Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

इराणची ट्रम्पना खुली धमकी

तेहराण : इराणच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांना थेट धमकी दिली आहे. “ट्रम्प यांनी सावध राहावे, अन्यथा ते स्वतःच संपून जातील,” अशी धमकी संबंधित इराणी अधिकाऱ्याने दिली आहे. या युद्धामुळे खाडी…

गर्भशमुखाच्या कर्करोगपासून बचाव करण्याऱ्या लसीकरणाला मिरा भाईंदर शहरात सुरुवात

गर्भशमुखाच्या कर्करोगपासून बचाव करण्याऱ्या लसीकरणाला मिरा भाईंदर शहरात सुरुवात मिरा – भाईंदर भारतात महिलांमध्ये कर्करोगामुळे होणा-या मृत्यूंचे एक प्रमुख कारण गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हे आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची जवळजवळ सर्व प्रकरणे ह्युमन  पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) या विषाणूच्या संसर्गामुळे होतात आणि वेळेवर लसीकरण करून हा कर्करोग प्रभावीपणे रोखता येतो. महाराष्ट्र राज्यामध्ये सदर एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ ८ मार्चला झाला आहे. त्या अनुषंगाने मिरा भाईंदर महानगरपालिकेने १४ ते १५ वर्षे वयोगटातील (१४ वर्षे पूर्ण मात्र अद्याप १५ वर्षे पूर्ण नाही अशा) मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. सदर एचपीव्ही मोहिमेचे उद्घाटन महापौर डिंपल मेहता, उप-महापौर ध्रुवकिशोर पाटील, सभापती, महिला व बाल कल्याण समिती अनिता पाटील तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नंदकिशोर लहाने यांच्या उपस्थितीत नवघर आरोग्य केंद्रात करण्यात आले.  या मोहिमेदरम्यान एचपीव्ही लस (गार्डासिल -४) सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (यूपीएचसी) आणि महानगरपालिका / शासकिय रुग्णालयांमध्ये मोफत दिली जाईल. एचपीव्ही लस जगभरात जवळजवळ २० वर्षांपासून वापरली जात आहे, आणि जगभरात सदर लसीचे करोडो डोस दिले गेले आहेत. व्यापक वैज्ञानिक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे, की ही लस सुरक्षित आहे. इंजेक्शनच्या जागी वेदना, लालसरपणा किंवा सूज, ताप, डोकेदुखी, थकवा जाणवणे, मळमळ, चक्कर येणे इ. किरकोळ त्रास वगळता सदर लसीचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे सदर लसीच्या दुष्परिणामाबाबत अपप्रचार करणारे व्हिडीओज् समाजमाध्यमावर फिरत आहेत, त्याकडे कृपया दुर्लक्ष करुन सर्व पालकांनी आपापल्या मुलींना सदर लस द्यावी असे मिरा भाईंदर महानरगपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारावा

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारावा आमदार मिलिंद नार्वेकर यांची विधान परिषदेत मागणी केतन खेडेकर मुंबईच्या ऐतिहासिक विक्टोरिया टर्मिनस (VT) रेल्वे स्थानकाचे सर्वप्रथम सन १९९६ मध्ये नाव बदलून ‘छत्रपति शिवाजी टर्मिनस’ (CST) करण्यात आले होते. तद्नंतर जून २०१७ मध्ये या नावात ‘महाराज’ शब्द अधिकृतरित्या जोडण्यात आला आणि  या स्थानकाचे नाव ‘छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT) करण्यात आले. हे मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि यूनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. खेदाची बाब हि आहे की, या स्थानकाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देवून सुमारे २० वर्षाचा कालावधी लोटला तरीदेखील या स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आजतागायत बसविण्यात आलेला नाही. या स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसविण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी राज्य आणि केंद्र शासनाकडे केली आहे. या स्थानकाच्या नवीन पुनर्विकास आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाचा केंद्र सरकारने समावेश केला असल्याची ग्वाही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी माहे डिसेंबर २०२५ मध्ये दिली आहे. त्यानुसार शिवरायांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी या स्थानकाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या कामाचा तातडीने शुभारंभ करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी औचित्याच्या मुद्दयाद्वारे श्री मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषदेत केली.

मुंबई, पालघर, ठाणेला उष्णतेचा ऑरेंज अर्लट

मुंबई : मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात कमाल तापमानात प्रचंड वाढ होणार असल्याचे सांगितलं जात आहे. उद्याही पालघर, ठाणे आणि…

उल्हासनगरात कोणार्कच्या सफाई कामगाराची निर्घृण हत्या

उल्हासनगरात कोणार्कच्या सफाई कामगाराची निर्घृण हत्या शरीरावर जवळपास ३२ हून अधिक वार उल्हासनगर दि ९ ( सुनिल इंगळे  ) : उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नशेखोर तरुणाने ऑन ड्युटी सफाई कामगारावर धारदार चाकूने जवळपास ३२ हून अधिक त्याच्या शरीरावर वार करून त्याची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याची खळबजनक घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे शहरातील सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार चाकूने भोसकून हत्या करण्यात आलेल्या त्या सफाई कामगाराचे नाव महादू उर्फ महादेव जगताप (३५) असे आहे. तो उल्हासनगरातील कॅम्प नंबर एक मधील शहाड गावठाण परिसरात राहत होता. महादू हा कोणार्क ग्रीन एन्व्हायरो या कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. सोमवारी सकाळी तो शहरातील पॅनल क्रमांक ११ मध्ये बॅरेग क्रमांक ८९६, माजी नगरसेविका इंदिरा उदासी यांच्या घरासमोर त्या ठिकाणी लोकांच्या घरातून कचरा डब्यामध्ये टाकण्याचे काम करीत होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास त्या ठिकाणी एका नशेखोर तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून महादू याच्याशी भांडण काढून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या तरुणाने त्याच्या जवळील धारदार चाकूने महादू जगताप यांच्या शरीरावर जवळपास ३२ हून अधिक चाकूचे सपासप वार केले. महादू हा रक्ताच्या थरोळात त्या ठिकाणी पडला. हा प्रकार घडून येतात त्या तरुणाने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून डांबून ठेवले. या घटनेची खबर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी महादू जगताप याला त्वरित उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. पोलिसांनी त्या तरुणाला महादू जगताप यांच्या हत्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये एकच संतापाचे वातावरण पसरले असून त्यांनी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात धाव घेऊन त्या ठिकाणी गर्दी केली होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या हत्याची थरारक दृश्य सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहेत. मध्यवर्ती पोलिसांनी या घटने प्रकरणी तपास सुरू केला असून ताब्यात घेतलेल्या त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. मध्यवर्ती पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव दुर्गेश गुप्त असल्याचे सांगितले आहे. कोणार्क कंपनीच्या सफाई कामगारांनी या घटनेचा निषेध केला. नशेखोर तरुणाकडून हा हात्याचा प्रकार घडून आल्याने शहरातील सफाई कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा कोण पुरवणार. निर्घृण हत्या करण्यात आलेल्या महादू जगताप याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्याला दोन लहान मुले आणि पत्नी असा परिवार आहे. या घटनेबाबत लढा संघटनेचे संदीप गायकवाड यांनी सांगितले महानगरपालिकेने व कोणार्क कंपनीच्या प्रशासनाने महादू जगताप यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी जेणेकरून त्याच्या मुलांच्या भवितव्याचे तजबीज करता येईल, त्याच्या कुटुंबाला आधार होईल आणि ज्या आरोपीने हे कृत्य केले या घटनेच्या निषेधार्थ उद्या आम्ही काम बंद आंदोलन करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्या तरुणाने महादू जगताप यांच्यावर इतक्या भयानक प्रमाणे चाकूने सपासप वार का केले. याचीही माहिती पोलीस काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली असून शहरातील मोकाट फिरणाऱ्या नशेखोर व गांजाडी तरुणाविरुद्ध पोलिसांनी त्वरित काहीतरी उपयोजना करावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.

मुंबई, पालघर, ठाणेला उष्णतेचा ऑरेंज अर्लट

मुंबई : मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील दोन दिवस महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात कमाल तापमानात प्रचंड वाढ होणार असल्याचे सांगितलं जात आहे. उद्याही पालघर, ठाणे आणि…

“लवकर या, लवकर जा”

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महिलांना गिफ्ट मुंबई : जागतिक महिला दिन ८ मार्चला साजरा झाला याचे औचित्य साधून आज विधिमंडळ अधिवेशनात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना मोठी गिफ्ट झाली. लवकर या आणि लवकर जाण्याची सुट महीलांना…

 सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती सभापती -उपसभापती महायुतीचेच…!

सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती सभापती -उपसभापती महायुतीचेच…! सर्व निवडी बिनविरोध…! सिंधुदुर्ग(प्रतिनिधी )– जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांमध्ये भाजपा आणि शिंदे सेनेचे सभापती आणि उप -सभापती बिनविरोध निवडून आले असून सर्व ठिकाणी महायुतीचाच  झेंडा फडकला आहे. कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदी शिंदे सेनेचे मिलिंद नाईक तर उप -सभापती पदी भाजपाचे सिताराम तेली बिनविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे नाईक हे तुळसुली गावचे तर तेली हे हुमरस गावचे सरपंच म्हणून कार्यरत होते. या निवडीनंतर सभापती दालनामध्ये भाजपा खासदार नारायण राणे आणि शिंदे सेनेचे आमदार निलेश  राणे यांचे फोटो लावण्यात येऊन महायुतीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. मालवणमध्ये शिंदे सेनेच्या पोईप मतदारसंघातील सदस्या प्रज्ञा चव्हाण तर उप-सभापतीपदी भाजपाचे वायरी   – भूतनाथ मतदारसंघाचे सदस्य घनश्याम झाड यांची बिनविरोध निवड झाली. देवगडमध्ये भाजपाचे गणेश राणे हे सभापती झाले तर शिंदे सेनेचे अमोल लोके हे उप- सभापती बिनविरोध विजयी झाले आहेत. याठिकाणी महायुतीची निर्विवाद सत्ता आहे. कणकवली पंचायत समिती सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे नांदगाव पं. स.मतदारसंघातून  बिनविरोध विजयी  झालेल्या हर्षदा वाळके यांची बिनविरोध निवड झाली आहे  तर उप-सभापतीपदी वरवडे पंचायत समिती मतदारसंघातून बिनविरोध विजयी झालेले राजेश उर्फ सोनू सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. कणकवलीत  भाजपाचे १४ तर शिंदे सेनेचे दोन अशा १६ ही जागांवर महायुतीचीच सत्ता आहे. महायुतीचेच सर्व  उमेदवार विजयी होऊन  एकहाती सत्ता मिळाली आहे. वैभववाडीत सभापती आणि उप-सभापती हे दोन्ही भाजपाचेच असून दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत.सभापतीपदी सिद्धेश दिलीप रावराणे तर उप- सभापतीपदी सौ. साची सचिन  कोलते या बिनविरोध निवडून आल्या आहेत. दोडामार्ग  तालुक्यात महायुतीची एकहाती सत्ता आल्याने सभापतीपदासाठी भाजपच्या पार्वती गवस यांची तर उप-सभापती पदासाठी गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाली आहे. वेंगुर्ल्यात सभापतीपदी मातोंडचे भाजपा सदस्य शंकर घारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उप-सभापतीपदी शिंदे सेनेचे परुळे प. स.सदस्य सचिन देसाई यांची निवड झाली आहे. सावंतवाडीत शिंदे सेनेच्या सुस्मिता जाधव या सभापतीपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत  तर उप-सभापतीपदी भाजपाचे गौरव मुळीक हे बिनविरोध निवडून आले आहेत.

वंचितचा पंतप्रधान मोदींविरोधात एल्गार २३ मार्ला आरएसएस मुख्यालयावर मोर्चा

वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चात काँग्रेसही होणार सहभागी ० आरएसएस मुख्यालयासमोर धरणे आंदोलनही करणार मुंबई : देशाच्या सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्ततेशी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी तडजोड केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष आणि वंचित…

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट मुंबई  : मॉरिशस प्रजासत्ताकाच्या भारतातील उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बाप्पू यांनी आज सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भारत-मॉरिशस संबंधांना अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने सुनेत्रा अजित पवार व शीलाबाई बाप्पू यांच्यामध्ये भारत–मॉरिशस संबंध, महाराष्ट्र–मॉरिशस ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध, व्यापार-गुंतवणूक संधी तसेच पर्यटन व सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. यावेळी मॉरिशसचे कॉन्सुल जनरल डॉ. डी. के. बकटोवार, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, दयानंद बाप्पू उपस्थित होते.