Category: मुंबई

Mumbai news

अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे पुण्यात शोकसभा

अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे पुण्यात शोकसभा मुंबई, दि. ६ फेब्रुवारी – महाराष्ट्राचे क्रीडा नेतृत्व, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने क्रीडा प्रेमी, कर्तृत्ववान, विकासाभिमुख व सर्वसामान्यांचा हक्काचा आधार असलेला नेता गमावला आहे. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्याकरिता खो-खो परिवारातर्फे रविवार, ८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता नु. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आप्पा बळवंत चौकाजवळ, बाजीराव रोड, पुणे येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस खो-खो परिवारातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पुरस्कार्थी, क्रीडा संघटक, खो-खो प्रेमी व सर्व क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केले आहे.

भारत–श्रीलंका पर्यटन व व्यापार संबंध अधिक दृढ

भारत–श्रीलंका पर्यटन व व्यापार संबंध अधिक दृढ रमेश औताडे मुंबई : श्रीलंका टुरिझम प्रमोशन ब्युरो यांच्या वतीने मुंबईत ‘श्रीलंका टुरिझम नेटवर्किंग इव्हिनिंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत आणि श्रीलंका…

वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे

वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे लोककला अभ्यासकांचे चर्चासत्रात परखड मत मुंबई, दि (प्रतिनिधी) : लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली अमिट छाप आजही तितकीच तेजस्वी आहे.…

कलर मराठी वाहिनीने अंधश्रद्धा पसरविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी- अंनिसची मागणी

कलर मराठी वाहिनीने अंधश्रद्धा पसरविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी- अंनिसची मागणी अनिल ठाणेकर मुंबई, कलर मराठी वाहिनी कडून अंधश्रद्धा पसरविली गेल्याने त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी व समाजात चुकीचा संदेश जाईल असे प्रसारण करू नये अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. तसे त्यांनी संबंधितांना निवेदन पाठविले आहे. कलर मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या आवडीचा व लोकप्रिय कार्यक्रम आहे. त्याद्वारे बहुजन कलाकारांना आपण लोकप्रियता मिळवून दिली आहे.त्याचा सहावा सीज़न आता चालू आहे.पण त्यात अंधश्रद्धा पसरवली गेली आहे. ४ फेब्रुवारीच्या २५ व्या भागात अंधश्रद्धायुक्त प्रसंगाचे प्रसारण झाले  आहे. त्यामध्ये  कलाकारांची नजर उतरविण्याचे दृश्य आहे. काही शब्द पुटपुटत मिरची कलाकाराच्या शरीरावरून ओवाळून गॅसवरील तव्यावर टाकली असल्याचे दिसत आहे. खरं तर ही अतिशय गंभीर बाब असून ती निखालसपणे अंधश्रद्धा आहे. यामुळे प्रेक्षकांच्या मनात अंधश्रद्धा रुजण्याचा धोका संभवतो. ही बाब वाहिनीसह दिग्दर्शक व पुरोगामी विचाराचे निवेदक रितेश देशमुख यांच्या नजरेतून सुटली गेली किंवा त्याचे गांभीर्य त्यांना समजले नाही. तरी त्यांनी ही चूक सुधारून तसे निवेदन त्यांच्या येणाऱ्या भागात प्रसिद्ध करावे म्हणजे प्रेक्षकांना मनात अंधश्रद्धा बळावण्याचा धोका टळेल. असे अंनिसने निवेदनात म्हटले आहे. या विषयी सकारात्मक विचार करून या पुढे अंधश्रद्धायुक्त प्रसंगांची दृश्य सदर वाहिनीवर प्रसारित केले जाणार नाहीत, उलट अंधश्रद्धांच्या विरोधात प्रबोधन करावे असेही पुढे म्हटले आहे. निवेदनावर राज्य प्रधान सचिव डॉ टी आर गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मी ज्या देशात वाढलो तो हा देश नाही- नसीरुद्दीन शाह

मी ज्या देशात वाढलो तो हा देश नाही- नसीरुद्दीन शाह स्वाती घोसाळकर मुंबई : “मी कधीही सत्तेची अंध स्तुती केली नाही, नेहमी प्रश्न विचारले. पण आज प्रश्न विचारणेच देशद्रोह ठरत आहे का?” असा…

अजित पवारांच्या अपघातामागे पार्थसहीत तटकरे, पटेलांचा हात?

अजित पवारांच्या अपघातामागे पार्थसहीत तटकरे, पटेलांचा हात? अंजली दमानियांच्या वक्तव्याने खळबळ मुंबई : घरातील पाळीव कुत्रा मेला तरी आपण दुखावटा पाळतो, येथे महाराष्ट्राच उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धक्कादायक अपघाती निधन झाल्यानंतर ज्या पद्धतीन…

कुणाल कामरा, सुषमा अंधारेंना हाजीर हो !

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी आणि विडंबन गाणे तयार केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरा आणि ते व्हायरल करणाऱ्या नेत्या सुषमा अंधारे यांना समन्स बजावले आहे. मार्च २०२५ मध्ये कुणाल कामरा याने एका…

थरथरत्या ओंजळीत अश्रुंची फुले…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाच्या दु:खातून अद्यापही महाराष्ट्र  सावरलेला नाही. अजित पवारांचे राजकारणातील सर्वेसर्वा असणारे शरद पवार आज बारामतीत आले, आपल्या लाडक्या पुतण्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शरद पवारांनी…

टँकर उलटल्याने एक्सप्रेस वे २४ तास ‘आडवा’ झाला

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या 139 फेऱ्या रद्द मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या इतिहासातील सर्वात मोठा ट्रॅफीक जाम एका टँकरच्या उलटल्याने झाला. टँकरमधिल वायु गळतीमुळे तब्बल २४…