Category: महाराष्ट्र

Maharashtra News

वीज कर्मचाऱ्यांचा १२ फेब्रुवारीला संप

वीज कर्मचाऱ्यांचा १२ फेब्रुवारीला संप नागपूर : वीज क्षेत्रातील खासगीकरण, बहुल परवाना व्यवस्था, सक्तीची स्मार्ट मीटर योजना आणि सार्वजनिक वीज व्यवस्थेवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात देशभरातील वीज कर्मचारी व अभियंते १२ फेब्रुवारी २०२६…

सिंधुदुर्गच्या सर्वांगिण विकासाठी कटीबद्ध – उपमुख्यमंत्री शिंदे

सिंधुदुर्गच्या सर्वांगिण विकासाठी कटीबद्ध – उपमुख्यमंत्री शिंदे राजन चव्हाण कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, रोजगार निर्मिती, पर्यटन वाढ, शेतकरी-बागायतदारांचे प्रश्न आणि लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपण…

कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही –  एकनाथ शिंदे

कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही –  एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर चिपळूण, कोकणच्या मातीवर, पाण्यावर आणि जनतेच्या श्वासावर घाला घालणाऱ्या प्रदूषणकारी उद्योगांविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट रणशिंग फुंकलं! चिपळूण तालुक्यातील खेड येथील लोटे परशुराम एमआयडीसीत इटलीतून हद्दपार करण्यात आलेली मितेनी कंपनी अप्रत्यक्षपणे ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ या नावाने कार्यरत आहे. ‘अशा प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना कोकणात थारा देणार नाही! जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!’ असे सांगत त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आणि स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली. विकासाच्या नावाखाली कोकणचा निसर्ग आणि लोकांचे आयुष्य धोक्यात घालणाऱ्या शक्तींविरोधात सरकार कठोरात कठोर भूमिका घेईल, असा निर्धार त्यांनी यावेळी जनतेसमोर मांडला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजकीय सभेऐवजी जणू विकासाचा रणसंग्रामच उघडला. हजारोंच्या जन समुदायासमोर त्यांनी कार्यकर्त्यांची ताकद, कोकणाशी शिवसेनेचं ऐतिहासिक नातं, महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंतच्या योजना, केंद्र-राज्य सरकारची “डबल इंजिन” शक्ती आणि रत्नागिरी जिल्ह्यावर भगवा फडकवण्याचा निर्धार एका श्वासात मांडला. सभेच्या सुरुवातीलाच शिंदेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनावर श्रद्धांजली अर्पण करत वातावरण भावनिक केलं. मात्र त्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं की ही केवळ उमेदवारांची नाही, तर कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ही निवडणूक विकासाच्या भवितव्याचा फैसला करणारी आहे.शिंदेंनी ठामपणे सांगितलं की पक्षाचा खरा कणा हा कार्यकर्ता आहे. या पक्षात कोणी मालक नाही, कुणी नोकर नाही, आपण सगळे कार्यकर्ते आहोत आणि संपूर्ण पक्षाचा डोलारा हा कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा आहे, असा थेट संदेश त्यांनी शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.कोकणाच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीचा उल्लेख करत त्यांनी शिवसेना आणि कोकणाचं भावनिक नातं उलगडलं. शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिची नाळ कोकणात पुरलेली आहे, बाळासाहेबांनी कोकणावर भरभरून प्रेम केलं आणि कोकणानेही शिवसेनेवर तेवढंच प्रेम केलं, असं सांगत त्यांनी नारळी-पोफळी, आंबा, काजू, मत्स्य व्यवसाय आणि निसर्गसंपन्न कोकणाच्या विकासाची गरज अधोरेखित केली.विधानसभेतील महायुतीच्या २३२ आमदारांच्या ऐतिहासिक विजयाचा उल्लेख करत शिंदेंनी, हा विजय माझ्या लाडक्या बहिणींच्या भावाने घडवलेला चमत्कार असल्याचं सांगितलं आणि महिलांच्या मतदानशक्तीचं खुलेपणाने कौतुक केलं. लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना त्यांनी ठाम शब्दांत सांगितलं की ही योजना कधीही बंद होणार नाही. दरवर्षी ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च करून अडीच ते पावणेतीन कोटी महिलांना थेट लाभ दिला जात आहे. या योजनेमुळे महिलांना स्वतःच्या नावावर पैसे काढण्याचा अधिकार मिळाला, समाजात सन्मान वाढला आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला झाला, असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेताना त्यांनी शेतकरी सन्मान योजना, पिक विमा सुलभ योजना, कर्जमाफीसाठी समिती स्थापन आणि अतिवृष्टीसाठी ३२ हजार कोटींच्या पॅकेजचा उल्लेख केला. छोट्या शेतकऱ्यांनाही न्याय दिला जाईल आणि शेतकऱ्यांना सरकार कधीही सोडणार नाही, असा ठाम शब्द त्यांनी दिला. मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीतून कोट्यवधी रुपयांची मदत दिल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की ७० ते ८० हजार रुग्णांना थेट लाभ झाला असून अनेकांचे प्राण वाचले आहेत. माझ्या एका सहीमुळे लोकांचे जीव वाचत असतील तर त्याहून मोठं समाधान काहीच नाही, असं त्यांनी भावनिक शब्दांत सांगितलं. ‘शासन आपल्या दारी’ या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे सरकारी कार्यालयांचे फेरे थांबले असून जवळपास पाच कोटी लोकांपर्यंत सेवा पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. ही महाराष्ट्राच्या प्रशासनातील मोठी उपलब्धी असल्याचं त्यांनी नमूद केलं.कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विकासाचा मास्टर प्लॅन मांडला. मुंबई ते अलिबाग ते सिंधुदुर्ग-गोवा असा ग्रीनफिल्ड रस्ता, कोकण विकास प्राधिकरण, काजू, आंबा आणि मत्स्य व्यवसायाला चालना, ३० लाख कोटींचे उद्योग करार, रस्ते आणि रेल्वेला प्राधान्य, तसेच पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण या सर्व बाबी त्यांनी सविस्तर मांडल्या.महिलांसाठी बचत गट, प्रशिक्षण केंद्रे आणि ‘लखपती दीदी’ योजनेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग मोकळा केला जाईल, असं सांगत त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला.मितेनी – लक्ष्मी ऑरगॅनिक या प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांबाबत बोलताना त्यांनी लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे आणि जे कारखाने लोकांच्या आरोग्याला घातक ठरतील त्यांना सरकार कधीही पाठीशी घालणार नाही असे स्पष्ट केले. चिपळूण तालुक्यातील भूस्खलनग्रस्त भागांसाठी संरक्षण भिंत उभारण्याचा आणि कळवंडे धरणाच्या दुरुस्तीचा ठाम शब्द देत त्यांनी लोकजीवन धोक्यात येऊ देणार नाही, ही सरकारची जबाबदारी असल्याचं सांगितलं.ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीमध्ये सवलत, तीर्थदर्शन योजना, तसेच महिलांसाठी व्यावसायिक केंद्रे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक बळकटीकरणाचा कार्यक्रम राबवला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.केंद्र सरकारच्या बजेटचं कौतुक करत शिंदेंनी सांगितलं की भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे आणि हे बजेट त्या दिशेने टाकलेलं दमदार पाऊल आहे. केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य माणसाचा विचार करून काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.राजकारणात शब्दाला किंमत असते, असा ठाम संदेश देत त्यांनी आपली त्रिसूत्री मांडली. उपलब्धता, साधेपणा आणि विश्वासार्हता. शब्द दिला की तो पाळणं हीच माझी ओळख आहे, असं त्यांनी सांगितलं.शेवटी त्यांनी थेट आवाहन केलं की 7 तारखेला धनुष्यबाण आणि कमळाच्या निशाणावर बटण दाबा, सर्व उमेदवारांना विजयी करा आणि रत्नागिरी जिल्ह्यावर महायुतीचा भगवा डौलाने फडकवा. ही केवळ मतदानाची नाही, तर तुमच्या आणि कोकणाच्या भवितव्याची निवडणूक आहे, असा ठाम एल्गार त्यांनी केला.सभागृहात आणि सभोवतालच्या रस्त्यांवर उसळलेला जनसागर, महिलांचा, युवकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ही सभा केवळ प्रचारसभा नव्हती, तर चिपळूण आणि कोकणाच्या विकासासाठी दिलेली राजकीय घोषणा ठरली.यावेळी उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व उमेदवार आणि चिपळूणमधील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 राज्यात मैत्री, नाशिकमध्ये कुस्ती!

राज्यात मैत्री, नाशिकमध्ये कुस्ती! उपमहापौरपदासाठी शिंदे गट भाजपला भिडला हरिभाऊ लाखे नाशिक –महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना नाशिकच्या महापौर पदासाठी शिवसेना ठाकरे गट आणि उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गट मैदानात उतरल्याने ही…

 वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी केंद्राची ३,२४४ कोटींची तरतूद

वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी केंद्राची ३,२४४ कोटींची तरतूद राज्य सरकारही तेवढाच निधी देणार..! आचारसंहिता संपताच भूसंपादन…! कणकवली(प्रतिनिधी)– वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ३ हजार २४४ कोटी रुपयांची तरतूद…

भयानक : उमेदवारी ठिकवण्यासाठी उमेदवाराकडून पोटच्या मुलीची हत्या

भयानक : उमेदवारी ठिकवण्यासाठी उमेदवाराकडून पोटच्या मुलीची हत्या नांदेड : निवडणूक लढवण्यासाठी दोन अपत्यांचा नियम असल्यामुळे उमेदवारी रद्द होऊ नये म्हणून एक उमेदवाराने निर्दयीपणे आपल्या पोटच्या एका मुलीचा खून केल्याची खळबळजनक घटना नांदेडमध्ये घडली आहे.…

मुंढवा जमीन गैरव्यवहार पार्थ पवारांना ‘क्लीनचीट’?

मुंढवा जमीन गैरव्यवहार पार्थ पवारांना ‘क्लीनचीट’?  पोलिसांची चार्जशीट सादर फक्त शीतल तेजवानी आरोपी पार्थ पवारांचे नाव वगळले पुणे: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी प्राथमिक चौकशीतच पार्थ पवारला क्लीन चीट दिली असल्याचा आरोप…

‘नाशिक महापालिका सत्तेत आम्हाला कुबड्या नको’

‘नाशिक महापालिका सत्तेत आम्हाला कुबड्या नको’ हरिभाऊ लाखे नाशिक: मनपाच्या सत्तेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या उतावीळपणाला कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी ब्रेक लावला आहे. महायुती म्हणून निवडणूक लढलो तेथे घटक पक्षांना सत्तेत सहभागी करून घेतले. नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढवली असून, ७२ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे सत्तेत कोणाच्याही कुबड्यांची गरज नसल्याचे सांगत, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभाग देण्यास त्यांनी नकार दिला आहे. नाशिक येथे रविवारी भाजप कार्यालयात प्रसारमाध्यमांशी महाजन यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिकच्या महापौर तसेच सत्तास्थापनेबाबत भूमिका मांडली. आम्ही स्वबळावर ७२ जागा निवडून आणल्या. विरोधकांचे पाच ते सहा नगरसेवक संपर्कात आहेत. आम्ही बहुमतात असल्याने कोणाच्याही कुबड्यांची आवश्यकता नसल्याचे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करण्याचा कोणताही प्रस्ताव मित्रपक्षांना दिला नसल्याचे सांगत, महाजन यांनी केदार यांच्या दाव्याची हवा काढून घेतली. जळगावमध्ये महायुती म्हणून लढल्याने या ठिकाणी शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेणार आहोत. त्यामुळे शिंदेसेनेला विरोधी बाकावर बसावे लागण्याची शक्यता आहे. इच्छुकांचे लॉबिंग सुरू मंत्री महाजन हे भाजप कार्यालयात आले असता महापौरपदासह स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी त्यांच्याकडे लॉबिंग केले. महापौरपद सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने इच्छुक महिलांची गर्दी झाली होती. स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्यांनी भाऊ, आम्हाला स्वीकृतसाठी तरी संधी द्या, अशी गळ महाजन यांना घातली. वरिष्ठांच्या चर्चेनंतर महापौरांची घोषणा महापौरपदी कोणास संधी द्यायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. महापौर पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. चर्चेनंतरच ६ फेब्रुवारीस महापौरांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले. अद्याप या प्रक्रियेला वेळ आहे. मी मुंबईला जात असून, कोणाला संधी द्यायची याबाबत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी चर्चा करणार आहे. त्यानंतर ज्या नावावर एकमत होईल त्याची घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. राज ठाकरेंना टोला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत भाष्य करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर महाजन यांनी टीकास्त्र सोडले. दुसऱ्यांच्या पक्षात काय चालल आहे, हे बघण्यापेक्षा ठाकरेंनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावे, असा टोला महाजन यांनी लगावला. मनसेचे आमदार निवडून येत नाही. नगरसेवक निवडून आले तरी ते दुसऱ्या पक्षात जातात यावर ठाकरे यांनी चिंतन करावे. नाशिकमध्ये मनसेचा निवडून आलेल्या एकमेव महिला नगरसेविका आमच्याकडे येण्यास उत्सुक असल्याचा दावा महाजन यांनी केला.

प्रा. खुशाल भिकनराव देशमुख यांना उत्कृष्ट व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

प्रा. खुशाल भिकनराव देशमुख यांना उत्कृष्ट व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान जळगाव : चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स, के. के. सी. कॉमर्स महाविद्यालय तसेच के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज, चाळीसगाव येथील क्रीडा संचालक प्रा. खुशाल भिकनराव देशमुख यांना आज महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा “उत्कृष्ट व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार (सन २०२५–२६)”   प्रदान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त जळगाव येथे आयोजित विशेष समारंभात पालकमंत्री  गुलाबरावजी पाटील, जळगाव जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक (एस. पी.) महेश्वर रेड्डी व जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक , जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करनवाल यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार प्रा. खुशाल देशमुख यांना प्रदान करण्यात आला. प्रा. खुशाल देशमुख यांच्या या सन्मानामुळे चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचा तसेच चाळीसगाव तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर तसेच विविध समित्यांचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  प्रा.खुशाल देशमुख यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.