Category: मुंबई

Mumbai news

नवी मुंबई सानपाडा येथे महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण दिन साजरा

नवी मुंबई : ठाणे, नवी मुंबई सानपाडा येथे कै.  सिताराम मास्तर उद्यानात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने  ५ जून हा  पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेचे डी वॉर्डचे विभाग अधिकारी(उपायुक्त) भरत धांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून  ५ जुन हा पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.    याप्रसंगी वसुंधरेची शपथ घेण्यात आली. ५ जुन हा  पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या वृक्षारोपण प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे व हरियाली संस्थेचे अध्यक्ष मारुती नाना कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,  पर्यावरण दिनाचे महत्त्व फार मोठे आहे. आज भारतात  ५३ टक्के तापमान वाढीचे प्रमाण पोहोचले आहे. ही बॉर्डर लाईन असून धोक्याची घंटा आहे.   तापमान ५६ टक्के  गेल्यावर मनुष्य हानी होऊ शकते. कोरोनानंतर आपण काही शिकलो नाही.  त्या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करणे फार गरजेचे आहे. विदर्भ व मराठवाड्यात वृक्षारोपण न  झाल्यामुळे तापमानवाढीने अनेक लोक मृत्युमुखी पडले आहे. राजस्थानमध्ये  बीएसएफचे जवानानी २५  सेकंदात पापड भाजून  काढले. हा व्हिडीओ आज जगभर व्हाट्सअप वर फिरत आहे.  आफ्रिकेची राजधानी केपटाऊन ही  २०१३  पासून वॉटरलेस झाली असून मिलेटरी व पोलीस संरक्षणामध्ये प्रत्येकाला २५  लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. याचा अर्थ तपमानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. आज भारताला ५००  कोटी झाडे लावण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी पाच झाडे जरी  लावली तरी पर्यावरणाचे संरक्षण होईल व भारतातील नागरिकांना चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळेल. आज झालेल्या पर्यावरण दिन प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबईचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, सावंत,  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख अजय पवार, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक व मराठा विकास प्रतिष्ठानचे सहसचिव मारुती विश्वासराव,  सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. अजय पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

शिक्षक व पदवीधर निवडणूक मतदानाच्या वेळेत वाढ – म.स.पास्कर

अशोक गायकवाड नवी मुंबई,:महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार, २६ जून  रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी ०७.०० ते सायं ६.०० ही नवीन वेळ निश्चित करण्यात…

नेरुळ येथे विधी महाविद्यलयाकडून वृक्षरोपण

नेरुळ ; महात्मा गांधी मिशिन विधी महाविद्यालय नेरुळ नवी मुंबई येथे विधी महाविद्याल यांच्या वतीने ५ जून रोजी  ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे  वृक्ष रोपणाचा उपक्रम यशवीरित्या राबवण्यात आला विधी महाविद्यालय  च्या मुख्याध्यापीक शीला होसमानी  व महाविद्यलयातील विद्यार्थी , कर्मचारी, नवी मुंबई महानगपालिकेचे अधिकारी ,कर्मचारी ,व   ईतर विद्यार्थी आणि नागरिक यांनी सहभाग घेतला होता. या उन्हाळ्यात साधारणतः तापमान हे ४५ अंश सेल्सियस च्या जवळ पास गेले होते पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे त्यामुळे वृक्षरोपण हि काळाची गरज झालेली आहे प्रत्येक माणसांनी किमान एक तरी झाड लावून संगोपन करून जगवले पाहिजे असा संदेश मुख्याध्यापिका शीला होसमानी यांनी  पर्यावरणदिनानिमित्त तेथे जमलेल्या विद्यार्थी ,महानगपालिकीचे कर्मचारी व नागरिकांना दिला.

कांबळे, गोळे, सोनार, राऊत ठरले सर्वोत्तम लिफ्टर

राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग स्पर्धा मुंबई : नुकत्याच परळ येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ज्युनियर मुलांमध्ये कोल्हापूरच्या शामसुंदर कांबळे व मुलींमध्ये मुंबई उपनगरची हर्षदा गोळे व सब ज्युनिअरमध्ये मुंबई उपनगरचा क्रिश सोनार व पुण्याची कादंबरी राऊत यांनी स्ट्रॉंग वुमन व स्ट्रॉंग मॅन हा किताब पटकाविला. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, भोईवाडा व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उदय देशपांडे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त, अरुण केदार, छत्रपती पुरस्कार प्राप्त, सचिव महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या हस्ते संपन्न झाला. बक्षीस समारंभ ॲड. प्रवीण शिंदे, सेक्रेटरी,जीएसटी असोसिएशन, ॲड. दत्तात्रेय उतेकर व संजय नारकर, सरचिटणीस ऑल इंडिया ज्युनिअर जीएसटी ऑफिसर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ही स्पर्धा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, संजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. स्पर्धेचा निकाल (विजेते खेळाडू) ज्युनिअर पुरुष ५३ किलो – विराज पावसकर, (मुंबई उपनगर), ५९ किलो – वैभव जाधव, (मुंबई उपनगर), ६६ किलो – पार्थ तारे, (पालघर), ७४ किलो – श्यामसुंदर कांबळे, (कोल्हापूर), ८३ किलो – ओमकार भगत, (ठाणे),  ९३ किलो – नवाज खान (मुंबई उपनगर), १०५ किलो – रोशन गावकर, (मुंबई), १२० किलो – हर्षल पाटील, (कोल्हापूर), १२० + – सुमित जाधव,(कोल्हापूर) ज्युनियर महिला ४३ किलो – मानसी हांडे, (मुंबई उपनगर), ४७ किलो – हर्षदा घोले, (मुंबई उपनगर) ५७ किलो – शुभांगी पाटील, (कोल्हापूर), ६३ किलो – सेजल मकवाना, (मुंबई उपनगर), ६९ किलो – प्रेरणा साळवी, (ठाणे), ७६ किलो – सेजल मोईकर, (पुणे), ८४ किलो – प्रतिभा लोणे, (ठाणे), ८४+ किलो – अनुष्का खोपीकर, (पुणे) सब ज्युनिअर महिला ४३ किलो – गायत्री बडेकर,…

किरण शेलार यांना भाजपाची उमेदवारी

मुंबई : भाजपकडून विधानपरिषदेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजप विधान परिषदेच्या एकूण तीन जागा लढणार आहे. मुंबई शिक्षक आणि पदवीधरसहित, कोकण पदवीधरवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. कोकण विभाग पदवीधरमधून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई…

शरद पवारांचा शिंदेना इशारा

मुंबई: राज्य सरकारने दुष्काळाबाबत कुठलीच भूमिका घेतलेली नाही. सातत्याने पाठपुरावा करून देखील सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे आता मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांना…

ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी

मुंबई : उकाड्याने हैराण ठाणेकरांसाठी आजची दुपार सुखद ठरली. ठाण्यासह राज्यात ठिकठिकाणी मान्सुनपुर्व पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मान्सून…

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश

मुंबई :  मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी  पत्रकार परिषद घेत आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. भाजप…

सहावर्षानंतर एसटी कर्मचारींना गणवेश

मुंबई : पगाराची अनियमितता. तटपुंजा पगार यावर कसे बसे आपले घर चाविणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आता गणवेशापोटी तब्बल सहावर्षानंतर नवेकोरे कापड मिळणार आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप सुरू केले आहे. मुंबईतील विविध आगारांतील चालक, वाहकांसह ९३२…

आवाज कुणाचा ? आज फैसला !

मुंबई : देशाच्या १८ व्या लोकसभेत आवाज कुणाचा असणार याचा फैसला आज मंगळवारी ४ जूनला होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. आधी पोस्टल मतांची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हिएम मशिनची…