Month: June 2026

मृतदेहाला मिळेना रस्ता!

 दिव्यात बिल्डरांच्या कथित दादागिरी विरोधात नागरिकांचा संताप दिवा : दिवा शहरातील बेडेकरनगर परिसरात राज वाघ यांचा मृत्यू झाला. पण मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याच्या वेळी रस्ता बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बेडेकरनगर येथील पाटील टॉवर आणि रविना अपार्टमेंट परिसरातील रस्त्याच्या वापराबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या मार्गावरून वाहन किंवा रिक्षा नेण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या या परिसरातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, एका मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणल्यानंतर अंत्ययात्रेसाठी त्याच मार्गाचा वापर करावा लागणार असल्याचे माहिती असतानाही संबंधित रस्ता लोखंडी रॉड टाकून बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच समाजसेवक अमोल केंद्रे घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्याला लावण्यात आलेले कुलूप तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना एका युवकाने चावी आणून कुलूप उघडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “जिवंत माणसांनाच नव्हे तर मृतदेहालाही रस्ता नाकारला जात असेल तर ही अत्यंत अमानुष बाब आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित बिल्डर आणि जागा मालकांविरोधात पोलिसांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच नागरिकांना मुक्तपणे रस्ता वापरण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे. अमोल केंद्रे, समाजसेवक, दिवा बिल्डरांची दादागिरी कधी बंद होणार.राज वाघ यांचे निधन झाले होते.अंतिम संस्कार करण्यासाठी बॉडी घेऊन जाण्याचा रस्ता बंद केला.पोलिस प्रशासनास कळवले,दिवा प्रभाग समिती यांना कळवले. बेडेकर नगर पाटील टॉवर येथे कित्तेक वर्षा पासून हिच परिस्थिती आहे.कोण बोलणार? गुंडागर्दी,हुकूमशाही सुरू आहे.माणुसकी जिवंत राहिली नाही.कायद्याचा धाक राहिला नाही.मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्यावर योग्य ती कारवाई करून हा रस्ता कायमचा खुला करावा.  

ठाणे मध्यवर्ती कारागृहात प्रसादिक कीर्तन सोहळ्याचे आयोजन

ठाणे, महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग व महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभाग तसेच वै. प. पू. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ, आळंदी (देवाची) द्वारा संचालित “वारकरी आचारसंहिता परिषद, महाराष्ट्र” याचे  संयुक्त…

– कल्याणमध्ये कचऱ्यात सापडली नवजात मुलगी

 नवजात मुलीला फेकणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील चिकणीपाडा परिसरात कचऱ्यात सहा दिवसांची नवजात मुलगी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात राहणाऱ्या पूजा लावेकर या शाळेत काम करतात. सकाळच्या सुमारास त्या कचरा टाकण्यासाठी गेल्या असता एका पिशवीत ही नवजात मुलगी आढळून आली. त्यावेळी काही भटके कुत्रे या बाळाच्या आसपास फिरत होते. कुत्र्यांपासून बाळाला धोका असल्याचे लक्षात येताच पूजा यांनी तातडीने मुलीला उचलून घेतले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मुलीला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून काही काळ तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, नवजात मुलीला अशा अवस्थेत टाकून जाणाऱ्या व्यक्तींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

देवस्थान जमीन विधेयक स्थगितीचा निषेध

 किसान सभेची राज्यव्यापी आंदोलने ठाणे : शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात आणि देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क देणारे विधेयक तातडीने मंजूर करावे, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या…

ठाणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्याला वेग

 १.१६ लाख नागरिकांनी केली स्व-गणना ठाणे : केंद्र शासनाच्या ‘जनगणना २०२७’ मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यात घर यादी व घरगणना (House Listing & Housing Census) या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू असून, स्व-गणना सुविधेला नागरिकांकडून…

– झाराप रेल्वे स्टेशनवरून होते हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक…!

– चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘उबाठा ‘ सेनेला आश्वासन…! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन अवैधरित्या हजारो टन खनिज सदृश्य मातीची रेल्वेने वास्को-गोवा येथे वाहतुक केली जात आहे.त्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथे अवैद्यरित्या उत्खनन केले जात आहे. ‘उबाठा ‘सेनेचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर आणि पक्षाचे  प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. त्याबाबतचे लेखी निवदेन यावेळी त्यांना देण्यात आले. जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग कसा काय सुरु करण्यात आला.संबंधितांनी  उत्खनन आणि वाहतुकीसाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने घेतले आहेत का? असे प्रश्न यावेळी उपस्थित करत  प्रति वर्षी २५ कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे असा आरोप यावेळी  करण्यात आला. या माध्यमातून सिंधुदुर्गात मोठा खनिज घोटाळा होत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बर्डे देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी या अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या  तक्रारीची गंभीर दखल घेत उत्खननासाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने व इतर कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश खनिकर्म  अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकऱ्यांना  देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गेले दोन आठवडे कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन फार मोठ्या प्रमाणावर खनिज सदृश्य मातीची वाहतुक वास्को-गोवा येथे होत आहे. गेल्या दोन आठवड्यात १० ते १२ रेल्वे वॅगन  मालवाहतूक  दररोज भरुन ही खनिज सदृश्य माती नेली जात आहे. दिवसाला ५००-६०० डंपर भरुन आणण्यात येणाऱ्या खनिज सदृश्य मातीच्या  वाहतुकीमुळे झाराप येथील ग्रामस्थांना प्रदुषणाचा त्रास होत आहे. शिवाय या परिसरातील अरुंद रस्ते यामुळे अपघात होण्याची भिती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत  याकडे लक्ष वेधण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथून अवैद्यरित्या उत्खनन करुन ही खनिज माती आणली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर ही खनिज माती तळवणे, कोंडुरा भागातून आणण्यात येत आहे तर तिथे कुठल्याही शासकीय, प्रशासकीय परवानग्या न घेता तसेच कुठल्याही प्रकारचा पर्यावरण आघात अहवाल तसेच  जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग सुरु झाला आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठल्याही शासकीय प्रशासकीय परवानग्या न घेता होत असलेला अवैद्य मायनिंग उद्योग शासनाचा महसुल बुडवून सुरु आहे काय? असाही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी ‘एमआयडीसी’ क्षेत्रात रात्रीच्या अंधारात होत असलेल्या खनिज सदृश्य मातीच्या चोरीचा प्रकार उघड झालेला आहे. असे असताना झाराप रेल्वे स्टेशनवरुन नेण्यात आलेली हजारो टन खनिज सदृश्य माती ही  कुठल्या नियमांतर्गत नेण्यात आली आहे. हे जनतेला कळले पाहिजे. अशाच प्रकारे जिल्ह्यात जागोजागी होत असलेल्या बेकायदेशीर अवैध मायनिंग विरोधात देखील कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मिरा-भाईंदरमध्ये रेशनकार्डमधून हजारो नावे गायब

गरिबांच्या अन्नावर घाला मिरा -भाईंदर : मिरा-ईंदर शहरातील हजारो रेशनकार्डधारकांना नावावर अचानक ऑनलाइन प्रणालीतून गंडांतर आले असून, गेल्या ८ ते १० महिन्यांपासून केशरी आणि पिवळ्या रेशनकार्डमधील हजारो नावे गायब झाल्याची…

कलेक्टर एनओसीसाठी म्हाडा रहिवाशांना पडतोय दीड लाखाचा अतिरिक्त भुर्दंड

केतन खेडेकर मुंबई -भायखळा घोडपदेव येथील न्यू हिंद म्हाडा कॉलनी येथील कलेक्टरवरील जमिनीच्या प्रॉपर्टी कार्डवर अजूनही कलेक्टरचे नाव असल्याने महाराष्ट्र शासनाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सदनिका हस्तांतर करण्यासाठी हेलफाटे मारावे लागत…

घनकचरा नियमावली जनतेच्या दारी

 महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन अशोक गायकवाड नवी मुंबई :  १ एप्रिल २०२६ पासून घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ लागू झाले असून याची माहिती नागरिकांपर्यंत विविध माध्यमातून पोहचविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ ते ११ जून या कालावधीत विविध सोसायट्या व वसाहतींमध्ये विशेष जनजागृती करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभाग कार्यालय क्षेत्रात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून संबधित स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांचेमार्फत नागरिकांपर्यंत पोहचून घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत लोकजागृती करण्यात येत आहे. यामध्ये से.१४,१५ ऐरोली येथील विविध सोसायट्या, दिघा कृष्णावाडी येथील त्रिमूर्ती सोसायटी, सानपाडा येथील मोराज सोसायटी, से.१२ कोपरखैरणे येथील फाम सोसायटी व से.५ येथील शकुंतला सोसायटी तसेच से.१९ ऐरोली येथील काकासाहेब थोरात सोसायटी, वाशी येथील वर्धमान पॅलेस सोसायटी, सिबीडी बेलापूर से.६ येथील वर्षा सोसायटी अशा विविध सोसायट्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अंतर्गत निर्मितीच्या ठिकाणी घरापासूनच ओला, सुका, घरगुती घातक व सॅनेटरी अशा चार प्रकारे कचरा वर्गीकरण करावयाचा आहे याविषयी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे वर्गीकरण झालेला कचरा हा कचरा वाहतूक करणा-या वाहनांमध्ये वेगवेगळा देणे अत्यावश्यक असल्याचेही सूचित करण्यात आलेले आहे. दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणा-या सोसायट्या यांनी स्वत:च्या आवारात कच-याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प राबविणे नव्या नियमानुसार बंधनकारक असल्याने याविषयी सोसायटी व संस्था पदाधिकारी, सदस्य यांना मार्गदर्शन करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आठही विभागांमध्ये एजी एन्व्हायरो आणि परिसर सखी या संस्थांच्या वतीने सोसायट्यांमध्ये जाऊन तसेच आस्थापना व संस्था याठिकाणी व्यापक जनजागृती करण्यात येत असून नवी मुंबईकर नागरिकांचा याकामी चांगला प्रतिसाद लाभत आहे.