Category: होम

मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान-संजय यादव

अशोक गायकवाड मुंबई : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या वोटर स्लिप निवडणूक कार्यालयाकडून वितरित केल्या जात आहेत,असेही जिल्हाधिकारी यादव यांनी यावेळी सांगितले. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदार आहेत. या मतदारांचे नाव मतदान यादीत असल्याने त्यांना मूळ पास पोर्ट असेल तर मतदान करता येईल. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे,अशी ही माहिती जिल्हाधिकारी यादव यांनी यावेळी दिली.

कल्याण मोमीस समूहाने बाईक रॅलीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

ठाणे : कल्याण पश्चिम मतदारसंघात कल्याण मोमीस समूहातर्फे मतदार जनजागृतीकरिता बाईक रॅली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आम्ही नक्की मतदान करणार असा संदेश या…

युजीसी नेट परीक्षेसाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ

मुंबई : देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विविध विषयांमध्ये पीएचडीसाठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट या परीक्षेची मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १० मे होत. यूजीसी नेट या परीक्षेचे नियोजन मागील काही वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)च्या मार्फत केले जाते. यंदाही एनटीएमार्फत ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. देशभरात लोकसभा निवडणुका सुरू असल्याने अनेक शिक्षक, कर्मचारी हे या निवडणूक कामात असल्याने यूजीसी नेटसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार १५ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहील. तसेच १६ ते १७ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत विद्यार्थी परीक्षा शुल्क भरू शकतात. ऑनलाईन प्रवेश अर्जात काही सुधारणा करायची असल्यास त्यासाठी १८ ते २० मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ugcnet.nta.ac.in या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल. यूजीसी नेट परीक्षेला बसणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १ हजार १५० रुपये प्रवेश शुल्क आहे; तर ईडब्लूएस, ओबीसी, एनसीएल प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये आणि एसटी, एससी, दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी ३२५ रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.

मतदानासाठी २० मे रोजी भरपगारी सुट्टी – अशोक शिनगारे

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात २० मे  रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यात २३ भिवंडी, २४ कल्याण आणि २५ ठाणे लोकसभा मतदार संघ आहेत. या तीनही मतदार संघात पाचव्या टप्प्यात सोमवार २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ ब नुसार भरपगारी रजा देय आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी /कर्मचारी /रोजंदारी कर्मचारी यांना सोमवार दि. २० मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश शर्ती/अटीस अधीन राहून देय आहे. १.  सदर आदेश हा शासकीय आस्थापना/खासगी आस्थापना/रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना/दुकाने/कंपनी/अशा सर्व आस्थापनांना लागू आहे. २. ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांचे अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांना धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही. ३. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या आस्थापना प्रमुख हे उक्त कलमाचे १३५ ब (२) नुसार कारवाईस पात्र राहतील. ४. हा आदेश हा अन्य जिल्ह्यात काम करणाऱ्या परंतु ठाणे जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

ठाकरे गटाकडून वायकरांना नोटीस

मुंबई : ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात माझ्यासहीत कुटुंबियांना अटक होण्याची भीती होती. ती टाळण्यासाठीच मनाविरुद्ध एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला अशी जाहीर कबुल देणाऱ्या रवींद्र वायकर यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नोटीस बजावण्यात…

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

दिन विशेष श्याम ठाणेदार आज ११ मे, आजचा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९९९ सालापासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास महामंडळ ( टी डी बी )…

निवडणूक निकालानंतर मोबाईल रिचार्ज महागणार

सध्या देशात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून २०२४ रोजी लागणार असून त्यानंतर सामान्य माणसाला फटका बसण्याची शक्यता आहे. निकालानंतर मोबाईलचे रिचार्ज महागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर…

जनमताचा आरसा दिसतोय

पैलू सुभाष लांडे देशातील सार्वत्रिक निवडणुकींमुळे वातावरण ढवळून निघत असताना हळूहळू जनमताचा कलही समोर येत आहे. त्यानुसार ‘एनडी’च्या विरोधात ‘इंडिया’ आघाडी सरस असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषत: शेतकरी, कामगार, विद्यार्थी…

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल…

तब्बल १० वर्ष ८ महिने आणि २१ दिवसांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला असून त्यात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तर उर्वरित तीन आरोपी…