Category: ठाणे

Thane news

ठाणे बाजारपेठेतील ८० वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळला

ठाणे : ठाण्यातील जांभळीनाका बाजारपेठेतील ८० ते ९० वर्ष जुन्या इमारतीचा भाग रविवारी कोसळला. ही इमारत रिकामी असल्याने दुर्घटना टळली. सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी इमारतीजवळ धोकापट्टी बांधली आहे.…

उल्हास खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे

उल्हास, भातसा, भारंगी, काळू नद्यांच्या पाणी पातळीत वाढ     कल्याण : रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातील उल्हास खोरे आणि ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री डोंगरांच्या रांगेत रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या खोऱ्यातून वाहणाऱ्या उल्हास, भातसा, काळू, भारंगी नद्यांच्या पाणी पातळीत शनिवारी रात्री पासून वाढ झाली आहे. कल्याण-डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोहिली, मोहने येथील पाणी पुरवठा केंद्रांच्या समतल पाण्याची पातळी वाढली आहे. मोहने ते टिटवाळा परिसर जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या कठड्यांना पाणी लागले आहे. पुलावरून पाणी वाहून जाण्यासाठी एक ते दीड फुटाची उंची बाकी आहे. पाण्याच्या पातळीमुळे टिटवाळा भागातील सावरकर नगर भागातील वस्तीत रात्रीपासून पाणी घुसले आहे. हा परिसर नद्यांच्या समतल पातळीत येतो. रात्रीपासून रहिवासी घरातील पाणी उपसण्यासाठी व्यस्त आहेत. सतत मसुळधार पाऊस सुरू राहिला तर कल्याणमधील दुर्गाडी परिसरातील बाजारपेठ, बैलबाजार भागात पाणी घुसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे खाडी किनारच्या रहिवाशांनी स्थलांतराची, तबेले चालकांनी सावध राहून पाणी पातळी वाढील तर तबेल्यातून म्हशी बाहेर काढण्याची तयारी सुरू केली आहे. मुसळधार पावसामुळे पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. माहुली किल्ला परिसरा रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने सावरोली, शहापूर भागातून वाहणारी भारंगी नदी दुथढी वाहत आहेत. या नदी किनाऱ्याच्या वस्तीत पाणी शिरले आहे. अनेकांची वाहने पाण्याखाली गेली आहेत. तर काहींच्या दुचाकी वाहून गेल्या आहेत. भातसा, काळू नद्यांच्या पात्रात वाढ झाला आहे. या मुसळधार पावसामुळे भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे. रविवार सकाळपासून पावसाने उसंत घेतल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडकसागर या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला नसल्याने धरणांची तळ गाठला आहे. या धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. धरणांमध्ये पाणी नसल्याने सध्या मृत साठ्यांमधून शहराला पाणी पुरवठा केला जातो. रेल्वे मार्गांवर अडथळे मध्य रेल्वेच्या कसारा ते आसनगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे मार्गावर झाड कोसळले होते. ते कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून या रेल्वे मार्गावरील वाहूतूक सुरळीत केली. वासिंद आणि खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान डोंगराच्या खचलेल्या मातीचा भाग रेल्वे रूळावर येऊन पडला होता. त्यामुळे रेल्वे रूळ ढिगाऱ्याखाली गेला होता. रेल्वे कामगारांनी तातडीने घटनास्थळी येऊन या रूळावरील चिखलमय मातीचा ढीग बाजुला काढला. कल्याण ते आसनगाव रेल्वे स्थानकांच्या दरम्यान तिसऱ्या, चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामामुळे डोंगरभागात खोदकाम करण्यात आले आहे. हा खोदलेला भाग पावसाळ्यात खचून तो रेल्वे मार्गात मातीसकट वाहून येत आहे. ०००००

पावसामुळे जनजीवन विस्कळीत कल्याण कसारा रेल्वे सेवा 6 तास ठप्प

कल्याण : रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे आटगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रकवर झाड पडल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक 2 तासाहून अधिक काळ ठप्प होती. सकाळी 8 वाजता रेल्वे…

तरुणांनी आता फिरकायचं  कुठे ?

ठाणे : ठाणे जिल्हा प्रशासनाने ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच पर्यटन स्थळावर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे मागील आठवड्यात सर्वत्र चर्चेत राहिलेले लोणावळ्यातील भुशी डॅम च्या पाठीमागच्या बाजूला धबधब्यातून एकाच घरातील नऊ ते दहा जण अचानक आलेल्या महाभयानक धबधब्याच्या पाण्यातून वाहून गेली नऊ ते दहा पैकी पाच जण जिवंत सापडली तर बाकीचे चार जणांचा मृत्युंजय काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे अजूनही एका जणांचा पत्ता लागलेला नाही. ही घटना ताजी असतानाच जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावरील होणाऱ्या दुर्घटनेमुळे जिल्हा प्रशासनाचा भार हलका होईल. हे मात्र खरे पण दुसरीकडे सामान्य सामान्यता पर्यावरण प्रेमी पर्यटक ट्रेकर्स आणि तरुणाई मध्ये नाराजी आहे ठाणे जिल्हा हा स्वच्छ व सुंदर अशा पर्यटन स्थळ आणि व त्याचबरोबर उंच उंच डोंगर घाट व धबधब्यांनी सजलेला नटलेला आहे. पावसाळ्यात जी मजा या धबधब्यात डोंगरावर नदीकिनारी धरणावर येते ती मजा घेण्यासाठी ठाणेकर मुंबईकर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक हे खूप उत्सुक असतात कधी एकदाचा पाऊस पडतो आणि कळत नकळत मित्राचे मैत्रिणीचे प्लॅन्स बनतात एरवी शिमला कुल्लू मनाली हिमाचल जम्मू-काश्मीरला फिरायला जाणारी माणसे पावसाळ्यात मात्र आपला ठाणे जिल्हा स्वरा असे म्हणून ठाणे जिल्ह्यातील किमान एका तरी पर्यटन स्थळाला आवर्जून भेट देत असतात. ठाणे जिल्ह्यातील कांदा पावशेपाडा खडवली नदी परिसर टिटवाळा नदी परिसर गणेश घाट गणेशपुरी नदी परिसर वज्रेश्वरी भातसा धरण माहुलीगड व पायथा अशोक धबधबा आजा पर्वत कसारा घाट व घाटात घाट परिसरातील सर्व धबधबे गोरखगड नाणेघाट बारवी धरण परिसर सिद्धगड डोंगर नावे सोनाळे सुप्रसिद्ध असा हरिश्चंद्रगड व सर्वात जास्त पसंतीचे माळशेज घाट या सर्व परिसरात ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने या परिसराच्या एक ची पर्यंत दोन महिन्यासाठी प्रतिबंध लावला आहे. काही अत्युट साई तरुणांमुळे मोठ्या प्रमाणात हातचे होतात पाण्यात उतरणे पावसामुळे वाहत्या पाण्याचा अंदाज न येणे यामुळे हानिकारक घटना घडत असतात व काही जणांना आपला जीव गमावा लागतो असा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने हे निर्बंध लावले आहे या निर्बदामुळे सर्व पर्यटकांना एक मोठा प्रश्न पडला आहे की आता फिरकायचे कुठे. ००००

ज्येष्ठ पत्रकार कपील राऊत यांना पितृशोक

वडील अनंत राऊत यांचे निधन     ठाणे : ठाणे – मुंबईत झी २४ तासमध्ये कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार कपिल राऊत यांना पितृशोक झाला. कपील याचे वडील अनंत राऊत यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७६ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, पुतणे आणि नातवंडे असा परिवार आहे. ठाणे पुर्वेकडील कोपरी परिसरात राहणारे अनंत राऊत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासुन खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्याने उपचारा दरम्यान शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर  कोपरी ठाणेकरवाडी येथील स्मशानभूमीत दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी निरंजन डावखरे,माजी नगरसेवक भरत चव्हाण, भाजप प्रवक्ते अजित चव्हाण आदिसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी, तसेच अनेक पत्रकार मित्रांनी उपस्थित राहून पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. अत्यंत मीतभाषी, मनमिळाऊ स्वभावाचे अनंत राऊत यांच्या जाण्याने कोपरी भागात हळहळ व्यक्त होत आहे. 00000

कोपरी शांती नगर भागात अद्यावत शौचालय

ठाणे : कोपरी शांती नगर परिसरात सार्वजनिक शौचालयाची चांगली व्यवस्था नसल्यामुळे गैरसोय होत होती. परंतु माजी ज्येष्ठ नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी ठाणे महापालिकेने सुसज्य सार्वजनिक शौचालय बांधून दिले…

 घोडबंदर रोडवरील वाहतुकोंडी दूर होणार-प्रताप सरनाईक

२० हजार कोटींच्या गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंत भुयारी मार्ग व फाऊंटन हॉटेल जंक्शन ते उन्नत भाईंदर मार्गाला मंजूरी ! अनिल ठाणेकर     ठाणे : २० हजार कोटी खर्चुन गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार असून आठ पदरी उन्नत मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यावरून वसई, विरार, मीरा रोड तसेच भाईंदरकडे जाणाऱ्या प्रवाश्यांची, वाहतुक कोंडीपासून सुटका होईल, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भुयारी मार्गासाठी अंदाजे ११५०० कोटी रूपये व भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या उन्नत मार्गासाठी अंदाजे ८५०० कोटी असे दोन्ही प्रकल्पांना अंदाजे २० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येणार असून गायमुख ते फाऊंटन हॉटेल या भागाची एकूण लांबी ५.५ किमी असून या अंतर्गत प्रत्येकी ३.५ किमी लांबीचे दोन स्वतंत्र बोगदे ३+३ असे सहा पदरी बांधण्यात येणार आहेत. तसेच भाईंदर ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंतच्या रस्त्याची एकूण लांबी १० किमी असून ४+४ असे आठ पदरी उन्नत मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्यावरून वसई, विरार, मीरा रोड तसेच भाईंदर कडे जाणार्या प्रवाश्यांची वाहतुककोंडीपासून सुटका होईल, असे आमदार  प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या दोन्ही प्रकल्पांना एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी मंजुरी दिल्याबद्दल आमदार  प्रताप सरनाईक यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त  संजय मुखर्जी यांचे आभार मानले. घोडबंदर रोडवर होत असलेल्या वाहतुककोंडीवर उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मंगळवार २ जुलै, २०२४ ला एम.एम.आर.डी.ए. च्या प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत भुयारी मार्ग व फाऊंटन हॉटेल जंक्शन ते भाईंदर उन्नत मार्ग या दोन्ही प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात चार पदरी मार्गिका असून या मागील ठाणे शहरातील घोडबंदर रस्त्याचा भाग व पुढील राष्ट्रीय महामार्गाचा भाग विस्तृत रूंदीचे आहेत. त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडी होते. तसेच या रस्त्याचा काही भाग घाट स्वरूपातील असून या भागात अवजड वाहनांची वाहतुक देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वाहतुकीची गती धीमी असते. या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी या रस्त्याच्या भागाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे तथापि, रस्त्याच्या एका बाजुला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व दुसर्या बाजुला ठाणे खाडी असल्याने रस्त्याचे रूंदीकरण करणे अश्यक्य आहे त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे भाईंदर  ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात देखील वाहतुककोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे वर्सोवा ते भाईंदर  या प्रकल्पाचे काम सुरू असल्याने भाईंदर  ते घोडबंदर रोडपर्यंत येण्याकरिता अंतर्गत रस्त्याचा वापर करण्यात येणार असून खाडी किनारा लगत असणारा खारफुटीचा भाग लक्षात घेता वाहतुककोंडीवर उपाय योजना करण्यासाठी भाईंदर  ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत उन्नत मार्ग होणे गरजेचे आहे. ठाणे शहरातून घोडबंदर मार्गे वसई, विरार, मीरा रोड तसेच ठाणे ते भाईंदर  येथे जाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतुककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. घोडबंदर रोडवरील वाहतुककोंडी दुर करण्यासाठी गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन या भागात भुयारी मार्ग बांधण्यात यावा तसेच भाईंदर  ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत उन्नत मार्गाची निर्मिती व्हावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या ७-८ वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन मंगळवारी झालेल्या एम.एम.आर.डी.ए.च्या बैठकीमध्ये वसई, फाऊंटन हॉटेल जंक्शन ते गायमुख या भागात भुयारी मार्ग बांधण्यासाठी तसेच गायमुख ते वसई भुयारी मार्गाने येणार्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदर ला अतिवेगाने जाता यावे यासाठी फाऊंटन हॉटेल जंक्शन, वसई ते भाईंदरपर्यंत उन्नत मार्गाची निर्मिती करण्यासाठी एम.एम.आर.डी.ए.चे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी मंजुरी दिलेली आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. ०००००

कच्छ अस्मिता मंच तर्फे कच्छ पागडी कोणा शिरे’? कार्यक्रम रविवार ७ जुलैला गडकरी रंगायतन येथे

ठाणे : कच्छ वागड या समाजातील तमाम ज्ञाती बांधवांचे नवीन वर्ष म्हणजे आषाढी बिज. ठाण्यामध्ये कच्छ वागड या समाजाचे असंख्य लोक रहात असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवून…

अतिक्रमण आणि निष्कासन विभागातील अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करा

मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांची आयुक्तांकडे मागणी     ठाणे : अनधिकृत हॉटेल, पब, हुक्का पार्लर आणि बार व्यवसायिकांना पाठीशी घालणाऱ्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण आणि निष्कासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी…

उल्हासनगर महापालिका आक्रमक भूमिकेत १४ मालमत्ता थकबाकीदारांना जप्तीचा इशारा

उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी आक्रमक भूमिका घेत मालमत्ता कर न भरणाऱ्यावर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला. गेल्या आठवड्यात १४ मालमत्ताना जप्तीच्या नोटिसा…