Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

गुदाशय कर्करोग आजाराबाबत जनजागृतीचा अभाव

गुदाशय कर्करोग आजाराबाबत जनजागृतीचा अभाव रमेश औताडे मुंबई : धावपळीची जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि बैठे काम यामुळे पचनसंस्था बिघडत आहे. पचनाच्या तक्रारी वाढत असल्या तरी कोलोरेक्टल कर्करोग सारख्या गंभीर आजाराविषयी जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. अशी माहिती मर्क स्पेशालिटीज प्रा. लि. लिमिटेड च्या एका सर्वेक्षण अहवालात समोर आली आहे. अनियमित शौच, ऑसिडिट, शौचावाटे रक्त येणं यासारख्या लक्षणावर लोक कशी प्रतिक्रिया देतान, तसेच डॉक्टरांकडे जाण्यास होणारा विलंब व त्यामुळे निदान करण्यास होणारा विलंब आणि जागरुकतेचा अभाव यामागील त्यांच्या वर्तणुकीच्या तसेच सवयीचा अभ्यास करण्यात आला. या परिषदेला अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील वैद्यकीय आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती बाजपेयी, एस. एन. रहेजा हॉस्पिटल, मुंबई चेबीन वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शिवम शिंगला, हिरानंदानी हॉस्पिटल, मुंबई येथील वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मुबारकुन्निसा टोसे, मर एच. एन. रिलायन्स हॉस्पीटल, मुंबई येथीन वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दर्शित शाह उपस्थित होते.

जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली कल्याण नगरी

जय श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमली कल्याण नगरी रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण : श्रीरामनवमी निमित्त कल्याण शहरात आयोजित करण्यात आलेल्या सकल हिंदू समाजाच्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा नगरसेविका हेमलता पवार, तसेच शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या शेकडो महिला, अनेक रामभक्त आणि युवक त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शोभायात्रेला कल्याण पश्चिमेतील किल्ले दुर्गाडी येथील भवानी चौक येथून सायंकाळी प्रारंभ झाला. दुर्गाडी देवीची आरती करून शोभायात्रा सुरू झाली. तिथून पुढे लालचौकी, आग्रारोड, सहजानंद चौक, देवी अहिल्याबाई होळकर चौक, टिळक चौकमार्गे पारनाका येथील श्रीराम मंदिरापर्यंत अत्यंत उत्साहात काढण्यात आली. त्यानंतर येथील श्रीराम मंदिरामध्ये महाआरती करून शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे या शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य चित्ररथ, महापराक्रमी श्री बजरंगबलींची आकर्षक झांकी, विविध पारंपरिक चित्ररथ, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच साहसी खेळांचे प्रात्यक्षिक यांचा समावेश होता. यामुळे नागरिकांना आपल्या पारंपरिक कला, संस्कृती आणि अध्यात्म यांचे दर्शन घडले. त्यामध्ये कल्याण कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे वंदे मातरम् ला दिडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित माहिती देणारा चित्ररथ, शीख बांधवांचे नववे धर्मगुरू गुरु श्री तेग बहाद्दुर यांच्या पराक्रमावर आधारित चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गिनिज बूक मध्ये नोंद झालेले नारायणी लेझीम पथक, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विद्यालय, उज्वला महिला मंडळ व राष्ट्रीय सेविका समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कृत भारती योग विद्याधाम संस्था, स्वराज्य मित्र मंडळ, लयभारी हास्य क्लब, कराओके, श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवा ट्रस्ट, बालक मंदिर संस्थेचे कॅप्टन रवींद्र माधव ओक शाळेचे लेझीम पथक, विश्व मांगल्य बालसभा, श्री गजानन महाराज शेगाव भक्त, श्री संत राम मारुती, सात संगिनी फाउंडेशन ट्रस्ट, बोहरा आदिवासी नृत्य, भटके विमुक्त समाजाचे मरीआई पोथराज, बंजारा समाजाच्या महिला, इस्कॉन मंदिर संस्था असे शहरातील अनेक नामांकित संस्थांचा समावेश होता. या रामनवमी उत्सवानिमित्त नागरिकांनी आपल्या घरांवर भगवे ध्वज फडकवून, रांगोळी काढून तसेच दीप प्रज्वलित केल्याने संपूर्ण शहर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात रंगून गेले होते. या शोभायात्रेचे लालचौकी, आग्रा रोड, सहजानंद चौक, पारनाका आदी मार्गावर जोरदार पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात आले. तर या मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक संस्था, नागरिकांकडून पिण्याचे पाणी, आइस्क्रिम तसेच सरबत वाटप केले जात होते.

 ‘जिल्हाधिकारी मॅडम’चा नृत्याविष्कार…!

‘जिल्हाधिकारी मॅडम’चा नृत्याविष्कार…! ‘चिमणी पाखरं ‘सोबत धरला ताल! कुडाळ:‘सिंधु सरस’ प्रदर्शनातील चिमणी पाखरं डान्स   अकादमीच्या एका आगळ्या वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या…

चरईमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने रहिवाशांना हुसकावण्याचा डाव – संजय केळकर

चरईमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने रहिवाशांना हुसकावण्याचा डाव – संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे, सर्वसामान्य रहिवाशांना दमदाटी करुन त्यांना जुन्या इमारतीमधून हुसकावण्याचा प्रयत्न बिल्डरकडून होत असल्याचा प्रकार ठाण्यातील चरई भागात उघडकीस आला आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. या कार्यक्रमात नगरसेवक विकास पाटील, अनिल भगत, किशोर मसुरकर, राजेश गाडे उपस्थित होते. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात चरईतील एका जुन्या इमारतीमधील रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत माहिती देताना श्री.केळकर यांनी सांगितले की चरई हा ठाण्यातील जुना भाग असून येथे अनेक जुन्या इमारती आहेत. या इमारतींना अधिकाऱ्यांना हाताशी धरून धोकादायक घोषित करण्याचे आणि रहिवाशांना हुसकावून लावण्याचे प्रकार विकासकांकडून होत आहेत. रहिवाशांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. बिल्डरकडून रहिवाशांना दमदाटी करण्यात येत असून रहिवासी आणि विकासक यांच्यात योग्य करार झाल्याशिवाय रहिवाशांवर घरे खाली करण्याचा दबाव आणू नये, त्यांचा हक्क अबाधित राहावा, अशा स्पष्ट शब्दांत अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती श्री.केळकर यांनी माध्यमांना दिली. या कार्यक्रमात ठाण्यातील एका सीबीएसई शाळेतील पालकही उपस्थित होते. पालक आणि शिक्षकांचा समावेश असलेल्या शाळा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता विविध उपक्रमांच्या माध्यमातून ज्यादा शुल्क वसूल करून आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार या पालकांनी केली. याबाबत आमदार संजय केळकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित शाळेची चौकशी करून कारवाई करण्याची सूचना केली. विविध प्रकल्पांत बाधित झालेल्या रहिवाशांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. बाधित रहिवाशांना हक्काची घरे मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रेंटल घरे प्रशासनाने दिली आहेत. मात्र त्या ठिकाणी सुविधांअभावी रहिवासी नरकयातना भोगत आहेत. त्यामुळे हक्काचे घरही नाही आणि आता रेंटलची घरेही सोडण्याच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. या प्रकरणी आता जन आंदोलनाची तयारी करत असल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली. करवसुलीबाबतही सर्वसामान्य नागरीकांना मानसिक त्रास देऊन मालमत्ता सील करणे आणि नळ जोडणी तोडण्याची कारवाई केली जात आहे. दुसरीकडे कोट्यवधींची थकबाकी असलेल्या मोठमोठ्या आस्थापना, विकासक यांना मोकाट सोडले जात आहे. सर्वसामान्य नागरीक कर भरण्यास तयार आहेत पण प्रशासनाने सापत्न वागणूक देऊ नये, अशी तंबीही केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दर्शनी इमारतीच्या खड्ड्यामुळे शेजारील इमारतीस धोका

ठाणे महापालिका क्षेत्रातील दर्शनी इमारतीच्या खड्ड्यामुळे शेजारील इमारतीस धोका अनिल ठाणेकर ठाणे: महानगरपालिका क्षेत्रातील गुरुकुल सोसायटी जवळील महापालिका मंजूर नगररचना क्रमांक १ अंतिम भूखंड क्रमांक ३४१ या भूखंडावर संबंधित विकासकाने दर्शनी इमारतीचे काम करताना तीन ते चार वर्षांपूर्वी मोठा खड्डा खणून ठेवलेला आहे, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्षांनी दिली. सदर खड्ड्यांमध्ये दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी साचत असल्याने परिसरात मलेरिया ,डेंगू सारख्या गंभीर आजारांची परिसरातील नागरिकांना लागण होत असल्याचा गंभीर प्रकार वारंवार उघडकीस आलेला आहे . त्यातच सदरच्या खड्ड्यामुळे आमच्या इमारतीच्या कंपाऊंडला तडे गेलेले असून बाजूची इमारत कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची गंभीर बाब वारंवार आपल्या निदर्शनास आणलेली,आहे ,येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . सदर गंभीर प्रकरणे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच गणेश कृपा हाउसिंग सोसायटीचे माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका यांचे कडे वारंवार तक्रारी करूनही सदर प्रकरणी कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याने  येथील नागरिकांमध्ये  तीव्र असंतोष पसरलेला आहे .तसेच सदर दर्शनी इमारतीची महापालिकेची सी. सी.परवानगी एप्रिल  महिन्यात संपत आहे. सदर प्रकरणी  त्वरित कारवाई न केल्यास महापालिकेवर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल,आपण या बाबीकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित विभागास आवश्यक त्या सूचना करून सदर समस्या सोडवावी ही नम्र विनंती.

छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे – रामदास आठवले

छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे – रामदास आठवले मुंबई / रमेश औताडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणाऱ्या छोट्या राजकीय पक्षांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये झाले पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात विलीन करून मिलिंद सुर्वे यांचा शेकडो कार्यकत्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश तसेच राष्ट्रवादीचे नेते जीवन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव आणि डॉ रश्मी जीवन जाधव यांच्या नेतृत्वात त्यांच्या अनेक सहकान्यांनी जाहीर प्रवेश केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील प् आहोत. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष आपण पोहचवला असून लवकरच रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. त्या दृष्टीने रिपब्लिकन  पक्षाची घोडदौड सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी छोट्या रिपब्लिकन गटांनी, पक्षांनी आणि संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे असे आवाहन आठवले यांनी केले.

येथे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत आढावा बैठक

येथे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत आढावा बैठक उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेतला आढावा अशोक गायकवाड रायगड-कर्जत : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील ९ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, पुढील टप्प्यात महाराष्ट्रातही हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत येथे कृषी संशोधन केंद्रात मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार धनंजय जाधव, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कोटुंबे यांच्या उपस्थितीत मंगळवारी आढावा बैठक पार पडली. बैठकीस ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), मंडळ अधिकारी, मतदान केंद्र अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते. यावेळी विविध पूर्वतयारी कामांचा सविस्तर आढावा घेण्यात येऊन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. मतदान केंद्र अधिकारी ऐप द्वारे मॅपिंग पूर्ण करणे तसेच प्रोजेनी मॅपिंग तत्काळ पूर्ण कराव्या, ८५ वर्षांवरील मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणे, मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ भरून घेणे, मृत्यू दाखला उपलब्ध नसल्यास जबाब, पंचनामा व कुटुंबीयांची स्वाक्षरी घेऊन कार्यवाही करणे, अस्पष्ट / ब्लॅक अँड व्हाईट फोटो असलेल्या मतदारांचे रंगीत फोटो घेऊन फॉर्म क्रमांक ८ भरून घेणे, मॅपिंग कार्यवाहीबाबत मॅपिंगची प्रक्रिया तीन टप्प्यांत राबविण्याचे निर्देश टेबल टॉप एक्टिविटी द्वारे २००२ व २०२४ मतदार याद्यांचे जुळवणी (मॅपिंग) करणे, जुळवणी न झाल्यास प्रोजनी मॅपिंग(आई-वडील/आजी-आजोबा यांच्या आधारे) करणे, उर्वरित अद्याप सर्वेक्षण झालेले नाही अशा मतदारांसाठी घरभेट देऊन माहिती संकलन करणे, मॅपिंगनंतरची माहिती बूथ लेवल अधिकारी ऍप वर ऑनलाइन अपलोड करणे, राज्यातील ऑनलाइन मॅपिंग फक्त २१% पूर्ण असल्याने गती वाढविण्याचे निर्देश (मोजणी/ गणना फॉर्म) छपाई डेटा उपलब्ध झाल्यानंतर २ दिवसांत डाउनलोड व ३ दिवसांत छपाई पूर्ण करणे, छपाईसाठी जिल्हास्तरावर अभिकर्ता नियुक्ती तातडीने करणे, टप्प्याटप्प्याने (उदा. २०० फॉर्म) छपाई करून वितरण करणे, इंटरनेट वेग लक्षात घेऊन रात्रीच्या वेळेस डाउनलोड करण्याचे नियोजन, DSE पडताळणी भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरील DSE Generation नंतर पडताळणी व वगळणी तातडीने पूर्ण करणे मतदान केंद्र अधिकारी व पर्यवेक्षक बाबत प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्र मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करणे, मतदान केंद्र अधिकारी अधिकारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देणे, BLO Call Book सुविधा वापरून नागरिकांच्या कॉलला त्वरित प्रतिसाद देणे, प्रशासकीय व्यवस्था कामाचा ताण कमी करण्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटर्स नियुक्त करण्याची तयारी करणे , मतदान केंद्र अधिकारी पर्यवेक्षक मार्फत फॉर्म संकलन व नोंद प्रक्रिया करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करून लोकसहभाग वाढविण्याचे आवाहनकरणे, विशेष सूचना अस्पष्ट व मानवी नसलेल्या छायाचित्रांची पडताळणी तातडीने पूर्ण करणे प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करून विशेष सखोल पुनरिक्षणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करून मतदार यादी शुद्ध, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी प्राधान्याने कार्य करावे, असे आवाहन केले.

कुंभमेळा प्रकल्पांसाठी ५४.५३ कोटींचा निधी

कुंभमेळा प्रकल्पांसाठी ५४.५३ कोटींचा निधी नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती हरिभाऊ लाखे नाशिक : केंद्र शासनाच्या ‘भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य २०२५-२६’ योजनेअंतर्गत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी ५४.५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ५० वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला असून, राज्य सरकारने तो संबंधित यंत्रणांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या निधीतून प्रामुख्याने रस्ते विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. डहाणू-जव्हार त्र्यंबकेश्वर नाशिक-औरंगाबाद मार्गावरील सहा लेन काँक्रीट रस्ता व पालखी मार्ग बांधकामासाठी ३५ कोटी रुपये, शिर्डी-राहाता बायपास रस्त्याच्या सुधारणा कामासाठी १६.५ कोटी रुपये, तर नाशिक-दिंडोरी-वणी-नंदुरी रुंदीकरण व काँक्रिटीकरणासाठी ३.०३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व कामांची रस्त्याच्या अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे. सदर निधी नगर विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वितरित करण्यात येणार असून, यासाठी मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांना आहरण व नियंत्रण अधिकार देण्यात आले आहेत. तसेच कुंभमेळा आयुक्तांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रकल्पांसाठी वितरित करण्यात आलेला निधी केवळ मंजूर उद्दिष्टांसाठीच वापरणे बंधनकारक असून, त्याचा पूर्ण वापर ३१ मार्च २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे. निधीचा विनियोग केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळेत सादर करण्याचेही निर्देश शासनाने दिले आहेत. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या प्रकल्पांवर दुबार निधी खर्च होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोणताही बदल करावयाचा असल्यास केंद्र शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. या निर्णयामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून, वाहतूक सुलभता व भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण सुधारणा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प भूसंपादन मोबदला वाटपाला वेग

वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प भूसंपादन मोबदला वाटपाला वेग जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी घेतले महत्वाचे निर्णय अशोक गायकवाड पालघर : वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन मोबदला वाटप प्रक्रियेला सुरुवात झाली असून, भूधारकांना मोबदला सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक कार्यपद्धती आखली आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहव्यवस्थापक संचित मंगला, विविध बँकांचे प्रतिनिधी तसेच पालघर व डहाणू तालुक्यातील अधिकारी सक्षम प्राधिकारी (CALA), बँकांचे अधिकारी, प्रकल्प क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. मोबदला थेट संबंधित भूधारकांच्या बँक खात्यात RTGS पद्धतीने जमा केला जाणार असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले . भूधारकांनी अद्ययावत ७/१२ उतारा, फेरफार नोंदी सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या प्रकरणांमध्ये वारस नोंदी प्रलंबित आहेत, त्या तातडीने पूर्ण करण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यासाठी तलाठी कार्यालये व ग्रामपंचायती येथे विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले. नोटीस बजावणीदरम्यान अनुपस्थित असलेल्या भूधारकांपर्यंत पुन्हा संपर्क साधण्याचे, आणि आवश्यकतेनुसार सार्वजनिक ठिकाणी नोटीस प्रसिद्ध करून पंचनामा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले. मोबदला मिळाल्यानंतर भूधारकांनी घाईघाईने खर्च न करता, तो सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले . नवीन जमीन खरेदी, बँक मुदत ठेवी किंवा पोस्ट ऑफिस बचत योजना यांसारख्या पर्यायांचा वापर करावा. याशिवाय, बँकांनी भूधारकांना नियमित उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करावे, तसेच मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा ठेवून कुटुंबीयांची संमती घेण्याची प्रणाली विकसित करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले. मोबदल्याच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांचा धोका लक्षात घेता, OTP किंवा बँक तपशील कोणालाही देऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले. बँका व पोलीस विभागाने संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवण्याचेही निर्देश देण्यात आले. भूधारकांनी कोणत्याही मध्यस्थ, एजंट किंवा दलालांमार्फत व्यवहार न करता थेट सक्षम प्राधिकाऱ्यांशी किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले.

अंगणवाड्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि बाल संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली? -वर्षा गायकवाड

अंगणवाड्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि बाल संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली? -वर्षा गायकवाड नवी दिल्ली : अंगणवाडीतील पायाभूत सुविधा व कुपोषणाच्या प्रश्नावर सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. स्वच्छता गृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या शहरी भागांमध्ये —विशेषतः अनधिकृत वस्त्यांमध्ये—अंगणवाडीची पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणाची बोंबाबोंब आहे. केंद्र सरकारने यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, त्याची सविस्तर आकडेवारी द्यावी, असा प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. लोकसभेत प्रश्न उपस्थित करत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्यात सध्या किती अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत, जिथे स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी किंवा पुरेशी पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत आणि या त्रुटी दूर करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत?महाराष्ट्रातील आदिवासी व पोषणदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये ‘पोषण ट्रॅकर’  अंतर्गत संकलित करण्यात आलेल्या माहितीची सद्यस्थिती काय आहे व जन्मावेळी कमी वजन असलेल्या मुलांविषयीची अद्ययावत आकडेवारी काय आहे? ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत, मुंबईमध्ये काळजी आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या मुलांची प्रभागनिहाय संख्या किती आहे? तसेच, त्यांच्या पुनर्वसनासाठी निधीचा वापर केला जात आहे का? मुंबईसारख्या महानगरांमध्ये पोषणसेवा, अंगणवाडीची पायाभूत सुविधा आणि बाल संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत? असे प्रश्न खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारले आहेत. वर्षा गायकवाड यांच्या प्रश्नाला महिला व बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी उत्तर दिले आहे, मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’ अंतर्गत, अंगणवाडी केंद्रांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. १५ व्या वित्त आयोगाच्या कालावधीत, ‘मनरेगा’ (MGNREGA) योजनेशी समन्वय साधून, दरवर्षी १०,००० या दराने एकूण ५०,००० अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम केले जात आहे. या योजने अंतर्गत, निधीची तरतूद करण्यात आली असून MGNREGA अंतर्गत ₹८.०० लाख, १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत (किंवा इतर कोणताही विना-निर्बंध निधी) ₹२.०० लाख, आणि महिला व बाल विकास मंत्रालयाकडून ₹२.०० लाख; हा निधी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये, निधी-वाटपाच्या विशिष्ट पद्धतीवर आधारित असलेल्या गुणोत्तरामध्ये विभागला जातो. अंगणवाडी केंद्रांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने, मंत्रालयाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत, यामध्ये, इतर बाबींसह, अंगणवाडी केंद्रांमधील पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि शौचालयांसाठी वाटप करण्यात येणारा निधी अनुक्रमे ₹१०,००० वरून ₹१७,००० पर्यंत आणि ₹१२,००० वरून ₹३६,००० पर्यंत वाढवण्याचा समावेश आहे.’मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’ ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांच्या अधिकारक्षेत्रात येते. ‘मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’ अंतर्गत, महाराष्ट्र राज्यातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांची (AWCs) एकूण संख्या—तसेच पिण्याचे पाणी, पायाभूत सुविधा आणि विकास देखरेख निर्देशकांवर आधारित कार्यरत अंगणवाडी केंद्रांची संख्या https://www.poshantracker.in/statistics या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींना ‘टेक-होम रेशन’ (THR) चा पुरवठा अखंडितपणे होत राहील याची खात्री करण्यासाठी, ‘पोषण ट्रॅकर’मध्ये ‘नॉमिनी मॉड्यूल’ सुरू करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान, ‘मिशन वात्सल्य’च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाला ₹१४४.९७ कोटींची रक्कम वितरित करण्यात आली. याव्यतिरिक्त, बाल संगोपन संस्थांच्या (CCIs) माध्यमातून ३,६६७ मुलांना लाभ मिळाला, आणि ‘मिशन वात्सल्य’च्या संस्थाबाह्य संगोपन घटकाअंतर्गत ३२,५२० मुलांना सहाय्य पुरवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.