Category: देश

National-News

अहमदाबाद विमानतळावर ईसीसच्या चार दहशतवाद्यांना अटक

अमहदाबाद : अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे आहेत. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी श्रीलंकेतून…

अभूतपूर्व ! गर्दीचा उच्चांक !!

राहुल गांधी आणि अखिलेश यादवांच्या प्रयागराज सभेत अभूतपूर्व गर्दी सभेत माईक बंद पडला बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत लोकं पोहोचली राहुल गांधीने घेतली अखिलेशची मुलाखत प्रयागराज : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे…

ईडीचा अजब गजब दावा !

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अख्खा आम आदमी पक्षाला केले ‘आरोपी’ नवी दिल्ली : दिल्लीमधील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज आरोपपत्र दाखल करताना अजब आणि गजब दावा केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुध्द आरोपपत्र दाखल…

सोनीया गांधींचे भावनिक आवाहन

रायबरेली : मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही अशा शब्दात सोनिया गांधी यांनी रायबरेली येथील नागरीकांना भावनिक आवाहन केले.  जनतेला भावनिक आवाहन करत त्या म्हणाल्या की, मी माझा मुलगा जनतेसाठी…

मोदींचा डोळा फक्त सत्तेवर

मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल… नवी दिल्ली : आज देशभऱात अनेक भुकेल्यांना जेवण मिळत नाही, त्यांच्या जेवणाची काही व्यवस्था करावी. अनेक तरुणांना नोकरी मिळत नाही, त्यांच्या नोकरीची काही व्यवस्था करावी. पण हे सोडून मोदींचा डोळा फक्त आणि फक्त सत्तेवरच आहे,…

पाकव्याप्त काश्मिरवर अधिकार भारताचाच-अमित शाह

 नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्यावर आमचाच अधिकार आहे, असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. फारुख अब्दुल्ला आणि काँग्रेसचे नेते आज…

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदींचे निधन

पटणा : बिहारमधील भाजपचा चेहरा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचं दीर्घ आजाराने निधन झालेय. 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मागील सात महिन्यापासून कॅन्सरसोबत…

बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले!

मोदींचा TMC वर हल्लाबोल नवी दिल्ली : एका टीएमसी नेत्याचे म्हणणे आहे की, ते हिंदूंना भागीरथी नदीत फेकून देतील. त्यांच्यात एवढं बोलण्याची हिंमत कुठून येते? त्यांचे समर्थन कोण करत आहे?…

ब्रिजभूषणवर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित

नवी दिल्ली : अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते ब्रिजभूषण शरण सिंहांच्या अडचणीत वाढल्या आहेत. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी त्यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दिल्लीतील राऊज रेवेन्यू…

उत्तर प्रदेशात ‘इंडिया’चे वादळ- राहुल

कन्नौज: उत्तर प्रदेशात भाजपाचा सर्वात मोठा पराभव होणार आहे, कारण उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचे वादळ येत आहे, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधाला. ते म्हणाले, ” मोदींनी १० वर्षे अदानी आणि अंबानींचे नाव घेतले नाही, परंतु जेव्हा ते घाबरले तेव्हा त्यांनी त्यांच्या दोन मित्रांची नावे घेतली आणि सांगितले की, या आणि मला वाचवा. इंडिया आघाडीने मला घेरले आहे.” नरेंद्र मोदी यावेळी पंतप्रधान होणार नाहीत, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले, “१० ते १५ दिवसात तुम्हाला दिसेल की, तुमची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले जातील, परंतु विचलित होऊ नका. आमचा मुद्दा भारतीय संविधानाचा आहे. या संविधानाने दलित आणि मागासवर्गीयांना अधिकार दिले आहेत.” नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, भाजपाने ठरवले आहे की, ते संविधान रद्द करणार आहेत, पण आम्ही हे होऊ देणार नाही. मतदानासह इतर अधिकारही संविधानानेच दिले आहेत. ही महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. तसेच, नरेंद्र मोदी २२ लोकांसाठी काम करतात, असेही राहुल गांधी म्हणाले. याचबरोबर, नरेंद्र मोदींनी या २२ लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. नरेंद्र मोदींनी तुमचे किती कर्ज माफ केले आहे? असा सवाल करत हे केंद्र सरकार दलित, मागासवर्गीय, शेतकरी, मजूर यांचे नाही, असे राहुल गांधी म्हणाले.