Category: महाराष्ट्र

Maharashtra News

राष्ट्रीय बॅडमिंटन पंच प्राचार्य चित्ते सर यांचे निधन

राष्ट्रीय बॅडमिंटन पंच प्राचार्य चित्ते सर यांचे निधन पुणे – चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिनकर वामन चित्ते यांचे वयाच्या ८9 व्या वर्षी पुणे येथे दुःखद निधन झाले.  महाविद्यालयाच्या सुरुवातीपासूनचे  कॉमर्स विषयाचे प्राध्यापक  आणि महाविद्यालयाचे  १९७३ पासून ते १९९७ पर्यंत प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते. कुशल प्रशासक, हाडाचे कर्तव्य तत्पर शिक्षक, खिलाडू वृत्तीचा शिस्तप्रिय खेळाडू, बुद्धिमान अर्थतज्ञ,  राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटनचे पंच, तसेच चाळीसगाव सारख्या ग्रामिण भागातील तालुक्यातून आपल्या परिसस्पर्शातून ४५/५० वर्षा पुर्वी  त्यांनी  सुजाता देव, मिलींद घाटे, विवेक जोशी व मिलींद पूर्णपात्रे या सोन्यासारखे आतंरराष्टीय खेलाडू घडविले जे अजूनही खेळत आहेत व चालीसगावच नाव खेलाडू जगातात चमकावण्यात सराचा फार मोठा वाटा आहे.चित्ते सर वयाच्या ८३ वयापर्यंत पुणे येथे  ५० च्या आसपास मुलामुलींना बॅडमिंटन चे  प्रशिक्षण देत असत.    एक सहृदय पालक, आदर्श पिता, आदर्श शिक्षक, आदर्श मित्र, आदर्श खेळाडू असं बहुगुणी, बहूआयामी व्यक्तिमत्व आज हरवलं. चित्ते आणि कोतकर कुटुंबीय दुःख सागरात बुडाले ,त्यांच्या जाण्याने या क्षेत्रात झालेली पोकळी कधी भरून निघणार नाही असे आदर्श बहुगुणी माणसं आज दुर्मिळ ! सरांच्या जाण्याने चित्ते कुटुंबीयांवर झालेला आघात सहन करण्याची शक्ती त्यांना मिळावी ही चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या सर्व आजी-माजी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून दुःखद सहवेदना.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१ वा दीक्षान्त सोहळा ४ फेब्रुवारीला

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१ वा दीक्षान्त सोहळा ४ फेब्रुवारीला एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३१…

टी.डी.के च्या कामगारांची वेतन वाढीच्या प्रस्तावाला मान्यता

टी.डी.के च्या कामगारांची वेतन वाढीच्या प्रस्तावाला मान्यता अनिल ठाणेकर नाशिक, नाशिक मधील सातपूर औद्योगिक वसाहतीतील टी डी के प्रा. लि. या कंपनीतील कामगारांना अनेक सेवा आणि सुविधांसह होणाऱ्या वेतन वाढीच्या…

दहावी-बारावी परीक्षेत कॉपी झाल्यास केंद्राची मान्यता रद्द

दहावी-बारावी परीक्षेत कॉपी झाल्यास केंद्राची मान्यता रद्द बोर्डाचा ‘कडक’ इशारा हरिभाऊ लाखे नाशिक: फेब्रुवारी-/मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षांवेळी ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळतील, त्यांची मान्यता रद्द करण्याचा इशारा विभागीय शिक्षण मंडळाने दिला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय मंडळ आणि जिल्हा मुख्याध्यापक संघ यांची संयुक्त बैठक झाली. मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे, सचिव मोहन देसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व केंद्रांवरील खोल्यांमध्ये आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. २०२५ च्या परीक्षेत ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळले होते, त्यांची मान्यता रद्द करण्याबाबत कठोर भूमिका मांडण्यात आली. राज्यातील अतिवृष्टी व आपत्तीमुळे बाधित झालेल्या १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच परीक्षक आणि नियामकांची संख्या वाढवून कामाचा ताण कमी करण्यासाठी, एका परीक्षकास जास्तीत जास्त २०० तर नियामकास १००० उत्तरपत्रिका तपासणीसाठी देण्याबाबत चर्चा झाली. सातत्याने परीक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांऐवजी आतापर्यंत हे काम न केलेल्या नवीन शिक्षकांना संधी देण्याबाबत विचार विनिमय झाला. केंद्र संचालक, कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. ५३ वर्षांवरील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना परीक्षक आणि नियामक कामातून सवलत देण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत मुख्याध्यापक संघाचे एस. बी. देशमुख यांनी, परीक्षा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मुख्याध्यापक आणि मंडळ यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. शिक्षकांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी मांडलेल्या मागण्यांवर मंडळ सकारात्मक विचार करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांची शुल्क माफी आणि मानधन वाढ या विषयांकडे आम्ही प्राधान्याने लक्ष वेधले असल्याचे त्यांनी नमूद केले. विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बोरसे यांनी, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य असून यासाठी स्थानिक खासदार, आमदार यांच्याकडून निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी सूचना केली. कंपनी उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून घ्यावेत तसेच वेतनेतर अनुदानात सीसीटीव्हीसाठी तरतूद करण्यात यावी, अशी सूचना डॉ. बोरसे यांनी केली. मुख्याध्यापक संघाकडून मांडलेल्या मागण्यांबाबत मंडळ सकारात्मक असून याविषयी वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठविण्यात येईल, असे डॉ. बोरसे यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या उपस्थितीत मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली

अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या उपस्थितीत मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अशोक गायकवाड रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात २ मिनिटे मौन पाळून आज आदरांजली वाहण्यात आली. अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण विश्वजीत गाताडे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मौन सुरु होण्यापूर्वी सकाळी ठीक १०.५९ ते ११ वाजता इशारा भोंगा वाजविण्यात आला. त्यानंतर ११.०३ वाजता मौन संपल्या संबंधिताचा इशारा भोंगा वाजविण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी रोजी २ मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते.

 आरोग्य विभागाचे ‘कोकण स्पंदन’ उत्साहात

आरोग्य विभागाचे ‘कोकण स्पंदन’ उत्साहात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कलाविष्काराने जिंकली रसिकांची मने अशोक गायकवाड रत्नागिरी: रुग्णांची सेवा करताना दिवसरात्र व्यस्त असणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण स्पंदन’ या स्नेहसंमेलनाने रत्नागिरीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. भारतीय प्रजासत्ताक दिन आणि ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ यांचे औचित्य साधून येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा सांस्कृतिक कार्यक्रम २६ जानेवारीला पार पडला.जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, क्षयरोग, कुष्ठरोग व हत्तीरोग विभाग, महिला रुग्णालय आणि प्रादेशिक मनोरुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि मुख्याधिकारी वैभव गारवे आदी उपस्थित होते.स्टेथोस्कोप बाजूला ठेवून जोपासली कला आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले वैद्यकीय कर्तव्य बजावत असतानाच जोपासलेली कला यावेळी सादर केली. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात ६० हून अधिक वैविध्यपूर्ण कलाप्रकार सादर करण्यात आले. शास्त्रीय व सुगम संगीताच्या सुरेल मैफिलीने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. लोकनृत्य आणि बॉलीवूड गाण्यांवरील बहारदार सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. उपस्थितांना खळखळून हसवणारी मिमिक्री (नक्कल) आणि सामाजिक संदेश देणाऱ्या एकांकिका व नाटकांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे, आणि पॅथॉलॉजिस्ट डॉ. अर्जुन सुतार यांच्यासह संपूर्ण टीमने अहोरात्र परिश्रम घेतले.रत्नागिरीच्या सांस्कृतिक इतिहासात आरोग्य विभागाने सेवेसोबतच कलेच्या क्षेत्रातही मारलेली ही भरारी कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रेक्षकांच्या तुडुंब प्रतिसादाने सावरकर नाट्यगृह दुमदुमून गेले होते.

‘रिफार्म, परफॉर्म आणि  ट्रान्सफॉर्म’वर फोकस

 पंतप्रधान मोदींचा रोडमॅप नवी दिल्ली : देशाची आर्थिक दिशा ठरवणारे संसदचे अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात झाली असून ‘रिफार्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’वर फोकस हा आपला रोडमॅम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले आहे.  या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके, मोठे आर्थिक निर्णय अपेक्षित आहेत. १ फेब्रुवारी रोजी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि आज संसदेत मांडला जाणारा आर्थिक सर्वेक्षण २०२६-२७ यामुळे हे अधिवेशन अधिकच महत्त्वाचे ठरले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, पंतप्रधान मोदी म्हणाले की, २१व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ पूर्ण झाला असून आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी पुढील २५ वर्षे अत्यंत महत्त्वाची असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. हा अर्थसंकल्प या शतकाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला अर्थसंकल्प असून, तो देशाच्या भविष्याची दिशा ठरवणारा ठरेल, असे मतही त्यांनी मांडले. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग ९ वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार असून, हा क्षण भारताच्या संसदीय इतिहासातील गौरवशाली क्षण आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदेशीर जागृती

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदेशीर जागृती कोकण कृषी विद्यापीठात लैंगिक छळ प्रतिबंधक कार्यक्रम अशोक गायकवाड रत्नागिरी: राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रमा अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने “महिलांचे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण” या विषयावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष विष्णू सावर्डेकर हे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पाटील यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा याबाबत सविस्तर माहिती दिली. लैंगिक छळ म्हणजे काय, कोणती कृत्ये लैंगिक छळाच्या व्याख्येत येतात, याविषयी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. कामाच्या ठिकाणी लैगिक छळ होत असल्यास महिलांनी कोणती पावले उचलावीत, तक्रार कशी करावी, याबाबतही माहिती दिली. लैगिक छळ तक्रार निवारण समितीची रचना, तिची कार्यपद्धती व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मार्गदर्शनानंतर उपस्थित विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांचे शंकानिरसन करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व महिला कर्मचारी तसेच महिला व पुरुष शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद

विश्वनाथ स्पोर्ट मीट – २०२६ ‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालय दुसरे, तर एम.ई.एस. गरवारे महाविद्यालय तिसऱ्या क्रमांकावर पुणे: आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मीट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी-एडीटी), विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत तब्बल १० सुवर्ण व २४ रौप्यपदकांसह पदकतालिकेत वर्चस्व राखत स्पर्धेचे विजेतेपद कायम ठेवले. एमआयटी-एडीटी विद्यापीठानंतर मुंबईतील बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालयाच्या संघाने एकूण ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह दुसरा क्रमांक पटकाविला, तर पुण्यातील एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने ५ सुवर्ण व ३ रौप्य पदकांसह तिसरा क्रमांक मिळविला. एमआयटी-एडीटी विद्यापीठाने गतवर्षीही विजेतेपद पटकाविले होते. भारत सरकारच्या फिट इंडिया चळवळीच्या प्रचारासाठी क्रीडा भारती व बँक ऑफ इंडिया यांच्या प्रमुख सहयोगाने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. तब्बल १५ क्रीडा प्रकारांत, १५०हून अधिक शिक्षण संस्थांमधील ६,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त तसेच रोईंगमधील आशियाई सुवर्णपदक विजेते कॅप्टन बजरंग लाल ताखर (व्हीएसएम), ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू विरधवल खाडे, तसेच मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोवर स्मिता शिरोळे-यादव, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिके, पदके व करंडक प्रदान करण्यात आले. बॅडमिंटन पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात डी.वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा ३–२ असा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. महिला गटात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा २–१ अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक जिंकले. बुद्धिबळ पुरुष गटात पार्थ बढेकरच्या कामगिरीच्या जोरावर एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांतही एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान संघाचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. बास्केटबॉल पुरुषांच्या अंतिम सामन्यात एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या संघाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा, तर महिलांत एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संघाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरीची नोंद केली. फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात स्पायसर विद्यापीठाने नेस वाडिया महाविद्यालय, पुणे यांचा ३–२ असा पराभव केला. महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा ३–१ असा पराभव केला. यामध्ये अंजली कामठे हिला सर्वोत्तम खेळाडू घोषित करण्यात आले. कबड्डी पुरुष गटात भारती विद्यापीठाने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांत सरहद महाविद्यालयाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरी केली. विश्वजीत सरवले व ज्ञानेश्वर खळदकर हे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. अत्यंत रोमांचक ठरलेल्या महिला खो-खो अंतिम सामन्यात एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने डी.वाय. पाटील विद्यापीठ, अंबी यांचा, तर पुरुष गटात एमआयटी-एडीटी विद्यापीठाने प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, निगडी यांचा पराभव केला. श्वेता नवले व निखिल परांदे हे सर्वोत्तम खेळाडू ठरले. टेनिसच्या दोन्ही गटांत एनडीए, खडकवासला व एमआयटी-एडीटी विद्यापीठाने विजेतेपद पटकाविले, तर व्हॉलीबॉलमध्ये भारती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने सुवर्ण कामगिरीची नोंद केली. वॉटर पोलो प्रकारात पुरुष गटात मुंबई विद्यापीठ, तर महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे वर्चस्व राहिले.…

 कोश्यारींचा ‘पद्मभूषण’ परत घ्या आणि महाजनांना बडतर्फ करा!

कोश्यारींचा ‘पद्मभूषण’ परत घ्या आणि महाजनांना बडतर्फ करा! नाशिकमध्ये ४ फेब्रुवारीला जनआक्रोश मोर्चा हरिभाऊ लाखे नाशिक – प्रजासत्ताक दिन सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ चार फेब्रुवारी रोजी शिव-फुले-शाहू आणि आंबेडकरी विचारांच्या नागरिकांच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी येथील पोलीस कवायत मैदानावरील कार्यक्रमात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नव्हता. यावर वनरक्षक माधवी जाधव यांनी जाहीर आक्षेप घेतल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. संविधान निर्माण करणाऱ्यांचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कसे विसरलात, असा प्रश्न जाधव यांनी करीत महाजन यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अनवधानाने नाव राहिल्याबद्दल मंत्री महाजन यांनी दिलगिरीही व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, शिव-फुले-शाहू आणि आंबेडकर विचारांच्या…