Category: महाराष्ट्र

Maharashtra News

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व…!

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीचे वर्चस्व…! उबाठा सेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह ? महायुतीच्या विरोधात बंडखोरी करणारे ७ अपक्ष विजयी. राजन चव्हाण सिंधुदुर्ग : तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत…

जिल्हा परिषदेतही भाजपच पुन्हा नंबर १

१२ पैकी सात जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता  पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता रत्नागिरीत एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्ता सांगलीत महाविकास आघाडी सत्तेत मुंबई : बुहप्रतिक्षित १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या निकालात…

शरद पवारांची प्रकृती बिघडली, पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल

शरद पवारांची प्रकृती बिघडली, पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने बारामतीहून पुण्यातील रूबी रूग्णालयात हलवण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे…

बारावीची परीक्षा आजपासून

बारावीची परीक्षा आजपासून पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे उद्या मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी पासून राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी १० हजार ६६४ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील १५ लाख ३२ हजार ४८७…

महाराष्ट्राच्या क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपला

महाराष्ट्राच्या क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपला पुण्यात खो-खो परिवारातर्फे स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली क्रीडा विश्वावर दुःखाचा डोंगर पुणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके लोकनेते व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपल्याची भावना प्रत्येक मैदानातून व्यक्त होत असून, खो-खो परिवाराने पुण्यात आयोजित केलेल्या शोकसभेत ही हानी शब्दातीत असल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. भावपूर्ण शोकसभा : आठवणींनी दाटलेले क्षण पुण्यात पार पडलेल्या या विशेष शोकसभेत राज्यभरातून आलेले क्रीडा संघटक, प्रशिक्षक, पंच, खेळाडू व पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला दोन मिनिटे मौन पाळून स्व. अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. खेळाडूंचे कैवारी, शिस्तप्रिय नेतृत्व मनोगत व्यक्त करताना वक्त्यांनी दादांची खेळाप्रती असलेली ओढ, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि निर्णयक्षमता अधोरेखित केली. “दादा शब्दाला जागणारे होते; एकदा शब्द दिला की काम पूर्ण,” असा अनुभव अनेकांनी सांगितला. खो-खो खेळाला आधुनिक स्वरूप देत त्याला व्यावसायिक उंचीवर नेण्यात दादांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद झाले. निधी, सुविधा आणि थेट संवाद राज्यातील क्रीडा संकुले, मैदाने, स्पर्धा व खेळाडूंसाठी निधी उपलब्ध करून देताना दादांनी कधीही आखडता हात घेतला नाही. सोलापूर, नाशिक, सांगली, कोल्हापूर, रायगड आदी जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी अडचणीच्या काळात दादांनी मोठ्या भावाप्रमाणे मदतीचा हात दिल्याच्या आठवणी सांगितल्या. मैदानावर थेट येऊन खेळाडूंशी संवाद साधण्याची त्यांची शैली सर्वांच्या मनात कोरली गेली. महिला खेळाडूंना बळ महिला खेळाडूंना संधी, सन्मान आणि नेतृत्वाच्या पातळीवर पुढे आणण्यात दादांचे योगदान मोलाचे असल्याचे रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनच्या प्रतिनिधींनी नमूद केले. “महिलांना विश्वासाने पुढे नेणारा नेता आज आपल्यात नाही,” ही भावना सर्वत्र उमटली. न भरून निघणारी हानी…

नाशिकमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ

नाशिकमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ संरक्षित वृक्षांची सर्रास कत्तल सुरूच हरिभाऊ लाखे नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने पिंपळ, वड, औदुंबर या वृक्षांना संरक्षित दर्जा देताना, तोडण्यास सक्त मनाई केल्यानंतरही निसर्गसाखळीतील अत्यंत…

  प्रस्तावित वैनगंगा, नळगंगा प्रकल्पात दुष्काळी भागावरील अन्याय टाळा…

प्रस्तावित वैनगंगा, नळगंगा प्रकल्पात दुष्काळी भागावरील अन्याय टाळा… जल अभ्यासक डॉ. प्रवीण महाजन यांची मागणी राजेंद्र साळसकर नागपूर : वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पांतर्गत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प ते नळगंगा प्रकल्प पाणी वहन करताना पहिल्या टप्प्यात गरज नसतानाही ८३६ दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात आले आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात तिथे दुष्काळी भाग असतानाही पाणी कमी देण्यात आले आहे. याकडे जल अभ्यासक आणि वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पाची प्रथम मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्रात त्यांनी याबाबत फेरविचार करून दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात डॉ. महाजन यांनी नमूद केले आहे की, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प वैनगंगा नदी ते नळगंगा प्रकल्प इथे १८०४.७८ दशलक्ष घनमीटर पाणी वहन प्रस्तावित आहे. हे पाणी विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सिंचन, घरगुती आणि औद्योगिक पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित आहे. या योजनेमुळे ४०४२८१ हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. ही विदर्भासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. गोसीखुर्द ते निम्न वर्धा प्रकल्प असा या योजनेतील पहिला टप्पा हा असून दुसरा टप्पा निम्न वर्धा प्रकल्प ते काटेपूर्णा प्रकल्प असा आहे. तिसरा टप्पा हा नियमबाह्य बाबी टाळण्यात याव्यात. आतापर्यंतच्या अनेक कागदपत्रांवरून आपल्या लक्षात येईल की, या प्रकल्पासाठी खूपच घाई करण्यात येत आहे आणि या प्रकल्पात रोज नवनवीन कागदपत्रांचा खेळ खेळला जात आहे. तिथे अनेक बाबी महत्त्वाच्या असून भविष्यात जेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रातून केंद्रीय जल आयोगाकडे जाईल, त्यावेळी या आकड्यांच्या खेळावर बोट ठेवले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी भीतीही या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे आणि असे होऊ नये यासाठी नियमात्मक बाबी स्विकाराव्या. नियमबाह्य बाबी टाळण्यात याव्या, अशी सूचनाही केली आहे. त्यामुळेच वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पाला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता हा प्रकल्प आपल्या मार्गदर्शनात पुढे जावा, अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

  नाशिक महापालिकेच्या प्रभावी नियोजनामुळे रस्ते चकाकले

नाशिक महापालिकेच्या प्रभावी नियोजनामुळे रस्ते चकाकले नाशिक मनपाची कचरा व्यवस्थापनात मोठी झेप हरिभाऊ लाखे नाशिक : शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने नाशिक महापालिकेने प्रत्यक्ष कचरा संकलन व वर्गीकरण व्यवस्थेत मोठी झेप घेतली आहे. कचरा व्यवस्थापन हे केवळ संकलनापुरते मर्यादित न ठेवता, ते मोजमापयोग्य, उत्तरदायी आणि नागरिक केंद्रित प्रणाली म्हणून विकसित करण्यासाठी मनपाने सुसूत्र, नियोजनबद्ध आणि परिणामाभिमुख मोहीम राबवली आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, काटेकोर निरीक्षण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचा समन्वय साधण्यात आला. या मोहिमेमुळे शहरातील ओला व सुका कचरा वर्गीकरणात अल्पावधीतच ठोस सुधारणा दिसून आली आहे. उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे तंत्रज्ञानाधारित रिअल टाइम देखरेख प्रणाली. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन आपत्कालीन नियंत्रण कक्षातून दररोज सरासरी ८० हन अधिक कचरा संकलन वाहने आणि कचरा-संवेदनशील ठिकाणांची थेट व्हिडिओ कॉलद्वारे तपासणी करण्यात आली. यात वाहनातील ओला सुका कचरा वर्गीकरण, मनुष्यबळ उपलब्धता, मार्ग व वेळापत्रक पालन, ब्लॅक स्पॉटची स्थिती तपासून तत्काळ सुधारात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे कचरा मिश्रणावर नियंत्रण मिळाले असून, कार्यप्रणालीत पारदर्शकता वाढली आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त आयुक्तांनी स्वतः शहरातील विविध वॉडर्डामध्ये दैनंदिन पाहणी सुरू केली. पायलट वॉर्डासह महत्त्वाच्या भागांना भेटी देत वाहननिहाय वर्गीकरण, ब्लॅक स्पॉट, सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची स्वच्छता तसेच नागरिकांच्या तक्रारींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. यामुळे प्रशासकीय निर्णय जलद आणि प्रभावीपणे घेणे शक्य झाले. तिसऱ्या टप्प्यात साप्ताहिक आढावा व कामगिरी मूल्यमापन यंत्रणा राबविण्यात आली. विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, कंत्राटदार, घनकचरा प्रकल्प व्यवस्थापक, जनजागृती आणि उपद्रव शोध पथकांच्या उपस्थितीत कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यामुळे जवाबदारी निश्चित होत कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली. ५३ ब्लॅक स्पॉट निर्मूलन चार स्तरांवरील पडताळणी, ब्लॅक स्पॉट निर्मूलन, घरोघरी जनजागृती, झोपडपट्टी मोहिमा आणि कडक दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून शहरातील ६० पैकी ५३ ब्लॅक स्पॉट पूर्णपणे निर्मूलित करण्यात आले आहेत. परिणामी रस्ते स्वच्छ होऊन, नागरिकांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. पायलट वॉर्डमुळे वर्गीकरणात झेप प्रत्येक विभागात एक पायलट वॉर्ड निवडून राबविण्यात आलेल्या धोरणामुळे सुरुवातीला २० ते ३० टक्के असलेले कचरा वर्गीकरण सातत्यपूर्ण निरीक्षणांमुळे ६५ टक्क्यांहून अधिक पातळीवर पोहोचले. अवघ्या दोन महिन्यांत या मोहिमेचे सकारात्मक आणि ठोस परिणाम दिसून आले.

नक्षलवाद्यांची ‘कंपनी १०’ खतम

गडचिरोलीत सी-६० पोलिसांची मोहीम ० ७ नक्षलवादी ठार ० महाराष्ट्राचे जवान दिपक मडावी शहीद गडचिरोली : नक्षलवाद्यांमध्ये कुख्यात असणाऱ्या कंपनी १० चा गडचिरोली पोलिसांनी आज खात्मा केलाय. छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या अबुझमाड दुर्गम भागात आणि…

काय आहे हिमगौरी आडकेंचा विक्रम?

काय आहे हिमगौरी आडकेंचा विक्रम? नाशिक महापौर दालनाचा फलक चर्चेत हरिभाऊ लाखे नाशिक: महापालिकेत स्थायी समिती सभापती झालेली व्यक्ती कधीही महापौर होत नाही, असा आजवरचा नाशिकचा इतिहास आहे. महापौरपदी विराजमान…