडण्यात येणार आहेत.

तंत्रज्ञान क्रांतीमुळे दिव्यांगांचे जीवन सुलभ होईल : राज्यपाल रमेश बैस

अशोक गायकवाड मुंबई : नजीकच्या भविष्यकाळात तंत्रज्ञान विकासामुळे दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक बदल संभवणार असून त्यांचे जीवन सुलभ होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता दिव्यांगांकरिता वरदान ठरेल, असे सांगताना विकलांगता ही गैरसोय राहील, परंतु प्रगतीत अडचण ठरणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. ८) मालाड मुंबई येथे १०० दृष्टिहीन विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारित स्मार्ट चष्म्यांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अंदाजे वीस हजार रुपये किंमत असलेल्या या तंत्रज्ञान आधारित स्मार्ट चष्म्यांमुळे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अभ्यास करणे, शाळेत अथवा अन्यत्र जाणे तसेच इतर दिनचर्येत मदत होणार आहे. या चष्म्यामध्ये लेन्स, प्रोसेसर व स्पीकरचा समावेश आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी दर आठ व्यक्तींमागे एक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे दिव्यांग असून भारताची दोन टक्के लोकसंख्या दिव्यांग आहे. देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविणे गरजेचे आहे, असे राज्यपालांनी सांगितले.दिव्यांगांची सेवा हीच वास्तविक नारायणाची सेवा आहे. दिव्यांग व्यक्तींमध्ये अनेक दिव्य गुण असतात. त्यांना योग्य संधी मिळाली तर ते प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात असे सांगून दिव्यांगांच्या सक्षमीकरणाबद्दल मानवाधिकार आयोग व हेतू चॅरिटेबल ट्रस्ट करीत असलेल्या कार्याबद्दल राज्यपालांनी उभय संस्थांचे कौतुक केले. स्मार्ट चष्मे खरेदीसाठी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच इतर दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते हेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या संकेतस्थळाचे देखील यावेळी उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमात ७५ दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश देखील प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. संदीप मेहता, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. शिवकुमार दिघे व न्या.अभय आहुजा, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड (नि.) व हेतू चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखबचंद जैन प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई उपनगर जिल्हा तसेच हेतू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारत निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ 3 तासांनी वाढवली

पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विनंती निवडणूक आयोगाने स्वीकारली मुंबई: भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदानाची वेळ तीन तासांनी वाढवली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विनंती केल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 3 जून 2024 रोजीच्या आदेशानुसार, मतदानाचा कालावधी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी हा कालावधी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदानाचा कालावधी होता. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार ॲड अनिल परब यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 28 मे रोजी आम्ही आयोगाला पत्र लिहून मतदारांसाठी वेळ योग्य नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. बहुतेक मतदार हे नोकरदार वर्गातील असून ते नेहमी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा मतदान करण्यास प्राधान्य देतात, असे आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते ऍड अनिल परब यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत मतदानासाठी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नाही. त्यामुळे मतदारांना त्यांचा लोकशाही हक्क बजावणे कठीण झाले आहे. त्यांना मतदानाच्या त्यांच्या घटनात्मक अधिकारापासून वंचित ठेवले जाईल. त्यामुळे निवडणुकीत मतदान कमी होऊ शकते. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवणे गरजेचे आहे असे आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याचे परब पुढे म्हणाले. 8 मे रोजी निवडणूक आयोगाने मुंबई आणि कोकण पदवीधर आणि नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या चार विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विलेपार्ले शाखेच्या वतीने आय़ोजित करण्यात आलेल्या चांद्रयान पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात कोकण मराठी साहित्य परिषदेचे ज्येष्ठ सदस्य सुरेंद्र पोतदार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप हॉटेल व्यावसायिक गोविंद शेट्टी तसेच उडिपीचे आमदार गुर्मे सुरेश शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.