Month: June 2026

सभागृहनेते अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

अशोक गायकवाड पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार १ जून रोजी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, नवीन पनवेल शहराध्यक्ष अमोल राजन जाधव आणि दिव्यांग सेल नवीन पनवेल अध्यक्ष प्रथमेश भगवान भंडारे यांच्यावतीने नवीन पनवेल, सेक्टर ६ येथील रुषिवन व रुपवन या दोन्ही वृध्दाश्रमात जावून सभागृह नेता अॅड. प्रकाश बिनेदार यांच्या हस्ते वृध्द पुरुष-महिलांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी या दोन्ही वृध्दाश्रमाचे संचालक संतोष पवार यांनी सभागृह नेता अॅड. प्रकाश बिनेदार यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या व तेथील महिलांनी औक्षणही केले. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे माजी सरचिटणीस प्रभाकर पवार, भाजपा उत्तर रायगड जिल्हा सदस्य श्याम साळवी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, नवीन पनवेल शहराचे सरचिटणीस अॅड. शिवकुमार कांबळे, कोष्याध्यक्ष संतोष म्हस्के, सेलचे संयोजक विलास फडके, सागर येसनकर, जयेश कांबळे, साईनाथ भटकळ, अजिंक्य माने, भावेश बाईट, अनिकेत पंडीत, सुदेश तावडे, सुमित सकपाळ, कुणाल भंडारे आदि मान्यवर उपस्थित होते.

दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, मुलांमध्ये वाढतेय संसर्गाची भीती

राज भंडारी नवी मुंबई : गेल्या आठवड्यापासून नवी मुंबईतील काही भागांमध्ये दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाण्याला दुर्गंधी येणे, गढूळपणा, पाण्याचा रंग बदलणे आणि चव बदलणे अशा तक्रारी रहिवाशांकडून केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पोटाचे विकार, अतिसार, उलट्या, ताप आणि त्वचारोगाच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याची माहिती आरोग्यतज्ज्ञांनी दिली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी नळातून येणारे पाणी पिवळसर किंवा गढूळ दिसत असून ते पिण्यास अयोग्य असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही कुटुंबांनी खबरदारी म्हणून बाटलीबंद पाणी किंवा पाणी उकळून वापरण्यास सुरुवात केली आहे. तज्ज्ञांच्या मते, दूषित पाण्यात जीवाणू, विषाणू किंवा परजीवी असू शकतात, ज्यामुळे गॅस्ट्रोएन्टरायटिस, टायफॉइड, हिपॅटायटिस-ए आणि इतर जलजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना याचा अधिक धोका असतो. मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबईचे वरिष्ठ फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. श्रीराम रघुनाथ नावडे  यांनी सांगितले की, दूषित पाण्यामुळे सर्वाधिक प्रमाणात अतिसार, उलट्या, पोटदुखी आणि ताप यांसारख्या तक्रारी दिसून येतात. सतत जुलाब किंवा उलट्या झाल्यास शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते, जी गंभीर ठरू शकते. नागरिकांनी पाणी गाळुन व उकळूनच प्यावे. पोटाचे विकार दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकल्यास किंवा लघवीचे प्रमाण कमी झाल्यास तातडीने वैद्यकिय सल्ला घ्यावा. तसेच मदरहुड हॉस्पिटल, खारघरचे बालरोग व नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. अमित पी. घावडे यांनी सांगितले की, लहान मुलांची रोगप्रतिकारक क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसल्याने दूषित पाण्यामुळे त्यांना अतिसार, उलट्या आणि तापाचा त्रास लवकर होऊ शकतो. सध्या ओपीडीत दाखल होणाऱ्या १०० पैकी १५ मुलांमध्ये दुषित पाण्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या आढळून येत आहेत. दुषित पाण्यामुळे होणाऱ्या अतिसारामुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन वेगाने वाढू शकते तर पोटाच्या संसर्गाशी संबंधित तक्रारींमध्ये सुमारे १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. पालकांनी विशेष खबरदारी घेत मुलांना उकळलेले, स्वच्छ पाणी द्यावे, मुलांना हातांची स्वच्छता बाळगण्यास प्रोत्साहन द्या आणि मुलांमध्ये सुस्ती, डोळे खोल जाणे किंवा लघवी कमी होणे तसेच इतर असामान्य लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी नोंदवल्या असून पाण्याची तपासणी आणि पुरवठा यंत्रणेची पाहणी करण्याची मागणी केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, समस्या पूर्णपणे सुटेपर्यंत नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून वापरणे, उघड्यावर विकली जाणारी कापलेली फळं व उघड्यावरच्या अन्न पदार्थांचे सेवन टाळणे आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. अशी घ्या काळजी * पाणी किमान 10 मिनिटे उकळून घ्या व त्यानंतर थंड करुन प्या. * घरी असलेले वॉटर फिल्टर नियमित स्वच्छ करा. * हात साबणाने स्वच्छ धुवा. * उघड्यावरचे अन्न आणि कापलेली फळे यांचे सेवन करणे टाळा. * अतिसार किंवा उलट्या झाल्यास ओआरएस आणि पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करा. * लक्षणे गंभीर असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

फणसोलीचा सुपुत्र संविधान चंदने भारतीय सैन्यात दाखल

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशसेवेचे स्वप्न साकार; मुरबाड तालुक्यात अभिमानाचे वातावरण राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील फणसोली गावचा सुपुत्र संविधान रविंद्र चंदने याची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याने गावासह संपूर्ण मुरबाड तालुक्यात आनंद…

चौल-२ शाखा कार्यालय रायगड जिल्ह्यातील पहिले १०० टक्के स्मार्ट मीटरयुक्त कार्यालय

१,५७० ग्राहकांचे सर्व मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतर रायगड : राज्यभर महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग-१ उपविभागांतर्गत चौल-२ शाखा कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या…

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आकाश पाटील यांची निवड

कल्याण  : दि.ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत “ठाणे तालुका” मतदारसंघातून युवा नेतृत्व आकाश  पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून सहकार क्षेत्रात नव्या पिढीच्या नेतृत्वाला संधी मिळाल्याची भावना व्यक्त…

एमएमआरडीएच्या रस्ते प्रकल्पांना गती देण्याचे आमदार कुमार आयलानी यांचे निर्देश

पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासह दुभाजक रंगविणे व वृक्षारोपणावर भर सुनिल इंगळे उल्हासनगर : शहरातील एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकाम प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम…

 शिष्यवृत्ती व आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी ‘झुरळ फेको’ आंदोलन करण्याचा इशारा

सेव्ह एज्युकेशन सोसायटीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र कल्याण : डोंबिवली येथील के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयातील शिष्यवृती व आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी माहिती दडपणे, चौकशी टाळणे, तक्रारदारावर पुरावे सादर करण्याचा दबाव आणणे याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया समोर झुरळ फेको आंदोलन करण्याचा इशारा सेव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रोहिदास सुरवसे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला आहे. प्रकल्प विकास अधिकाऱ्यांनी सुरवसे यांच्याकडून कथित शिष्यवृती घोटाळ्याबाबत पुरावे व विद्यार्थ्यांची यादी सादर करण्यास सांगितले आहे. हि बाब अत्यंत गंभीर, कायदेशीरदृष्ट्या चुकीची व प्रशासनिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न दर्शविणारी आहे. सुरवसे यांनी वेळोवेळी के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय, डॉबिवली येथील आदिवासी वि‌द्यार्थ्यांच्या शिष्यवृती, आर्थिक अनियमितता, निधी अपहार, वि‌द्याथ्यांच्या हक्कांचे उल्लंघन तसेच विविध प्रशासकीय गैरप्रकारांबाबत शासनाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तसेच माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत अनेक आरटीआय अर्ज करुन संबंधित माहिती मागविण्यात आलेली आहे. मात्र आजपर्यंत संबंधित विभाग व महावि‌द्यालयाकडून कोणतीही संपूर्ण, सत्य व कायदेशीर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे, सेव एज्युकेशन सोसायटी व सेव पेंडरकर कॉलेज संदर्भातील विविध आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार, प्रशासकीय गाँधळ व गंभीर घोटाळ्यांबाबत गेल्या दीड वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आलेला आहे. या तक्रारींची गंभीरता लक्षात घेऊन शासनाने स्वतः के. व्ही. पेंडरकर महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे. शासनाने काढलेल्या प्रशासक नियुक्ती आदेशामध्ये देखील संस्थेमध्ये गंभीर अनियमितता व प्रशासकीय बिघाड असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत देखील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने प्रत्यक्ष चौकशी करण्याऐवजी तक्रारदारालाच “तुम्ही पुरावे द्या, मग आम्ही कारवाई करू” असे सांगितले जात आहे, ही बाब अत्यंत धक्कादायक, निषेधार्ह व संशय निर्माण करणारी आहे. माहिती अधिकार अंतर्गत माहिती न देणे आणि त्यानंतर तक्रारदाराकडूनच पुरावे मागणे हे वस्तुतः माहिती दडपण्याचा व चौकशी टाळण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर संशय निर्माण करणारे आहे. त्यामुळे तक्रारदाराकडून अशक्य स्वरूपाचे पुरावे मागण्याऐवजी संबंधित सर्व अभिलेख स्वतः ताब्यात घेऊन निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. सन २०१० पासून आजपर्यंतच्या सर्व शिष्यवृत्ती निधीचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे. उपयोगिता प्रमाणपत्रांची सत्यता तपासणी करण्यात यावी, व मंजूर व वितरित शिष्यवृत्तीची तुलना रिपोर्ट द्यावा.  माहिती दडपणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आदिवासी वि‌द्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक हक्कांशी संबंधित या गंभीर प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, व माहिती अधिकार अंतर्गत मागविलेली सर्व माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी सेव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणात निष्पक्ष व प्रभावी कारवाई न झाल्यास दिनांक २० जून  रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, शहापूर येथील प्रकल्प अधिकारी यांच्या दालनासमोर समोर झुरळ फेको आंदोलन करण्याच्या इशारा रोहिदास सुरवसे यांनी दिला आहे. 00000000000 त होते. 000000000

दिवा शहरातील नालेसफाई कामांबाबत मनसेची तीव्र नाराजी

दिवा, दि. 3 जून (आरती परब) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहराचे शहराध्यक्ष तुषार पाटील यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन दिवा शहरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांबाबत…

भगवान बुद्ध भारत-म्यानमार संबंधांचा अध्यात्मिक दुवा

 – राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन अशोक गायकवाड मुंबई : ‘भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांचे दृढ बंध असून या संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी आपण भारत…