Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांना शिवसेना नगरसेवकांनी झापले

केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांना शिवसेना नगरसेवकांनी झापले कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. यावेळी आयोजित  महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना झापले. महापालिकेची पहिली महासभा ही आज पार पडली. ती खऱ्या अर्थाने गाजली, या महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लिक शेट्टी यांनी आक्रमक भूमीका घेतली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना झापले. या महासभेत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही,  बोलू नका, नाहीतर बाहेर पडा असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. अधिकाऱ्यांना खूप माज आलाय असं ही ते म्हणाले.  महापौर निवडीनंतर भाषणा दरम्यान अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि मल्लेश शेट्टी यांच्यामध्ये वाद पहायला मिळाला.

दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी व डोंबिवली मार्गावरील बस फेऱ्या वाढवण्याची मनसेची मागणी

दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी व डोंबिवली मार्गावरील बस फेऱ्या वाढवण्याची मनसेची मागणी आरती परब दिवा : दिवा रेल्वे स्टेशन ते पडले बीएसयुपी तसेच दिवा स्टेशन ते डोंबिवली या मार्गांवरील ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसची संख्या व फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसे दिवा शहराचे सचिव प्रशांत प्रभाकर गावडे यांनी ठाणे महानगर पालिकेच्या वाहतूक व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. दिवा रेल्वे स्टेशनजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पडले बीएसयुपी व डोंबिवली या मार्गांवर परिवहन सेवेच्या बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही सध्या या मार्गांवरील बसची संख्या अपुरी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी या मार्गावर केवळ दोन बसेस असून त्यामधून फक्त सहा फेऱ्या होत असल्याने दोन फेऱ्यांमधील अंतर एक ते दीड तासांपर्यंत जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच दिवा स्टेशन ते डोंबिवली या मार्गावरही फक्त दोन बसेस असल्याने फेऱ्यांमधील अंतर मोठे असून अनेक वेळा ऐनवेळी बस रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. विशेषतः रविवारी अचानक बस फेऱ्या रद्द केल्या जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत असून याबाबत प्रवाशांना कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने प्रशासनाबाबत नाराजी वाढत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. दिवा शहर व परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक नागरिक डोंबिवली एमआयडीसी, खिडकाळी आदी भागात जाण्यासाठी या परिवहन सेवेवर अवलंबून आहेत. भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेता संबंधित मार्गांवरील बसची संख्या व फेऱ्या वाढवणे अत्यावश्यक असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होऊन परिवहन सेवेचे उत्पन्न व विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून दिवा शहरातील वरील मार्गांवरील बस सेवा तातडीने सुधारावी, अशी मागणी मनसे दिवा शहराच्या वतीने प्रशांत प्रभाकर गावडे यांनी केली आहे.

  विनय चंद्रकांत शाह, परिचर, ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या सेवानिवृत्ती सोहळयास प्रकाश नरसाणा,तुषार परब, रजनीकांत काजरोळकर यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.

 `नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन

श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे या संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिननिमित्त `नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन ठाणे -भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या श्री गणराज नृत्य…

शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची ठाणे महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड

शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची ठाणे महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आज पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत ठाणे शहराच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची, तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केली. मंगळवारी, ३ फेब्रुवारी, सकाळी ११.३० वाजता ठाणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हाधिकारी, ठाणे तसेच महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर व उपमहापौर कृष्णा पाटील यांचे तुळशीचे रोप देऊन अभिनंदन व स्वागत केले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सीएसआर निधीतून तिसरा सोलर हायमास्ट

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सीएसआर निधीतून तिसरा सोलर हायमास्ट कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शाश्वत विकासावर भर देवून शहराचा विकास करण्याचा महापालिका आयुक्त अभिनव गोयल, यांचा मानस आहे. तसेच महापालिका क्षेत्रात लोकोपयोगी उपक्रम हे कॉरपोरेट सामाजिक जबाबदारी निधी मधून कामे हाती घेण्यात यावी व त्यासाठी महापालिका अधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे महापालिका आयुक्त यांचे धोरण आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सहजानंद चौक कल्याण (प) येथे तिसरा सोलार हायमास्ट हा मे. बजाज इलेक्ट्रिकल या कंपनीने कॉरपोरेट सामाजिक बांधिलकी निधीतून उपलब्ध करुन दिला असून सोलार हायमास्ट फिटींग्सचे लोकार्पण सोमवारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याहस्ते संपन्न झाले. उदघाटनावेळी विद्युत यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, उप अभियंता भागवत पाटील व मे. बजाज इलेक्ट्रिकल कंपनीचे रिजनल हेड सरोज कुमार व ओरीया हेड तरण कोहली उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत तीन सोलार हायमास्ट कॉरपोरेट सामाजिक जबाबदारी निधी मधून उभारण्यात आलेले आहेत. कल्याण (प) गणपती चौक गांधारे, इंदिरानगर चौक डोंबिवली (पूर्व) व सहजानंद चौक, कल्याण (प) या ठिकाणी सोलार हायमास्ट उभारण्यात आले आहेत. सोलार हायमास्ट हे सुर्याच्या किरणांवर कार्यान्वित होणार असून त्यास विजेची गरज नाही तसेच महावितरण कंपनीची विज खंडीत झाल्यानंतर सुध्दा हे सोलार हायमास्ट कार्यान्वित राहतील, त्यामुळे चौकात प्रकाश राहणार असल्याने नागरीकांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील १४४ हायमास्ट पैकी उर्वरीत १४१ हायमास्ट हे सोलार हायमास्ट करण्यासाठी  नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यानशिवाजी पार्क, दादर येथील महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट अँड गाईड हॉलमध्ये ३३ व्या वरिष्ठ मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष वयस्कर एकेरी (५० वर्षावरील ), महिला वयस्कर एकेरी (५० वर्षावरील), आंतर कचेरी व आंतर क्लब अशा एकंदर सहा गटांमध्ये हि स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येईल. मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या क्लब मार्फत नावे स्वीकारली जाणार असल्याने खेळाडूंनी त्वरित आपल्या क्लबशी संपर्क साधावा. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, शिवाजी पार्क, मुंबई येथे उपलब्ध असून दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान नावे स्वीकारली जातील. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.

महाराष्ट्राचे किशोर–किशोरी संघ उपांत्य फेरीत

३५ वी किशोर–किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्राचे किशोर–किशोरी संघ उपांत्य फेरीत कुरुक्षेत्रच्या थीम पार्क मैदानावर वेग, चपळाई आणि डावपेचांचा महाउत्सव हरियाणा, क्री. प्र. : कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे सुरु असलेल्या ३५ व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अफलातून, आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ साकारत उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश केला. थीम पार्क मैदानावर उपउपांत्य फेरीतील सामन्यांत महाराष्ट्राने प्रतिस्पर्ध्यांना संधी न देता वेगवान आक्रमण, भक्कम संरक्षण आणि अचूक डावपेचांचा प्रत्यय दिला. उपांत्य फेरीत किशोर गटात महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा, कोल्हापूर विरुद्ध उत्तरप्रदेश, तर किशोरी गटात महाराष्ट्र विरुद्ध पंजाब, राजस्थान विरुद्ध हरयाणा अशी थरारक लढती रंगणार आहे. किशोर गट : महाराष्ट्राची मणिपूरवर दणदणीत सरशी उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राने मणिपूरचा ३०–२१ असा ५.३५ मि. राखून ९ गुणांनी दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राकडून वरद पोळ (२.५०, १.२० मि. संरक्षण व २ गुण), सुरज खाडे (१.१०, १.५५ मि. संरक्षण), प्रफुल्ल वसावे (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), विक्रम राठोड (१.२० मि. संरक्षण व २ गुण) यांनी सलग उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. मणिपूरकडून एल. सिंग (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), पी. पोहिंबा (१.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी झुंज दिली. किशोरी गट : महाराष्ट्राचा विदर्भावर एकतर्फी डावाने विजय किशोरी गटात महाराष्ट्राने विदर्भावर एक डाव आणि १२ गुण राखून (२८–१६) विजय मिळवला. महाराष्ट्राकडून अनुषा तामखडे (२.५० मि. संरक्षण व ४ गुण), अपर्णा वर्दे (२.४० मि. संरक्षण व ४ गुण), राही पाटील (२.१० मि. संरक्षण), कार्तिकी यलमार (१.५० मि. संरक्षण), ऋतुजा सुरवसे (१.३० मि. संरक्षण), पियुशा पानमळकर (नाबाद १.२० मि. संरक्षण) यांनी सलग दमदार कामगिरी केली. विदर्भकडून नव्या दुग्गा (१ मि. संरक्षण), मनवी राजू (१ मि. संरक्षण व ४ गुण), कोमल ठाकरे (४ गुण) यांनी चांगला खेळ केला. किशोर गट : ओडिसाची तामिळनाडूवर एकतर्फी धडक ओडिसाने तामिळनाडूचा २३ गुणांनी (४८–२५) पराभव केला. ओडिसाकडून सत्या (२.३०, २ मि. संरक्षण व १२ गुण), अमरज्योत (१.२०, १ मि. संरक्षण व १० गुण), धनंजय दास (१.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ साकारला. तामिळनाडूकडून कौशिक (१.५० मि. संरक्षण व २ गुण) याने किल्ला लढवला. किशोर गट : उत्तरप्रदेशची विदर्भवर दणदणीत बाजी उत्तरप्रदेशने विदर्भवर २९ गुणांनी (५३–२४) मात केली. उत्तरप्रदेशकडून देव कुमार (१.४० मि. संरक्षण व ८ गुण), बिट्टु यादव (१.४५, १.१० मि. संरक्षण व ६ गुण), इशान (१, २ मि. संरक्षण व ८ गुण) यांनी प्रभावी कामगिरी केली. विदर्भकडून रोशन पालटे (१ मि. संरक्षण व ४ गुण) याने प्रतिकार केला.…

रस्ते अपघात पीडितांसाठीच्या `कॅशलेस उपचार योजने’तील उपचाराची रक्कम ५ लाखापर्यंत वाढवावी – नरेश म्हस्के

रस्ते अपघात पीडितांसाठीच्या `कॅशलेस उपचार योजने’तील उपचाराची रक्कम ५ लाखापर्यंत वाढवावी – नरेश म्हस्के अनिल ठाणेकर नवी दिल्ली, रस्ते अपघातातील जखमी व्यक्तींच्या उपचारासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘कॅशलेस उपचार योजना’ सुरु केली केली आहे. या योजनेतील आईसीयूची मर्यादा किमान २५ दिवसांपर्यंत वाढवावी तसेच उपचाराची रक्कम ५ लाख रुपयांपर्यंत वाढवावी, अशी आग्रही मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी आज लोकसभेत केली. कॅशलेस उपचार योजनेमध्ये या दोन सुधारणा केल्यास गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. लोकसभेमध्ये नियम ३७७ अंतर्गत खासदार नरेश म्हस्के यांनी कॅशलेस उपचार योजनेत करावयाच्या बदलांविषयी लोकसभा अध्यक्षांसमोर ठळक मुद्दे मांडले. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १६२ अंतर्गत रस्ते अपघात पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजना २०२५ ही दिनांक ५ मे २०२५ रोजी अधिसूचित करण्यात आली आहे. आज देशभरात रस्त्यावर होणाऱ्या  अपघातांचं प्रमाण खूप वाढलं आहे. कमावता व्यक्ती अपघातात जखमी झाला की त्यांच्या उपचारासाठी कुटुंबावर आर्थिक संकट ओढावतं. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने सुरू केलेली ‘कॅशलेस ट्रीटमेंट योजना’ ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. ‘गोल्डन ऑवर’ म्हणजे अपघातानंतरचे पहिले काही तास, या काळात उपचार मिळाला तर अनेकांचा जीव वाचू शकतो, ही संकल्पना लक्षात घेऊन सरकारने सुरु केलेली ही योजना नक्कीच दिलासादायक असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. योजना आणखी प्रभावी आणि उपयुक्त ठरण्यासाठी काही सुधारणांची आवश्यकता असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. देशातील एम्स (AIIMS) तसेच इतर नामांकित रुग्णालयांच्या आकडेवारीनुसार, मस्तिष्काला (ब्रेन) झालेली गंभीर दुखापत आणि पाठीच्या कण्याला (स्पायनल कॉर्ड) झालेली इजा अत्यंत गंभीर असते. अशा रुग्णांना धोका टळेपर्यंत सरासरी १८ ते २५ दिवस ICU मध्ये ठेवणं आवश्यक असतं. सध्याच्या कॅशलेस ट्रीटमेंट योजनेत फक्त १.५ लाख रुपये आणि ७ दिवसांपर्यंतच आयसीयू उपचारांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. अपघात झाल्यावर रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण सात दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतो, पण सात दिवसांनंतरही तो पूर्णपणे बरा झाला नसेल तर पुढील उपचारांसाठी खर्चही खूप असतो. गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा खर्च परवडणारा नसतो. म्हणून, काही कुटुंबं उपचार थांबवतात, काही कर्ज काढतात, तर काहींच्या आयुष्यभराची कमाई उपचारामध्ये संपून जाते. अशा वेळी, रुग्णाला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो ही गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.आजच्या काळात वैद्यकीय उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. एका दिवसाचा आयसीयू खर्च अनेक हजार ते लाखो रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे या योजनेतील आर्थिक कव्हरेज वाढवणं ही काळाची गरज आहे. जर ही रक्कम किमान ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली, तर गंभीर अपघातग्रस्त रुग्णांना आवश्यक ते उपचार पूर्ण करता येतील आणि कुटुंबांवरचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. जर आईसीयूची मर्यादा किमान २५ दिवसांपर्यंत वाढवली आणि कव्हरेज ५ लाख रुपये केले, तर असंख्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल. अनेक जीव वाचतील, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. ही मागणी कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नाही, तर मानवतेच्या दृष्टीने आहे. गरीब, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या वेदना समजून घेऊन सरकारने हा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात व्यक्त केली.

 डोंबिवली पश्चिमेतील कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याकडे भाजपाने वेधले लक्ष

डोंबिवली पश्चिमेतील कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याकडे भाजपाने वेधले लक्ष पाणीपुरवठा नियमित करण्याची प्रकाश भोईर यांची  मागणी कल्याण : डोंबिवली पश्चिमेतील काही प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून याकडे भारतीय जनता पार्टीने लक्ष वेधले आहे. माजी नगरसेवक तथा भाजपाचे प्रकाश भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र देऊन जास्त दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. डोंबीवली पश्चिमेतील प्रभाग क्र २२ सहयाद्री नगर, राजूनगर, सरोवर नगर, गरिबाचा वाडा, साई नगर, शंकेश्वर नगर तसेच महालक्ष्मी चौक, या परिसरामध्ये बऱ्याच प्रमाणावर पाणी पुरवठा कमी दाबाने येत असून काही ठिकाणी दिवसातून एका तासापेक्षा कमी पाण्याचा वेळ मिळत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे. तसेच केडीएमसीचा टैंकर पुरवठा वेळेवर व पुरेसा होत नसल्याने दोन-अडीच हजार रु. देऊन खाजगी टैंकर आणावे लागतात. काही ठिकाणी दुपारच्या वेळेत पाणी असल्याने गृहिनींना घरची काम आटपून मुलांना शाळेत सोडणे तसेच बाकीच्या दैनंदीन कामातून वेळ काढणे कठीण होते. शासनाच्या माध्यमातून अमृत योजनेतून राजू नगर व गरिबाचा वाडा या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम अत्यंत प्रकाश धिम्या गतिने सुरू असल्याने भविष्यात हे काम कधी होईल हे सांगता येत नाही. तसेच हे झाले तरी डोबिंवली पश्चिमेला ह्या टाक्या भरण्यासाठी माझ्या माहिती प्रमाणे तशी वितरण व्यवस्थेला डोंबिवली पश्चिमेला अधिकची व्यवस्था करण्यासाठी जल वाहिन्यांची वितरण व्यवस्था दिसून येत नाही. तरी या  परिसरातील पाणी पुरवठा व्यवस्थित होई पर्यंत नागरिकांना त्यांच्या मागणी नुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर जास्त वाढवून नियमित व महापालिकेच्या दरात देण्याची व्यवस्था करावी शक्य असल्यास मोफत देण्याची मागणी भोईर यांनी केली आहे.