Category: ठाणे

Thane news

ठामपाच्यावतीने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे प्राचीनत्व’ या विषयावर व्याख्यान

ठामपाच्यावतीने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे प्राचीनत्व’ या विषयावर व्याख्यान अनिल ठाणेकर ठाणे : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि ऐतिहासिक वारशाचा गौरव करण्यासाठी ‘मराठी भाषेचे प्राचीनत्व’ (मराठी भाषेच्या जन्मापासून आजवरची स्थित्यंतरे) या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीकांत बोजेवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार २७ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषेची उत्पत्ती, तिची प्राचीन मुळे, संत साहित्याची परंपरा, शिवकालीन आणि पेशवेकालीन काळातील भाषेची भूमिका, तसेच आधुनिक काळातील मराठी भाषेचे बदलते स्वरूप यांचा सखोल आढावा ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत बोजेवार हे  आपल्या व्याख्यानातून घेणार आहेत.मराठी भाषेचा उगम, तिचे संस्कृत आणि प्राकृत भाषांशी असलेले नाते, विविध शिलालेख आणि ऐतिहासिक दस्तऐवजांतील उल्लेख, तसेच ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांच्या साहित्यामुळे भाषेला लाभलेले वैभव यावरही ते प्रकाश टाकणार आहेत. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची वाहक आहे, हा संदेश या व्याख्यानातून अधोरेखित होणार आहे.जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसार यासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी, साहित्यप्रेमींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा – प्रताप सरनाईक

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा – प्रताप सरनाईक २१० कोटी रुपयांपैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध! अनिल ठाणेकर ठाणे : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची झळाळी उमटली आहे. वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होताच, दिलेला शब्द पाळणाऱ्या परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहर उमटली. मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत २१० कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले असताना शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली. परिणामी, फेब्रुवारी महिन्याच्या  थकीत वेतन वाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला. हा केवळ आर्थिक दिलासा नसून, तो शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा सुमारे ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्यांची प्रक्रिया सुरू झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणे अशक्य झाले आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत २१० कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.२४ फेब्रुवारी रोजी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीचा हप्ता जमा होताच, नाराजीचे ढग दूर झाले आणि विश्वासाचा सूर्य पुन्हा तेजाने उगवला. “दिलेला शब्द पाळला,” अशी भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे मनापासून आभार मानले.

 डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा

डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करा भाजप नगरसेविका रंजना पेणकर यांची महापौर, उपमहापौर, आयुक्तांकडे मागणी कल्याण: डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशन परिसरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येमुळे नागरिकांना होत असलेला त्रास, वाहतुकीची अडचण तसेच सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन भाजप नगरसेविका रंजना पेणकर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षली चोधरी, उपमहापौर राहुल दामले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. नागरिकांकडून प्राप्त झालेली निवेदने, स्थानिक रहिवाशांच्या मागण्या व सार्वजनिक हिताचा विचार करून हा परिसर फेरीवाला मुक्त करण्याची तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व निर्बाध पादचारी मार्ग उपलब्ध व्हावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा येणाऱ्या काळात नागरिकांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा नगरसेविका रंजना पेणकर आणि मितेश पेणकर यांनी दिला आहे.

अभिनव महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

अभिनव महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिरा – भाईंदर: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत आयोजित महाविद्यालयीन…

कल्याणमध्ये रविवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर

कल्याणमध्ये रविवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर कल्याण:  सोशल सर्व्हिस लीग, कल्याण धर्मादाय डोळ्यांचे व जनरल हॉस्पिटलच्या वतीने हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम…

 घोडबंदर रोडवरील तीव्र पाणीटंचाईमुळे नव्या बांधकामांना परवानगी बंद करावी

घोडबंदर रोडवरील तीव्र पाणीटंचाईमुळे नव्या बांधकामांना परवानगी बंद करावी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांची मागणी ठाणे: घोडबंदर रोडवरील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सध्या राहणाऱ्या नागरिकांच्या हितासाठी महापालिकेकडून नव्या बांधकामांना परवानगी…

भारतीय मजदूर संघाचे देशव्यापी ‘सरकार जगावो आंदोलन’

भारतीय मजदूर संघाचे देशव्यापी ‘सरकार जगावो आंदोलन’ कल्याण: देशातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कॉन्ट्रॅक्ट लेवर, निवृत्त कामगार, सुरक्षा रक्षक, स्कीम वर्कर्स, आशा, अंगणवाडी, घरेलू बांधकाम, रिक्षा टॅक्सी चालक, फेरीवाले,…

बल्याणीत रमजान निमित्त लावलेले बॅनर फाडले

बल्याणीत रमजान निमित्त लावलेले बॅनर फाडले कल्याण: बल्याणी परिसरातील पीर वली शहा बाबा दर्गा येथे रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेले कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे प्रभाग क्र. ४ शिवसेना ठाकरे गटाचे…

खाकी वर्दीतील देवदूत- मानसिंग वचकल आणि रामेश्वर खरुळे

खाकी वर्दीतील देवदूत- मानसिंग वचकल आणि रामेश्वर खरुळे कल्याण: ओक हायस्कुल शाळेचे शिक्षक काळे यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने बॉम्बे हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांना A+ve रक्ताची गरज असल्याने…

  शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्र्यात जोरदार आंदोलन

मुस्लिमांचे पाच टक्के आरक्षण रद्द शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्र्यात जोरदार आंदोलन अनिल ठाणेकर ठाणे, सन २०१४ मध्ये मुस्लिमांना दिलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यानिषेधार्थ मुंब्रा…