Category: मुंबई

Mumbai news

 डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर

डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर २४ फेब्रुवारी रोजी ‘हेमूदादा’चा माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात प्रयोग मुंबई : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची स्थापना करुन मुंबईत गुजराती समाज बांधवांना विविध व्यासपीठ उपलब्ध करुन देणारे, मराठी आणि गुजराती साहित्य निर्मिती मध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच सुमारे ६० वर्षांहून अधिक काळापासून कच्छशक्ती नियतकालिक अखंडपणे प्रकाशित करणारे डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ हे नाटक मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. वसंत मारु आणि कवल सावला लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग माटुंगा (पश्चिम) येथील यशवंत नाट्यगृहात रात्री ८.४५ वाजता होणार आहे. त्याचप्रमाणे या नाटकाचे प्रयोग २५ फेब्रुवारी रोजी झवेरबेन हॉल, घाटकोपर आणि २२ मार्च रोजी न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातुश्री सभागृहात रात्री ८.४५ रोजी सादर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे २२मार्च रोजी डॉ. हेमराज शाह हे वयाची ८५ वर्षे पूर्ण करुन ८६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित हेमूदादा या नाटकाप्रमाणेच ‘डॉ. हेमराज शाह: एक समर्पित जीवन’ या शीर्षकाखाली डॉक्युमेंटरी फिल्म सुद्धा बनविण्यात आली आहे जी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये चमकली आहे. याच विक्रमादित्य व्यक्तिमत्वावर ‘कलष छलके’ ही कादंबरी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे.

भिडले, नडले आणि मग हरले..

भिडले, नडले आणि मग हरले.. नेपाळ अवघ्या ४ धावांनी इंग्लंडविरुध्द पराभूत स्वाती घोसाळकर मुंबई – अरबी समुद्रांच्या उसळणाऱ्या उंच लाटांपेक्षाही उत्तुंग उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या नेपाळच्या पाठीराख्यांच्या समोर नेपाळ बलाढ्य इंग्रजांना भिडले……

पवार राज्यसभेवर तर, ठाकरे विधानपरिषदेवर

पवार राज्यसभेवर तर,ठाकरे विधानपरिषदेवर सिध्देश शिगवण मुंबई : राज्याच्या राजकारणात दोन महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राज्याच्या राजकारणातील दोन बढे नेते पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात असणार आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार राज्यसभेतून…

पद्मश्री नामदेवराव ढसाळांच्या स्मृतीचा जागर

पद्मश्री नामदेवराव ढसाळांच्या स्मृतीचा जागर रमेश औताडे मुंबई : आपल्या धारधार शब्दांनी समाजातील विषमतेवर प्रहार करणाऱ्या विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळांच्या स्मृतीचा जागर पुण्यात करण्यात येणरा आहे. कुलस्वामिनी साहित्य परिषदतर्फे तिसरे विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव…

सावरकरांना भारत रत्न दिल्यास किताबाची प्रतिष्ठा वाढेल– भागवत

सावरकरांना भारत रत्न दिल्यास किताबाची प्रतिष्ठा वाढेल– भागवत संदीप चव्हाण मुंबई:  स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारत रत्न किताब दिल्यास या किताबाची प्रतिष्ठा वाढेल अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भावना व्यक्त…

 गरजू महिलांना घरघंटी, शिलाई मशीनचे वाटप

गरजू महिलांना घरघंटी, शिलाई मशीनचे वाटप शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविकेने सुरु केले विधायक कार्य मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या परंतु अद्यापही महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यात आलेली नाही. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ सारिका शशीकांत झोरे यांनी गरजू महिलांना मदतकार्य करण्याचे विधायक कार्य सुरु केले आहे. मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र.१२ बोरिवली आर मध्य विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांच्या माध्यमातून महिलांना घरघंटी, शिलाई मशीन, मसाला कांडप मशीनचे वाटप माजी महापौर, शिवसेनेच्या महानगरपालिका गटनेत्या सौ किशोरी पेडणेकर यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक शुभदा शिंदे, विधानसभा प्रमुख अशोक म्हामूणकर, विधानसभा निरीक्षक सिनेट सदस्य शशिकांत झोरे, नगरसेवक धरम काळे, माजी नगरसेवक सुजाता पाटेकर, चेतन कदम, सुनिल चव्हाण, सिनेट सदस्य मिलिंद साटम, सचिन मोरे, इतिश्री महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

एक देश एक परवान्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळणार

एक देश एक परवान्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळणार रमेश औताडे मुंबई : सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये खत विक्रीसाठी वेगवेगळे परवाने घ्यावे लागतात. त्यामुळे कंपन्यांना अडचणी येतात आणि त्याचा फटका अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांनाच बसतो. एकच राष्ट्रीय परवाना प्रणाली लागू झाल्यास देशभर एकसारखी, दर्जेदार आणि योग्य दरातील खते शेतकऱ्यांना सहज मिळू शकतील. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होऊन पीक उत्पादन वाढावे, यासाठी खत व सूक्ष्म पोषक तत्त्वांच्या धोरणात बदल होणे गरजेचे असल्याचे मत  परिषदेत व्यक्त करण्यात आले. ५ व ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे ही दोन दिवसांची परिषद झाली. परिषदेत बोलताना भारत सरकारचे कृषी आयुक्त डॉ. पी. के. सिंह यांनी सांगितले की, शेतीची खरी ताकद माती, पीक आणि शेतकरी यांच्यात आहे. माती निरोगी नसेल तर उत्पादन वाढणार नाही. त्यामुळे संतुलित खत वापर आणि एकात्मिक पोषण व्यवस्थापन  शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्री जयकुमार जितेंद्रसिंह रावल यांनी सांगितले की, सूक्ष्म खतांनी गेल्या अनेक वर्षांत पीक उत्पादन आणि गुणवत्तेत मोठी भर घातली आहे. शेतकरी, खत उत्पादक, बियाणे उद्योग आणि प्रक्रिया उद्योग यांनी एकत्र काम केल्यास शेती अधिक फायदेशीर होईल. सूक्ष्म खते, जैविक खते आणि विशेष खतांना जलद मंजुरी बनावट व निकृष्ट खते विकणाऱ्यांवर कडक कारवाई चांगल्या दर्जाच्या भारतीय खतांच्या निर्यातीला प्रोत्साहन नियम सोपे करून शेतकऱ्यांपर्यंत नव्या तंत्रज्ञानाचे फायदे पोहोचवणे एकूणच, या शिखर परिषदेत शेतकऱ्यांना योग्य खत, योग्य वेळी आणि योग्य दरात मिळावे, तसेच शेती शाश्वत व फायदेशीर व्हावी, यासाठी सरकार आणि उद्योगांनी एकत्र काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा

चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा युवा खेळाडू विवांश घोषचे शानदार यश मुंबई : नुकत्याच मरीन लाईन्स येथील विद्यापीठ क्रीडा संकुलात झालेल्या “चॅम्पियन्स ट्रॉफी तायक्वांडो” स्पर्धेत युवा तायक्वांडोपटू विवांश घोषने शानदार यश…

राष्ट्रीय आपत्तीच्या काळात इराणमध्ये बहाई समुदायावर दोषारोप

राष्ट्रीय आपत्तीच्या काळात इराणमध्ये बहाई समुदायावर दोषारोप रमेश औताडे मुंबई: इराणमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय संकटाच्या पार्श्वभूमीवर बहाई समुदायाला पुन्हा एकदा दोषारोपांचे लक्ष्य बनवले जात असून त्यांच्या विरोधात द्वेष भडकवला जात…

 डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर

डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित नाटक रंगभूमीवर २४ फेब्रुवारी रोजी ‘हेमूदादा’चा माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात प्रयोग मुंबई : बृहन्मुंबई गुजराती समाज, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची स्थापना करुन मुंबईत गुजराती समाज बांधवांना विविध व्यासपीठ उपलब्ध करुन देणारे, मराठी आणि गुजराती साहित्य निर्मिती मध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच सुमारे ६० वर्षांहून अधिक काळापासून कच्छशक्ती नियतकालिक अखंडपणे प्रकाशित करणारे डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ हे नाटक मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. वसंत मारु आणि कवल सावला लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग माटुंगा (पश्चिम) येथील यशवंत नाट्यगृहात रात्री ८.४५ वाजता होणार आहे. त्याचप्रमाणे या नाटकाचे प्रयोग २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झवेरबेन हॉल, घाटकोपर आणि २२ मार्च २०२६ रोजी न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातुश्री सभागृहात रात्री ८.४५ रोजी सादर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे २२मार्च रोजी डॉ. हेमराज शाह हे वयाची ८५ वर्षे पूर्ण करुन ८६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित हेमूदादा या नाटकाप्रमाणेच ‘डॉ. हेमराज शाह : एक समर्पित जीवन’ या शीर्षकाखाली डॉक्युमेंटरी फिल्म सुद्धा बनविण्यात आली आहे जी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये चमकली आहे. याच विक्रमादित्य व्यक्तिमत्वावर ‘कलष छलके’ ही कादंबरी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे.