Category: पालघर

palghar news

पत्रकार पित्याच्या संघर्षाच सोनं रशियातुन एम.बी.बी.एस होऊन प्रियंका बोरगे भारतात परतली

राजीव चंदने     मुरबाड : ठाणे जिल्ह्यात गेली पंचवीस वर्षे अनुभवी पत्रकारितेतून आपल्या लिखाणाचा ठसा उमटविणारे अभ्यासू पत्रकार संजय रमाकांत बोरगे यांच्या आजवरच्या संघर्षाला यश आले असून त्यांची मुलगी…

मुरबाड मधे जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा

राजीव चंदने     मुरबाड : तालुक्यात आज जागतिक आदिवासी दिन, आदिवासी बांधवानी समाजाने मोठ्या उत्साहात साजरा केला. दहा हजारांहून अधिक आदिवासी एकत्र येऊन आपल्या पारंपरिक संस्कृतीचे प्रदर्शन केले. अनेक…

थेट कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भजन कीर्तन आंदोलन

राजीव चंदने   मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना कृतिम खताचे पुरवठा होत नसल्याने तात्काळ खतांची उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला…

‘प्रत्येक सणातून राजकीय वातावरण निर्मिती करा’

मंत्री रवीद्र चव्हाण यांचा कार्यकर्त्यांना सल्ला   उल्हासनगर : विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे येत असलेल्या प्रत्येक सणामध्ये राजकीय वातावरण निर्मिती करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले. विधानसभा कार्यकारिणी विस्तारित बैठकीत चव्हाण बोलत होते. विधानसभा निवडणूक अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे भाजप जोमाने कामाला लागला आहे. मोदी सरकारने मागील दहा वर्षांत २५ करोड भारतीयांना गरिबीतून बाहेर काढल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, २०१९ मध्ये आपल्याबरोबर गद्दारी झाली; मात्र आता तसे होणार नाही. त्यामुळे पुढची पाच वर्षे विधानसभेत आपली सत्ता राहणार, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकारने चालू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना आदी योजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँगेस सरकार भ्रष्टाचारी सरकार होते. त्यामुळे ते पुन्हा निवडून आल्यावर योजना बंद करेल, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी कलानी कुटुंबावर टीका करत त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पाढा वाचला. तसेच, ज्येष्ठ नेते नरेंद्र राजानी यांनीही कलानी कुटुंबाचा समाचार घेतला. आमदार कुमार आयलानी यांनी कलानी कुटुंबाकडून कोणीही उमेदवार असला तरी विजय मात्र भाजपचाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. या बैठकीला मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, जमनु पूरस्वानी, संजय गुप्ता, प्रशांत पाटील, नरेंद्र राजानी, मीना आयलानी आदी उपस्थित होते.

साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या चौघांपैकी तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार!

डोंबिवली : घरकाम करणा-या नोकराने आपल्या तीन साथदारांसह घरफोडी करून साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २६ जुलैच्या मध्यरात्री घडली होती. या गुन्हयातील तीघांना अटक करण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले…

 केंद्रशासित प्रदेशातील मद्य साठ्याची महाराष्ट्रात विक्री

१४ लाख रुपयांचा ऐवज जप्त योगेश चांदेकर     पालघरःराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर व डहाणू येथील भरारी पथकांनी मोखाडा तालुक्यातील नीळमाती येथे कारवाई करून विदेशी मद्य, बियरचा साठा व…

कल्याण नगर मार्गावरील शहाड पूलाला भगदाड;

कल्याणकडे येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक बंद, प्रवाशांच्या त्रासात भर     उल्हासनगरः कल्याण शहराला कल्याण तालुक्यासह, मुरबाड, अहमदनगर जिल्ह्याला जोडण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील शहाड पुलाला कल्याणकडे जाणाऱ्या मार्गिकेवर…

 उल्हासनगरात उभा राहतोय महाराष्ट्रातील दुसरा पशु दाहिणीचा प्रकल्प Slug – लहान-मोठ्या पशूंची क्षणात होणार राख

 लहान-मोठ्या पशूंची क्षणात होणार राख     उल्हासनगर – दोन वर्षांपूर्वी ड्रेनेजची साफसफाई करणाऱ्या रोबोटला गणतंत्र दिनाच्या चित्र रथावर स्थान मिळाल्याने महानगरपालिकेचे नाव राज्य पातळीवर गाजले होते. आता महाराष्ट्रातील दुसरा…

 बोगद्यातील पाण्याने प्रवासी त्रस्त

निळजे ते लोढा संकुल दरम्यानच्या   डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत रेल्वे प्रशासनाने निळजे ते लोढा गृहसंकुल दरम्यान एक बोगदा नागरिकांना येण्या जाण्यासाठी बांधून दिला आहे. या बोगद्यात पाऊस सुरू झाल्यापासून पाणी तुंबत आहे. मुसळधार पाऊस असला की या बोगद्यात कंबरभर पाणी असते. त्यामुळे निळजे गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, महिलांचे हाल होत आहेत. निळजे गावातील ग्रामस्थांचे बहुतांशी व्यवहार लोढा गृहसंकुल भागात आहेत. या गावातील बहुतांशी मुले लोढा गृहसंकुल परिसरातील शाळांमध्ये, खासगी शिकवणीसाठी, तसेच रहिवासी बाजारपेठेसाठी याच भागात जातात. मध्य रेल्वेने निळजे गावाजवळील लोढा गृहसंकुलकडे जाणारे रेल्वे फाटक दोन महिन्यापूर्वी बंद केले. हे फाटक बंद करण्यापूर्वी फाटक भागात भुयारी मार्ग बांधून देण्याची मागणी निळजे ग्रामस्थांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. अधिकाऱ्यांनी ती मागणी मान्य केली होती. परंतु, एक दिवस रेल्वेने निळजे गावाजवळील रेल्वे फाटक ग्रामस्थांच्या भुयारी मार्गाची पूर्तता न करता रेल्वेने बंद केले. निळजे गावातून रेल्वे फाटकातून गेले की लोढा हेवन गृहसंकुल कमी अंतरावर होते. त्यामुळे ग्रामस्थ याच मार्गाला सर्वाधिक प्राधान्य देत होते. रेल्वे फाटक बंद केल्याने ग्रामस्थांना सोयीचे होणार नाही अशा पध्दतीने रेल्वेने एका बोगदा बांधला आहे. हा बोगदा सखल आणि खोलगट भागात आहे. या बोगद्यातून निळजे ग्रामस्थांना लोढा हेवन भागात जाता येते. या बोगद्यात पाऊस सुरू झाल्यापासून पाणी तुंबते. हे पाणी जाण्यासाठी या भागात गटार किंवा अन्य कोणतीही सोय नाही. त्यामुळे बोगद्यात पाणी तुंबून राहते. या बोगद्यातून प्रवाशांची वर्दळ असते. त्याच बरोबर मोटारी, लहान मालवाहू वाहने याच बोगद्यातून धावतात. त्यामुळे बोगद्यात पाऊस नसला की चिखल होतो. आणि पाऊस सुरू असला की बोगद्यात पाणी तुंबते. मुसळधार पावसात कंबरभर पाणी साचते. त्यामुळे ग्रामस्थांना या भागातून जाणे मुश्किल होते. मुलांना लोढा हेवन भागातील शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या महिला, मुलांचे या बोगद्यातील पाणी तुंबण्याचा सर्वाधिक त्रास होतो. ग्रामस्थांना विश्वासात न घेता घाईघाईने हा बोगदा बांधला आहे, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. गावापासून दूर अंतरावर हा बोगदा आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत या बोगद्यातून येणे धोकादायक आहे. रात्रीच्या वेळेत निळजे ग्रामस्थांची, नोकरदाररांची मोठी अडचण होते. निळजे गावातून बाहेर पडण्यासाठी रेल्वे फाटक हा एक मधला मार्ग होता. तोच रेल्वेने बंद केल्याने ग्रामस्थांचे खूल हाल सुरू आहेत. ग्रामस्थांना पाणी तुंबलेल्या बोगद्यातून सध्या प्रवास करावा लागतो. 00000

मुरबाडच्या तारांगण शाळेत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

राजीव चंदने     मुरबाड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व्हेसर्वा तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काल मुरबाडच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मुरबाड तालुक्यातील तारांगण मतिमंद मुलांच्या निवासी कार्यशाळेत केक कापून तसेच मुलांना फळे व मिष्ठांन्नाचे वाटप करून वाढदिवस साजरा केला. मुलांशी हितगुज करत, संवाद साधत सामाजिक जाणिवेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव, विधानसभा क्षेत्र संघटक भरत गायकर,  तालुका समन्वयक विनायक ढमणे, शहर प्रमुख संदीप बहाडकर, तालुका सचिव नरेंद्र (भाऊ) यशवंतराव, सहसंपर्क प्रमुख नरेश देसले, युवसेनेचे विधानसभा प्रमुख निलेश चौधरी, युवासेना सचिव मिलिंद घरत आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत कायकर्ते उपस्थित होते. 00000