Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 श्री माँ विद्यालयात २५ वी आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धा संपन्न

श्री माँ विद्यालयात २५ वी आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धा संपन्न ठाणे : श्री माँ विद्यालय, पातलीपाडा, ठाणे (प) यांच्या विद्यमाने ७ फेब्रुवारी दिवशी आयोजित केलेल्या २५ व्या आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेचे व शालांतर्गत प्रदर्शनाचे उद्घाटन श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे चेअरमन बालगोपाल यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.   यावेळी एफडीए महाराष्ट्रचे असिस्टंट कमिशनर योगेश ढाणे, छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण मुंबईच्या आरोग्य अधिकारी एम महेश्वरी, ठाणे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम तसेच श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे सेक्रेटरी रमेश जोशी, विश्वस्त मिस मंजू तेजवानी, चित्रा अय्यर, प्रिन्सिपॉल मिनी नायर, व्हाईस प्रिन्सिपॉल मेघना वांगे आणि रमा अनंतरामन यांचीही उपस्थिती लाभली. विज्ञान प्रकल्पासाठी विविध बुध्दीगम्य विषय देण्यात आले. विज्ञान प्रदर्शनासाठी ठाणे जिह्यातील २२ शाळांचा समावेश होता. आंतरशालेय ३० प्रकल्प, तसेच वार्षिक ४०० प्रकल्प आयोजित केले होते. इयत्ता पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी – दैनंदिन जीवनात बायोप्लास्टीकचा वापर, विज्ञान आणि स्वच्छ उपग्रह तसेच आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी – मानवतेसाठी तंत्रज्ञान, पर्यावरण पूरक भविष्यातील वाहतूक हे विषय देण्यात आले आहेत. श्री माँ स्नेहदिप ट्रस्ट संचालित श्री माँ स्नेहदिप स्कूलच्या विशेष विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग दिला असून त्यांनी विविध विषयावरील शैक्षणिक साधनांवर तयार केलेल्या प्रकल्पांची मांडणी केली आहे. यावेळी उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थित प्रमुख पाहुणे विद्यार्थी व पालकांनी श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कौतुक करत आभार मानले तसेच श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने ही सर्वांचे आभार मानण्यात आले.

महाराष्ट्राच्या क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपला

महाराष्ट्राच्या क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपला पुण्यात खो-खो परिवारातर्फे स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली क्रीडा विश्वावर दुःखाचा डोंगर पुणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडके लोकनेते व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण क्रीडा क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. क्रीडा क्रांतीचा महामेरू हरपल्याची भावना प्रत्येक मैदानातून व्यक्त होत असून, खो-खो परिवाराने पुण्यात आयोजित केलेल्या शोकसभेत ही हानी शब्दातीत असल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. भावपूर्ण शोकसभा : आठवणींनी दाटलेले क्षण पुण्यात पार पडलेल्या या विशेष शोकसभेत राज्यभरातून आलेले क्रीडा संघटक, प्रशिक्षक, पंच, खेळाडू व पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला दोन मिनिटे मौन पाळून स्व. अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. खेळाडूंचे कैवारी, शिस्तप्रिय नेतृत्व मनोगत व्यक्त करताना वक्त्यांनी दादांची खेळाप्रती असलेली ओढ, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि निर्णयक्षमता अधोरेखित केली. “दादा शब्दाला जागणारे होते; एकदा शब्द दिला की काम पूर्ण,” असा अनुभव अनेकांनी सांगितला. खो-खो खेळाला आधुनिक स्वरूप देत त्याला व्यावसायिक उंचीवर नेण्यात दादांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद झाले. निधी, सुविधा आणि थेट संवाद राज्यातील क्रीडा संकुले, मैदाने, स्पर्धा व खेळाडूंसाठी निधी उपलब्ध करून देताना दादांनी कधीही आखडता हात घेतला नाही. सोलापूर, नाशिक, सांगली, कोल्हापूर, रायगड आदी जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी अडचणीच्या काळात दादांनी मोठ्या भावाप्रमाणे मदतीचा हात दिल्याच्या आठवणी सांगितल्या. मैदानावर थेट येऊन खेळाडूंशी संवाद साधण्याची त्यांची शैली सर्वांच्या मनात कोरली गेली. महिला खेळाडूंना बळ महिला खेळाडूंना संधी, सन्मान आणि नेतृत्वाच्या पातळीवर पुढे आणण्यात दादांचे योगदान मोलाचे असल्याचे रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनच्या प्रतिनिधींनी नमूद केले. “महिलांना विश्वासाने पुढे नेणारा नेता आज आपल्यात नाही,” ही भावना सर्वत्र उमटली. न भरून निघणारी हानी…

मन, मनगट, आणि मेंदू यांनी आपल्या मुलांना सक्षम बनवणे म्हणजे राष्ट्र उभारणीच – सुमेधा चिथडे

मन, मनगट, आणि मेंदू यांनी आपल्या मुलांना सक्षम बनवणे म्हणजे राष्ट्र उभारणीच – सुमेधा चिथडे कल्याण : “मुलांवर आपण काय संस्कार करतो त्यांना काय शिकवतो ? इतिहास चुकीचा समजल्यामुळे भूगोल…

केंद्र सरकारच्या मालकधार्जिणे व कामगारविरोधी धोरणाविरुद्ध १२ फेब्रुवारीला देशव्यापी संप – हरभजन सिंग सिद्धू

केंद्र सरकारच्या मालकधार्जिणे व कामगारविरोधी धोरणाविरुद्ध १२ फेब्रुवारीला देशव्यापी संप – हरभजन सिंग सिद्धू अनिल ठाणेकर ठाणे : केंद्र सरकारच्या या मालक धार्जिणे व कामगार धोरणाविरुद्ध १२ फेब्रुवारी २०२६ रोजी…

तिसगांव पाडा, विजयनगर प्रभागातील प्रलंबीत रस्तामुळे नागरीक त्रस्त

तिसगांव पाडा, विजयनगर प्रभागातील प्रलंबीत रस्तामुळे नागरीक त्रस्त काम त्वरीत मार्गी लावण्यासाठी नगरसेवक महेश गायकवाड यांनी अधिकाराऱ्यांना धरले धारेवर कल्याण : कल्याण पूर्वेतील विजय नगर प्रभागातील सम्राट अशोक विद्यालय ते…

नाशिकमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ

नाशिकमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ संरक्षित वृक्षांची सर्रास कत्तल सुरूच हरिभाऊ लाखे नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने पिंपळ, वड, औदुंबर या वृक्षांना संरक्षित दर्जा देताना, तोडण्यास सक्त मनाई केल्यानंतरही निसर्गसाखळीतील अत्यंत…

 समाजभूषण नासिकेत पानसरे आदर्श पत्रकार ; दैनिक संध्यातर्फे पुरस्कार प्रदान

समाजभूषण नासिकेत पानसरे आदर्श पत्रकार ; दैनिक संध्यातर्फे पुरस्कार प्रदान मुंबई : महाराष्ट्र शासनाने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले मंत्रालय , मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांना आदर्श पत्रकार…

 चिन्मय मिशनच्या ठाणे केंद्रामध्ये अमृत्व महोत्सव प्रित्यर्थ गुरुपादुका पूजन सोहळा संपन्न

चिन्मय मिशनच्या ठाणे केंद्रामध्ये अमृत्व महोत्सव प्रित्यर्थ गुरुपादुका पूजन सोहळा संपन्न ठाणे – परमपूज्य स्वामी चिन्मयानंद यांनी वेदांताचा प्रामुख्याने श्रीमद्भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी स्थापन केलेल्या विश्वव्यापी चिन्मय मिशनला…

महाराष्ट्र राज्य पाणी स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महाराष्ट्र राज्य पाणी स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन रमेश औताडे मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन, सेवा-सुरक्षा व सामाजिक संरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने राज्य सरकारकडे केली असल्याचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड कार्याध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष ऋषिकेश शिलवंत उपाध्यक्ष बंडू हिरवे यांनी आझाद मैदानात आंदोलन दरम्यान सांगितले. याबाबतचा निवेदनपत्र ४ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहे. राज्यातील ग्रामीण भागात स्वच्छता, पाणीपुरवठा, जनजागृती, क्षमता बांधणी आणि घराघरात नळजोडणी (हर घर जल) यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या ऑक्टोबर २०२५ पासून मानधन प्रलंबित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. निधीअभावी ही परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.असे सचिन जाधव व संदीप पाटील यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे राज्यातील हजारो गावे ओ डी एफ प्लस घोषित झाली असून हजारो गावे ‘हर घर जल’ म्हणून प्रमाणित झाली आहेत. मात्र, इतके महत्त्वाचे काम करूनही कर्मचाऱ्यांना मानधन, आरोग्य व सामाजिक सुरक्षा सुविधा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अंजना उबाळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न

अंजना उबाळे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न ठाणे : शहापूर तालुक्यातील साठगाव येथील रहिवासी असलेल्या अंजना तानाजी उबाळे या भिवंडी परिमंडळ पोलीस उपायुक्त कार्यालयात सळग ३१ वर्षे चतुर्थ श्रेणी पदावरून आपली सेवा करून अलीकडेच सेवानिवृत्त झाल्या आहेत.काल त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम साठगाव येथे आयोजित करण्यात आला होता.त्यांनी  उत्तम सेवा बजावली.त्याच्या सेवेच्या कामगिरी बद्दल ठाणे पोलिस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे यांनी त्यांच्या कार्याचा सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मधुकर उबाळे,जेष्ठ पत्रकार  बी.डी. गायकवाड,पत्रकार अविनाश उबाळे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मारुती चन्ने,डॉ.  बी.बी. प्रधान,कुमार उबाळे,गोविंद विशे,लक्ष्मण विशे,दीपक गायकवाड,मनोहर गायकवाड,जगन गायकवाड,राज जाधव भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयातील कर्मचारी,साठगावचे पोलीस पाटील सचिन गायकवाड गावातील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी भीमाई संस्थेचे अध्यक्ष घनश्याम गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.उपस्थित मान्यवरांनी सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे  बौद्धाचार्य  मनोज गायकवाड यांनी केले. उपस्थितांचे आभार घनश्याम गायकवाड यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.